मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप

हेमंतकुमार ·

वैद्यकीय क्षेत्रात चाललेले संशोधन या कडे लक्ष नसते व सर्व सामान्य जनतेला काही घेणेदेणे नसते व या बद्दल चे अपडेट्स सर्व सामान्यांच्या भाषेत उपलब्ध ही नसतात. आपण नेमकी हीच उणीव भरून काढत अहात.प्रशंसनीय आहे. लेख आवडला. कृत्रिम मूत्रपिंड हे रिनल फेल्युअर वर वरदान व डायलेसिस पासुन मुक्ती देणार असे ऐकेले होते. त्यावर कुठपर्यंत प्रगती झाली आहे यावर थोडा प्रकाश टाकावा.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 19/12/2023 - 07:52
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! चांगला प्रश्न. The Kidney Project या नावाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमेरिकेत चालू आहे. त्यामध्ये कृत्रिम मूत्रपिंडाची प्राथमिक प्रारूपे तयार करून त्यांची चाचणी झालेली आहे. preclinical या पातळीवरील संशोधन झालेले आहे. आता प्रत्यक्ष रुग्णप्रयोग करण्यासाठी पुढील तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. त्यासाठी सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. * सध्या या उपचाराकडे डायलिसिस आणि खऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यांच्या दरम्यानची उपचार पायरी (bridge) म्हणून पाहिले जात आहे. * डायलिसिसपेक्षा या पद्धतीत होणारे फायदे असे आहेत : १. रुग्ण कुठल्याही निर्बंधाविना नेहमीचा आहार घेऊ शकतो २. या उपचारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी किंवा रक्तपातळ करणारी औषधे द्यावी लागत नाहीत. *अजून काही वर्षांत पुढील संशोधनातली प्रगती समजेल.

कुमार सरांच्या पोतडीमधुन आलेला अजुन एक उत्तम लेख!! सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत माहीती देणे ही खासियत याही लेखात दिसुन येते. नॅनो तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता ईतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही जोरदार प्रगती करत आहेत (अगदी स्टेथास्कोप सारख्या प्राथमिक गोष्टीतही) हे वाचुन आनंद झाला. एक शंका(रोगोपचार व प्रतिबंध) औषध निर्मिती करताना, ‘जर त्या प्रथिनाची निर्मितीच थांबवता आली तर?’ ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना? समजा--प्रथिने निर्मिती थांबली, रोग आटोक्यात आला, पण निर्मिती पुन्हा सुरु झालीच नाही/किवा कमीजास्त प्रमाणात झाली, तर? बाहेरील औषधाचा डोस कमीजास्त करता येईल, पण ईथे पेशीला दिलेली सूचना कशी रद्द करणार?

हेमंतकुमार 20/12/2023 - 19:42
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

हेमंतकुमार 20/12/2023 - 19:42
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

हेमंतकुमार 31/12/2023 - 09:38
१. लालपेशींच्या सिकलसेल या आजारावर जनुकीय संपादन उपचार उपलब्ध झाले आहेत. नुकतेच त्याला अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली. ‘exa-cel’ या प्रकारचे उपचार करून रुग्णाच्या मूळ रक्तपेशी सुधारित केल्या जातात. २. अंशतः चेहरा आणि संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण : ही एक अभूतपूर्व यशस्वी शस्त्रक्रिया अमेरिकेत पार पडली. एका विद्युत कर्मचाऱ्याचा चेहरा व डोळा काम करताना जळाला होता. त्याच्या बाबतीत हे मानवी प्रत्यारोपण करण्यात आले. डोळ्यातील फक्त corneaचे प्रत्यारोपण रूढ आहे परंतु या घटनेत संपूर्ण डोळा प्रथमच प्रत्यारोपित करण्यात आला आहे. अद्याप त्या रुग्णाला नव्या डोळ्यात दृष्टी आलेली नाही परंतु ती यथावकाश यावी अशी डॉक्टरांची अपेक्षा आहे.

वैद्यकीय क्षेत्रात चाललेले संशोधन या कडे लक्ष नसते व सर्व सामान्य जनतेला काही घेणेदेणे नसते व या बद्दल चे अपडेट्स सर्व सामान्यांच्या भाषेत उपलब्ध ही नसतात. आपण नेमकी हीच उणीव भरून काढत अहात.प्रशंसनीय आहे. लेख आवडला. कृत्रिम मूत्रपिंड हे रिनल फेल्युअर वर वरदान व डायलेसिस पासुन मुक्ती देणार असे ऐकेले होते. त्यावर कुठपर्यंत प्रगती झाली आहे यावर थोडा प्रकाश टाकावा.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 19/12/2023 - 07:52
अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! चांगला प्रश्न. The Kidney Project या नावाने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अमेरिकेत चालू आहे. त्यामध्ये कृत्रिम मूत्रपिंडाची प्राथमिक प्रारूपे तयार करून त्यांची चाचणी झालेली आहे. preclinical या पातळीवरील संशोधन झालेले आहे. आता प्रत्यक्ष रुग्णप्रयोग करण्यासाठी पुढील तंत्रज्ञान विकसित करायचे आहे. त्यासाठी सुमारे 12 ते 15 दशलक्ष डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. * सध्या या उपचाराकडे डायलिसिस आणि खऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यांच्या दरम्यानची उपचार पायरी (bridge) म्हणून पाहिले जात आहे. * डायलिसिसपेक्षा या पद्धतीत होणारे फायदे असे आहेत : १. रुग्ण कुठल्याही निर्बंधाविना नेहमीचा आहार घेऊ शकतो २. या उपचारानंतर शरीराची प्रतिकारशक्ती दाबणारी किंवा रक्तपातळ करणारी औषधे द्यावी लागत नाहीत. *अजून काही वर्षांत पुढील संशोधनातली प्रगती समजेल.

कुमार सरांच्या पोतडीमधुन आलेला अजुन एक उत्तम लेख!! सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत माहीती देणे ही खासियत याही लेखात दिसुन येते. नॅनो तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता ईतर सगळ्या क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातही जोरदार प्रगती करत आहेत (अगदी स्टेथास्कोप सारख्या प्राथमिक गोष्टीतही) हे वाचुन आनंद झाला. एक शंका(रोगोपचार व प्रतिबंध) औषध निर्मिती करताना, ‘जर त्या प्रथिनाची निर्मितीच थांबवता आली तर?’ ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना? समजा--प्रथिने निर्मिती थांबली, रोग आटोक्यात आला, पण निर्मिती पुन्हा सुरु झालीच नाही/किवा कमीजास्त प्रमाणात झाली, तर? बाहेरील औषधाचा डोस कमीजास्त करता येईल, पण ईथे पेशीला दिलेली सूचना कशी रद्द करणार?

हेमंतकुमार 20/12/2023 - 19:42
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

हेमंतकुमार 20/12/2023 - 19:42
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद !
ह्याचे साईड ईफेक्ट असतीलच ना?
प्रश्न चांगला आणि रास्त आहे. सध्या हे नवे तंत्रज्ञान तसे बाल्यावस्थेत आहे. त्याचे तोटे किंवा धोके समजून यायला काही काळ जावा लागणार आहे. या तंत्राने बनवलेली औषधे ठराविक डोस मध्ये आणि ठराविक काळच दिलीत. एखाद्या प्रथिनाची निर्मिती थांबवणे हे नेहमीच पूर्णपणे असते असे नाही; ते औषधाच्या डोसवर आणि कालावधीवर अवलंबून असते. पेशीला दिलेली सूचना कायमस्वरूपीच असेल असे नाही; किंबहुना ती कालमर्यादेतच राहते. या औषधांमुळे एलर्जी किंवा दीर्घकालीन जनुकीय बदल होऊ शकतील का, ही खरी सतावणारी समस्या आहे. अजून पुरेशा संशोधनानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल

हेमंतकुमार 31/12/2023 - 09:38
१. लालपेशींच्या सिकलसेल या आजारावर जनुकीय संपादन उपचार उपलब्ध झाले आहेत. नुकतेच त्याला अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली. ‘exa-cel’ या प्रकारचे उपचार करून रुग्णाच्या मूळ रक्तपेशी सुधारित केल्या जातात. २. अंशतः चेहरा आणि संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण : ही एक अभूतपूर्व यशस्वी शस्त्रक्रिया अमेरिकेत पार पडली. एका विद्युत कर्मचाऱ्याचा चेहरा व डोळा काम करताना जळाला होता. त्याच्या बाबतीत हे मानवी प्रत्यारोपण करण्यात आले. डोळ्यातील फक्त corneaचे प्रत्यारोपण रूढ आहे परंतु या घटनेत संपूर्ण डोळा प्रथमच प्रत्यारोपित करण्यात आला आहे. अद्याप त्या रुग्णाला नव्या डोळ्यात दृष्टी आलेली नाही परंतु ती यथावकाश यावी अशी डॉक्टरांची अपेक्षा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२३ ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षातील आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर यंदापासून चालू करतोय. त्यात आपण वैद्यकाच्या काही महत्वाच्या क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू. अशा विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो : • रोगनिदान पद्धती • रोगोपचार व प्रतिबंध • वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे • रोगनिदान पद्धती १. कर्करोगाचे अत्यंत लवकरच्या अवस्थेत(शून्यावस्था) निदान झाल्यास त्यावरील उपचार प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य सुसह्य होते. असे निदान करण्यासाठी सोप्या व सुटसुटीत चाचणीचा शोध गेली काही वर्षे चालू आहे.

दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन" ✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता" ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.

भूक आणि तृप्ती : हॉर्मोन्सची जुगलबंदी

हेमंतकुमार ·

Bhakti 16/10/2023 - 10:36
या दोन हॉर्मोन्सची माहिती नव्हती.इन्सुलिन आणि ग्लुकागोन सारखीच जोडी आहे.जागतिक अन्नदिनाच्या शुभेच्छा!

निनाद 16/10/2023 - 10:44
खूप छान लेख. पण vagus वर अजून थोडी माहिती हवी होती - का महत्त्वाची आहे या विषयी.

In reply to by निनाद

हेमंतकुमार 16/10/2023 - 11:21
vagus वर अजून थोडी माहिती
आपल्या मनात जेव्हा अन्न खावे हा विचार येतो तिथंपासून मेंदूमध्ये चलनवलन सुरू होते. अन्नाचे दर्शन, वास किंवा चव या सर्वांमुळे मेंदूमध्ये काही घडामोडी होतात. परिणामी तिथून संदेश निघून ते vagus nerve मार्फत जठराला पोहोचवले जातात. आता पुढे दोन घडामोडी होतात : १. जठरातील आम्लनिर्मिती पेशी थेट चेतवल्या जातात. २. जठरातून gastrin हे हार्मोन स्त्रवते. वरील दोन्ही क्रियांमुळे जठरातून पाचकस्त्राव वाढू लागतो, ज्यात मुख्यत्वे HCl हे आम्ल आणि pepsin या पाचक एंझाइमचा समावेश असतो.

कंजूस 16/10/2023 - 13:54
भारतात रात्रीचे जेवण असो किंवा दिवसाचे अर्धा पाऊण तासात उरकले जाते. (माझ्या समजेप्रमाणे). परदेशांत डिनर / डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील? तसेच करणारा जेवून ढेकर दिली की झाले हे इकडे. तिकडे ढेकरच बाद. घ्रेलीन संपल्यावर ढेकर येत असेल. "आता पान/कॉफी येऊ द्या ." (प्राण्यांचे काही वेगळे असावे. चरतात काही. थांबतच नाहीत. अवांतर)

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 16/10/2023 - 14:42
डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील?
हा तसा गुंतागुंतीचा मामला आहे ! सर्वसाधारणपणे काय होतं ते पाहू. जेवणानंतर ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते. त्याच प्रमाणात इन्सुलिनची पातळी देखील वाढते आणि त्याचबरोबर ghrelinची पातळी कमी होते. म्हणजेच, इन्सुलिन व ghrelin ही दोन्ही हार्मोन्स परस्परविरोधी आहेत. जेवणाचा वेग आणि वरील गोष्टींवर होणारा परिणाम या संदर्भात मर्यादित लोकांवर केलेला एक अभ्यास सापडला : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/20004655/ तिथे म्हटल्यानुसार, संथपणे जेवले असता ग्लुकोज आणि ghrelin हे दोन्ही बरेच वाढलेले राहिले. एकंदरीत वरील तीन घटकांच्या बाबतीत उलटसुलट निष्कर्ष काढलेले अभ्यास झालेत.

In reply to by मनो

हेमंतकुमार 16/10/2023 - 20:58
GLP-१ दोन नवीन औषधांवर
मुळात ही औषधे मधुमेहाशी संबंधित आहेत. या लेखाचा उद्देश Ghrelin व Leptin यांची मूलभूत माहिती हा असल्यामुळे इथे त्यांचा विचार केलेला नाही. भविष्यात मधुमेहावरील औषधे यावर वेगळे लिहायचे ठरल्यास तिथे ते योग्य होईल.

परिंदा 20/10/2023 - 08:16
उपवासामुळे Ghrelin चे प्रमाण वाढते का? या वाढलेल्या Ghrelin मुळे काही इतर फायदे होतात का? उदा: हृदय व रक्तवाहिन्यांची तंदुरुस्ती, चेतातंतू व स्नायूपेशींची निर्मिती वगैरे

In reply to by परिंदा

हेमंतकुमार 20/10/2023 - 09:04
मर्यादित उपासामुळे Ghrelin ची रक्तपातळी वाढते हे बरोबर. अशा वाढलेल्या पातळीमुळे मेदसाठे कमी होऊ शकतात आणि वजनही कमी होते. त्याचबरोबर शरीरातील पेशीचा इन्सुलिनला मिळणारा प्रतिसाद वाढतो. मात्र दीर्घकाळ उपास केल्यास Ghrelin ची पातळी कमी होते. या संदर्भात संशोधनांचे निष्कर्ष काहीसे उलट सुलट देखील आहेत. ठाम निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.

Bhakti 16/10/2023 - 10:36
या दोन हॉर्मोन्सची माहिती नव्हती.इन्सुलिन आणि ग्लुकागोन सारखीच जोडी आहे.जागतिक अन्नदिनाच्या शुभेच्छा!

निनाद 16/10/2023 - 10:44
खूप छान लेख. पण vagus वर अजून थोडी माहिती हवी होती - का महत्त्वाची आहे या विषयी.

In reply to by निनाद

हेमंतकुमार 16/10/2023 - 11:21
vagus वर अजून थोडी माहिती
आपल्या मनात जेव्हा अन्न खावे हा विचार येतो तिथंपासून मेंदूमध्ये चलनवलन सुरू होते. अन्नाचे दर्शन, वास किंवा चव या सर्वांमुळे मेंदूमध्ये काही घडामोडी होतात. परिणामी तिथून संदेश निघून ते vagus nerve मार्फत जठराला पोहोचवले जातात. आता पुढे दोन घडामोडी होतात : १. जठरातील आम्लनिर्मिती पेशी थेट चेतवल्या जातात. २. जठरातून gastrin हे हार्मोन स्त्रवते. वरील दोन्ही क्रियांमुळे जठरातून पाचकस्त्राव वाढू लागतो, ज्यात मुख्यत्वे HCl हे आम्ल आणि pepsin या पाचक एंझाइमचा समावेश असतो.

कंजूस 16/10/2023 - 13:54
भारतात रात्रीचे जेवण असो किंवा दिवसाचे अर्धा पाऊण तासात उरकले जाते. (माझ्या समजेप्रमाणे). परदेशांत डिनर / डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील? तसेच करणारा जेवून ढेकर दिली की झाले हे इकडे. तिकडे ढेकरच बाद. घ्रेलीन संपल्यावर ढेकर येत असेल. "आता पान/कॉफी येऊ द्या ." (प्राण्यांचे काही वेगळे असावे. चरतात काही. थांबतच नाहीत. अवांतर)

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 16/10/2023 - 14:42
डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील?
हा तसा गुंतागुंतीचा मामला आहे ! सर्वसाधारणपणे काय होतं ते पाहू. जेवणानंतर ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते. त्याच प्रमाणात इन्सुलिनची पातळी देखील वाढते आणि त्याचबरोबर ghrelinची पातळी कमी होते. म्हणजेच, इन्सुलिन व ghrelin ही दोन्ही हार्मोन्स परस्परविरोधी आहेत. जेवणाचा वेग आणि वरील गोष्टींवर होणारा परिणाम या संदर्भात मर्यादित लोकांवर केलेला एक अभ्यास सापडला : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/20004655/ तिथे म्हटल्यानुसार, संथपणे जेवले असता ग्लुकोज आणि ghrelin हे दोन्ही बरेच वाढलेले राहिले. एकंदरीत वरील तीन घटकांच्या बाबतीत उलटसुलट निष्कर्ष काढलेले अभ्यास झालेत.

In reply to by मनो

हेमंतकुमार 16/10/2023 - 20:58
GLP-१ दोन नवीन औषधांवर
मुळात ही औषधे मधुमेहाशी संबंधित आहेत. या लेखाचा उद्देश Ghrelin व Leptin यांची मूलभूत माहिती हा असल्यामुळे इथे त्यांचा विचार केलेला नाही. भविष्यात मधुमेहावरील औषधे यावर वेगळे लिहायचे ठरल्यास तिथे ते योग्य होईल.

परिंदा 20/10/2023 - 08:16
उपवासामुळे Ghrelin चे प्रमाण वाढते का? या वाढलेल्या Ghrelin मुळे काही इतर फायदे होतात का? उदा: हृदय व रक्तवाहिन्यांची तंदुरुस्ती, चेतातंतू व स्नायूपेशींची निर्मिती वगैरे

In reply to by परिंदा

हेमंतकुमार 20/10/2023 - 09:04
मर्यादित उपासामुळे Ghrelin ची रक्तपातळी वाढते हे बरोबर. अशा वाढलेल्या पातळीमुळे मेदसाठे कमी होऊ शकतात आणि वजनही कमी होते. त्याचबरोबर शरीरातील पेशीचा इन्सुलिनला मिळणारा प्रतिसाद वाढतो. मात्र दीर्घकाळ उपास केल्यास Ghrelin ची पातळी कमी होते. या संदर्भात संशोधनांचे निष्कर्ष काहीसे उलट सुलट देखील आहेत. ठाम निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवी शरीरात स्रवणाऱ्या अनेक रसायनांमध्ये हॉर्मोन्सचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म प्रमाणात स्त्रवणारी हॉर्मोन्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणा एखाद्या चमत्काराप्रमाणे नियंत्रित करतात. आपल्या शरीरात जवळपास ६० हार्मोन्स विविध अवयवांत कार्यरत आहेत. त्यापैकी इन्सुलिन, थायरॉईड आणि ॲड्रीनल ग्रंथींच्या दमदार हार्मोन्सचा परिचय वाचकांना यापूर्वी करून दिलेला आहे. अन्न ही आपली मूलभूत गरज. भूक लागली की आपण खातो आणि खाता खाता तृप्तीची भावना झाली की खाणे थांबवतो. या दृष्टीने भूक आणि तृप्ती या दोन अतिशय महत्त्वाच्या संवेदना आहेत.

‘निपा’ विषाणूचा अतिघातक आजार

हेमंतकुमार ·

गवि 04/10/2023 - 11:25
आता ही काय नसती पीडा..!! हे राम. नीरा पिणे देखील अवघड झाले की. विषाणू इतका घातक आहे पण तुलनेत पसरत मात्र नाहीये ते बरे आहे. असे का होत असावे. म्हणजे नकोच पसरायला.. पण पुन्हा ते लॉक डाऊन वगैरे स्थिती येण्याची कितपत शक्यता या निपामुळे?

In reply to by गवि

हेमंतकुमार 04/10/2023 - 11:38
काळजीचे कारण नाही. काही दिवसांपूर्वीच तो केरळमध्ये मर्यादित स्वरूपात आला आणि परिस्थिती चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान दक्षिणेकडील वृत्तमाध्यमांमध्ये त्या बातम्या सतत झळकत होत्या. हा आजार केरळमध्येच अधूनमधून का येतो यावर पत्रकारांचा थोडाफार काथ्याकूटही झाला होता. तिथल्या एका जिल्ह्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवल्या होत्या. आपल्याकडे उत्सवी वातावरण असल्याने त्या काळात मी संयम ठेवून या विषयावर लिहिणे टाळले. आताचे लेखन फक्त एका संसर्गजन्य रोगाची नोंद / माहिती देणे इतक्याच हेतूने केलेले आहे.

Bhakti 04/10/2023 - 12:09
२०१८ मध्ये निपा विषयी बातम्या यायच्या ते आठवलं.तुम्ही लिहिलेल्या रेबीज लेखाचा दुवा (लिंक)द्याल का?

आज किवा कालच्या पेपरमध्ये या विषाणु ची तुलना, कोविड्,सार्स्,ईबोला वगैरे शी केलेली आढळली. ती गुण साधर्म्यामुळे की संहारकतेमुळे? बाकी लेख नेहमीसारखाच माहितीपुर्ण आहे. शेवटचा फोटो आवडला :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 04/10/2023 - 13:23
या विषाणुची तुलना, कोविड्,सार्स्, ईबोला
हे तिघेही आरएनए या जमातीचे आहेत तसेच ते फ्रुट बॅट या वटवाघळापासून मानवात येतात

निपा आणि झिका यांच्याबाबतीत असं वाचलं होतं, की हे विषाणूजन्य आजार जास्त संहारक असल्याने त्यांचा प्रसार मर्यादित राहतो. म्हणजे बाधित व्यक्ती जर लवकर मृत्यूमुखी पडली तर विषाणूला प्रसार व्हायला कमी संधी मिळते. जर विषाणू जास्त संहारक नसेल (समजा बाधितांमधील मृत्यूदर १०% हून कमी - उदा कोविड१९) तर विषाणूसंसर्ग झालेले जास्त लोक प्रसार करण्यासाठी उपलब्ध असतील आणि विषाणू जास्त पसरेल. म्हणजे संसर्ग जास्त लोकांना म्हणजे विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 05/10/2023 - 12:50
विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?
प्रश्न अतिशय चांगला आहे. वरवर पाहता त्या दोन गोष्टींचे प्रमाण व्यस्त असेल असे वाटते, पण हा मुद्दा इतका सोपा नसून गुंतागुंतीचा आहे ! एखाद्या आजाराची संसर्गक्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काही प्रमुख पाहू : १. प्रसारगती : इथे त्या आजाराचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर (RO) पाहावा लागतो. म्हणजे, एक बाधित व्यक्ती तो आजार किती निरोगी लोकांना पसरवू शकते? २. संसर्गची तीव्रता (contagiousness) : म्हणजे, बाधिताच्या निव्वळ जवळ उभे राहिले असता प्रसार होऊ शकतो, की बाधित वारंवार जोरात शिंकल्यास/ खोकल्यास मगच प्रसार होऊ शकतो?.. इत्यादी ३. लक्षणविरहित किंवा लक्षणपूर्व बाधित लोक त्या रोगाचा प्रसार करू शकतात किंवा नाही? जो आजार पुरेसा गंभीर झाल्यावरच लक्षात येतो ( किंवा पसरू शकतो) त्याच्या बाबतीत रोग्याचे विलगीकरण करणेही सोपे जाते. ४. एखाद्या रोगाची अस्तित्वात असलेली समाज-प्रतिकारशक्ती : म्हणजे, पूर्वी त्याचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे किंवा नाही... इत्यादी इत्यादी सारांश : Not all serious infectious diseases spread less.

नठ्यारा 05/10/2023 - 19:28
निपा हा एक क्षुल्लक विषाणू आहे. खरोखर भयानक घातक मिपा नावाचा विषाणू आहे. त्याने एकदा दंश केला की माणूस मरेपर्यंत त्याच्या आधीन राहतो. औषध वगैरे विसरावे लागते. - नाठाळ नठ्या

गवि 04/10/2023 - 11:25
आता ही काय नसती पीडा..!! हे राम. नीरा पिणे देखील अवघड झाले की. विषाणू इतका घातक आहे पण तुलनेत पसरत मात्र नाहीये ते बरे आहे. असे का होत असावे. म्हणजे नकोच पसरायला.. पण पुन्हा ते लॉक डाऊन वगैरे स्थिती येण्याची कितपत शक्यता या निपामुळे?

In reply to by गवि

हेमंतकुमार 04/10/2023 - 11:38
काळजीचे कारण नाही. काही दिवसांपूर्वीच तो केरळमध्ये मर्यादित स्वरूपात आला आणि परिस्थिती चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान दक्षिणेकडील वृत्तमाध्यमांमध्ये त्या बातम्या सतत झळकत होत्या. हा आजार केरळमध्येच अधूनमधून का येतो यावर पत्रकारांचा थोडाफार काथ्याकूटही झाला होता. तिथल्या एका जिल्ह्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवल्या होत्या. आपल्याकडे उत्सवी वातावरण असल्याने त्या काळात मी संयम ठेवून या विषयावर लिहिणे टाळले. आताचे लेखन फक्त एका संसर्गजन्य रोगाची नोंद / माहिती देणे इतक्याच हेतूने केलेले आहे.

Bhakti 04/10/2023 - 12:09
२०१८ मध्ये निपा विषयी बातम्या यायच्या ते आठवलं.तुम्ही लिहिलेल्या रेबीज लेखाचा दुवा (लिंक)द्याल का?

आज किवा कालच्या पेपरमध्ये या विषाणु ची तुलना, कोविड्,सार्स्,ईबोला वगैरे शी केलेली आढळली. ती गुण साधर्म्यामुळे की संहारकतेमुळे? बाकी लेख नेहमीसारखाच माहितीपुर्ण आहे. शेवटचा फोटो आवडला :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 04/10/2023 - 13:23
या विषाणुची तुलना, कोविड्,सार्स्, ईबोला
हे तिघेही आरएनए या जमातीचे आहेत तसेच ते फ्रुट बॅट या वटवाघळापासून मानवात येतात

निपा आणि झिका यांच्याबाबतीत असं वाचलं होतं, की हे विषाणूजन्य आजार जास्त संहारक असल्याने त्यांचा प्रसार मर्यादित राहतो. म्हणजे बाधित व्यक्ती जर लवकर मृत्यूमुखी पडली तर विषाणूला प्रसार व्हायला कमी संधी मिळते. जर विषाणू जास्त संहारक नसेल (समजा बाधितांमधील मृत्यूदर १०% हून कमी - उदा कोविड१९) तर विषाणूसंसर्ग झालेले जास्त लोक प्रसार करण्यासाठी उपलब्ध असतील आणि विषाणू जास्त पसरेल. म्हणजे संसर्ग जास्त लोकांना म्हणजे विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 05/10/2023 - 12:50
विषाणूची संहारकता (Mortality Rate) आणि प्रसारक्षमता हे परस्परांशी व्यस्त प्रमाणात असतात, असं काहीसं असतं का?
प्रश्न अतिशय चांगला आहे. वरवर पाहता त्या दोन गोष्टींचे प्रमाण व्यस्त असेल असे वाटते, पण हा मुद्दा इतका सोपा नसून गुंतागुंतीचा आहे ! एखाद्या आजाराची संसर्गक्षमता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी काही प्रमुख पाहू : १. प्रसारगती : इथे त्या आजाराचा बेसिक रिप्रोडक्शन नंबर (RO) पाहावा लागतो. म्हणजे, एक बाधित व्यक्ती तो आजार किती निरोगी लोकांना पसरवू शकते? २. संसर्गची तीव्रता (contagiousness) : म्हणजे, बाधिताच्या निव्वळ जवळ उभे राहिले असता प्रसार होऊ शकतो, की बाधित वारंवार जोरात शिंकल्यास/ खोकल्यास मगच प्रसार होऊ शकतो?.. इत्यादी ३. लक्षणविरहित किंवा लक्षणपूर्व बाधित लोक त्या रोगाचा प्रसार करू शकतात किंवा नाही? जो आजार पुरेसा गंभीर झाल्यावरच लक्षात येतो ( किंवा पसरू शकतो) त्याच्या बाबतीत रोग्याचे विलगीकरण करणेही सोपे जाते. ४. एखाद्या रोगाची अस्तित्वात असलेली समाज-प्रतिकारशक्ती : म्हणजे, पूर्वी त्याचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले आहे किंवा नाही... इत्यादी इत्यादी सारांश : Not all serious infectious diseases spread less.

नठ्यारा 05/10/2023 - 19:28
निपा हा एक क्षुल्लक विषाणू आहे. खरोखर भयानक घातक मिपा नावाचा विषाणू आहे. त्याने एकदा दंश केला की माणूस मरेपर्यंत त्याच्या आधीन राहतो. औषध वगैरे विसरावे लागते. - नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे. रोगाचा जागतिक इतिहास या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता.

एल-निनो : बिघडलेले आरोग्य आणि संभाव्य धोके

हेमंतकुमार ·

पण कुमार सरांचा व्यासंग लक्षात घेता लेखाची लांबी कमी वाटली. सुरुवातीचा वरण भात झाला आणि एक्दम जेवणच संपले :) एल निनोशी संबंधित अजुन काही पैलु वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

हेमंतकुमार 29/09/2023 - 13:12
लेखाच्या लांबीविषयीचा मुद्दा मान्य आहे. तो मूळ अहवाल तब्बल 39 पानी आहे. फार सविस्तर लिहिले तर ते रुक्ष आणि कंटाळवाणे वाटेल असा माझा समज होता... :)

हेमंतकुमार 16/11/2023 - 14:42
Arboviral आजार
केरळ व कर्नाटक पाठोपाठ आता Zika विषाणू पुण्यात दाखल. आरोग्य परिस्थिती नियंत्रणात आहे. डास -नियंत्रण महत्त्वाचे. गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्याची गरज.

पण कुमार सरांचा व्यासंग लक्षात घेता लेखाची लांबी कमी वाटली. सुरुवातीचा वरण भात झाला आणि एक्दम जेवणच संपले :) एल निनोशी संबंधित अजुन काही पैलु वाचायला मिळतील अशी अपेक्षा.

हेमंतकुमार 29/09/2023 - 13:12
लेखाच्या लांबीविषयीचा मुद्दा मान्य आहे. तो मूळ अहवाल तब्बल 39 पानी आहे. फार सविस्तर लिहिले तर ते रुक्ष आणि कंटाळवाणे वाटेल असा माझा समज होता... :)

हेमंतकुमार 16/11/2023 - 14:42
Arboviral आजार
केरळ व कर्नाटक पाठोपाठ आता Zika विषाणू पुण्यात दाखल. आरोग्य परिस्थिती नियंत्रणात आहे. डास -नियंत्रण महत्त्वाचे. गरोदर स्त्रियांची विशेष काळजी घेण्याची गरज.
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे.

जुलाबावरील जीवरक्षक प्रथमोपचाराचा मौलिक शोध

हेमंतकुमार ·

टर्मीनेटर 19/07/2023 - 17:02
रोचक माहिती! पद्मविभूषण डॉ. दिलीप महालनबीस ह्यांची सामाजिक आरोग्य सेवा अतुलनीय आहे, त्यांना भावपुर्ण आदरांजली 🙏

कुमार सरांच्या सिद्धहस्त लेखणीतुन उतरलेला अजुन एक माहीतीपूर्ण लेख. सोप्या भाषेत असे विषय समजवुन सांगण्याची हातोटी फार कमी जणांकडे असते. "महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण. त्यांच्या कार्याला सलाम!!

हेमंतकुमार 19/07/2023 - 20:43
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
"महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण.
>>> बरोबर. बंगाली उच्चारांची ती खासियत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात " ****नवीस /नीस" असे बरेच असतात.

हेमंतकुमार 25/07/2023 - 10:21
नॉर्मल फ्लोरा वर काही लिहायला
हा विषय या आधी अन्य एका सभासदांनी पण सुचवलेला आहे आणि मी तो प्रतीक्षा यादीत ठेवला आहे. बघूया, पुढच्या वर्षी प्रयत्न करतो.

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 29/07/2023 - 08:13
आजकाल "गट बॅक्टेरिया" चा खूप बोलबाला आहे. काही मंडळींचा human microbiome हा शरीराचा एक अवयवच समजावा असा आग्रह आहे. नक्की लिहा. वाचायला आवडेल.

या संदर्भात दोन आठवणी आल्या .... १. १ लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात एक खडा गूळ आणि चमचाभर मीठ विरघळवून बालकांस द्यावे असे दूरचित्रवाणीवर त्या काळात वारंवार सांगितले जात असे. २. क्लोरोडाईन बीपीसी (ब्रिटीश फार्मास्युटीकल कोडेक्स) यात टिंक्चर ओपियमचा वापर केलेला आहे. त्यासोबत क्लोरोफॉर्म आणि अ‍ॅनास्थेटीक ईथर अणि ज्येष्टीमध संपृक्तअर्क यांचा विशिष्ट प्रमाणात भाग होता आणि केवळ १० थेंब पाण्यात मिसळून घेण्याचे प्रमाण होते असे अंधुकसे आठवते आहे. १० मिलीच्या काचेच्या छोट्या बाटल्यात हे भरले जाई. हे (बहुधा यातील ओपियममधील मॉर्फीनमुळे) गुणकारी असल्यामुळे फार विकले जात असे. नंतर याचा वापर नशेसाठी सुरू झाल्यामुळे बहुतेक देशात या उत्पादनावर पूर्ण बंदी आली. बीपीसी १९७३ हे प्रमाण पुस्तक त्यासाठी मी वापरलेले आहे. त्यात हे बनविण्याची पूर्ण कृती दिलेली होती. असो. एका इतिहासजमा उत्पादनाची आठवण झाली. धन्यवाद.

हेमंतकुमार 29/07/2023 - 21:16
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
क्लोरोडाईन बीपीसी
चांगली आठवण.

हेमंतकुमार 29/07/2023 - 21:16
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
क्लोरोडाईन बीपीसी
चांगली आठवण.

गवि 30/07/2023 - 09:34
अत्यंत रोचक आणि तपशीलवार लेख. सामान्य मनुष्याला असा प्रश्न मात्र पडू शकतो की मीठ साखर पाणी हा फॉर्म्युला (फक्त वजनाचे प्रमाण योग्य ठरवणे) इतक्या साध्या सोल्युषनसाठी इतकी दशके मोठेमोठे संशोधन आणि अथक परिश्रम करावे लागले? असे असेल तर उगीच क्लिष्ट किचकट उपाय आगोदर ट्राय करून साधे सोपे सरळ उपाय मात्र नंतर आजमावले गेले असं म्हणता येईल का? सिंपल थिंकिंग इज रेअर, असं नेहमी वाटत आलं आहे त्याचं एक आणखी उदाहरण?

हेमंतकुमार 30/07/2023 - 10:44
गवि, अतिशय चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. गतवर्षी जेव्हा डॉ. महालनबीस यांचे निधन झाले तेव्हा मी दोघातिघा परिचिताना या विषयाबद्दल बोललो. त्यांच्याकडूनही हाच प्रश्न आला, “ साध्याशा तीन गोष्टींच्या मिश्रणासाठी इतकी वर्ष संशोधनासाठी लागतात ?” या लेखासाठी जो मुख्य संदर्भ ( 1) वापरलेला आहे त्यात या सगळ्या संशोधनामागच्या मानवी प्रवृत्तींचा इतिहास दिलेला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यातली काही निवडक वाक्ये खाली उद्धृत करतो आहे. ( मुळात ही संकल्पना सन 1830 पासूनच अस्तित्वात होती. परंतु इतका सोपा घरगुती उपचार हा काय ‘उपचार’ असतो का, ह्या प्रवृत्तीमुळे हे प्रकरण खूप लांबले गेलेले दिसते). JOSHUA NALIBOW RUXIN असे म्हणतात :
The simplicity of ORT contrasts starkly with the story of its discovery which overflows with abrasive personalities, professional jealousies, and scientific breakthroughs, as well as with an unusual degree of scientific co-operation…... Furthermore, it demonstrates how the prejudices of the medical establishment and its reverence for advanced technology can postpone life-saving discoveries... …. The formidable and persistent ignorance of the Western medical establishment, which continues over twenty-five years after the discovery of ORT, is phenomenal. While its refusal to advocate ORT may be due in part to the notion that ORT is only necessary for people in the developing world, its actions appear to be driven also by financial considerations.

टर्मीनेटर 19/07/2023 - 17:02
रोचक माहिती! पद्मविभूषण डॉ. दिलीप महालनबीस ह्यांची सामाजिक आरोग्य सेवा अतुलनीय आहे, त्यांना भावपुर्ण आदरांजली 🙏

कुमार सरांच्या सिद्धहस्त लेखणीतुन उतरलेला अजुन एक माहीतीपूर्ण लेख. सोप्या भाषेत असे विषय समजवुन सांगण्याची हातोटी फार कमी जणांकडे असते. "महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण. त्यांच्या कार्याला सलाम!!

हेमंतकुमार 19/07/2023 - 20:43
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
"महालनोबिस" असेही म्हणतात काहीजण.
>>> बरोबर. बंगाली उच्चारांची ती खासियत आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात " ****नवीस /नीस" असे बरेच असतात.

हेमंतकुमार 25/07/2023 - 10:21
नॉर्मल फ्लोरा वर काही लिहायला
हा विषय या आधी अन्य एका सभासदांनी पण सुचवलेला आहे आणि मी तो प्रतीक्षा यादीत ठेवला आहे. बघूया, पुढच्या वर्षी प्रयत्न करतो.

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 29/07/2023 - 08:13
आजकाल "गट बॅक्टेरिया" चा खूप बोलबाला आहे. काही मंडळींचा human microbiome हा शरीराचा एक अवयवच समजावा असा आग्रह आहे. नक्की लिहा. वाचायला आवडेल.

या संदर्भात दोन आठवणी आल्या .... १. १ लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात एक खडा गूळ आणि चमचाभर मीठ विरघळवून बालकांस द्यावे असे दूरचित्रवाणीवर त्या काळात वारंवार सांगितले जात असे. २. क्लोरोडाईन बीपीसी (ब्रिटीश फार्मास्युटीकल कोडेक्स) यात टिंक्चर ओपियमचा वापर केलेला आहे. त्यासोबत क्लोरोफॉर्म आणि अ‍ॅनास्थेटीक ईथर अणि ज्येष्टीमध संपृक्तअर्क यांचा विशिष्ट प्रमाणात भाग होता आणि केवळ १० थेंब पाण्यात मिसळून घेण्याचे प्रमाण होते असे अंधुकसे आठवते आहे. १० मिलीच्या काचेच्या छोट्या बाटल्यात हे भरले जाई. हे (बहुधा यातील ओपियममधील मॉर्फीनमुळे) गुणकारी असल्यामुळे फार विकले जात असे. नंतर याचा वापर नशेसाठी सुरू झाल्यामुळे बहुतेक देशात या उत्पादनावर पूर्ण बंदी आली. बीपीसी १९७३ हे प्रमाण पुस्तक त्यासाठी मी वापरलेले आहे. त्यात हे बनविण्याची पूर्ण कृती दिलेली होती. असो. एका इतिहासजमा उत्पादनाची आठवण झाली. धन्यवाद.

हेमंतकुमार 29/07/2023 - 21:16
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
क्लोरोडाईन बीपीसी
चांगली आठवण.

हेमंतकुमार 29/07/2023 - 21:16
अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद.
क्लोरोडाईन बीपीसी
चांगली आठवण.

गवि 30/07/2023 - 09:34
अत्यंत रोचक आणि तपशीलवार लेख. सामान्य मनुष्याला असा प्रश्न मात्र पडू शकतो की मीठ साखर पाणी हा फॉर्म्युला (फक्त वजनाचे प्रमाण योग्य ठरवणे) इतक्या साध्या सोल्युषनसाठी इतकी दशके मोठेमोठे संशोधन आणि अथक परिश्रम करावे लागले? असे असेल तर उगीच क्लिष्ट किचकट उपाय आगोदर ट्राय करून साधे सोपे सरळ उपाय मात्र नंतर आजमावले गेले असं म्हणता येईल का? सिंपल थिंकिंग इज रेअर, असं नेहमी वाटत आलं आहे त्याचं एक आणखी उदाहरण?

हेमंतकुमार 30/07/2023 - 10:44
गवि, अतिशय चांगला मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे. गतवर्षी जेव्हा डॉ. महालनबीस यांचे निधन झाले तेव्हा मी दोघातिघा परिचिताना या विषयाबद्दल बोललो. त्यांच्याकडूनही हाच प्रश्न आला, “ साध्याशा तीन गोष्टींच्या मिश्रणासाठी इतकी वर्ष संशोधनासाठी लागतात ?” या लेखासाठी जो मुख्य संदर्भ ( 1) वापरलेला आहे त्यात या सगळ्या संशोधनामागच्या मानवी प्रवृत्तींचा इतिहास दिलेला आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यातली काही निवडक वाक्ये खाली उद्धृत करतो आहे. ( मुळात ही संकल्पना सन 1830 पासूनच अस्तित्वात होती. परंतु इतका सोपा घरगुती उपचार हा काय ‘उपचार’ असतो का, ह्या प्रवृत्तीमुळे हे प्रकरण खूप लांबले गेलेले दिसते). JOSHUA NALIBOW RUXIN असे म्हणतात :
The simplicity of ORT contrasts starkly with the story of its discovery which overflows with abrasive personalities, professional jealousies, and scientific breakthroughs, as well as with an unusual degree of scientific co-operation…... Furthermore, it demonstrates how the prejudices of the medical establishment and its reverence for advanced technology can postpone life-saving discoveries... …. The formidable and persistent ignorance of the Western medical establishment, which continues over twenty-five years after the discovery of ORT, is phenomenal. While its refusal to advocate ORT may be due in part to the notion that ORT is only necessary for people in the developing world, its actions appear to be driven also by financial considerations.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" या शासकीय जाहिरातीने आपल्या सामाजिक आरोग्य क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवलेले आहे. अतिशय सोपा असलेला हा घरगुती प्रथमोपचार म्हणजे जुलाबाच्या रुग्णांसाठी वरदान असते. जुलाब ही पचनसंस्थेशी संबंधित असलेली समस्या जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते. मुळात जुलाब हा ‘आजार’ नाही, परंतु ते काही आजारांचे एक लक्षण आहे. विविध प्रकारचे सूक्ष्मजीव संसर्ग आणि अन्नातून झालेली विषबाधा ही त्याची प्रमुख कारणे. जुलाबाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे चयापचय आणि रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.

स्तनांचा कर्करोग : धोका कुणाला व किती ?

हेमंतकुमार ·

नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि मननीय लेख आहे. नात्यात स्तन कर्करोगाशी सामना करुन आता सुरळीत जीवन जगणार्‍या २ स्त्रिया आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल किंचित माहिती आहे. पण तुमचा लेख वाचुन बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या. अवघड विषय सोपा करुन सांगतो तोच खरा शिक्षक आणि अवघड विषय सोपे करुन लिहितात ते कुमार सर _/\_ _/\_ एक प्रश्न-- हा अवयव शरीराबाहेर असल्याने तो सरळ काढुन रोगापासुन मुक्ती मिळवता येते त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 04/07/2023 - 19:44
त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?
>>> नाही. हा अवयव तशा अर्थाने ‘शरीरातच’ आहे. त्याच्या अगदी सुरवातीच्या स्टेज दरम्यान लक्षात आला तर शस्त्रक्रिया प्रभावी ठरते. पण लक्षात येतानाच तो थोडा जरी ‘पसरला’ असेल तर ‘मुक्ती’ मिळेलच असे नाही. तसेच उपचारानंतरही recurrence होतो की नाही यावर बारीक लक्ष द्यावे लागते. .. विनंती : उपचार हा विशेषतज्ज्ञांचा प्रांत असल्यामुळे त्यावर शक्यतो मी काही अधिक भाष्य करणार नाही. कारणमीमांसा या पैलूवर हवी तितकी चर्चा व्हावी.

Bhakti 04/07/2023 - 19:02
पूर्वी हा कर्करोग परदेशात जास्त असायचा,पण आता भारतातही अधिक दिसतो, यातून मुक्त झालेलेही अनेक आहेत.
केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे कसे काय? काही एक्सटरनल फक्टरही इन्फेक्शन करून स्तनांना गाठी येतात.अर्थात अन्टीबायोटिक/औषधांनी बरी होते हे पण पाहिलेय.ते कदाचित स्तनाच्या काही पोरस भागामुळे?आणि इतर सिक्रीशनमुळे असेल का?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 04/07/2023 - 19:48
केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने : हे कसे काय?
>>> केसांच्या विविध सौंदर्यवर्धकांमध्ये काही ना काही रसायने असतात. त्यातील काहींमुळे शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच काहींमुळे डीएनएच्या पातळीवर इजा होऊन जनुकबदल होतात. अर्थात यामुळे संभवणारा धोका "साधारण" गटात मोडतो हे लेखात दिले आहे. रसायनांचा हॉर्मोनवरील परिणाम याचा आढावा यापूर्वी इथे घेतलेला आहे

गवि 04/07/2023 - 20:21
माहितीपूर्ण लेख. रिस्क फॅक्टर्सची इतकी लांबलचक यादी असून देखील त्या मानाने बऱ्याच स्त्रिया अजून हयात आहेत हे पाहून हायसे वाटले. जवळपास प्रत्येक गोष्टीने या ना त्या कर्करोगाचा काही टक्के धोका आहेच असे असेल तर त्या मानाने प्रीव्हेलंस फारच कमी दिसतो. मग टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?

In reply to by गवि

हेमंतकुमार 04/07/2023 - 20:42
टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?
निव्वळ एखाद्या शरीरधर्मातील साधारण घटकामुळे कर्करोग होतो असे अजिबात नाही. धोका मापनाचे गुण काढताना सर्वाधिक धोकादायकनाच महत्व येते. उदा : निव्वळ अंदाज म्हणून धोक्याचे गुण असे दिले जातील : 1. बालपणात काढले गेलेले छातीचे बरेच एक्स-रे : 22 ते 40 2. आनुवंशिकता आणि विशिष्ट जनुकीय बिघाड : १५ 3. इथून पुढे उतरत्या क्रमाने त्या लेखातील उतरंडीनुसार गुण कमी कमी होत जातील हे उघड आहे. या क्षेत्रातही मशीन लर्निंग येऊ घातलेले आहे. त्या तंत्रज्ञानात शरीरधर्मासंबंधी आणि जीवन शैलीसंबंधी विविध गुण देऊन एकत्रित विचार करून धोका काढला जातो.

कर्क रोग झाला. निदान आणी उपाय केल्यानंतर पुर्ण पणे ठिक झाला. विस वर्ष इतर रोग्यांना समुपदेशन केले. पण शेवटी त्याच रोगाने तडकाफडकी वर्षभरात ज्योत मालवली. कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही. बाकी लेख चांगला आहे हे वादातीत.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 05/07/2023 - 07:53
उपचारानंतर लक्षणे नाहीशी झाली की वरकरणी कर्करोग 'बरा झाला" असे म्हटले जाते. अर्थात पेशींच्या सूक्ष्म पातळीवर काय दडून राहिलेले आहे हे वरून समजण्यास मार्ग नसतो. उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे जीवनशैली खालील प्रमाणे असावी. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की, कितीही आरोग्यदायी जीवनशैली ठेवली तरी पूर्वी झालेला कर्करोग पुन्हा उद्भवणारच नाही असे नसते; दोन्ही शक्यता राहतात. उपाय: १. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित अंतराने त्यांना तब्येत दाखवत राहणे. कुठल्याही प्रकारची रोगसदृश्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या त्वरित कानावर घालणे. रोगाच्या प्रकारानुसार काही तपासण्या वार्षिक अथवा ठराविक अंतराने करण्यास सांगितल्या जातात. २. आहारात भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा वापर. ३. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो आणि पुरेसा व्यायाम. ४. मद्यपान जमल्यास पूर्ण बंद अन्यथा माफक प्रमाणात असावे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 05/07/2023 - 19:17
कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही. कर्करोगाच्या बाबतीत संपूर्ण बरा होणे( cure) आणि सध्या रोग दिसत नाही (remission) या दोन बाबतीत लोकांची गल्लत होते. एखादी कर्करोगाची गाठ आपण शल्यक्रिया करून काढून टाकलेली असली तरी सूक्ष्म स्वरुपात तो पसरलेला असू शकतो यासाठी कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे दोन ते पाच वर्षे त्याचा पाठपुरावा केला जातो आणि जेथे जेथे तो पसरण्याची शक्यता असते त्या भागाची कसून तपासणी केली जाते. साधारण पाच वर्षे असा पाठपुरावा केल्यानंतरच हा रुग्ण बरा झाला असे समजले जाते. या अगोदर जरी रुग्ण मध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी रुग्ण बरा झाला असे समजले जात नाही. पाच वर्षानंतर त्याच अवयवात कर्करोग झाला तर तो नवीन रोग आहे असे समजून उपाय केला जातो. या बाबतीत दोन फार महत्त्वाचे फरक आहेत. उदा गर्भाशयाचा कर्करोग. यात गर्भाशय काढूनच टाकले आणि पाच वर्षे रोग बाहेर पसरलेला नसेल तर रुग्ण पूर्ण बरा झाला याची खात्री देता येते. परंतु तोंडाचा किंवा फुफुसाचा कर्करोग आहे हे अवयव आपल्याला काढून टाकणे शक्य नसते. जेवढ्या भागाला हा रोग झाला आहे तेवढा भाग काढला जातो. मुळात या अवयवाचा कर्करोग का झाला ते कारण आपल्याला बरेच वेळेस माहिती नसते मग ते कारण दूर करणे शक्य नसते. उदा हवेतील प्रदूषणामुळे फुफुसाचा कर्करोग झाला असेल तर गेली कित्येक वर्षे फुफुसाचा इतर भाग सुद्धा त्या प्रदूषित हवेची शिकार झालेलाच असतो. तेंव्हा तेथे दुसरा कर्करोग होणारच नाही याची खात्री देता येत नाही. एक म्हणजे आहे त्याच रोगाचा पुनरुद्भव( relapse) आणि दुसरा म्हणजे नवीन कर्करोग जो काही काळानंतर दृगोच्चर झालेला ( metachronus) स्तनाच्या कर्करोगाबाबत ज्या बाजूला कर्करोग झाला आहे तेथे शल्यक्रिया केली आणि तो स्तन काढून टाकला तरी दुसऱ्या बाजूच्या स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आपल्याला गृहीत धरावीच लागते हा एखादे वेळेस पहिल्या पाच वर्षे पाठपुरावा चालू असतो त्याकाळात उद्भवू शकतो (synchronus) किंवा त्यानंतर सुद्धा( metachronus). यामुळे आपण डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे वेळेवर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टर उगाचच सारखे सारखे (पैशासाठी) चाचण्या करून घ्यायला सांगतात हा सार्वत्रिक पसरलेला/ पसरवलेला गैरसमज आहे. यामुळे आवश्यक असलेल्या चाचण्या करून न घेणारे रुग्ण आमच्या रोजच्या पाहण्यात आहेत. अशा रुग्णांना -- "मी आपल्याला कर्करोगाचा पुनरुद्भव होण्याची शक्यता फार तर ५ टक्के आहे म्हणजेच आपण या चाचण्या केल्या नाहीत तर ९५ टक्के आपल्याला काहीच होणार नाही परंतु आपण या ५ टक्क्यात आहात कि ९५ टक्क्यात हे सांगायला मी ज्योतिषी नाही. आपला विश्वास असेल तर आपण आपल्या ज्योतिषाला विचारून पहा कि आपल्या पत्रिकेत मृत्यू योग आहे का" ---असेच सांगतो

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 05/07/2023 - 20:12
कर्करोग बरा होणे याची व्याख्या वाटते तितकी सोपी नाही. प्रत्येक कर्करोग मॉलेक्युलर पातळीवर नष्ट होईलच असे नाही. आंतरराष्ट्रीय औपचारिक व्याख्या अशी गुंतागुंतीची आहे : A cancer patient can be defined as “cured” only when his or her life expectancy is the same as that of a sex- and age-matched general population.

वामन देशमुख 05/07/2023 - 07:28
' स्तन कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक यांची लांबलचक यादी वरपासून खालपर्यंत पाहिली आणि खरोखरच डोळे विस्फारले! --- महत्वाच्या विषयावरील महत्वाचा लेख! --- परिवारातील स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे. '

टर्मीनेटर 05/07/2023 - 15:25
उत्तम माहितीपुर्ण आणि संग्रहणीय असा लेख! वाचनखूण साठवली आहे 🔖 नुकताच मिपावर ह्या रोगाशी आणि त्यावरील उपचार पद्धतीशी संबंधित एक लेख आला आहे. त्यावर काही उद्बोधक चर्चा होइल असे वाटले होते पण त्या धाग्यावरील प्रतिसादांना भलतेच वळण लागल्याने साफ निराशा झाली. विषय मांडण्यासाठी धागाकर्त्याने मांडलेल्या पार्श्वभुमीवर चर्चा केंद्रीत होउन मुळ विषय मागे पडला आणि "रोग्याला धर्म असु शकतो, रोगाला नाही!" इतक्या साध्या गोष्टीचे भान न ठेवता धर्म, रुढी, कायदे आणि अनेक अनावश्यक गोष्टींवर काथ्याकुट सुरु झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला 😀 असो, आमच्या घरातच ह्या रोगाची (आता रोगमुक्त) केस असल्याने त्याचे निदान आणि उपचार ह्यांविषयी गेल्या चौदा वर्षांपासुन बऱ्यापैकी माहिती आणि अनुभव होताच पण गेल्या दोन वर्षात आणखीन चार केसेस जवळुन बघीतल्या असल्याने त्यात बरीच भर पडली आहे. त्याविषयी एक मेगाबाईटी प्रतिसाद वर उल्लेख केलेल्या धाग्यावर दिलेला असल्याने लिंक देउन त्याची पुनरावृत्ती टाळतो. सदर प्रतिसादात उल्लेख केलेल्या माझ्या मामेबहीणीच्या उपचारांसाठी गेल्या वर्षभरात टाटा मेमोरीअल होस्पिटल मध्ये कित्येकवेळा जाणे-येणे झाले आणि ती तिथे अ‍ॅडमीट असताना अनेक रात्री तिथे वास्तव्यही झाले. ह्या कालावधीत त्या ठिकाणी बघीतलेले असंख्य रुग्ण, त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव मन विदीर्ण करणारे आहेत. माझ्या निरिक्षणाप्रमाणे दिवसेंदिवस रुग्णसंख्या चिंताजनकरीत्या वाढत असुन आता ह्या रोगाचे आणि उपचार पद्धतींचे स्वरुप बऱ्यापैकी बदलले असले तरी एक गोष्ट मात्र कायम आहे ती म्हाणजे "लवकर निदान + योग्य उपचार = संपुर्ण रोगमुक्त होण्याची शक्यता". बाकी उपचारांदरम्यान होणारे औषधांचे / केमो थेरपीचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे रुग्णांचे प्रचंड हाल आणि खर्च ह्याबद्दल न बोललेलेच बरे! असो... ह्या माहितीपुर्ण लेखासाठी मनःपूर्वक आभार! वरती वामन देशमुख साहेब म्हणाल्याप्रमाणे 'परिवारातील सर्व स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे.' तुमचे ज्ञानदानाचे कार्य असेच चालु ठेवावे हि विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

सुबोध खरे 05/07/2023 - 19:36
@ टर्मीनेटर आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला माझा लेख हा कर्करोगाबद्दल नव्हताच. तो स्वार्थी मानवी प्रवृत्तीबद्दल होता. कर्करोगाऐवजी दुसरा एखादा दुर्धर जीवघेणा रोग असता तरी चालेल त्या माणसाच्या वृत्तीबद्दल मी लिहिलेले आहे. त्यामुळे त्या धाग्यावर कर्करोगाबद्दल चर्चा केल्यास मूळ मानवी वृत्तीबद्दल मला लिहायचे होते त्यापासून विषयांतर झाले असते. स्तनांच्या कर्करोगाबद्दल मी एक लेख १० वर्षांपूर्वी लिहिलेला होता https://www.misalpav.com/node/23924 त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिलेली होती त्याला १० वर्षे झालेली असल्याने आणि या १० वर्षात या विषयात प्रचंड प्रगती झालेली असल्याने मी या धाग्यावर त्याची जाहिरात केली नव्हती

हेमंतकुमार 05/07/2023 - 15:30
या लेखावर पसंतीचा अभिप्राय देणाऱ्या तसेच पूरक माहितीची भर घालणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार ! काहींना या लेखाची शिफारस परिवारातील स्त्रियांना करावीशी वाटली हे वाचून समाधान वाटले.

nutanm 06/07/2023 - 09:09
आज माझे सतत मोबाईलवर प्रतिसाद उडत असल्याने सहनशक्ती संपून‌ खूप इच्छा असूनही प्रतिसाद देता येत‌नाहीत , क्षमसव व छान लेखाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य 17/07/2023 - 20:03
माहितीपूर्ण लेख. सध्या स्तनांचा कर्करोग होण्याचे एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला येत आहेत ?

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 17/07/2023 - 21:20
एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला ?
>> हे लेखात दिले आहे : सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान. तसेच, प्रमाणवाढ पण आहे : ok

हेमंतकुमार 22/07/2023 - 11:40
आनंदी मूडात असताना एखाद्या स्त्रीला अचानक तिच्या स्तनामध्ये गाठ झालेली पहिल्यांदाच जाणवणे… त्यातून मनात निर्माण झालेली भीती… घाईघाईने गुगलून वाचन करणे…. त्याने अजूनच घाबरायला होणे….. डॉक्टरांची पहिली भेट….. .. त्यांनी सांगितलेले दोन्ही अंदाज आणि सुचवलेल्या तपासण्या……. विश्वास न बसल्याने दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेणे…. मग बायोप्सी…. परंतु रिपोर्ट येईपर्यंत झालेली मनाची प्रचंड घालमेल…… केमोथेरपीमुळे केस गेल्यानंतर मी कशी दिसेन याची चिंता….. घरातील लोकांशी निर्वाणीचे बोलणे….. घरातल्यांनी भावनिक आधार देणे आणि…. .. अखेर बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर ती गाठ कर्करोगाची नाही हे स्पष्ट होणे…… त्यानंतर झालेला कौटुंबिक आनंद अवर्णनीय असतो !! असा प्रसंग काही जणींच्या वाट्याला येऊ शकतो. मी जो वर्णन केला आहे तो होम या हिंदी चित्रपटातील आहे. मुळात ती जालमालिका होती. त्याचा आता सलग चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. वरील प्रसंगातील जोडप्याच्या भूमिका सुप्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांनी केल्यात. तो प्रसंग सुरेख वठला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हेमंतकुमार 10/02/2024 - 10:41
या बातमीचे शीर्षक अर्थातच दिशाभूल करणारे आहे. CAR-T cell therapy हा जो अत्याधुनिक कर्करोग उपचार आहे त्याच्या मर्यादा, दुष्परिणाम आणि प्रचंड खर्च हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत : 1. सध्या या उपचारांना फक्त रक्तपेशींच्या काही कर्करोगांसाठीच (lymphomas, some forms of leukemia, and multiple myeloma) मान्यता आहे. मेंदू, स्तन किंवा मूत्रपिंडाचे सॉलिड ट्यूमर यासाठी हे उपचार अजून तरी उपयुक्त ठरलेले नाहीत 2. सदर उपचार घेतल्यानंतर 50% हून कमी रुग्णांना दीर्घायुष्य लाभलेले आहे 3. ते प्रचंड म्हणजे प्रचंड खर्चिक आहेत. भारतात ज्यांनी उपचार प्रथम घेतला आहे त्यांना 42 लाख रुपये खर्च आला आहे. परदेशातील हा खर्च सुमारे पावणेचार ते चार कोटी रुपयांच्या घरात आहे ! 4. या उपचारांचे मेंदूवरील काही गंभीर दुष्परिणामही विचारात घ्यावे लागतील - जसे की, फीट्स आणि वाचाशक्तीवर परिणाम होणे.

In reply to by हेमंतकुमार

हो माहित आहे. मुळातच मराठी वृत्तपत्रांची लायकी ( की वकुब) जाणून आहे. ही बातमी खरोखरच एवढी विश्वसनीय असती तर तिची अफाट चर्चा झाली असती. एक नमुना म्हणून ती बातमी इथे डकवली आहे.

हेमंतकुमार 05/03/2024 - 08:21
कर्करोग उपचार घेताना बऱ्याच स्त्रियांचे भरपूर केस गळतात. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माहेर महिला प्रतिष्ठानने केस दान स्विकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. किमान 12 इंच लांबीचे केस 7 मार्च पर्यंत सोमवार पेठेतील कुमार सदन इथल्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात द्यावेत असे आवाहन त्यांनी केलेले आहे (बातमी : छापील मटा 5 मार्च 2024)

हा धोका पुरुषांना असू शकतो का या प्रश्नाने माझ्या मनांत डोके वर काढले होते. त्याचे धक्कादायक उत्तर मिळाले. विविध गोष्टींच्या परिणामाची वा कारकतेची प्रतिशत शक्ती देखील दिलेली आहे. वा! सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि मननीय लेख आहे. नात्यात स्तन कर्करोगाशी सामना करुन आता सुरळीत जीवन जगणार्‍या २ स्त्रिया आहेत. त्यामुळे या विषयाबद्दल किंचित माहिती आहे. पण तुमचा लेख वाचुन बर्‍याच गोष्टी नव्याने समजल्या. अवघड विषय सोपा करुन सांगतो तोच खरा शिक्षक आणि अवघड विषय सोपे करुन लिहितात ते कुमार सर _/\_ _/\_ एक प्रश्न-- हा अवयव शरीराबाहेर असल्याने तो सरळ काढुन रोगापासुन मुक्ती मिळवता येते त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 04/07/2023 - 19:44
त्यामुळे हा त्यातल्या त्यात कर्करोगाचा सौम्य प्रकार म्हणावा काय?
>>> नाही. हा अवयव तशा अर्थाने ‘शरीरातच’ आहे. त्याच्या अगदी सुरवातीच्या स्टेज दरम्यान लक्षात आला तर शस्त्रक्रिया प्रभावी ठरते. पण लक्षात येतानाच तो थोडा जरी ‘पसरला’ असेल तर ‘मुक्ती’ मिळेलच असे नाही. तसेच उपचारानंतरही recurrence होतो की नाही यावर बारीक लक्ष द्यावे लागते. .. विनंती : उपचार हा विशेषतज्ज्ञांचा प्रांत असल्यामुळे त्यावर शक्यतो मी काही अधिक भाष्य करणार नाही. कारणमीमांसा या पैलूवर हवी तितकी चर्चा व्हावी.

Bhakti 04/07/2023 - 19:02
पूर्वी हा कर्करोग परदेशात जास्त असायचा,पण आता भारतातही अधिक दिसतो, यातून मुक्त झालेलेही अनेक आहेत.
केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने
हे कसे काय? काही एक्सटरनल फक्टरही इन्फेक्शन करून स्तनांना गाठी येतात.अर्थात अन्टीबायोटिक/औषधांनी बरी होते हे पण पाहिलेय.ते कदाचित स्तनाच्या काही पोरस भागामुळे?आणि इतर सिक्रीशनमुळे असेल का?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 04/07/2023 - 19:48
केस मोकळे किंवा सरळ करण्यासाठी वापरलेली प्रसाधने : हे कसे काय?
>>> केसांच्या विविध सौंदर्यवर्धकांमध्ये काही ना काही रसायने असतात. त्यातील काहींमुळे शरीरातील हार्मोन्सच्या कार्यावर परिणाम होतो. तसेच काहींमुळे डीएनएच्या पातळीवर इजा होऊन जनुकबदल होतात. अर्थात यामुळे संभवणारा धोका "साधारण" गटात मोडतो हे लेखात दिले आहे. रसायनांचा हॉर्मोनवरील परिणाम याचा आढावा यापूर्वी इथे घेतलेला आहे

गवि 04/07/2023 - 20:21
माहितीपूर्ण लेख. रिस्क फॅक्टर्सची इतकी लांबलचक यादी असून देखील त्या मानाने बऱ्याच स्त्रिया अजून हयात आहेत हे पाहून हायसे वाटले. जवळपास प्रत्येक गोष्टीने या ना त्या कर्करोगाचा काही टक्के धोका आहेच असे असेल तर त्या मानाने प्रीव्हेलंस फारच कमी दिसतो. मग टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?

In reply to by गवि

हेमंतकुमार 04/07/2023 - 20:42
टॉप दोन तीन फॅक्टर वगळता बाकीचे ट्रिवियल मानावेत का?
निव्वळ एखाद्या शरीरधर्मातील साधारण घटकामुळे कर्करोग होतो असे अजिबात नाही. धोका मापनाचे गुण काढताना सर्वाधिक धोकादायकनाच महत्व येते. उदा : निव्वळ अंदाज म्हणून धोक्याचे गुण असे दिले जातील : 1. बालपणात काढले गेलेले छातीचे बरेच एक्स-रे : 22 ते 40 2. आनुवंशिकता आणि विशिष्ट जनुकीय बिघाड : १५ 3. इथून पुढे उतरत्या क्रमाने त्या लेखातील उतरंडीनुसार गुण कमी कमी होत जातील हे उघड आहे. या क्षेत्रातही मशीन लर्निंग येऊ घातलेले आहे. त्या तंत्रज्ञानात शरीरधर्मासंबंधी आणि जीवन शैलीसंबंधी विविध गुण देऊन एकत्रित विचार करून धोका काढला जातो.

कर्क रोग झाला. निदान आणी उपाय केल्यानंतर पुर्ण पणे ठिक झाला. विस वर्ष इतर रोग्यांना समुपदेशन केले. पण शेवटी त्याच रोगाने तडकाफडकी वर्षभरात ज्योत मालवली. कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही. बाकी लेख चांगला आहे हे वादातीत.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 05/07/2023 - 07:53
उपचारानंतर लक्षणे नाहीशी झाली की वरकरणी कर्करोग 'बरा झाला" असे म्हटले जाते. अर्थात पेशींच्या सूक्ष्म पातळीवर काय दडून राहिलेले आहे हे वरून समजण्यास मार्ग नसतो. उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे जीवनशैली खालील प्रमाणे असावी. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की, कितीही आरोग्यदायी जीवनशैली ठेवली तरी पूर्वी झालेला कर्करोग पुन्हा उद्भवणारच नाही असे नसते; दोन्ही शक्यता राहतात. उपाय: १. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नियमित अंतराने त्यांना तब्येत दाखवत राहणे. कुठल्याही प्रकारची रोगसदृश्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या त्वरित कानावर घालणे. रोगाच्या प्रकारानुसार काही तपासण्या वार्षिक अथवा ठराविक अंतराने करण्यास सांगितल्या जातात. २. आहारात भाज्या, पालेभाज्या आणि फळांचा वापर. ३. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो आणि पुरेसा व्यायाम. ४. मद्यपान जमल्यास पूर्ण बंद अन्यथा माफक प्रमाणात असावे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 05/07/2023 - 19:17
कर्क रोग ठिक झाल्यानंतर काय उपाय करावे जेणेकरून रिलॅक्स होणार नाही. कर्करोगाच्या बाबतीत संपूर्ण बरा होणे( cure) आणि सध्या रोग दिसत नाही (remission) या दोन बाबतीत लोकांची गल्लत होते. एखादी कर्करोगाची गाठ आपण शल्यक्रिया करून काढून टाकलेली असली तरी सूक्ष्म स्वरुपात तो पसरलेला असू शकतो यासाठी कर्करोगाच्या प्रकाराप्रमाणे दोन ते पाच वर्षे त्याचा पाठपुरावा केला जातो आणि जेथे जेथे तो पसरण्याची शक्यता असते त्या भागाची कसून तपासणी केली जाते. साधारण पाच वर्षे असा पाठपुरावा केल्यानंतरच हा रुग्ण बरा झाला असे समजले जाते. या अगोदर जरी रुग्ण मध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी रुग्ण बरा झाला असे समजले जात नाही. पाच वर्षानंतर त्याच अवयवात कर्करोग झाला तर तो नवीन रोग आहे असे समजून उपाय केला जातो. या बाबतीत दोन फार महत्त्वाचे फरक आहेत. उदा गर्भाशयाचा कर्करोग. यात गर्भाशय काढूनच टाकले आणि पाच वर्षे रोग बाहेर पसरलेला नसेल तर रुग्ण पूर्ण बरा झाला याची खात्री देता येते. परंतु तोंडाचा किंवा फुफुसाचा कर्करोग आहे हे अवयव आपल्याला काढून टाकणे शक्य नसते. जेवढ्या भागाला हा रोग झाला आहे तेवढा भाग काढला जातो. मुळात या अवयवाचा कर्करोग का झाला ते कारण आपल्याला बरेच वेळेस माहिती नसते मग ते कारण दूर करणे शक्य नसते. उदा हवेतील प्रदूषणामुळे फुफुसाचा कर्करोग झाला असेल तर गेली कित्येक वर्षे फुफुसाचा इतर भाग सुद्धा त्या प्रदूषित हवेची शिकार झालेलाच असतो. तेंव्हा तेथे दुसरा कर्करोग होणारच नाही याची खात्री देता येत नाही. एक म्हणजे आहे त्याच रोगाचा पुनरुद्भव( relapse) आणि दुसरा म्हणजे नवीन कर्करोग जो काही काळानंतर दृगोच्चर झालेला ( metachronus) स्तनाच्या कर्करोगाबाबत ज्या बाजूला कर्करोग झाला आहे तेथे शल्यक्रिया केली आणि तो स्तन काढून टाकला तरी दुसऱ्या बाजूच्या स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आपल्याला गृहीत धरावीच लागते हा एखादे वेळेस पहिल्या पाच वर्षे पाठपुरावा चालू असतो त्याकाळात उद्भवू शकतो (synchronus) किंवा त्यानंतर सुद्धा( metachronus). यामुळे आपण डॉक्टरांनी शिफारस केल्याप्रमाणे वेळेवर चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टर उगाचच सारखे सारखे (पैशासाठी) चाचण्या करून घ्यायला सांगतात हा सार्वत्रिक पसरलेला/ पसरवलेला गैरसमज आहे. यामुळे आवश्यक असलेल्या चाचण्या करून न घेणारे रुग्ण आमच्या रोजच्या पाहण्यात आहेत. अशा रुग्णांना -- "मी आपल्याला कर्करोगाचा पुनरुद्भव होण्याची शक्यता फार तर ५ टक्के आहे म्हणजेच आपण या चाचण्या केल्या नाहीत तर ९५ टक्के आपल्याला काहीच होणार नाही परंतु आपण या ५ टक्क्यात आहात कि ९५ टक्क्यात हे सांगायला मी ज्योतिषी नाही. आपला विश्वास असेल तर आपण आपल्या ज्योतिषाला विचारून पहा कि आपल्या पत्रिकेत मृत्यू योग आहे का" ---असेच सांगतो

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 05/07/2023 - 20:12
कर्करोग बरा होणे याची व्याख्या वाटते तितकी सोपी नाही. प्रत्येक कर्करोग मॉलेक्युलर पातळीवर नष्ट होईलच असे नाही. आंतरराष्ट्रीय औपचारिक व्याख्या अशी गुंतागुंतीची आहे : A cancer patient can be defined as “cured” only when his or her life expectancy is the same as that of a sex- and age-matched general population.

वामन देशमुख 05/07/2023 - 07:28
' स्तन कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक यांची लांबलचक यादी वरपासून खालपर्यंत पाहिली आणि खरोखरच डोळे विस्फारले! --- महत्वाच्या विषयावरील महत्वाचा लेख! --- परिवारातील स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे. '

टर्मीनेटर 05/07/2023 - 15:25
उत्तम माहितीपुर्ण आणि संग्रहणीय असा लेख! वाचनखूण साठवली आहे 🔖 नुकताच मिपावर ह्या रोगाशी आणि त्यावरील उपचार पद्धतीशी संबंधित एक लेख आला आहे. त्यावर काही उद्बोधक चर्चा होइल असे वाटले होते पण त्या धाग्यावरील प्रतिसादांना भलतेच वळण लागल्याने साफ निराशा झाली. विषय मांडण्यासाठी धागाकर्त्याने मांडलेल्या पार्श्वभुमीवर चर्चा केंद्रीत होउन मुळ विषय मागे पडला आणि "रोग्याला धर्म असु शकतो, रोगाला नाही!" इतक्या साध्या गोष्टीचे भान न ठेवता धर्म, रुढी, कायदे आणि अनेक अनावश्यक गोष्टींवर काथ्याकुट सुरु झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला 😀 असो, आमच्या घरातच ह्या रोगाची (आता रोगमुक्त) केस असल्याने त्याचे निदान आणि उपचार ह्यांविषयी गेल्या चौदा वर्षांपासुन बऱ्यापैकी माहिती आणि अनुभव होताच पण गेल्या दोन वर्षात आणखीन चार केसेस जवळुन बघीतल्या असल्याने त्यात बरीच भर पडली आहे. त्याविषयी एक मेगाबाईटी प्रतिसाद वर उल्लेख केलेल्या धाग्यावर दिलेला असल्याने लिंक देउन त्याची पुनरावृत्ती टाळतो. सदर प्रतिसादात उल्लेख केलेल्या माझ्या मामेबहीणीच्या उपचारांसाठी गेल्या वर्षभरात टाटा मेमोरीअल होस्पिटल मध्ये कित्येकवेळा जाणे-येणे झाले आणि ती तिथे अ‍ॅडमीट असताना अनेक रात्री तिथे वास्तव्यही झाले. ह्या कालावधीत त्या ठिकाणी बघीतलेले असंख्य रुग्ण, त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव मन विदीर्ण करणारे आहेत. माझ्या निरिक्षणाप्रमाणे दिवसेंदिवस रुग्णसंख्या चिंताजनकरीत्या वाढत असुन आता ह्या रोगाचे आणि उपचार पद्धतींचे स्वरुप बऱ्यापैकी बदलले असले तरी एक गोष्ट मात्र कायम आहे ती म्हाणजे "लवकर निदान + योग्य उपचार = संपुर्ण रोगमुक्त होण्याची शक्यता". बाकी उपचारांदरम्यान होणारे औषधांचे / केमो थेरपीचे दुष्परिणाम आणि त्यातून होणारे रुग्णांचे प्रचंड हाल आणि खर्च ह्याबद्दल न बोललेलेच बरे! असो... ह्या माहितीपुर्ण लेखासाठी मनःपूर्वक आभार! वरती वामन देशमुख साहेब म्हणाल्याप्रमाणे 'परिवारातील सर्व स्त्रियांना वाचायची शिफारस करतो आहे.' तुमचे ज्ञानदानाचे कार्य असेच चालु ठेवावे हि विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

सुबोध खरे 05/07/2023 - 19:36
@ टर्मीनेटर आश्चर्याची गोष्ट म्हणजे धागालेखकही त्या अस्थानी चर्चेत अगदी हिरीरीने सहभागी झाला माझा लेख हा कर्करोगाबद्दल नव्हताच. तो स्वार्थी मानवी प्रवृत्तीबद्दल होता. कर्करोगाऐवजी दुसरा एखादा दुर्धर जीवघेणा रोग असता तरी चालेल त्या माणसाच्या वृत्तीबद्दल मी लिहिलेले आहे. त्यामुळे त्या धाग्यावर कर्करोगाबद्दल चर्चा केल्यास मूळ मानवी वृत्तीबद्दल मला लिहायचे होते त्यापासून विषयांतर झाले असते. स्तनांच्या कर्करोगाबद्दल मी एक लेख १० वर्षांपूर्वी लिहिलेला होता https://www.misalpav.com/node/23924 त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिलेली होती त्याला १० वर्षे झालेली असल्याने आणि या १० वर्षात या विषयात प्रचंड प्रगती झालेली असल्याने मी या धाग्यावर त्याची जाहिरात केली नव्हती

हेमंतकुमार 05/07/2023 - 15:30
या लेखावर पसंतीचा अभिप्राय देणाऱ्या तसेच पूरक माहितीची भर घालणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार ! काहींना या लेखाची शिफारस परिवारातील स्त्रियांना करावीशी वाटली हे वाचून समाधान वाटले.

nutanm 06/07/2023 - 09:09
आज माझे सतत मोबाईलवर प्रतिसाद उडत असल्याने सहनशक्ती संपून‌ खूप इच्छा असूनही प्रतिसाद देता येत‌नाहीत , क्षमसव व छान लेखाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य 17/07/2023 - 20:03
माहितीपूर्ण लेख. सध्या स्तनांचा कर्करोग होण्याचे एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला येत आहेत ?

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 17/07/2023 - 21:20
एकूण प्रमाणच वाढलेय की जागरूकता वाढल्यामुळे जास्त केसेस उघडकीला ?
>> हे लेखात दिले आहे : सन 1990 नंतर हा आजार समाजात वाढत्या प्रमाणात 'दिसू' लागला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, चाळणी चाचण्यांचे वाढलेले प्रमाण आणि लवकर झालेले रोगनिदान. तसेच, प्रमाणवाढ पण आहे : ok

हेमंतकुमार 22/07/2023 - 11:40
आनंदी मूडात असताना एखाद्या स्त्रीला अचानक तिच्या स्तनामध्ये गाठ झालेली पहिल्यांदाच जाणवणे… त्यातून मनात निर्माण झालेली भीती… घाईघाईने गुगलून वाचन करणे…. त्याने अजूनच घाबरायला होणे….. डॉक्टरांची पहिली भेट….. .. त्यांनी सांगितलेले दोन्ही अंदाज आणि सुचवलेल्या तपासण्या……. विश्वास न बसल्याने दुसऱ्या डॉक्टरांचे मत घेणे…. मग बायोप्सी…. परंतु रिपोर्ट येईपर्यंत झालेली मनाची प्रचंड घालमेल…… केमोथेरपीमुळे केस गेल्यानंतर मी कशी दिसेन याची चिंता….. घरातील लोकांशी निर्वाणीचे बोलणे….. घरातल्यांनी भावनिक आधार देणे आणि…. .. अखेर बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर ती गाठ कर्करोगाची नाही हे स्पष्ट होणे…… त्यानंतर झालेला कौटुंबिक आनंद अवर्णनीय असतो !! असा प्रसंग काही जणींच्या वाट्याला येऊ शकतो. मी जो वर्णन केला आहे तो होम या हिंदी चित्रपटातील आहे. मुळात ती जालमालिका होती. त्याचा आता सलग चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे. वरील प्रसंगातील जोडप्याच्या भूमिका सुप्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांनी केल्यात. तो प्रसंग सुरेख वठला आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हेमंतकुमार 10/02/2024 - 10:41
या बातमीचे शीर्षक अर्थातच दिशाभूल करणारे आहे. CAR-T cell therapy हा जो अत्याधुनिक कर्करोग उपचार आहे त्याच्या मर्यादा, दुष्परिणाम आणि प्रचंड खर्च हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत : 1. सध्या या उपचारांना फक्त रक्तपेशींच्या काही कर्करोगांसाठीच (lymphomas, some forms of leukemia, and multiple myeloma) मान्यता आहे. मेंदू, स्तन किंवा मूत्रपिंडाचे सॉलिड ट्यूमर यासाठी हे उपचार अजून तरी उपयुक्त ठरलेले नाहीत 2. सदर उपचार घेतल्यानंतर 50% हून कमी रुग्णांना दीर्घायुष्य लाभलेले आहे 3. ते प्रचंड म्हणजे प्रचंड खर्चिक आहेत. भारतात ज्यांनी उपचार प्रथम घेतला आहे त्यांना 42 लाख रुपये खर्च आला आहे. परदेशातील हा खर्च सुमारे पावणेचार ते चार कोटी रुपयांच्या घरात आहे ! 4. या उपचारांचे मेंदूवरील काही गंभीर दुष्परिणामही विचारात घ्यावे लागतील - जसे की, फीट्स आणि वाचाशक्तीवर परिणाम होणे.

In reply to by हेमंतकुमार

हो माहित आहे. मुळातच मराठी वृत्तपत्रांची लायकी ( की वकुब) जाणून आहे. ही बातमी खरोखरच एवढी विश्वसनीय असती तर तिची अफाट चर्चा झाली असती. एक नमुना म्हणून ती बातमी इथे डकवली आहे.

हेमंतकुमार 05/03/2024 - 08:21
कर्करोग उपचार घेताना बऱ्याच स्त्रियांचे भरपूर केस गळतात. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या माहेर महिला प्रतिष्ठानने केस दान स्विकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. किमान 12 इंच लांबीचे केस 7 मार्च पर्यंत सोमवार पेठेतील कुमार सदन इथल्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात द्यावेत असे आवाहन त्यांनी केलेले आहे (बातमी : छापील मटा 5 मार्च 2024)

हा धोका पुरुषांना असू शकतो का या प्रश्नाने माझ्या मनांत डोके वर काढले होते. त्याचे धक्कादायक उत्तर मिळाले. विविध गोष्टींच्या परिणामाची वा कारकतेची प्रतिशत शक्ती देखील दिलेली आहे. वा! सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग शरीरभर पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.

एक मुलायम स्पर्शक (२)

हेमंतकुमार ·

शेर भाई 11/06/2023 - 23:41
मागील तेखाचा उत्तरार्ध यापेक्षा अधिक रंजक होऊच शत नाही |अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे. भारतात आजकाल Durex त्यांच्या Real - Feel नावाच्या उत्पादनाची जाहिरात करते आहे. ते याच प्रकारातील आहे का ? आणि हे साधरण स्पर्शकापेक्षा महाग का असतात ?

In reply to by शेर भाई

हेमंतकुमार 12/06/2023 - 05:55
Durex Real - Feel
नाही, हे विघटनशील नसावेत. ज्यांना latex ची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा वेगळा पर्याय असून त्यात polyisoprene हे रसायन वापरलेले आहे. इथे दिलेल्या माहितीनुसार Sustain Natural हा प्रकार पर्यावरणपूरक आहे. हे जे सगळे आधुनिक प्रकार आले आहेत त्यांची माहिती सध्या आपल्याला जाहिरात माध्यमामध्येच मिळते आहे. त्याविषयी शास्त्रीय लेखन सहज उपलब्ध नाही.

तांबी हा सुद्धा एक गर्भनिरोधाचा प्रकार. सरकारने याचा खुप पाठपुरावा केला. गावागावात भित्तीचित्रे व यमक साधत चारोळ्या,दोनोळ्या नी सर्व सामान्य जनतेला याची माहीती पुरवली. तरीही हा प्रकार जनतेला फारसा आवडला नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 12/06/2023 - 07:36
तांबी हा सुद्धा... भित्तीचित्रे व यमक साधत
>>> “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात छानच होती. गर्भनिरोधन आणि विविध कुटुंबकल्याण कार्यक्रमांमध्ये मला आलेले ग्रामीण भागातील काही अनुभव मी इथे लिहिले आहेत

असे विषय आम्हाला माहीत करुन देण्याबद्दल धन्यवाद कुमार सर!! माझे २ पैसे १. निरोध वापरताना कामसुखात (थेट स्पर्श न झाल्याने) कमतरता येते या समजावरुन त्याचा वापर टाळला जात असावा. पण आधुनिक संशोधनामुळे हे प्रमाण वाढेल असे लेखावरुन वाटत आहे. २. जोडप्यापैकी एकाने संतती नियमनाची शस्त्रक्रिया (पुरुष किवा स्त्री) केली असल्याने निरोध वापरला नाही तरी चालेल (दोघे एकमेकांशी एकनिष्ठ आहेत हे गृहित धरुन). येथे डॉक्टरांनीच सांगितल्याप्रमाणे पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.(यावर कृपया प्रकाश टाकावा) ३.तांबीसारख्या उपायात शरीराला ईजा होण्याची शक्यता असल्याने + कंबर दुखणे वगैरे होत असल्याने ती जास्त लोकप्रिय झाली नसावी असे वाटते. ४. गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परीणाम हा वेगळा एक मुद्दा आहेच. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुरुषाने निरोध वापरणेच सुटसुटीत वाटते. (यात समलैंगिक वगैरे लक्षात घेतलेले नाहीत) माहितीपुर्ण लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:49
चिकित्सक प्रतिसाद आवडला.
पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.
चांगला मुद्दा. सर्वसाधारण विधान म्हणून हे बरोबर आहे. पुरुष शस्त्रक्रियेमध्ये ज्या नलिकेचा (vas) संबंध येतो त्याची पुनर्जोडणी करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीची शस्त्रक्रिया करावी लागते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत कौशल्य आणि अनुभवाचा भाग मोठा असतो. अर्थात पुरुष व स्त्रियांच्या शस्त्रक्रियांमध्ये दिवसेंदिवस आधुनिक सुधारणा होत आहेत. संबंधित शल्यचिकित्सकांच्या कौशल्यानुसार वरील सर्वसाधारण विधानात फरक पडू शकेल.

टर्मीनेटर 14/06/2023 - 12:01
हा भागही छान माहितीपुर्ण आहे 👍
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत.
पुढच्या भागात त्याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती. मी ह्या उत्पादनाचा उपभोक्ता नसलो तरी अशी रंजक पद्धतीने दिलेली शास्त्रीय माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:55
धन्यवाद !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.
हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :) अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे. आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 14/06/2023 - 13:03
आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.
तसंही चालेल 😀

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:55
धन्यवाद !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.
हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :) अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे. आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.

शेर भाई 11/06/2023 - 23:41
मागील तेखाचा उत्तरार्ध यापेक्षा अधिक रंजक होऊच शत नाही |अलीकडे शुद्ध नैसर्गिक स्वरूपातील latex पासून तयार केलेले आणि रसायनविरहित काही निरोध अल्प प्रमाणात का होईना बाजारात आलेले आहेत. अशा निरोधांचे वेष्टण देखील एक प्रकारच्या विघटनशील कागदाचे केलेले आहे. भारतात आजकाल Durex त्यांच्या Real - Feel नावाच्या उत्पादनाची जाहिरात करते आहे. ते याच प्रकारातील आहे का ? आणि हे साधरण स्पर्शकापेक्षा महाग का असतात ?

In reply to by शेर भाई

हेमंतकुमार 12/06/2023 - 05:55
Durex Real - Feel
नाही, हे विघटनशील नसावेत. ज्यांना latex ची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा वेगळा पर्याय असून त्यात polyisoprene हे रसायन वापरलेले आहे. इथे दिलेल्या माहितीनुसार Sustain Natural हा प्रकार पर्यावरणपूरक आहे. हे जे सगळे आधुनिक प्रकार आले आहेत त्यांची माहिती सध्या आपल्याला जाहिरात माध्यमामध्येच मिळते आहे. त्याविषयी शास्त्रीय लेखन सहज उपलब्ध नाही.

तांबी हा सुद्धा एक गर्भनिरोधाचा प्रकार. सरकारने याचा खुप पाठपुरावा केला. गावागावात भित्तीचित्रे व यमक साधत चारोळ्या,दोनोळ्या नी सर्व सामान्य जनतेला याची माहीती पुरवली. तरीही हा प्रकार जनतेला फारसा आवडला नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 12/06/2023 - 07:36
तांबी हा सुद्धा... भित्तीचित्रे व यमक साधत
>>> “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात छानच होती. गर्भनिरोधन आणि विविध कुटुंबकल्याण कार्यक्रमांमध्ये मला आलेले ग्रामीण भागातील काही अनुभव मी इथे लिहिले आहेत

असे विषय आम्हाला माहीत करुन देण्याबद्दल धन्यवाद कुमार सर!! माझे २ पैसे १. निरोध वापरताना कामसुखात (थेट स्पर्श न झाल्याने) कमतरता येते या समजावरुन त्याचा वापर टाळला जात असावा. पण आधुनिक संशोधनामुळे हे प्रमाण वाढेल असे लेखावरुन वाटत आहे. २. जोडप्यापैकी एकाने संतती नियमनाची शस्त्रक्रिया (पुरुष किवा स्त्री) केली असल्याने निरोध वापरला नाही तरी चालेल (दोघे एकमेकांशी एकनिष्ठ आहेत हे गृहित धरुन). येथे डॉक्टरांनीच सांगितल्याप्रमाणे पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.(यावर कृपया प्रकाश टाकावा) ३.तांबीसारख्या उपायात शरीराला ईजा होण्याची शक्यता असल्याने + कंबर दुखणे वगैरे होत असल्याने ती जास्त लोकप्रिय झाली नसावी असे वाटते. ४. गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परीणाम हा वेगळा एक मुद्दा आहेच. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पुरुषाने निरोध वापरणेच सुटसुटीत वाटते. (यात समलैंगिक वगैरे लक्षात घेतलेले नाहीत) माहितीपुर्ण लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:49
चिकित्सक प्रतिसाद आवडला.
पुरुषांची शस्त्रक्रिया करणे सोपे पण उलट करणे अवघड तर स्त्रियांची शस्त्रक्रिया करणे अवघड पण उलटवणे सोपे.
चांगला मुद्दा. सर्वसाधारण विधान म्हणून हे बरोबर आहे. पुरुष शस्त्रक्रियेमध्ये ज्या नलिकेचा (vas) संबंध येतो त्याची पुनर्जोडणी करण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीची शस्त्रक्रिया करावी लागते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत कौशल्य आणि अनुभवाचा भाग मोठा असतो. अर्थात पुरुष व स्त्रियांच्या शस्त्रक्रियांमध्ये दिवसेंदिवस आधुनिक सुधारणा होत आहेत. संबंधित शल्यचिकित्सकांच्या कौशल्यानुसार वरील सर्वसाधारण विधानात फरक पडू शकेल.

टर्मीनेटर 14/06/2023 - 12:01
हा भागही छान माहितीपुर्ण आहे 👍
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. त्यातले काही कुतूहलजनक आहेत.
पुढच्या भागात त्याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती. मी ह्या उत्पादनाचा उपभोक्ता नसलो तरी अशी रंजक पद्धतीने दिलेली शास्त्रीय माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:55
धन्यवाद !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.
हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :) अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे. आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 14/06/2023 - 13:03
आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.
तसंही चालेल 😀

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 14/06/2023 - 12:55
धन्यवाद !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले काही निरोध उंबरठ्यावर येऊन ठेपलेत.
हे वाक्य दोन्ही भागांच्या समारोपाचे म्हणून होते :) अत्याधुनिक निरोधांची थोडक्यात माहिती या लेखाच्या पूर्वार्धात दिलेली आहे. आता ते जेव्हा प्रत्यक्ष भारतीय दुकानांमध्ये येतील तेव्हा त्याबद्दल अधिक काही माहिती इथल्या प्रतिसादांमध्ये लिहिता येईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वार्ध इथे. …………………………………………..

उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत: १. गर्भनिरोधनातील यशापयश २. गुप्तरोगांपासून संरक्षण ३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या ४.

दोघांत 'तिसरा' : एक मुलायम स्पर्शक

हेमंतकुमार ·

सॅल्युट. गरज ही शोधाची जननी त्यामुळेच शोधाचा इतीहास रंजक असतो .तो जेव्हा सिद्ध हस्त लेखणीतून उतरतो त्याच्याबद्दल काय बोलावे. धन्यवाद.

टर्मीनेटर 28/05/2023 - 18:31
"त्याच्या वीर्यात म्हणे “साप आणि विंचू” (= विष) असायचे ! त्यामुळे त्याने संभोगलेली एक दासी मरण पावली."
हे वाचून 'विषकन्या' (बुढ्ढा मर गया मधली राखी सावंत) आठवली एकदम 😀
"या राजाराणीने संभोगसमयी या प्रकारचा प्राणीजन्य निरोध नियमित वापरूनही त्यांना तब्बल आठ अपत्ये झाली !"
चला... राणीला “साप आणि विंचू”ची विषबाधा झाली नाही हेही नसे थोडके! म्हणजे हा 'पडदा' वापरण्याचा मुळ उद्देश सफल झाला म्हणायचा 😂 पण ह्यावरून एक जुना चावट विनोद आठवला... एक कुटुंब नियोजन विभागाचा अधिकारी कुठल्याशा खेडेगावात सरपंचाकरवी ग्रामसभा बोलावून गावकऱ्यांना संतती नियमनासाठी निरोधच्या वापराचे महत्व पटवून देत असतो. बराचवेळ त्याची बडबड ऐकून वैतागलेला सरपंच शेवटी त्याला विचारतो "काय हो साहेब, तुम्ही स्वतः वापरता का निरोध?" त्यावर तो अधिकारी आत्मविश्वासाने छाती फुगवून सांगतो "होय तर, चांगला गेल्या दहा-बारा वर्षांपासून वापरतोय, त्यामुळेच तर आम्हाला फक्त आठ मुले झाली!"

हेमंतकुमार 28/05/2023 - 18:59
उद्घाटनाबद्दल धन्यवाद ! ..
चांगला गेल्या दहा-बारा वर्षांपासून वापरतोय, त्यामुळेच तर आम्हाला फक्त आठ मुले झाली!"
🙂 असाच एक विनोद पूर्वी इथे लिहीलाय. (“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”)

चित्रगुप्त 28/05/2023 - 23:57
रोचक, माहितीपूर्ण लेख. वाचून एक प्रश्न उद्भवला.वात्स्यायनाच्या कामसूत्रात किंवा अन्य काही ग्रंथ, उदा. दामोदरगुप्ताचा 'कुट्टनीमत, बाराव्या शतकापूर्वी लिहिलेला रतिरहस्य ऊर्फ कोकशास्त्र हा ग्रंथ, कल्याणमल्लाचा सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अनंगरंग (रतिशास्त्र) हा ग्रंथ, अहिताग्नी राजवाडे यांचा ग्रंथ (आता नाव आठवत नाहीये) व्यासजनार्दनकृत कामप्रबोध, महाराज देवराजकृत रतिरत्नप्र‌दीपिका, दंडीविरचित नर्मकेलिकौतुकसंवाद इत्यादि प्राचीन भारतीय साहित्यात (तसेच उदाहरणार्थ खजुराहोच्या रतिशिल्पात) असे काही साधन वर्णिलेले आहे का, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. (सन्माननीय मिपाकर प्रचेतस यांना खास विनंती) मराठी विश्वकोषातील एक-दोन उतारे: --- कामशास्त्राच्या उत्पत्तीविषयी वात्स्यायनाने ग्रंथारंभी एक आख्यायिका सांगितली आहे. ब्रह्मदेवाने त्रिवर्गविषयक विशालकाय शास्त्र निर्माण केले. या शास्त्रातून महादेवाचा सेवक नंदी याने १००० अध्यायांचे ‘कामसूत्र’ निराळे काढले. त्याचा संक्षेप उद्दालकपुत्र श्वेतकेतूने ५०० अध्यायांत केला. या संक्षेपाचाही संक्षेप पांचालदेशवासी बाभ्रव्याने सात ‌अधिकरणांत व १५० अध्यायांत केला. यांतील वैशिक नावाचे अधिकरण पाटलिपुत्र नगरात राहणाऱ्या गणिकांच्या आज्ञेला अनुसरून दत्तकाचार्याने निराळष करून स्वतंत्रपणे रचले. तसेच चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिकापुत्र आणि कुचुमार या सहा आचार्यांनी क्रमश: साधारण, सांप्रयोगिक, कन्यासंप्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक व औपनि‌षदिक ही सहा अधिकरणे स्वमतप्रदर्शनार्थ स्वतंत्रपणेच रचली. कामशास्त्राचे असे वेगवेगळे विभाग झाल्याने हे शास्त्र अध्ययन-अध्यापनास गैरसौयीचे ठरून लुप्तप्राय झाले. नंदीचे ‘कामसूत्र’ फारच विशाल व म्हणून अजिबातच लुप्त झाले. बाभ्रव्याचा ग्रंथ विशाल आणि अध्ययनास कठीण होता, तसेच दत्तकादी आचार्यांनी कामशास्त्राच्या केवळ उपांगांवरच आपापले ग्रंथ लिहिलेले होते, म्हणून वात्स्यायनाने या शास्त्रातील सर्व विषयांचा अभ्यास करून व ते संक्षेपाने संकलित करून कामसूत्र या नावाने लोकांपुढे ठेविले. --- श्वेतकेतून समाजस्थैर्याच्या उद्देशाने सर्वप्रथम स्त्रीपुरुषसंबंधावर निर्बंध घातला, ही गोष्ट महाभारताच्या आदिपर्वात आली आहे (१२२.१०). (मिपाचे सन्माननीय सदस्य प्रचेतस यांना खास विनंती)

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 29/05/2023 - 05:35
कामसूत्रात किंवा अन्य काही ग्रंथ....असे काही साधन वर्णिलेले आहे का...
चांगला मुद्दा. मलाही जाणून घ्यायला आवडेल. .. अगदी अलिकडे, म्हणजे र.धों. कर्वे यांच्या काळात (१९२७ ते १९५३) त्यांनी महिलांना योनीत तैलचिंधी वापरण्याचा सल्ला दिला होता.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/05/2023 - 19:43
धन्यवाद चित्रगुप्तकाका, महाभारत आणि रामायण वगळता इतर ग्रंथ फारसे अभ्यासलेले नाहीत, आपण वर उल्लेखलेले कोणतेच ग्रंथ वाचलेले नाहीत मात्र अहिताग्नी राजवाडेंच्या ' नासदीयसूक्त भाष्य' ह्या महान ग्रंथाची दुर्मिळ प्रत मिपाकर बॅटमॅन ह्याच्या घरी प्रत्यक्ष पाहिली आहे मात्र वाचली नाही. आदिपर्वातील श्वेतकेतूने स्त्रियांना घालून दिलेल्या मर्यादेची कथा तर माहिती आहेच, शिवाय शांतिपर्वातील भीष्माच्या तोंडी आलेला विवाहसंस्थेविषयक श्लोक याबाबतीत रोचक आहे. न चैषां मैथुनो धर्मो बभूव भरतर्षभ | सङ्कल्पादेव चैतेषामपत्यमुदपद्यत || तत्र त्रेतायुगे काले सङ्कल्पाज्जायते प्रजा | न ह्यभून्मैथुनो धर्मस्तेषामपि जनाधिप || द्वापरे मैथुनो धर्मः प्रजानामभवन्नृप | तथा कलियुगे राजन्द्वंद्वमापेदिरे जनाः || कृतयुगात स्त्री पुरुषांच्या मनात येईल तेव्हा मैथुनक्रिया होत असे, त्रेतायुगात स्त्री पुरुषांनी एकमेकांस विषयभावनेने स्पर्श केला असता समाजजन त्यांस मैथुनाची अनुमती देत असत, द्वापरयुगात मैथुन झाला असता स्त्रीपुरुष एकत्र राहात असत आणि कलियुगात द्वंद्वावस्था म्हणजेच विवाहसंस्था निर्माण झाली मात्र येथे कोठेही संततीविषयक नियमनाचे उल्लेख माझ्या नजरेस तरी आलेले नाहीत, तशी येथे जागरूकताच नव्हती म्हणा ना. अर्थात आर्ष महाकाव्यात उर्ध्वरेत्यांचे वर्णन काही ठिकाणी येते मात्र ते संभोगाच्या दृष्टीने नव्हे. आकाशाच्या शिश्न उठावलेल्या लकुलिशाचे शिल्प याबाबतीत रोचक आहेच. शिवाय संततीनियमांची साधने नव्हती किंवा त्यांची माहिती नव्हती म्हणूनही गंगेने नदीत बुडवलेल्या शांतनु व तिच्या सात पुत्रांची कहाणी तसेच कुंतीने नदीत सोडलेल्या कर्णाची कहाणी त्यादृष्टीने महत्वाची ठरते.

In reply to by प्रचेतस

तीन वेळा बघीतली. सरकारी वाटाड्याने किंवा शिल्पांमधे ह्या विषयावर प्रकाश टाकणारी कुठलीच मुर्ती बघण्यात/ऐकण्यात आली नाही. उलट मैथुनाचे विविध प्रकार दिसले. धृतराष्ट्रपुत्र कौरव,गांधार नरेशाची मुलांची संख्या एवढी नसती जर संतती नियमनाची साधने उपलब्ध असती. कदाचीत लोकसंख्या कमी व संसाधने भरपुर यामुळे सुद्धा संतती नियमनाची गरज भासली नसावी. आमच्या मागच्या पिढीचा इतीहास बघीतला तर बारा,पंधरा बाळंतपणे सर्रास होत. तसेच मृत्यूदर पण भरपुर हे ही कारण असावे. प्रजापतीला म्हणे बासष्ट मुली होत्या.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 29/05/2023 - 21:06
1960 आणि त्यापूर्वीच्या दशकांमध्ये आपल्या पूर्वजांची भली मोठी कुटुंबे हे सर्वसाधारण चित्र होतेच. माझ्या आजीच्या पिढीच्या एक बाई एकदा बोलताना म्हणाल्या होत्या,
सात मुलं झाल्यानंतर मी नवऱ्याला सांगितलं की आता आपण वेगळे झोपायचे. तुला वेगळी बाई ठेवायची असेल तर ठेव. आता मला बाळंतपण सहन होणार नाही
. म्हणूनच, त्याकाळी ज्या समाज धुरीणांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार केला, त्यांचे कार्य खरोखरच महत्त्वाचे आहे.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 30/05/2023 - 02:44
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ? बहुधा नसावे. याउलट येक केन प्रकारेण गर्भधारणा व्हावी, जास्तीत जास्त संतती व्हावी, यासाठीच नियोग इत्यादि मार्ग अवलंबिले जात. त्यामुळे शंभर कौरव, किंवा कर्णाचा जन्म या गोष्टी 'त्या काळी अशी साधने उपलब्ध नव्हती' याचा पुरावा म्हणून ग्राह्य मानता येणार नाहीत असे वाटते. मुळात सगळे 'कौरव' फक्त गांधारीचेच मुलगे होते की अनेक स्त्रियांचे मिळून 'शंभर कौरव' होते ? तसेच कर्णजन्माच्या वेळी कुंतीचे वय किती होते, आणि 'सूर्यापासून जन्म' हे काय गौडबंगाल आहे ? हल्लीच्या भाषेत तो एक बलात्कार होता असे म्हणावे, तर बलात्कारकर्त्याला त्यातून होऊ शकणार्‍या (संभावित) गर्भाशी काय घेणेदेणे ? मुळात 'गर्भधारणा होऊ नये' ही गरज मनुष्याला केंव्हापासून वाटू लागली, याबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ? . (अवांतरः वरील आकृती ही अमेरिकनांच्या 'प्रत्येक बाबतीत जगात आम्हीच श्रेष्ठ' अशी बढाई मारण्याच्या सवयीचे द्योतक म्हणावे काय ? इ.स. १८०० मधे जगातल्या प्रत्येक देशात जन्मदर काय आहे, हे माहीत करून घेण्याची सोय तरी होती का ? --- Story of US का कुठल्याश्या माहितीपटात दर पाच मिनिटांनंतर कुठल्यातरी घटनेचा उल्लेख "जागतिक इतिहासाला कायमचे नवे वळण लावणारी घटना' असा केलेला बघितले आहे) १९१० मधे जन्मलेल्या माझ्या आईला झालेल्या अपत्यांपैकी मी सर्वात लहान असून आम्ही सात भावंडे होतो, त्याखेरीज काहींचा अगदी लहानपणीच मृत्यू झाला होता. (त्या काळी काही अपवाद वगळता घरोघरी हीच परिस्थिती असायची) आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान होते. लहानपणी मला एकदा दुकानात 'थ्री नाईट्स' लिहीलेल्या रिकाम्या डब्या मिळाल्या, त्यात काय असायचे ते मला समजले नाही, पण पेन्सिल तासायला लागणार्‍या ब्लेडा ठेवायला मी त्या वापरू लागलो. .. . सदर रिकामी डबी सध्या ईबे वर ११७ डॉलरला मिळते आहे.या डबीवर 'PROTECTION AGAIST DISEASE' असे लिहीलेले आहे हेही लक्षात घेण्याजोगे आहे. (आपण लहानपणापासून साठवलेल्या वस्तू फेकून दिल्या, तसे करायला नको होते.... ही पश्चातबुद्धी) एवढ्या वर्षांनंतर आज या लेखाच्या निमित्ताने ही आठवण जागी झाली याचे फार अप्रूप वाटत आहे. जालावर सापडलेला एक लेखः 15,000 Years Of Condoms: A Feel-Good History Lesson https://www.mtv.com/news/8uperu/history-of-condoms#:~:text=In%20the%201500s%2C%20Japanese%20men,Sexy!&text=The%20Italian%20scientist%20Gabriele%20Falloppio,to%20combat%20a%20syphilis%20epidemic.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 30/05/2023 - 05:43
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ? कुटुंबनियोजन नाही पण गर्भवती राहण्यासाठी इतर पुरुषाचे वीर्य घेणं आणि ते करताना एक विशिष्ट नियम पाळणे याला काही पद्धती होती असे एका कादंबरीत वाचले आहे ( पांडवानवर लिहिलेली भैरप्पा नामक कन्नड भाषिक लेखक यांची कादंबरी .. नाव आता आठवत नाही ) त्यात असे होते कि ज्याचे कडून वीर्य घ्यायचे त्याच्याशी अतिशय व्यापारिक दृषीने सहर्ष संबंध घडव्याचाच पण त्यात कोणतीही भावना गुंतली नाही पाहिजे अशी गुंतली तर तो व्यभिचार ठरेल, मग असा सभोग करताना त्या व्यक्तीने/ पुरुषाने अंगभर जुने तूप फसल्याचे ( वास येणारे ) कि ज्यामुळे स्त्रीला त्या पर पुरुषाबद्दल कोणतीही शारीरिक आकर्षण वाटणार नये .. आता हे कादंबिरीतील आहे खरे खोटे कोण जाणे

In reply to by अनामिक सदस्य

चित्रगुप्त 30/05/2023 - 15:57
@ अनामिक सदस्य: 'कुंतीने मंत्राद्वारे सूर्याला आवाहन करण्यामुळे सूर्यदेव प्रकट होऊन त्याने कुंतीच्या ठायी गर्भस्थापना केली' म्हणजे नेमके काय आणि कसे घडले, हे आजच्या माणसाला कळेल, पटेल अशा पद्धतीने सांगितल्यास बरे होईल. मुळात 'पृथा' ही राजा शूरसेन याची मुलगी. त्याने तिला कुंतीभोज राजाला 'देऊन टाकले' त्यामुळे तिचे 'कुंती' हे नाव पडले. कुंतीभोजाने तिला वर्षभर 'सेवेसाठी' म्हणून अतिशय तापट असलेल्या दुर्वास ऋषीला 'दिले'. तिने उत्तम सेवा केल्याचे बक्षिस म्हणून दुर्वासाने तिला 'मंत्र' दिला. महाभारतात हा मंत्र आणि त्याचे अनुष्ठान याला 'अभिचार' (अभिचाराभिसंयुक्तम) असे म्हटले आहे. वेदातील 'अभिचार मंत्रा'ची योजना ही कुणाचा नाश, पराजय करण्यासाठी, किंवा कुणाला अंकित, वश करण्यासाठी केला जात असे. बालसुलभ कुतुहलापायी कुंतीने सूर्यावर या मंत्राचा प्रयोग करून बघितला त्यातून कर्णाचा जन्म झाला म्हणे. 'सूर्यदेव' म्हणुन जे कुणी होते, त्याला गर्भस्थापना करणे बंधनकारक होते का ? असल्यास त्याचे कारण काय ? सगळेच अकलनीय. हल्लीच्या एकाद्या मुलीने गर्भ राहिल्यावर असे काही स्पष्टीकरण दिले तर कुणाला पटेल का ? असो. तुम्हाला काही समजले असेल तर जरूर सांगावे. 'पर्व' (भैरप्पा) 'व्यासपर्व'(दुर्गा भागवत) 'युगान्त' (इरावती कर्वे) 'महासमर (नरेन्द्र कोहली) वा अन्य पुस्तकातून याचे काही स्पष्टीकरण दिलेले असेल तर कळवावे ( पूर्वी मी वाचलेली असूनही आता विसारलो आहे)

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 30/05/2023 - 16:07
नियोग इत्यादि मार्ग अवलंबिले जात.
>>> नियोग = प्राचीनकाळीं वंश खुंटू नये म्हणून स्त्रीच्या ठिकाणीं परपुरुषाकडून करविलेली प्रजोत्पत्ति. या विषयावर आधारित अमोल पालेकर दिग्दर्शित अनाहत हा मराठी चित्रपट जरूर पाहा. मल्ल देशाच्या राजाला त्याच्यातील दोषामुळे मूल होत नसल्यामुळे त्या राणीला धर्मशास्त्रानुसार नियोग या विधीची परवानगी दिलेली असते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/05/2023 - 03:54
@प्रचेतस - फार वर्षांपूर्वी या अद्वितीय ग्रंथाचा दुसरा भाग वाचला होता. अर्थात फार क्लिष्ट, तांत्रिक विषय असल्याने पूर्ण वाचणे जमले नव्हते. अहिताग्नी राजवाडे (शंकर रामचंद्र राजवाडे - २३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२) यांचे नाव देखिल हल्ली फार कमी वाचकांना ठाऊक असेल. त्यांचेविषयी डॉ. सदानंद मोरे यांचा लेख इथे वाचता येईल.

In reply to by चित्रगुप्त

हायला भारीच की. माझे लग्न अहिताग्नी राजवाडे मंगल कार्यालयात झाले होते. कुठल्या का कारणाने होईना पण या मोठ्या माणसाच्या नावाशी आपण जोडले गेलो आहोत ही कल्पनाच.... लई भारी वाटलं.

In reply to by रंगीला रतन

हेमंतकुमार 30/05/2023 - 14:34
र. धों. कर्वे यांच्या सर्व लेखनाचे तपशील या संकेतस्थळावर आहेत: तिथे तैलचिंधीबद्दल मूळ लेख वाचता येईल. परंतु गेले ३-४ दिवस ते संकेतस्थळ खूप ‘मंद’ झालेले दिसते. मला काही त्यातील संततीनियमन हा विषय उघडण्यात यश आलेले नाही. बघा कोणी प्रयत्न करून… 5G असल्यास फरक पडतो का ?

In reply to by हेमंतकुमार

तुमचा लेख वाचून तिकडे बरेच लोक तेलचिंधी शोधायला गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित संस्थळ धीमे झाले असेल.

हेमंतकुमार 29/05/2023 - 11:16
तैलचिंधी म्हंजे काय?
चांगला प्रश्न. काही प्रकारच्या तेलांना शुक्रजंतूमारक गुणधर्म आहे. त्या उद्देशाने कर्वे यांनी त्या काळात संभोगसमयी योनीत तेलचिंधी ठेवण्याचा सोपा घरगुती उपाय सांगितला होता. त्यांनी सांगितलेल्या या उपायात कदाचित घरात जे उपलब्ध असते ते गोडतेल / खोबरेल तेल सुद्धा असण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचे यशापयश (टक्केवारी इत्यादी) याचा अभ्यास झाला होता का, याची कल्पना नाही.

अनिंद्य 29/05/2023 - 21:27
फार छान आढावा घेतला आहे डॉक्टर तुम्ही. जुना नवा, कल - आज और कल चा. ते फुगे फुगवणारे चित्र तर फारच धमाल आहे :-) चित्रगुप्त सरांच्या प्रतिसादामुळे वात्सायनापलीकडच्या प्राचीन साहित्याचा अंदाज आला आणि प्रचेतस यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाचा पुनःप्रत्यय !

चौकस२१२ 30/05/2023 - 06:02
विनोदी जाहिरातीन पैकी एक जाहिरात निरोधची बघितलेली आठवते, त्यात असे होते कि मिट्ट काळोखात स्त्री पुरुष संबंध चालू असावेत असे आवाज येत असतात तेवढ्यात दाराशी आवाज होते . " सरप्राईझ हनी आय आम होम".. अर्थातच नवरा "अ वेळी" घरी आलेलला असतो .. आपल्याला दिसत काय कि एक फ्लुरोसन्ट रंगाचा फुगा हवेत तरंगत ( जादूगारांचे फ्लुरोसंट उडणारा हाडाचा सापळा वैगरे खेळ खेळ आठवा !) उड्या मारत येतो .. आणि अचानक सगळी कडे धडपड झाल्याचे आवाज येतात आणि हवेत उरलेलया ६ रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे फुगे धडपडत हेंदकाळात "पळून " जात आहेत "

Bhakti 31/05/2023 - 08:07
अतिशय क्लिष्ट विषय रोचक पद्धतीने लिहिण्यात कुमारजींची विशेषता आहे. रचक्याने विविध फ्लेवरच्या कंडोमच्या उत्पत्तीचा इतिहासही थोडा समाविष्ट व्हावा.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 31/05/2023 - 08:52
चांगला मुद्दा. धन्यवाद.
स्वादिष्ट निरोध
मुळात या प्रकारचे निरोध मुखमैथुनासाठी तयार केले गेले. आज वापरल्या जाणाऱ्या निरोधांमध्ये latex चा वाटा सर्वाधिक आहे. त्याची अंगभूत चव किंवा वास विचित्र असतात. ते झाकण्यासाठी म्हणून त्यावर गोड पदार्थ आणि अन्य काही रसायने वापरून हे नवे निरोध तयार केले गेले. एक गोष्ट महत्त्वाची आहे. या प्रकारचे निरोध चुकूनही योनीसंभोगासाठी वापरू नयेत. त्यातील रसायनांमुळे दाह किंवा जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो. मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 31/05/2023 - 12:32
Flavoured असो कि Ribbed असो कि Dotted... आमचे मत तेच (जे मागे राजेंद्र मेहेंदळे साहेबांच्या 'चावट' लेखावर दिलेल्या प्रतिसादात लिहिले होते 😂) "जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार" 😂 😂 😂

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 02/06/2023 - 11:06
मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत. Latex -handgloves,काही शास्त्रीय किट्स मध्येही वापरला जातो.वैद्यकीय क्षेत्रात आमुलाग्र बदल‌ घडवणारा latex.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 07/06/2023 - 14:23
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट. आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले. लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो, “ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो, “चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?” हा प्रसंग मजेशीर आहे.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 07/06/2023 - 14:23
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट. आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले. लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो, “ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो, “चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?” हा प्रसंग मजेशीर आहे.

अवघड विषय सोपा करुन सांगण्यात कुमार सरांचा हातखंडा आहेच, पण वैद्यकीय संदर्भात ईतके विविध विषय त्यांना कसे काय सुचत असावेत बुवा? असो, माझ्या ज्ञानात बरीच भर पडली लेख आणि त्यावरचे भन्नाट प्रतिसाद वाचुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 02/06/2023 - 08:33
वैद्यकीय संदर्भात इतके विविध विषय त्यांना कसे काय सुचत असावेत बुवा?
चांगला मुद्दा. यासंदर्भात आपली या धाग्यावर पूर्वी काही चर्चाही झाली होती. काही वेळेस एखाद्या विषयाची डोक्यात अचानक ठिणगी पडते तेव्हा आपले आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. हा विषय असाच अचानक सुचला, पण त्याला एक पार्श्वभूमी आहे. आमचे वैद्यकीय शिक्षण झाले त्या काळात आंतरजाल अस्तित्वात सुद्धा नव्हते. तेव्हा असेच एकमेकांच्या चर्चांमधून असे समजले होते की कंडोम हा शब्द डॉक्टर कंडोम या त्याच्या संशोधकाच्या नावावरून आलेला आहे. तेव्हा सगळ्यांनी त्यावर माना डोलवल्या होत्या. आज जेव्हा आंतरजालावर अनेक संदर्भ धुंडाळले तेव्हा त्यातील सत्याचा उलगडा झाला !

छान परंतु सहसा नाक मुरडण्याचा विषय. सहसा या विषयावर अतिशहाणे अशिक्षितच आपण पीएचडी केल्यासारखे बोलतात. या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अर्हताप्राप्त व्यक्तीचे लेखन वाचून छान वाटले. आपण शास्त्रीय बाजू छानच हाताळली आहे. या विषयाला सामाजिक पैलूही आहे. कै. र. धों कर्वे यांचे अमोल कार्य आपण विसरू शकत नाही. ध्यासपर्व हा अमोल पालेकरांचा चित्रपट सुंदर आहे. कर्व्यांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकले होते. त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी खांदा द्यायला अक्षरश: चार देखील माणसे हजर नव्हती. त्यांचा एकच जिवलग मित्र आणि ते अशा दोघांनी सरकारी हातगाडीवरून मृतदेह वाहून नेऊन अंत्यसंस्कार उरकला होता. या विषयावरील दुसरे महत्त्वाचे कार्य फारच मोठ्या प्रमाणावर झाले आहे. एके काळी कोणत्याही बांधकामाच्या जागेवर गेले की कामगार स्त्रियांचा पोरवडा दिसे. एकेका बाईला चरपाच मुले सहज असत. आता असे दिसत नाही. कुटुंब नियोजनासाठी ट्रान्झिस्टर रेडिओ वगैरे बक्षिसे दिली गेली. नर्सेस, सुईणी, एवढेच काय अशिक्षित लोकांमधून लूप, तांबी बसवणार्या स्त्रिया प्रशिक्षित केल्या गेल्या. पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करणारे अल्पशिक्षित लोक तयार झाले. असा एक प्राणी ७०च्या दशकात आमच्या मित्रवर्गाच्या ओळखीचा होता. त्याला आम्ही डॊक्टर म्हणून चिडवत असू. त्यांच्या राजकीय मतांचे विरोधक मानणार नाहींत, हडेलहप्पीपणाने का होईना पण हे महाविशाल कार्य संजय गांधी यांनी केले. मी काही कॊन्ग्रेसचा वा संजय गांधीचा समर्थक नाही, पण सत्य आहे म्हणून लिहिले. आता तर अनेक जाचक धार्मिक बंधने असतांना देखील अनेक स्त्रिया लपूनछपून का होईना संतती नियमनाची साधने वापरतांना दिसतात. असो. वेगळ्या, कांहीशा भृकुटी उंचावल्या नजरेने पाहिल्या गेलेल्या विषयावरील ले ख आवडला, धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 02/06/2023 - 11:35
धन्यवाद ! तुमचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला आणि त्यातील काही मुद्द्यांची विशेष दखल घ्यावी वाटते.
ध्यासपर्व हा अमोल पालेकरांचा चित्रपट सुंदर आहे.
होय, मी पाहिला आहे. खूप चांगला आहे; अगदी प्रभावी.
बांधकामाच्या जागेवर.. एकेका बाईला चरपाच मुले सहज असत. आता असे दिसत नाही
बरोबर. कुटुंबनियोजन प्रसारात अनेक माध्यमातून चांगले समाजप्रबोधन झालेले आहे. या संदर्भात “नको हे चौथं मूल “ हे तेव्हाचे गाणे सुद्धा चांगले आहे. अधूनमधून ते जाल रेडिओवर लागते.
भृकुटी उंचावल्या नजरेने
कित्येक वर्षांनी हा सुंदर शब्दप्रयोग ऐकला आणि आवडलाच !

हेमंतकुमार 14/10/2023 - 20:03
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !

हेमंतकुमार 14/10/2023 - 20:03
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !

सॅल्युट. गरज ही शोधाची जननी त्यामुळेच शोधाचा इतीहास रंजक असतो .तो जेव्हा सिद्ध हस्त लेखणीतून उतरतो त्याच्याबद्दल काय बोलावे. धन्यवाद.

टर्मीनेटर 28/05/2023 - 18:31
"त्याच्या वीर्यात म्हणे “साप आणि विंचू” (= विष) असायचे ! त्यामुळे त्याने संभोगलेली एक दासी मरण पावली."
हे वाचून 'विषकन्या' (बुढ्ढा मर गया मधली राखी सावंत) आठवली एकदम 😀
"या राजाराणीने संभोगसमयी या प्रकारचा प्राणीजन्य निरोध नियमित वापरूनही त्यांना तब्बल आठ अपत्ये झाली !"
चला... राणीला “साप आणि विंचू”ची विषबाधा झाली नाही हेही नसे थोडके! म्हणजे हा 'पडदा' वापरण्याचा मुळ उद्देश सफल झाला म्हणायचा 😂 पण ह्यावरून एक जुना चावट विनोद आठवला... एक कुटुंब नियोजन विभागाचा अधिकारी कुठल्याशा खेडेगावात सरपंचाकरवी ग्रामसभा बोलावून गावकऱ्यांना संतती नियमनासाठी निरोधच्या वापराचे महत्व पटवून देत असतो. बराचवेळ त्याची बडबड ऐकून वैतागलेला सरपंच शेवटी त्याला विचारतो "काय हो साहेब, तुम्ही स्वतः वापरता का निरोध?" त्यावर तो अधिकारी आत्मविश्वासाने छाती फुगवून सांगतो "होय तर, चांगला गेल्या दहा-बारा वर्षांपासून वापरतोय, त्यामुळेच तर आम्हाला फक्त आठ मुले झाली!"

हेमंतकुमार 28/05/2023 - 18:59
उद्घाटनाबद्दल धन्यवाद ! ..
चांगला गेल्या दहा-बारा वर्षांपासून वापरतोय, त्यामुळेच तर आम्हाला फक्त आठ मुले झाली!"
🙂 असाच एक विनोद पूर्वी इथे लिहीलाय. (“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”)

चित्रगुप्त 28/05/2023 - 23:57
रोचक, माहितीपूर्ण लेख. वाचून एक प्रश्न उद्भवला.वात्स्यायनाच्या कामसूत्रात किंवा अन्य काही ग्रंथ, उदा. दामोदरगुप्ताचा 'कुट्टनीमत, बाराव्या शतकापूर्वी लिहिलेला रतिरहस्य ऊर्फ कोकशास्त्र हा ग्रंथ, कल्याणमल्लाचा सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धातील अनंगरंग (रतिशास्त्र) हा ग्रंथ, अहिताग्नी राजवाडे यांचा ग्रंथ (आता नाव आठवत नाहीये) व्यासजनार्दनकृत कामप्रबोध, महाराज देवराजकृत रतिरत्नप्र‌दीपिका, दंडीविरचित नर्मकेलिकौतुकसंवाद इत्यादि प्राचीन भारतीय साहित्यात (तसेच उदाहरणार्थ खजुराहोच्या रतिशिल्पात) असे काही साधन वर्णिलेले आहे का, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. (सन्माननीय मिपाकर प्रचेतस यांना खास विनंती) मराठी विश्वकोषातील एक-दोन उतारे: --- कामशास्त्राच्या उत्पत्तीविषयी वात्स्यायनाने ग्रंथारंभी एक आख्यायिका सांगितली आहे. ब्रह्मदेवाने त्रिवर्गविषयक विशालकाय शास्त्र निर्माण केले. या शास्त्रातून महादेवाचा सेवक नंदी याने १००० अध्यायांचे ‘कामसूत्र’ निराळे काढले. त्याचा संक्षेप उद्दालकपुत्र श्वेतकेतूने ५०० अध्यायांत केला. या संक्षेपाचाही संक्षेप पांचालदेशवासी बाभ्रव्याने सात ‌अधिकरणांत व १५० अध्यायांत केला. यांतील वैशिक नावाचे अधिकरण पाटलिपुत्र नगरात राहणाऱ्या गणिकांच्या आज्ञेला अनुसरून दत्तकाचार्याने निराळष करून स्वतंत्रपणे रचले. तसेच चारायण, सुवर्णनाभ, घोटकमुख, गोनर्दीय, गोणिकापुत्र आणि कुचुमार या सहा आचार्यांनी क्रमश: साधारण, सांप्रयोगिक, कन्यासंप्रयुक्तक, भार्याधिकारिक, पारदारिक व औपनि‌षदिक ही सहा अधिकरणे स्वमतप्रदर्शनार्थ स्वतंत्रपणेच रचली. कामशास्त्राचे असे वेगवेगळे विभाग झाल्याने हे शास्त्र अध्ययन-अध्यापनास गैरसौयीचे ठरून लुप्तप्राय झाले. नंदीचे ‘कामसूत्र’ फारच विशाल व म्हणून अजिबातच लुप्त झाले. बाभ्रव्याचा ग्रंथ विशाल आणि अध्ययनास कठीण होता, तसेच दत्तकादी आचार्यांनी कामशास्त्राच्या केवळ उपांगांवरच आपापले ग्रंथ लिहिलेले होते, म्हणून वात्स्यायनाने या शास्त्रातील सर्व विषयांचा अभ्यास करून व ते संक्षेपाने संकलित करून कामसूत्र या नावाने लोकांपुढे ठेविले. --- श्वेतकेतून समाजस्थैर्याच्या उद्देशाने सर्वप्रथम स्त्रीपुरुषसंबंधावर निर्बंध घातला, ही गोष्ट महाभारताच्या आदिपर्वात आली आहे (१२२.१०). (मिपाचे सन्माननीय सदस्य प्रचेतस यांना खास विनंती)

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 29/05/2023 - 05:35
कामसूत्रात किंवा अन्य काही ग्रंथ....असे काही साधन वर्णिलेले आहे का...
चांगला मुद्दा. मलाही जाणून घ्यायला आवडेल. .. अगदी अलिकडे, म्हणजे र.धों. कर्वे यांच्या काळात (१९२७ ते १९५३) त्यांनी महिलांना योनीत तैलचिंधी वापरण्याचा सल्ला दिला होता.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 29/05/2023 - 19:43
धन्यवाद चित्रगुप्तकाका, महाभारत आणि रामायण वगळता इतर ग्रंथ फारसे अभ्यासलेले नाहीत, आपण वर उल्लेखलेले कोणतेच ग्रंथ वाचलेले नाहीत मात्र अहिताग्नी राजवाडेंच्या ' नासदीयसूक्त भाष्य' ह्या महान ग्रंथाची दुर्मिळ प्रत मिपाकर बॅटमॅन ह्याच्या घरी प्रत्यक्ष पाहिली आहे मात्र वाचली नाही. आदिपर्वातील श्वेतकेतूने स्त्रियांना घालून दिलेल्या मर्यादेची कथा तर माहिती आहेच, शिवाय शांतिपर्वातील भीष्माच्या तोंडी आलेला विवाहसंस्थेविषयक श्लोक याबाबतीत रोचक आहे. न चैषां मैथुनो धर्मो बभूव भरतर्षभ | सङ्कल्पादेव चैतेषामपत्यमुदपद्यत || तत्र त्रेतायुगे काले सङ्कल्पाज्जायते प्रजा | न ह्यभून्मैथुनो धर्मस्तेषामपि जनाधिप || द्वापरे मैथुनो धर्मः प्रजानामभवन्नृप | तथा कलियुगे राजन्द्वंद्वमापेदिरे जनाः || कृतयुगात स्त्री पुरुषांच्या मनात येईल तेव्हा मैथुनक्रिया होत असे, त्रेतायुगात स्त्री पुरुषांनी एकमेकांस विषयभावनेने स्पर्श केला असता समाजजन त्यांस मैथुनाची अनुमती देत असत, द्वापरयुगात मैथुन झाला असता स्त्रीपुरुष एकत्र राहात असत आणि कलियुगात द्वंद्वावस्था म्हणजेच विवाहसंस्था निर्माण झाली मात्र येथे कोठेही संततीविषयक नियमनाचे उल्लेख माझ्या नजरेस तरी आलेले नाहीत, तशी येथे जागरूकताच नव्हती म्हणा ना. अर्थात आर्ष महाकाव्यात उर्ध्वरेत्यांचे वर्णन काही ठिकाणी येते मात्र ते संभोगाच्या दृष्टीने नव्हे. आकाशाच्या शिश्न उठावलेल्या लकुलिशाचे शिल्प याबाबतीत रोचक आहेच. शिवाय संततीनियमांची साधने नव्हती किंवा त्यांची माहिती नव्हती म्हणूनही गंगेने नदीत बुडवलेल्या शांतनु व तिच्या सात पुत्रांची कहाणी तसेच कुंतीने नदीत सोडलेल्या कर्णाची कहाणी त्यादृष्टीने महत्वाची ठरते.

In reply to by प्रचेतस

तीन वेळा बघीतली. सरकारी वाटाड्याने किंवा शिल्पांमधे ह्या विषयावर प्रकाश टाकणारी कुठलीच मुर्ती बघण्यात/ऐकण्यात आली नाही. उलट मैथुनाचे विविध प्रकार दिसले. धृतराष्ट्रपुत्र कौरव,गांधार नरेशाची मुलांची संख्या एवढी नसती जर संतती नियमनाची साधने उपलब्ध असती. कदाचीत लोकसंख्या कमी व संसाधने भरपुर यामुळे सुद्धा संतती नियमनाची गरज भासली नसावी. आमच्या मागच्या पिढीचा इतीहास बघीतला तर बारा,पंधरा बाळंतपणे सर्रास होत. तसेच मृत्यूदर पण भरपुर हे ही कारण असावे. प्रजापतीला म्हणे बासष्ट मुली होत्या.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 29/05/2023 - 21:06
1960 आणि त्यापूर्वीच्या दशकांमध्ये आपल्या पूर्वजांची भली मोठी कुटुंबे हे सर्वसाधारण चित्र होतेच. माझ्या आजीच्या पिढीच्या एक बाई एकदा बोलताना म्हणाल्या होत्या,
सात मुलं झाल्यानंतर मी नवऱ्याला सांगितलं की आता आपण वेगळे झोपायचे. तुला वेगळी बाई ठेवायची असेल तर ठेव. आता मला बाळंतपण सहन होणार नाही
. म्हणूनच, त्याकाळी ज्या समाज धुरीणांनी कुटुंब नियोजनाचा प्रचार व प्रसार केला, त्यांचे कार्य खरोखरच महत्त्वाचे आहे.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 30/05/2023 - 02:44
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ? बहुधा नसावे. याउलट येक केन प्रकारेण गर्भधारणा व्हावी, जास्तीत जास्त संतती व्हावी, यासाठीच नियोग इत्यादि मार्ग अवलंबिले जात. त्यामुळे शंभर कौरव, किंवा कर्णाचा जन्म या गोष्टी 'त्या काळी अशी साधने उपलब्ध नव्हती' याचा पुरावा म्हणून ग्राह्य मानता येणार नाहीत असे वाटते. मुळात सगळे 'कौरव' फक्त गांधारीचेच मुलगे होते की अनेक स्त्रियांचे मिळून 'शंभर कौरव' होते ? तसेच कर्णजन्माच्या वेळी कुंतीचे वय किती होते, आणि 'सूर्यापासून जन्म' हे काय गौडबंगाल आहे ? हल्लीच्या भाषेत तो एक बलात्कार होता असे म्हणावे, तर बलात्कारकर्त्याला त्यातून होऊ शकणार्‍या (संभावित) गर्भाशी काय घेणेदेणे ? मुळात 'गर्भधारणा होऊ नये' ही गरज मनुष्याला केंव्हापासून वाटू लागली, याबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ? . (अवांतरः वरील आकृती ही अमेरिकनांच्या 'प्रत्येक बाबतीत जगात आम्हीच श्रेष्ठ' अशी बढाई मारण्याच्या सवयीचे द्योतक म्हणावे काय ? इ.स. १८०० मधे जगातल्या प्रत्येक देशात जन्मदर काय आहे, हे माहीत करून घेण्याची सोय तरी होती का ? --- Story of US का कुठल्याश्या माहितीपटात दर पाच मिनिटांनंतर कुठल्यातरी घटनेचा उल्लेख "जागतिक इतिहासाला कायमचे नवे वळण लावणारी घटना' असा केलेला बघितले आहे) १९१० मधे जन्मलेल्या माझ्या आईला झालेल्या अपत्यांपैकी मी सर्वात लहान असून आम्ही सात भावंडे होतो, त्याखेरीज काहींचा अगदी लहानपणीच मृत्यू झाला होता. (त्या काळी काही अपवाद वगळता घरोघरी हीच परिस्थिती असायची) आमच्या वडिलांचे औषधाचे दुकान होते. लहानपणी मला एकदा दुकानात 'थ्री नाईट्स' लिहीलेल्या रिकाम्या डब्या मिळाल्या, त्यात काय असायचे ते मला समजले नाही, पण पेन्सिल तासायला लागणार्‍या ब्लेडा ठेवायला मी त्या वापरू लागलो. .. . सदर रिकामी डबी सध्या ईबे वर ११७ डॉलरला मिळते आहे.या डबीवर 'PROTECTION AGAIST DISEASE' असे लिहीलेले आहे हेही लक्षात घेण्याजोगे आहे. (आपण लहानपणापासून साठवलेल्या वस्तू फेकून दिल्या, तसे करायला नको होते.... ही पश्चातबुद्धी) एवढ्या वर्षांनंतर आज या लेखाच्या निमित्ताने ही आठवण जागी झाली याचे फार अप्रूप वाटत आहे. जालावर सापडलेला एक लेखः 15,000 Years Of Condoms: A Feel-Good History Lesson https://www.mtv.com/news/8uperu/history-of-condoms#:~:text=In%20the%201500s%2C%20Japanese%20men,Sexy!&text=The%20Italian%20scientist%20Gabriele%20Falloppio,to%20combat%20a%20syphilis%20epidemic.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 30/05/2023 - 05:43
पौराणिक काळात मुळात 'कुटुंबनियोजन' आवश्यक वाटत होते का ? कुटुंबनियोजन नाही पण गर्भवती राहण्यासाठी इतर पुरुषाचे वीर्य घेणं आणि ते करताना एक विशिष्ट नियम पाळणे याला काही पद्धती होती असे एका कादंबरीत वाचले आहे ( पांडवानवर लिहिलेली भैरप्पा नामक कन्नड भाषिक लेखक यांची कादंबरी .. नाव आता आठवत नाही ) त्यात असे होते कि ज्याचे कडून वीर्य घ्यायचे त्याच्याशी अतिशय व्यापारिक दृषीने सहर्ष संबंध घडव्याचाच पण त्यात कोणतीही भावना गुंतली नाही पाहिजे अशी गुंतली तर तो व्यभिचार ठरेल, मग असा सभोग करताना त्या व्यक्तीने/ पुरुषाने अंगभर जुने तूप फसल्याचे ( वास येणारे ) कि ज्यामुळे स्त्रीला त्या पर पुरुषाबद्दल कोणतीही शारीरिक आकर्षण वाटणार नये .. आता हे कादंबिरीतील आहे खरे खोटे कोण जाणे

In reply to by अनामिक सदस्य

चित्रगुप्त 30/05/2023 - 15:57
@ अनामिक सदस्य: 'कुंतीने मंत्राद्वारे सूर्याला आवाहन करण्यामुळे सूर्यदेव प्रकट होऊन त्याने कुंतीच्या ठायी गर्भस्थापना केली' म्हणजे नेमके काय आणि कसे घडले, हे आजच्या माणसाला कळेल, पटेल अशा पद्धतीने सांगितल्यास बरे होईल. मुळात 'पृथा' ही राजा शूरसेन याची मुलगी. त्याने तिला कुंतीभोज राजाला 'देऊन टाकले' त्यामुळे तिचे 'कुंती' हे नाव पडले. कुंतीभोजाने तिला वर्षभर 'सेवेसाठी' म्हणून अतिशय तापट असलेल्या दुर्वास ऋषीला 'दिले'. तिने उत्तम सेवा केल्याचे बक्षिस म्हणून दुर्वासाने तिला 'मंत्र' दिला. महाभारतात हा मंत्र आणि त्याचे अनुष्ठान याला 'अभिचार' (अभिचाराभिसंयुक्तम) असे म्हटले आहे. वेदातील 'अभिचार मंत्रा'ची योजना ही कुणाचा नाश, पराजय करण्यासाठी, किंवा कुणाला अंकित, वश करण्यासाठी केला जात असे. बालसुलभ कुतुहलापायी कुंतीने सूर्यावर या मंत्राचा प्रयोग करून बघितला त्यातून कर्णाचा जन्म झाला म्हणे. 'सूर्यदेव' म्हणुन जे कुणी होते, त्याला गर्भस्थापना करणे बंधनकारक होते का ? असल्यास त्याचे कारण काय ? सगळेच अकलनीय. हल्लीच्या एकाद्या मुलीने गर्भ राहिल्यावर असे काही स्पष्टीकरण दिले तर कुणाला पटेल का ? असो. तुम्हाला काही समजले असेल तर जरूर सांगावे. 'पर्व' (भैरप्पा) 'व्यासपर्व'(दुर्गा भागवत) 'युगान्त' (इरावती कर्वे) 'महासमर (नरेन्द्र कोहली) वा अन्य पुस्तकातून याचे काही स्पष्टीकरण दिलेले असेल तर कळवावे ( पूर्वी मी वाचलेली असूनही आता विसारलो आहे)

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 30/05/2023 - 16:07
नियोग इत्यादि मार्ग अवलंबिले जात.
>>> नियोग = प्राचीनकाळीं वंश खुंटू नये म्हणून स्त्रीच्या ठिकाणीं परपुरुषाकडून करविलेली प्रजोत्पत्ति. या विषयावर आधारित अमोल पालेकर दिग्दर्शित अनाहत हा मराठी चित्रपट जरूर पाहा. मल्ल देशाच्या राजाला त्याच्यातील दोषामुळे मूल होत नसल्यामुळे त्या राणीला धर्मशास्त्रानुसार नियोग या विधीची परवानगी दिलेली असते.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/05/2023 - 03:54
@प्रचेतस - फार वर्षांपूर्वी या अद्वितीय ग्रंथाचा दुसरा भाग वाचला होता. अर्थात फार क्लिष्ट, तांत्रिक विषय असल्याने पूर्ण वाचणे जमले नव्हते. अहिताग्नी राजवाडे (शंकर रामचंद्र राजवाडे - २३ ऑक्टोबर १८७९‒२७ नोव्हेंबर १९५२) यांचे नाव देखिल हल्ली फार कमी वाचकांना ठाऊक असेल. त्यांचेविषयी डॉ. सदानंद मोरे यांचा लेख इथे वाचता येईल.

In reply to by चित्रगुप्त

हायला भारीच की. माझे लग्न अहिताग्नी राजवाडे मंगल कार्यालयात झाले होते. कुठल्या का कारणाने होईना पण या मोठ्या माणसाच्या नावाशी आपण जोडले गेलो आहोत ही कल्पनाच.... लई भारी वाटलं.

In reply to by रंगीला रतन

हेमंतकुमार 30/05/2023 - 14:34
र. धों. कर्वे यांच्या सर्व लेखनाचे तपशील या संकेतस्थळावर आहेत: तिथे तैलचिंधीबद्दल मूळ लेख वाचता येईल. परंतु गेले ३-४ दिवस ते संकेतस्थळ खूप ‘मंद’ झालेले दिसते. मला काही त्यातील संततीनियमन हा विषय उघडण्यात यश आलेले नाही. बघा कोणी प्रयत्न करून… 5G असल्यास फरक पडतो का ?

In reply to by हेमंतकुमार

तुमचा लेख वाचून तिकडे बरेच लोक तेलचिंधी शोधायला गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित संस्थळ धीमे झाले असेल.

हेमंतकुमार 29/05/2023 - 11:16
तैलचिंधी म्हंजे काय?
चांगला प्रश्न. काही प्रकारच्या तेलांना शुक्रजंतूमारक गुणधर्म आहे. त्या उद्देशाने कर्वे यांनी त्या काळात संभोगसमयी योनीत तेलचिंधी ठेवण्याचा सोपा घरगुती उपाय सांगितला होता. त्यांनी सांगितलेल्या या उपायात कदाचित घरात जे उपलब्ध असते ते गोडतेल / खोबरेल तेल सुद्धा असण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचे यशापयश (टक्केवारी इत्यादी) याचा अभ्यास झाला होता का, याची कल्पना नाही.

अनिंद्य 29/05/2023 - 21:27
फार छान आढावा घेतला आहे डॉक्टर तुम्ही. जुना नवा, कल - आज और कल चा. ते फुगे फुगवणारे चित्र तर फारच धमाल आहे :-) चित्रगुप्त सरांच्या प्रतिसादामुळे वात्सायनापलीकडच्या प्राचीन साहित्याचा अंदाज आला आणि प्रचेतस यांच्या सर्वस्पर्शी व्यासंगाचा पुनःप्रत्यय !

चौकस२१२ 30/05/2023 - 06:02
विनोदी जाहिरातीन पैकी एक जाहिरात निरोधची बघितलेली आठवते, त्यात असे होते कि मिट्ट काळोखात स्त्री पुरुष संबंध चालू असावेत असे आवाज येत असतात तेवढ्यात दाराशी आवाज होते . " सरप्राईझ हनी आय आम होम".. अर्थातच नवरा "अ वेळी" घरी आलेलला असतो .. आपल्याला दिसत काय कि एक फ्लुरोसन्ट रंगाचा फुगा हवेत तरंगत ( जादूगारांचे फ्लुरोसंट उडणारा हाडाचा सापळा वैगरे खेळ खेळ आठवा !) उड्या मारत येतो .. आणि अचानक सगळी कडे धडपड झाल्याचे आवाज येतात आणि हवेत उरलेलया ६ रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे फुगे धडपडत हेंदकाळात "पळून " जात आहेत "

Bhakti 31/05/2023 - 08:07
अतिशय क्लिष्ट विषय रोचक पद्धतीने लिहिण्यात कुमारजींची विशेषता आहे. रचक्याने विविध फ्लेवरच्या कंडोमच्या उत्पत्तीचा इतिहासही थोडा समाविष्ट व्हावा.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 31/05/2023 - 08:52
चांगला मुद्दा. धन्यवाद.
स्वादिष्ट निरोध
मुळात या प्रकारचे निरोध मुखमैथुनासाठी तयार केले गेले. आज वापरल्या जाणाऱ्या निरोधांमध्ये latex चा वाटा सर्वाधिक आहे. त्याची अंगभूत चव किंवा वास विचित्र असतात. ते झाकण्यासाठी म्हणून त्यावर गोड पदार्थ आणि अन्य काही रसायने वापरून हे नवे निरोध तयार केले गेले. एक गोष्ट महत्त्वाची आहे. या प्रकारचे निरोध चुकूनही योनीसंभोगासाठी वापरू नयेत. त्यातील रसायनांमुळे दाह किंवा जंतूसंसर्ग होण्याचा धोका संभवतो. मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत.

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 31/05/2023 - 12:32
Flavoured असो कि Ribbed असो कि Dotted... आमचे मत तेच (जे मागे राजेंद्र मेहेंदळे साहेबांच्या 'चावट' लेखावर दिलेल्या प्रतिसादात लिहिले होते 😂) "जिभेवर प्लॅस्टिकची पिशवी लावून वाटीतले श्रीखंड चाटले, तर त्या श्रीखंडाचा काय कप्पाळ आस्वाद घेता येणार" 😂 😂 😂

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 02/06/2023 - 11:06
मुळात हा विषय जाहिरात माध्यमांमध्येच जास्त चर्चिला गेलेला आहे. या संबंधातील शास्त्रीय विवेचन किंवा अधिकृत संदर्भ सहज उपलब्ध नाहीत. Latex -handgloves,काही शास्त्रीय किट्स मध्येही वापरला जातो.वैद्यकीय क्षेत्रात आमुलाग्र बदल‌ घडवणारा latex.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 07/06/2023 - 14:23
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट. आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले. लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो, “ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो, “चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?” हा प्रसंग मजेशीर आहे.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 07/06/2023 - 14:23
वरील स्वादिष्ट निरोधची चर्चा आठवायचे कारण म्हणजे नुकताच प्राईम व्हिडिओवर आलेला “कहानी रबर बँड की’ हा हिंदी चित्रपट. आता पाहायला सुरुवात केली आहे. त्याने अर्ध्या तासात तरी काही पकड घेतलेली नाही. परंतु एक दृश्य मात्र मजेदार वाटले. लहान गावातील किराणा विक्रीचे दुकान. त्यात निरोध देखील विक्रीला ठेवलेले. दारात मुली उभ्या असताना एक तरुण निरोध विकत घ्यायला आलेला आहे. पण तो दुकानदाराला ते विचारायला खूप लाजतो आहे. अखेर तो ओशाळून म्हणतो, “ बरं .. नाही, एक चॉकलेट द्या”. त्यावर दुकानदार म्हणतो, “चॉकलेट की चॉकलेट फ्लेवर?” हा प्रसंग मजेशीर आहे.

अवघड विषय सोपा करुन सांगण्यात कुमार सरांचा हातखंडा आहेच, पण वैद्यकीय संदर्भात ईतके विविध विषय त्यांना कसे काय सुचत असावेत बुवा? असो, माझ्या ज्ञानात बरीच भर पडली लेख आणि त्यावरचे भन्नाट प्रतिसाद वाचुन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंतकुमार 02/06/2023 - 08:33
वैद्यकीय संदर्भात इतके विविध विषय त्यांना कसे काय सुचत असावेत बुवा?
चांगला मुद्दा. यासंदर्भात आपली या धाग्यावर पूर्वी काही चर्चाही झाली होती. काही वेळेस एखाद्या विषयाची डोक्यात अचानक ठिणगी पडते तेव्हा आपले आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. हा विषय असाच अचानक सुचला, पण त्याला एक पार्श्वभूमी आहे. आमचे वैद्यकीय शिक्षण झाले त्या काळात आंतरजाल अस्तित्वात सुद्धा नव्हते. तेव्हा असेच एकमेकांच्या चर्चांमधून असे समजले होते की कंडोम हा शब्द डॉक्टर कंडोम या त्याच्या संशोधकाच्या नावावरून आलेला आहे. तेव्हा सगळ्यांनी त्यावर माना डोलवल्या होत्या. आज जेव्हा आंतरजालावर अनेक संदर्भ धुंडाळले तेव्हा त्यातील सत्याचा उलगडा झाला !

छान परंतु सहसा नाक मुरडण्याचा विषय. सहसा या विषयावर अतिशहाणे अशिक्षितच आपण पीएचडी केल्यासारखे बोलतात. या पार्श्वभूमीवर आपल्यासारख्या अर्हताप्राप्त व्यक्तीचे लेखन वाचून छान वाटले. आपण शास्त्रीय बाजू छानच हाताळली आहे. या विषयाला सामाजिक पैलूही आहे. कै. र. धों कर्वे यांचे अमोल कार्य आपण विसरू शकत नाही. ध्यासपर्व हा अमोल पालेकरांचा चित्रपट सुंदर आहे. कर्व्यांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकले होते. त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी खांदा द्यायला अक्षरश: चार देखील माणसे हजर नव्हती. त्यांचा एकच जिवलग मित्र आणि ते अशा दोघांनी सरकारी हातगाडीवरून मृतदेह वाहून नेऊन अंत्यसंस्कार उरकला होता. या विषयावरील दुसरे महत्त्वाचे कार्य फारच मोठ्या प्रमाणावर झाले आहे. एके काळी कोणत्याही बांधकामाच्या जागेवर गेले की कामगार स्त्रियांचा पोरवडा दिसे. एकेका बाईला चरपाच मुले सहज असत. आता असे दिसत नाही. कुटुंब नियोजनासाठी ट्रान्झिस्टर रेडिओ वगैरे बक्षिसे दिली गेली. नर्सेस, सुईणी, एवढेच काय अशिक्षित लोकांमधून लूप, तांबी बसवणार्या स्त्रिया प्रशिक्षित केल्या गेल्या. पुरुषांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया करणारे अल्पशिक्षित लोक तयार झाले. असा एक प्राणी ७०च्या दशकात आमच्या मित्रवर्गाच्या ओळखीचा होता. त्याला आम्ही डॊक्टर म्हणून चिडवत असू. त्यांच्या राजकीय मतांचे विरोधक मानणार नाहींत, हडेलहप्पीपणाने का होईना पण हे महाविशाल कार्य संजय गांधी यांनी केले. मी काही कॊन्ग्रेसचा वा संजय गांधीचा समर्थक नाही, पण सत्य आहे म्हणून लिहिले. आता तर अनेक जाचक धार्मिक बंधने असतांना देखील अनेक स्त्रिया लपूनछपून का होईना संतती नियमनाची साधने वापरतांना दिसतात. असो. वेगळ्या, कांहीशा भृकुटी उंचावल्या नजरेने पाहिल्या गेलेल्या विषयावरील ले ख आवडला, धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 02/06/2023 - 11:35
धन्यवाद ! तुमचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला आणि त्यातील काही मुद्द्यांची विशेष दखल घ्यावी वाटते.
ध्यासपर्व हा अमोल पालेकरांचा चित्रपट सुंदर आहे.
होय, मी पाहिला आहे. खूप चांगला आहे; अगदी प्रभावी.
बांधकामाच्या जागेवर.. एकेका बाईला चरपाच मुले सहज असत. आता असे दिसत नाही
बरोबर. कुटुंबनियोजन प्रसारात अनेक माध्यमातून चांगले समाजप्रबोधन झालेले आहे. या संदर्भात “नको हे चौथं मूल “ हे तेव्हाचे गाणे सुद्धा चांगले आहे. अधूनमधून ते जाल रेडिओवर लागते.
भृकुटी उंचावल्या नजरेने
कित्येक वर्षांनी हा सुंदर शब्दप्रयोग ऐकला आणि आवडलाच !

हेमंतकुमार 14/10/2023 - 20:03
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !

हेमंतकुमार 14/10/2023 - 20:03
जगातील सर्वात प्राचीन आणि सुस्थितीत असलेला निरोध ऑस्ट्रिया येथील संग्रहालयात ठेवला आहे. तो स्वीडनमधील उत्खननातून मिळालेला आहे. तो डुकराच्या आतड्यांपासून बनवलेला आहे त्याच्याबरोबरच्या माहितीपत्रकात एक मजेदार माहिती आहे. हा निरोध वापरण्यापूर्वी गरम दुधात बुडवून घेण्याची शिफारस आहे, ज्यामुळे गुप्तरोगांपासून संरक्षण मिळते !
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो.

हवाईजन्मांच्या अघटित घटना !

हेमंतकुमार ·

सुखी 07/03/2023 - 21:48
रोचक माहिती... असं ऐकल आहे की विमानात जन्मलेल्या व्यक्तीस ती विमान कंपनी फुकट प्रवास करू देते म्हणून.. हे खर आहे का?

In reply to by सुखी

हेमंतकुमार 08/03/2023 - 07:48
व्यक्तीस ती विमान कंपनी फुकट प्रवास करू देते >> त्या बालकाचा जन्मानंतरचा लगेचचा प्रवास तर फुकट होतोच आणि विमान वेळापत्रक / मार्ग बदलण्याचा अतिरिक्त खर्च त्याच्या पालकांकडून वसूल केला जात नसावा ! :))) बाकी त्याच्या मोठेपणीचे माहीत नाही. अनुभवी लोकांनी सांगावे..

कुमार सर नेहमीच एकाहुन एक सरस विषय घेउन आणि त्याची सर्वांगाने चिकीत्सा करुन लेख लिहितात. त्यामुळे वाचायला मजा येतेच पण ज्ञानातही भर पडते. लिहीते रहा कुमार सर!!

Bhakti 08/03/2023 - 13:01
हवाईजन्म असलेले अधिकांश बाळ सुखरूप आहेत हे छानच आहे. अगदी प्रत्येकीची प्रसुती कथा निराळीच असते. रच्याकने डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला प्रसुती हा व्हिडिओ चांगला आहे. https://youtu.be/gUpNItnrS8Y

हेमंतकुमार 08/03/2023 - 13:54
१.
लिहीते रहा
>>> तुमच्यासारख्या चिकित्सक सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याने आनंद मिळतो. .... २.
डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला
>>> चांगला आहे.

हेमंतकुमार 08/03/2023 - 13:54
१.
लिहीते रहा
>>> तुमच्यासारख्या चिकित्सक सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याने आनंद मिळतो. .... २.
डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला
>>> चांगला आहे.

चौकस२१२ 09/03/2023 - 07:03
अशा प्रकारे विमानाचा मूळ मार्ग बदलून जेव्हा विमान अन्यत्र फिरवावे लागते त्याचा सध्याचा अतिरिक्त खर्च सुमारे एक लाख अमेरिकी डॉलर्स असतो. हायला अस्मादिकांनी एक एयरलाईन ला असा झटका जवळ जवळ दिला होता ते सुधा अ ३८० ला ! ( अर्थात प्रसूती नाही दुसरेच काहीतरी ) अह्ह्ह कधीतरी आयुष्यात क वर्गातून या वर्गात फुकट ची बढती मिळविता अशी इच्छा सगळ्या "का वर्ग वाल्यांची असते ,, त्यात जर लांब पाल्याचे उड्डाण असेल तर "अ " वर्ग मस्त वसूल करून घेता येणार म्हणजे मज्जाच मज्जा "क" वर्गातील मिळणाऱ्या आयरिश क्रीम , चॉकलेट आणि १ तांबडी वारुणी अश्या माफक पेय पानांनंतर अस्मादिकांना प्रचंड उलटी झाली , पित्त असणार,, उभे काय "क" वर्गाच्या शीटवर अर्धवट पडने तेही अवघड होत, विमान बहुतेक सागरावर किंवा पसरलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलयातील वाळवंतावर असावे म्हणजे कुठेही वळवायाचे तर हजारो डॉलर .. भुर्दंड ... सुदैवाने एक वैद्य होता .... तातडीने माझी रवानगी "अ" वर्गात केली गेली .. पोट ट हलके झाले आह इशांत झोप एढाच त्याने सांगितले ... संपूर्ण आडवि होणारी गादी .. अह्ह्ह कधी एकदा आडवे होतोय एवढेच काय ते मनात होते .. सकाळी उठवा एवढे म्हणालो आणि झोपायचा प्रयत्न चालू होता चुकून तेवढ्यात एक हवाई सुंदरी काहीतरी हुच्च खाद्यपदार्थ आणि शॅम्पेन पाहिजे का म्हणून विचारती झाली .. मी अर्धंझोपेत काहीतरी बरळतो ... तीला वाटले हा झोपेत तरी आहि किंवा जास्त झालीय मी म्हन्ले थोडे से पाणी दे बाई ! असो जाग आली तेवहा शेजारी डोक्यवरची रुबाबदार टोपी हातात घेतलेले ३८० चा कप्तान शेजारी बसून काय पाव्हणं ठीक आह एन ,, जाल ना घरी अशी विचारपूस करीत होता , विमान अर्थातच गंतवय ठिकाणी पोचले होते ... अर्थात तशी खरी "इमार्गांशीं " नसावी पण मग अगदी कप्तान भाऊ विशारपूस कार्याला का आले आसवेत खजील हुन सगळ्यांना धन्यवाद देत बाहेर पडलो .. पुढे अनेक दिवस चॉकलेट वरून मन उडाले ! ताबंड्या वारुणीचा पण धसका थोडे दिवस होता विषयान्तरबद्दल क्षमस्व

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 09/03/2023 - 07:42
** विषयान्तरबद्दल क्षमस्व >>> नाही हो, अजिबात नाही ! तुमचा अनुभव अगदी छान वर्णन केला आहे तुम्ही. विमानातलाच विषय चाललाय तर काय हरकत नाय .. **कप्तान भाऊ विशारपूस >> असा योग फारसा वाटेला येत नाही हो कोणाच्या ! :))

ऑपरेशन सॉलोमन (१९९१) इथिओपिया या देशात १९९०-९१ मध्ये यादवी युद्ध होऊन बंडखोरांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे तेथे काही शतकांपासून राहणाऱ्या बेटा इस्रायली लोकांचं जीवन धोक्यात आलं होतं. (आपल्याकडे कोकणात बेने इस्रायली आहेत, तसे तिकडचे बेटा इस्रायली). तेव्हा इस्रायलने ऑपरेशन सॉलोमन राबवलं ज्यात १४००० हून अधिक ज्यूंना इथिओपिया मधून इस्रायल मध्ये आणण्यात आलं. त्यातील एका प्रसंगात एका बोईंग ७४७ विमानात १००० हून अधिक प्रवाश्यांना बसवून इस्रायलला नेण्यात आलं. (हासुद्धा एक गिनीज बुकमध्ये नोंदवलेला विक्रम आहे!) विमान उड्डाण करताना जेवढे प्रवासी होते, त्यापेक्षा उतरताना दोन प्रवासी अधिक होते! कारण उड्डाणादरम्यान दोन महिलांची हवेत प्रसूती होऊन त्यांनी दोन बाळांना जन्म दिला होता!! या ऑपरेशन सॉलोमन दरम्यान केवळ छतीस तासांत पस्तीस विमानांनी उड्डाण केले आणि त्यादरम्यान एकूण आठ बाळांचा जन्म हवेत झाला होता!

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 13/03/2023 - 07:11
छान माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. विक्रम भारीच म्हणायचा. *************** खुलासा : लेखासाठी जो मुख्य संदर्भ (क्रमांक १ ) वापरलेला आहे, त्यात जगातील फक्त व्यावसायिक प्रवासी विमानांमध्ये घडलेल्या जन्मांची नोंद आहे. या व्यतिरिक्त, खाजगी विमाने, विशिष्ट कामासाठी वापरलेली लष्करी विमाने किंवा हवाई रुग्णवाहिकांमध्ये अशा घटना घडल्या आहेत का, याची कल्पना नाही. असल्यास, त्यांची सांख्यिक माहिती वेगळी राहील.

हेमंतकुमार 13/03/2023 - 15:58
जर बाळाचा जन्म विमान समुद्रावर असताना झाला तर नागरिकत्वाचे नियम प्रत्येक देशागणिक वेगळे आहेत. इथे सविस्तर माहिती आहे: काही ठळक मुद्दे : १. काही देशांत, जर विमान त्या देशाच्या मालकीचे असेल तर ते नागरिकत्व मिळते. २. अमेरिकेच्या बाबतीत सागरी आणि हवाई हद्दीत बाळ जन्मले असता नागरिकत्व मिळते. पण इंग्लंडच्या बाबतीत असे मिळत नाही. ३. काही देशांमध्ये पालकांचेच नागरिकत्व मुलाला लागू केले जाते

हेमंतकुमार 13/03/2023 - 15:58
जर बाळाचा जन्म विमान समुद्रावर असताना झाला तर नागरिकत्वाचे नियम प्रत्येक देशागणिक वेगळे आहेत. इथे सविस्तर माहिती आहे: काही ठळक मुद्दे : १. काही देशांत, जर विमान त्या देशाच्या मालकीचे असेल तर ते नागरिकत्व मिळते. २. अमेरिकेच्या बाबतीत सागरी आणि हवाई हद्दीत बाळ जन्मले असता नागरिकत्व मिळते. पण इंग्लंडच्या बाबतीत असे मिळत नाही. ३. काही देशांमध्ये पालकांचेच नागरिकत्व मुलाला लागू केले जाते

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 15/03/2023 - 11:18
धन्यवाद!
ऑपरेशन सॉलोमन (१९९१)' वाला प्रतिसादही
>> या लेखासाठीच्या संदर्भ क्रमांक १ नुसार असे वाटते, की ऑपरेशन सॉलोमनमधील ८ जन्म लेखातील 74 अंकांमध्ये मोजलेले नसावेत. कारण, मूळ संदर्भात 1990 ते 99 या कालावधीत एकूण सातच जन्म दाखवलेले आहेत.

काही वर्षांंपूर्वी पूर्व युरोपातील गरीब साम्यवादी देशातले काही चलाख लोक बायकोला बाळंत होण्यासाठी पश्चिम युरोपातील प्रगत राष्ट्रांतल्या शहरांत पाठवीत, जेणेकरून त्यांच्या अपत्यांना त्या राष्ट्रातले नागरिकत्त्व मिळावे. मग विविध राष्ट्रांनी नागरिकत्त्वाचे नियम आणले. गरीब, अप्रगत राष्ट्रातील कांही मुली प्रगत राष्ट्रांतील मुलांशी नाममात्र विवाह करीत. मग त्या मुलींना इच्छित राष्ट्राचे नागरिकत्त्व मिळाले की नंतर विवाहविच्छेद घेत. मग काही राष्ट्रांनी अशा विवाहांना मान्यता देणे थांबवले. मग असे विवाह तिसर्‍या राष्ट्रांत होऊं लागले. मग अशा त्रयस्थ देशातील विवाहांना मान्यता नाकारली गेली. एका काळात लोक एका क्ष राष्ट्रात जाऊन विवाह करीत, त्यामुळे त्या क्ष राष्ट्रातील विवाहांना बहुतेक राष्ट्रांत मान्यता नाही असे मी ऐकले आहे. असो. छान मनोरंजक लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 28/03/2023 - 12:50
माहितीपूर्ण व रंजक प्रतिसाद आवडला.
क्ष राष्ट्रातील विवाहांना बहुतेक राष्ट्रांत मान्यता नाही
हे भारी असून त्या क्ष वर विचार करीत आहे ! :)

सुखी 07/03/2023 - 21:48
रोचक माहिती... असं ऐकल आहे की विमानात जन्मलेल्या व्यक्तीस ती विमान कंपनी फुकट प्रवास करू देते म्हणून.. हे खर आहे का?

In reply to by सुखी

हेमंतकुमार 08/03/2023 - 07:48
व्यक्तीस ती विमान कंपनी फुकट प्रवास करू देते >> त्या बालकाचा जन्मानंतरचा लगेचचा प्रवास तर फुकट होतोच आणि विमान वेळापत्रक / मार्ग बदलण्याचा अतिरिक्त खर्च त्याच्या पालकांकडून वसूल केला जात नसावा ! :))) बाकी त्याच्या मोठेपणीचे माहीत नाही. अनुभवी लोकांनी सांगावे..

कुमार सर नेहमीच एकाहुन एक सरस विषय घेउन आणि त्याची सर्वांगाने चिकीत्सा करुन लेख लिहितात. त्यामुळे वाचायला मजा येतेच पण ज्ञानातही भर पडते. लिहीते रहा कुमार सर!!

Bhakti 08/03/2023 - 13:01
हवाईजन्म असलेले अधिकांश बाळ सुखरूप आहेत हे छानच आहे. अगदी प्रत्येकीची प्रसुती कथा निराळीच असते. रच्याकने डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला प्रसुती हा व्हिडिओ चांगला आहे. https://youtu.be/gUpNItnrS8Y

हेमंतकुमार 08/03/2023 - 13:54
१.
लिहीते रहा
>>> तुमच्यासारख्या चिकित्सक सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याने आनंद मिळतो. .... २.
डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला
>>> चांगला आहे.

हेमंतकुमार 08/03/2023 - 13:54
१.
लिहीते रहा
>>> तुमच्यासारख्या चिकित्सक सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याने आनंद मिळतो. .... २.
डॉक्टर शिल्पा चिटणीस यांनी माहिती दिलेला
>>> चांगला आहे.

चौकस२१२ 09/03/2023 - 07:03
अशा प्रकारे विमानाचा मूळ मार्ग बदलून जेव्हा विमान अन्यत्र फिरवावे लागते त्याचा सध्याचा अतिरिक्त खर्च सुमारे एक लाख अमेरिकी डॉलर्स असतो. हायला अस्मादिकांनी एक एयरलाईन ला असा झटका जवळ जवळ दिला होता ते सुधा अ ३८० ला ! ( अर्थात प्रसूती नाही दुसरेच काहीतरी ) अह्ह्ह कधीतरी आयुष्यात क वर्गातून या वर्गात फुकट ची बढती मिळविता अशी इच्छा सगळ्या "का वर्ग वाल्यांची असते ,, त्यात जर लांब पाल्याचे उड्डाण असेल तर "अ " वर्ग मस्त वसूल करून घेता येणार म्हणजे मज्जाच मज्जा "क" वर्गातील मिळणाऱ्या आयरिश क्रीम , चॉकलेट आणि १ तांबडी वारुणी अश्या माफक पेय पानांनंतर अस्मादिकांना प्रचंड उलटी झाली , पित्त असणार,, उभे काय "क" वर्गाच्या शीटवर अर्धवट पडने तेही अवघड होत, विमान बहुतेक सागरावर किंवा पसरलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलयातील वाळवंतावर असावे म्हणजे कुठेही वळवायाचे तर हजारो डॉलर .. भुर्दंड ... सुदैवाने एक वैद्य होता .... तातडीने माझी रवानगी "अ" वर्गात केली गेली .. पोट ट हलके झाले आह इशांत झोप एढाच त्याने सांगितले ... संपूर्ण आडवि होणारी गादी .. अह्ह्ह कधी एकदा आडवे होतोय एवढेच काय ते मनात होते .. सकाळी उठवा एवढे म्हणालो आणि झोपायचा प्रयत्न चालू होता चुकून तेवढ्यात एक हवाई सुंदरी काहीतरी हुच्च खाद्यपदार्थ आणि शॅम्पेन पाहिजे का म्हणून विचारती झाली .. मी अर्धंझोपेत काहीतरी बरळतो ... तीला वाटले हा झोपेत तरी आहि किंवा जास्त झालीय मी म्हन्ले थोडे से पाणी दे बाई ! असो जाग आली तेवहा शेजारी डोक्यवरची रुबाबदार टोपी हातात घेतलेले ३८० चा कप्तान शेजारी बसून काय पाव्हणं ठीक आह एन ,, जाल ना घरी अशी विचारपूस करीत होता , विमान अर्थातच गंतवय ठिकाणी पोचले होते ... अर्थात तशी खरी "इमार्गांशीं " नसावी पण मग अगदी कप्तान भाऊ विशारपूस कार्याला का आले आसवेत खजील हुन सगळ्यांना धन्यवाद देत बाहेर पडलो .. पुढे अनेक दिवस चॉकलेट वरून मन उडाले ! ताबंड्या वारुणीचा पण धसका थोडे दिवस होता विषयान्तरबद्दल क्षमस्व

In reply to by चौकस२१२

हेमंतकुमार 09/03/2023 - 07:42
** विषयान्तरबद्दल क्षमस्व >>> नाही हो, अजिबात नाही ! तुमचा अनुभव अगदी छान वर्णन केला आहे तुम्ही. विमानातलाच विषय चाललाय तर काय हरकत नाय .. **कप्तान भाऊ विशारपूस >> असा योग फारसा वाटेला येत नाही हो कोणाच्या ! :))

ऑपरेशन सॉलोमन (१९९१) इथिओपिया या देशात १९९०-९१ मध्ये यादवी युद्ध होऊन बंडखोरांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे तेथे काही शतकांपासून राहणाऱ्या बेटा इस्रायली लोकांचं जीवन धोक्यात आलं होतं. (आपल्याकडे कोकणात बेने इस्रायली आहेत, तसे तिकडचे बेटा इस्रायली). तेव्हा इस्रायलने ऑपरेशन सॉलोमन राबवलं ज्यात १४००० हून अधिक ज्यूंना इथिओपिया मधून इस्रायल मध्ये आणण्यात आलं. त्यातील एका प्रसंगात एका बोईंग ७४७ विमानात १००० हून अधिक प्रवाश्यांना बसवून इस्रायलला नेण्यात आलं. (हासुद्धा एक गिनीज बुकमध्ये नोंदवलेला विक्रम आहे!) विमान उड्डाण करताना जेवढे प्रवासी होते, त्यापेक्षा उतरताना दोन प्रवासी अधिक होते! कारण उड्डाणादरम्यान दोन महिलांची हवेत प्रसूती होऊन त्यांनी दोन बाळांना जन्म दिला होता!! या ऑपरेशन सॉलोमन दरम्यान केवळ छतीस तासांत पस्तीस विमानांनी उड्डाण केले आणि त्यादरम्यान एकूण आठ बाळांचा जन्म हवेत झाला होता!

In reply to by तुषार काळभोर

हेमंतकुमार 13/03/2023 - 07:11
छान माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. विक्रम भारीच म्हणायचा. *************** खुलासा : लेखासाठी जो मुख्य संदर्भ (क्रमांक १ ) वापरलेला आहे, त्यात जगातील फक्त व्यावसायिक प्रवासी विमानांमध्ये घडलेल्या जन्मांची नोंद आहे. या व्यतिरिक्त, खाजगी विमाने, विशिष्ट कामासाठी वापरलेली लष्करी विमाने किंवा हवाई रुग्णवाहिकांमध्ये अशा घटना घडल्या आहेत का, याची कल्पना नाही. असल्यास, त्यांची सांख्यिक माहिती वेगळी राहील.

हेमंतकुमार 13/03/2023 - 15:58
जर बाळाचा जन्म विमान समुद्रावर असताना झाला तर नागरिकत्वाचे नियम प्रत्येक देशागणिक वेगळे आहेत. इथे सविस्तर माहिती आहे: काही ठळक मुद्दे : १. काही देशांत, जर विमान त्या देशाच्या मालकीचे असेल तर ते नागरिकत्व मिळते. २. अमेरिकेच्या बाबतीत सागरी आणि हवाई हद्दीत बाळ जन्मले असता नागरिकत्व मिळते. पण इंग्लंडच्या बाबतीत असे मिळत नाही. ३. काही देशांमध्ये पालकांचेच नागरिकत्व मुलाला लागू केले जाते

हेमंतकुमार 13/03/2023 - 15:58
जर बाळाचा जन्म विमान समुद्रावर असताना झाला तर नागरिकत्वाचे नियम प्रत्येक देशागणिक वेगळे आहेत. इथे सविस्तर माहिती आहे: काही ठळक मुद्दे : १. काही देशांत, जर विमान त्या देशाच्या मालकीचे असेल तर ते नागरिकत्व मिळते. २. अमेरिकेच्या बाबतीत सागरी आणि हवाई हद्दीत बाळ जन्मले असता नागरिकत्व मिळते. पण इंग्लंडच्या बाबतीत असे मिळत नाही. ३. काही देशांमध्ये पालकांचेच नागरिकत्व मुलाला लागू केले जाते

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 15/03/2023 - 11:18
धन्यवाद!
ऑपरेशन सॉलोमन (१९९१)' वाला प्रतिसादही
>> या लेखासाठीच्या संदर्भ क्रमांक १ नुसार असे वाटते, की ऑपरेशन सॉलोमनमधील ८ जन्म लेखातील 74 अंकांमध्ये मोजलेले नसावेत. कारण, मूळ संदर्भात 1990 ते 99 या कालावधीत एकूण सातच जन्म दाखवलेले आहेत.

काही वर्षांंपूर्वी पूर्व युरोपातील गरीब साम्यवादी देशातले काही चलाख लोक बायकोला बाळंत होण्यासाठी पश्चिम युरोपातील प्रगत राष्ट्रांतल्या शहरांत पाठवीत, जेणेकरून त्यांच्या अपत्यांना त्या राष्ट्रातले नागरिकत्त्व मिळावे. मग विविध राष्ट्रांनी नागरिकत्त्वाचे नियम आणले. गरीब, अप्रगत राष्ट्रातील कांही मुली प्रगत राष्ट्रांतील मुलांशी नाममात्र विवाह करीत. मग त्या मुलींना इच्छित राष्ट्राचे नागरिकत्त्व मिळाले की नंतर विवाहविच्छेद घेत. मग काही राष्ट्रांनी अशा विवाहांना मान्यता देणे थांबवले. मग असे विवाह तिसर्‍या राष्ट्रांत होऊं लागले. मग अशा त्रयस्थ देशातील विवाहांना मान्यता नाकारली गेली. एका काळात लोक एका क्ष राष्ट्रात जाऊन विवाह करीत, त्यामुळे त्या क्ष राष्ट्रातील विवाहांना बहुतेक राष्ट्रांत मान्यता नाही असे मी ऐकले आहे. असो. छान मनोरंजक लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 28/03/2023 - 12:50
माहितीपूर्ण व रंजक प्रतिसाद आवडला.
क्ष राष्ट्रातील विवाहांना बहुतेक राष्ट्रांत मान्यता नाही
हे भारी असून त्या क्ष वर विचार करीत आहे ! :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गरोदरपणाच्या अखेरच्या महिन्यातील वाहनप्रवास हा एक संवेदनशील विषय आहे. सर्वसाधारणपणे मानवी गरोदरपणाची कालमर्यादा 40 आठवडे मानली जाते. परंतु, “नववा लागल्यानंतर काही खरं नसतं!”, हा पूर्वापार चालत आलेला आजीबाईंचा सल्ला देखील दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. एखाद्या गरोदर स्त्रीला डॉक्टरांनी व्यवस्थित काढून दिलेली “तारीख” दरवेळेस अचूक ठरतेच असे नाही. कित्येकदा अपेक्षेपेक्षा बऱ्याच लवकरही प्रसूतीवेदना चालू होतात. कधी कधी या वेदनांचा प्रारंभ आणि बाळाचा जन्म या घटना आश्चर्यकारक वेगाने घडतात. अशा प्रकारे नको तिथे बाळंत होण्याचे काही प्रसंग आपण अधूनमधून ऐकतो.