पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )
आधीचा भाग येथे वाचू शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली.
"चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली.
सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.
पेरणा अर्थातच
(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )
मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
तुझ्या हातचे लाडू याला फार आवडतात असे म्हणून केलेले
दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..
कधी ब्यागेत भरते कोण जाणे!
श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे सर्वसामान्यपणे सत्पुरूषांमधे असते तसेच आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते.
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो.
अंदमान - निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेला व आजही तितकाच स्वच्छ व सुंदर असलेला द्वीपसमूह.
अरसिकालाही सौंदर्याची प्रेरणा देणारा हा आपला भूभाग; पण काळया पाण्याच्या शिक्षेवर दंडाबेडी घातली असताना अंदमानात पाऊल टाकणाऱ्या बॅरिस्टर सावरकरांना मात्र या ठिकाणी आढळले ते संरक्षणदृष्टया महत्वाचे असलेले हिंदुस्तानचे पूर्वेकडील प्रवेशद्वार.
पहिल्या महायुद्धाने तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अवयव प्रत्यारोपण, सुश्रुषा शास्त्र, उड्डयन तंत्र अशा अनेक शास्त्रीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवले तसेच व्यापार दळणवळण आर्थिक व्यवहार, अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि राजकारणह्या क्षेत्रावरही प्रभाव आणि दबाव टाकला. बरेचदा ह्यापैकी एका क्षेत्रातले बदल दुसर्या क्षेत्रावर परिणाम करत . प्रचार तंत्र किंवा प्रोपोगंडा हे एक असेच तंत्र ज्याला पहिल्या मह्युद्धात नावेच आयाम प्राप्त झाले. ह्या प्रचार तंत्राचा आणि ब्रिटीश नर्स एडिथ कॅवेल हिचा फार घनिष्ठ संबंध आहे तर आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने तिची हि हकीगत.
काश्मीर प्रिन्सेस : विस्मृतीत गेलेली विमान दुर्घटना (सत्यकथा)