२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे(च), म्हणून एखादी ताजी कविता आपणही शोधू म्हटलं. सादर आहे....
सुबक दिसता, दे हृदय म्हटलेच होते
नाइलाजाला सवय म्हटलेच होते
खीर देती ते पुन्हा घेता पुरी मी
मीहि चरण्याला विजय म्हटलेच होते
एक मिटता नयन अन खुलताही दुसरा
उमटते गाली वलय म्हटलेच होते
वाटली होतीच भीती या क्षणाची
त्या कडीने ना अभय, म्हटलेच होते!!
'परतुनी' जा(ये)ती कशा समजे न रंग्या
सासवांना मी प्रलय म्हटलेच होते!
-चतुरंग
२१-३-१७
प्रतिक्रिया
22 Mar 2017 - 12:17 am | वेल्लाभट
वा वा वा वा वा! जमलंच
खलास
22 Mar 2017 - 7:28 pm | विशाल कुलकर्णी
लैच ...
22 Mar 2017 - 7:39 pm | सूड
__/\__
23 Mar 2017 - 11:52 am | सुमीत भातखंडे
मूळ कविता आणि आपला नजराणा दोन्ही उच्च!!!