पावसाळी भटकंती २०२४
पावसाळी भटकंती २०२४
ऑगस्टच्या दोन आठवड्यात भिवपुरी आणि नेरळ माथेरान भटकलो. त्याची क्षणचित्रे आणि चित्रपट.
पावसाळी भटकंती २०२४
ऑगस्टच्या दोन आठवड्यात भिवपुरी आणि नेरळ माथेरान भटकलो. त्याची क्षणचित्रे आणि चित्रपट.
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर.
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म.
***धर्मराज्य हरपले
युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली. महाभारताच्या सभापर्वातील वेदव्यासांचे ते उद्गार काळाची पावले ओळखणारे आहेत.
अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे.
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते !
संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास !
प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे .
अभ्यास केला पाहिजे .
कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .
यदा वै विजानात्यथ सत्यं वदति नविजान्नस्त्यं वदति विजन्नेव सत्यं वदति विज्ञानं त्वेव विज्यसितव्यमिति विज्ञानं भगवो विजिज्ञास इति ॥ 7.17.1 छांदोग्योपनिषद ॥