आदरांजली -१ टोबा टेक सिंह

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Aug 2016 - 7:34 pm

स़ाअदत हसन मन्टो
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मित्रांनो,
ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन. अर्थात तुम्ही त्या वाचल्या असतील पण मी हे माझ्या समाधनासाठी लिहितोय असे समजुयात.....

आदरांजली -१ टोबा टेक सिंह
मूळ लेखक : स़ाअदत हसन मन्टो.
१९१२-१९५५

कथेचे नाव : टोबा टेक सिंह.

फाळणीनंतर लगेचच पाकिस्तान व हिंदुस्तानच्या सरकारांच्या लक्षात आले की इतर खितपत पडलेल्या कैद्यांची अदलाबदल तर आपण केली पण वेड्यांच्या इस्पितळात खितपत पडलेल्या मनोरुग्णांची आदलाबदल करयचे राहूनच गेले. म्हणजे हिदुस्तानातील वेड्यांच्या इस्पितळात खितपत पडलेल्या मुसलमान वेड्यांना पाकिस्तानात पाठविले पाहिजे तसेच पाकिस्तानमधील इस्पितळातील हिंदू मनोरुग्णांना हिंदुस्तानात पाठविले पाहिजे.

आता हा निर्णय योग्य होता की नाही हे माहीत नाही पण दोन्ही बाजूच्या विद्वान मंडळींमधे अनेक बैठका होऊन हा ठराव दोन्ही देशात मांडण्यात आला व ठराव संमत होऊन या अदलाबदलीचा मुहुर्तही काढण्यात आला. हिंदुस्तानात ज्या मुसलमान मनोरुग्णांचे नातेवाईक इथेच राहिले होते त्यांना सोडून सर्वांची रवानगी पाकिस्तानात करण्यात आली. पाकिस्तानात मात्र जवळ जवळ सर्व हिंदू व शिख पाकिस्तानातून आधीच स्थलांतरीत झाले असल्यामुळे ही चाळणी लावायचा प्रसंगच उद्भवला नाही. जेवढे रुग्ण होते तेवढ्या सगळ्यांचीच हिदुस्थानाच्या सीमेवर पोलिस बंदोबस्तात रवानगी करण्याची योजना आखण्यात आली.

हिंदुस्थानात काय घडले याची कल्पना नाही पण इकडे पाकिस्तानात लाहोर येथे एका वेड्यांच्या इस्पितळात हा विषय मोठ्या चवीने चघळला जात होता. एका वेड्या मुसलमानाला ज्याने गेली बारा वर्षे कुराण पठणात घालविली होती त्याला त्याच्या मित्राने विचारले,

‘‘मौलवीसाब हे पाकिस्तान, पाकिस्तान म्हणतात ते काय आहे ?’’

मौलवीच्या कपाळावरील आठ्या अधिक दाट झाल्या. त्याने बराच वेळ विचार करीत, दाढी खाजवत उत्तर दिले,

‘‘अरे बाबा हा हिंदुस्थानातील असा एक भाग आहे जेथे चांगले वस्तरे बनतात.’’ हे ऐकून त्या मित्राचे समाधान होऊन तो गप्प झाला.

याच गोंधळात एका वेडसर सरदारजीने दुसऱ्या वेड्या सरदारजीला प्रश्र्न केला,

‘‘ सरदारजी हे आपल्याला हिंदुस्थानात का पाठवणार आहेत ? मला तर तेथील भाषाही येत नाही’’

दुसरा हसून म्हणाला, ‘‘मला तर हिंदुस्थानच्या लोकांचीच बोली भाषा येते. हिंदुस्तानी फार बदमाश ! स्वत:ला फार शहाणे समजतात !’’

त्याच दिवशी एका मुसलमान वेड्याने आंघोळ करता करता ‘‘पाकिस्तान झिंदाबादचे नारे इतक्या जोरात लावले की त्याला तो कुठे आहे याचे भान राहिले नाही. तो तेथेच पाय घसरुन पडला व भिंतीवर डोके आपटून बेहोष झाला. काही वेडे अट्टल गुन्हेगार होते. ते वेडे नव्हतेच. त्यांना फासावरुन सोडविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच चारुन, त्यांना वेडे ठरवून या इस्पितळात भरती केले होते. यांना मात्र हिंदुस्थान काय आहे व पाकिस्तान का होणार आहे याची थोडीफार कल्पना होती. पण अर्थातच बाहेरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना असणे शक्यच नव्हते. वर्तमानपत्रे तेथे येत नसत व पहारेकरी तर त्यांच्यापेक्षाही अडाणी होते. त्यांना एवढेच माहिती होते की कोणी जिनाह नावाच्या माणसाने मुसलमानांसाठी वेगळा मुलुख मागितला आहे ज्याचे नाव पाकिस्तान आहे. हा कुठे आहे, याचा आकार केवढा आहे हे त्यांना काहीही माहीत नव्हते. त्यामुळे ज्यांना हिंदुस्थानमधे तेथे डांबण्यात आले होते त्यांना हे समजत नव्हते की हा हिंदुस्थान आहे तर पाकिस्तान कुठे आहे. जर ते आत्ता पाकिस्तानमधे आहेत तर काही दिवसापूर्वी ते तेथेच रहात असताना हिंदुस्थानमधे कसे होते... त्यांच्या मनात या सगळ्याचा भयंकर गोंधळ उडाला होता.

एका वेड्याच्या मनात हिदुस्थान व पाकिस्तान या दोन शब्दांनी इतका गोंधळ उडाला की की त्याला वेडाचा झटका आला. तो एक झाडू घेऊन छपरावर चढला व तेथून त्याने या नाजूक विषयावर भाषण देण्यास सुरुवात केली. त्याचे हे भाषण जेव्हा संपता संपेना तेव्हा त्याला शिपायांनी खाली उतरण्यास सांगितले त्यावर तो जोरजोरात किंचाळू लागला, ‘‘ मला हिंदुस्थानातही जायचे नाही ना पाकिस्तानात. मला येथेच या छपरावर राहुद्या !’’ बऱ्याच वेळानंतर जेव्हा त्याचा हा झटका ओसरला तेव्हा तो खाली उतरला व आपल्या शिख सोबत्यांच्या गळ्यात गळे घालून रडला. त्याला ते त्याला सोडून हिंदुस्थानात जाणार या कल्पनेनेच रडू फुटले होते. या दोन शब्दांनी त्या इस्पितळात असा भयंकर गोंधळ घातला होता. एक इंजिनिअर होता त्याने अचानक आपले कपडे फेडले व तो बागेत तसाच नागडा हिंडूफिरु लागला. त्याला कसेबसे पकडून शिपायांनी एका खोलीत कोंडले पण दुसरीकडे पार मारामारीचा प्रसंग उद्भवला. एका जाड्या मुसलमानाला तो साक्षात मोहमदअली जिन्हा असल्याचा साक्षात्कार झाला. हा पूर्वी मुस्लिम लीगचा एक कारकून होता. पाक मुसलमान असल्यामुळे याला दिवसातून शंभरवेळा आंघोळ करावी लागत असे. त्याने तो जिन्हा असल्याचे जाहीर करताच एका शीख वेड्याने तो तारा सिंह असल्याचे जाहीर केले. प्रकरण चिघळल्यावर त्या दोघांनाही धोकादायक रुग्ण म्हणून घोषीत करण्यात आले व वेगवेगळ्या खोल्यांतून डांबण्यात आले.

लाहोरचा प्रेमभंग झालेला एक तरुण वकीलही वेड लागून या इस्पितळात भरती झाला होता. त्याने अचानक सर्व हिंदू मुसलमान पुढाऱ्यांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळे हिंदुस्थानचे दोन तुकडे पडले त्याची प्रेयसी आता हिंदुस्थानी होणार होती तर तो पाकिस्तानी. जेव्हा अदलाबदलीच्या वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा सगळ्यांनी त्याची समजूत काढली की त्याला आता निराश व्हायचे काही कारण नाही कारण त्याला आता त्याच्या प्रियतमेकडे हिंदुस्थानात पाठविले जाईल. पण त्याला तेथे जायचे नव्हते कारण त्याची वकिली अमृतसरमधे चालण्याची शक्यता नव्हती.

युरोपिअन वॉर्डमधे अँग्लोइंडियन वेडे ठेवले होते. जेव्हा त्यांच्या कानावर इंग्रज हिंदुस्तान सोडून जाणार ही बातमी कळली तेव्हा ते गंभीरपणे तसनतास या विषयावर चोरुन चर्चा करु लागले. त्यातून त्यांनी हा निष्कर्ष काढला की या वेड्यांच्या इस्पितळात आता त्यांचे कसे होणार ! हा खरा प्रश्र्न आहे. हा वॉर्ड राहणार का बंद होणार...ब्रेकफास्ट मिळणार का नाही...ब्रेड ऐवजी आता त्यांना ब्लडी रोटी खावी लागणार की काय.... अशा अनेक महत्वाच्या विषयांवर् ते कुजबुजत चर्चा करु लागले.

एक शिख वेडा होता ज्याला या वेड्यांच्या इस्पितळात येऊन जवळजवळ पंधरा वर्षे झाली होती. तो स्वत:शी काहीतरी विचित्र, सतत पुटपुटत असे. बऱ्याच प्रयत्नांनंतर इतरांना तो काय म्हणतो हे कळले. तो पुटपुटत असे,

‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल उफ दी लालटिन...’’

पहारेकऱ्यांचे असे म्हणणे होते की तो गेल्या पंधरा वर्षात कधीही आडवा झालेला त्यांनी बघितलेले नाही. कधी कधी मात्र भिंतीला टेकून तो उभा रहायचा. सतत उभे राहिल्यामुळे त्याचे पाय कायम सुजलेले असत. सुजुन सुजुन त्याचे पाय हत्तीसारखे झाले होते. जेव्हा केव्हा इतर वेड्यांमधे हिंदुस्थान, पाकिस्तान व रुग्णांच्या अदलाबदलीबद्दल चर्चा होई तेव्हा मात्र तो ती कान देऊ ऐकत असे. कोणी कधी त्याचे मत विचारलेच तर तो मोठ्या गंभीरपणे उत्तर देत असे, ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी वॉल ऑफ दी पकिस्तान गव्हर्नमेंट...’’ नंतर नंतर ‘‘ऑफ दी पकिस्तान गव्हर्नमेंट’’ याची जागा ‘ऑफ दी टोबा टेक सिंह गव्हर्नमेंट’’ ने घेतली. हे झाल्यावर मात्र त्याने माझे गाव टोबा टेक सिंह कुठे आहे असे विचारण्यास सुरुवात केली. पण दुर्दैवाने ते गाव कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हते. सगळा गोंधळच होता. जे कोणी उत्तर देण्याचा प्रयत्न करीत त्यांना आज हिंदुस्तानात असलेले सियालकोट आता पाकिस्तानात येणार आहे असे वाटे, तर कोणी म्हणत लाहोर जे आज पाकिस्तानात आहे उद्या कदाचित हिंदुस्थानात जाईल किंवा सारा हिंदुस्थानच पाकिस्तानमधे जाईल...तर कोणी म्हणत पाकिस्तान आणि हिंदुस्थान दोन्हीही राहणार नाही बहुतेक...

या शिखाच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. कधीतरी आंघोळ करीत असे..डोक्यावरील केस व दाढीच्या केसाचा गुंता झला होता व या सगळ्या प्रकाराने त्याचे रुप भयंकर दिसत असे. पण माणूस होता एकदम सभ्य.. गेल्या पंधरा वर्षात त्याला दुसऱ्याला उलटून बोललेलेसुद्धा कोणी पाहिलेले नव्हते. जे जुने रुग्ण होते ते सांगत की टोबा टेक सिंहमधे त्याची शेकडो एकर जमीन होता पण डोके फिरले आणि चांगल्या खात्यापित्या घरच्या हा जमिनदाराला त्याच्या नातेवाईकांनी जाडजुड साखळदंडामधे जखडले व या इस्पितळात भरती केले. महिन्यातून एकदा ते त्याला भेटण्यास येत व त्याची विचारपूस करुन चालते होत. या हिंदुस्थान, पाकिस्तानच्या धांदलीत मात्र हे नातेवाईक आले नाहीत, का येऊ शकले नाहीत याची कल्पना नाही. या शिखाचे नाव होते बिशन सिंह पण सगळे त्याला टोबा टेक सिंह म्हणूनच हाका मारीत. टोबा टेक सिंहला दिवस, महिना व वर्षाचे भान उरले नव्हते. त्याला येथे येऊन किती वर्षे झाली हेही त्याला माहीत नव्हते. पण त्याला प्रत्येक महिन्यात ज्या दिवशी त्याला भेटण्यास त्याचे नातेवाईक येणार आहेत त्या दिवसाची बरोबर जाण होती. घाणेरडे कपडे घालणारा बिशनसिंह त्या वेळेस मात्र साबण लावून, आंघोळ करुन, चांगले कपडे घालून केस विंचरुन तयार होई व वॉर्डाच्या कार्यालयात जाऊन सांगे की त्याला आज भेटायला येणार आहेत. कोणी विचारले तर तो उत्तर देत असे, ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ दी लालटिन...’’

त्याला एक मुलगी होती जी पंधरा वर्षात वाढत वाढत तरुण झाली. बिचारी लहान होती तेव्हाही आपल्या बापाला पाहून रडे व आताही बापाला पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागत कारण बिशनसिंह आता तिला ओळखतच नसे.

हा हिंदुस्थान, पाकिस्तानचा किस्सा चालू झाला तेव्हा मात्र त्याने इतर वेड्यांना विचारण्यास सुरुवात केली, ‘‘टोबा टेक सिंह कुठे आहे ? हिंदुस्थान की पाकिस्तान ?’’ या प्रश्र्नाचे मनासारखे उत्तर न मिळाल्यामुळे त्याचे वेड वाढतच गेले. आता त्याला भेटण्यासही कोणी येत नसे त्यामुळे बिचाऱ्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली.

त्याच वॉर्डात एक वेडा होता तो स्वत:ला खुदा समजत असे. एक दिवस बिशन सिंहने त्याला विचारले,

‘‘ माझे टोबा टेक सिंह कुठे आहे ? पाकिस्तानात का हिंदुस्तानात ?’’ यावर सवयीने गडगडाटी हास्य करीत तो म्हणाला,

‘‘ते पाकिस्तानमधे नाही आणि हिंदुस्थानातही नाही कारण मी अजून त्याबाबतीह हुकुम दिलेला नाही’’.

बिशन सिंहाने त्याला कळवळून सांगितले की त्याने एकदाचा तो निर्णय देऊन टाकावा म्हणजे हे झंझट मिटेल. पण खुदा म्हणाला,

‘‘ मला इतके निर्णय घ्यायचे आहेत की याच्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. मी तरी काय करु ?’’ ही उत्तरे ऐकून एक दिवस बिशन सिंह वैतागून म्हणाला,

‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ दी..... वाहे गुरु जी दा खालसा अँड वाहे गुरु की फतेह..जो बोले सो सत् श्री अकाल. बहुदा त्याचा अर्थ ‘‘तू मुसलमनांचा खुदा आहेस...शिखांचा खुदा असता तर माझे म्हणणे त्याने जरुर ऐकले असते’’.

रुग्णांच्या अदलाबदलीच्या थोडे दिवस आधी टोबा टेक सिंहचा एक मुसलमान मित्र त्याला भेटण्यास आला. या अगोदर तो तेथे कधीच आला नव्हता. त्याला बघून बिशन सिंह तेथून निघून जाऊ लागला. एका शिपायाने त्याला अडविले,

‘‘हा तुझा मित्र आहे. फ़ज़लदीन ! तुला भेटायला आला आहे.’’.

बिशन सिंहने फ़ज़लदीनकडे एक नजर टाकली व तो बडबडायला लागला. त्याची ती अवस्था पाहून फ़ज़लदीनने त्याच्या खांद्यावर आपले हात ठेवले.

‘‘ मी बऱ्याच दिवसापासून तुला भेटण्याचे ठरवीत होतो पण वेळच मिळाला नाही.... तुझी सगळी माणसे हिंदुस्थानला सुखरुप पोहोचली. मला शक्य होती तेवढी मदत मी केली... तुझी मुलगी रुप कौर....’’ असे म्हणून तो थबकला. बिशन सिंहला काहीतरी आठवत होतं... हंऽऽऽऽबेटी रुपकौर...
फ़ज़लदीनने वाक्य पुरे केले, ‘‘ हा बेटी रुपकौर, तीही त्यांच्याबरोबर हिंदुस्थानला गेली.’’

बिशन सिंह गप्प राहिला.

‘‘त्यांनी मला तुझी चौकशी करायला सांगितले होते. मी ऐकले की आता तूही हिंदुस्थानला जातो आहेस. भाई बलबीर सिंह आणि भाई वधवा सिंहाला माझा सलाम सांगा... आणि बहन अमृत कौरलाही माझा सलाम... भाई बलबीरला सांगा त्याने ज्या दोन गाभण म्हशी माझ्याकडे सोडल्या होत्या त्या विल्या..... आणि सांगा माझ्यासाठी काही काम असेल तर जरुर सांगा. संकोच करु नका... तुमच्यासाठी थोडे मरोंडे आणले आहेत... ’’

बिशन सिंहने ते बाचके घेतले आणि शिपायाला देऊन टाकले व फ़ज़लदीनला विचारले,

‘‘ टोबा टेक सिंह कुठे आहे ?’’

‘‘कुठे असणार ? जेथे आहे तेथेच आहे !’’ त्याने गडबडून उत्तर दिले.

‘‘पाकिस्तानात का हिंदुस्थानमधे ?’’

‘‘हिंदोस्थान ? नाही...पाकिस्तानातच आहे.’’

बिशनसिंग बडबडत तेथून निघून गेला. ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ पाकिस्तान अँड हिंदोस्थान दरफ़टे मुह...’’

अदलाबदलीची सगळी तयारी पूर्ण झाल्यावर इकडच्या आणि तिकडच्या वेड्यांना वाघा सीमेवर पोचविण्यात आले. दिवसही मुक्रर झाला. थंडी मी म्हणत होती. इकडचे वेडे आणि तिकडचे वेडे यांची अदलाबदल रात्रभर चालू राहणार होती. मोठे कठीण काम होते ते. काही जण बाहेर पडतच नव्हते तर काही उड्या मारुन पळत होते. ज्यांना कपड्यांची शुद्ध नव्हती त्यांना कपडे घालण्यात येत होते तर काही वेडे घातलेले कपडे फाडण्यात मग्न होते. यातच सर्व स्त्रियांना वेगळे करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु होता. काही ओरडत होते तर काही मोठ्या आवाजात गात होते. वेड्या स्त्रियांचा गोंधळ वेगळाच होता. थंडी तर इतकी होती दातांवर दात आपटत होते. बऱ्याच वेड्यांना त्यांना त्यांच्या मुळापासून उखडून दुसरीकडे फेकून देत आहेत हेच उमगत नव्हते. ज्यांना थोडेफार उमगत होते ते पाकिस्तान मुर्दाबाद किंवा पाकिस्तान झिंदाबदच्या घोषणा तारस्वरात देत होते. काही वेळा हमारतुमरीही झाली...

जेव्हा बिशन सिंहाचे नाव पुकारले गेले तेव्हा बिशनसिंहाने त्याचे नाव लिहिणाऱ्या अधिकाऱ्याला विचारले, ‘‘ टोबा टेक सिंह कुठे आहे ? पाकिस्तानात की हिंदोस्थानात ?

‘‘पाकिस्तानात !’’ त्या अधिकाऱ्याने सांगितले. हे ऐकल्यावर बिशन सिंह तेथून पळाला व आपल्या पाकिस्तानी सोबत्यांकडे गेला. पाकिस्तानी शिपाई त्याला सीमेच्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांनी त्याला खूप समजावले की टोबा टेक सिंह आता हिंदोस्थानात गेले आहे, तुही जा पण त्याने एकही पाऊल पुढे टाकण्यास नकार दिला. आपल्या सुजलेल्या पायावर भार टाकत तो असा उभा राहिला की जणू आता त्याला आता तेथून कोणी हलवू शकत नाही. तो जोरजोरात किंचाळू लागला,
‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ टोबा टेक सिंह अँड पाकिस्तान’’ निरुपद्रवी बिशन् सिंहला त्यांनी तेथेच तसेच सोडले व ते आपल्या पुढील कामास लागले.

पहाटे सूर्याचे पहिले किरण फाकले आणि खाली पडलेल्या बिशन सिंहच्या तोंडातून आकाश भेदणारी ह्रदयद्रावक किंकाळी बाहेर पडली. ती ऐकू आजुबाजूचे सैन्यातील अधिकारीही तेथे धावत गेले. बिशन सिंह जो गेले पंधरा वर्षे जमिनीवर झोपला नव्हता आता जमिनिवर निपचित पडला होता.

त्याच्या पुढ्यातील काटेरी तारांच्या कुंपणापलिकडे हिंदुस्थान होता तर त्याच्या मागच्या काटेरी तारांमागे पाकिस्तान.
या दोन कुंपणाच्या मधील जागेत, ज्याला काही नाव नव्हते त्यावर टोबा टेक सिंह त्याच्या पायांना अखेरची विश्रांती देत पहुडला होता.....

भाषांतर : जयंत कुलकर्णी.
क्रमश:

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 7:47 pm | बोका-ए-आझम

ही कथा मूळ उर्दूमध्ये (देवनागरी लिपीत) वाचायला मिळाली होती. तेव्हा ती वाचून टाॅलस्टाॅयच्या तितक्याच प्रसिद्ध ' माणसाला किती जागा लागते ' या कथेची आठवण झाली होती. अनुवाद छान.

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 10:24 pm | संदीप डांगे

_/\_

अमितदादा's picture

23 Aug 2016 - 10:40 pm | अमितदादा

वाचतोय....

भटक्य आणि उनाड's picture

23 Aug 2016 - 11:09 pm | भटक्य आणि उनाड

वाचतोय.

मंटोंची कथा म्हणजे प्रश्नच नाही. सुंदर भाषांतर. खरंतर स्वैर अनुवाद.

आनंद's picture

23 Aug 2016 - 11:12 pm | आनंद

मस्त! अनुवाद छान जमलाय.
यु ट्युब वर हे सापडल. नसिर कडुन ही कथा :
https://www.youtube.com/watch?v=vkVRLWsXriw

गामा पैलवान's picture

24 Aug 2016 - 3:52 am | गामा पैलवान

बापरे काय हे! निरर्थक फाळणीची भळभळती जखम घेऊन पडलेल्या वेडसर जनतेचं रूपक प्रभावीपणे चितारलं आहे.

-गा.पै.

अवांतर : तोबा तेक सिंह गूगल नकाशावर सापडतं. पाकिस्तानात आहे.

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 9:41 am | जयंत कुलकर्णी

गामा पै.,
तुम्हाला कुठलीही जागा गुगलार्थवर शोधण्याचा छंद आहे का ? मलाही आहे म्हणून विचारतोय. कुठेही एखाद्या गावाचा उल्लेख झाला की ती जागा गुगलार्थवर शोधेपर्यंत मला चैन पडत नाही. माझ्या काहूनच्या कथेत मी किती तास त्स शोधण्यात घालवले असतील माझे मलाच माहीत.... :-)
धन्यवाद !

गामा पैलवान's picture

24 Aug 2016 - 12:33 pm | गामा पैलवान

जयंत कुलकर्णी,

मला छंद नाही, पण आवड आहे. :-)

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

24 Aug 2016 - 3:44 pm | अभ्या..

अरे वा, जयंतराव तुमच्या युध्दकथा मी तशाच वाचल्या. अर्थवर गावे पाहण्याएवजी मी ते टॅन्क्स, लौन्चर्स, वेपन्स आणि आर्मीजचे तत्कालीन ड्रेस पाह्यले. जब्बरदस्त मज्जा आली.

खटपट्या's picture

24 Aug 2016 - 4:41 am | खटपट्या

खूप भावली कथा मनाला...

कोण वेडे होते हेच कळत नाही सद्या...

इल्यूमिनाटस's picture

24 Aug 2016 - 7:44 am | इल्यूमिनाटस

+ १

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 9:41 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

यशोधरा's picture

24 Aug 2016 - 12:47 pm | यशोधरा

अनुवाद आवडला, कथा आवडली म्हंणायापेक्षा खरं तर वाचून अस्वस्थ व्हायला झाले. फाळणीमुळे किती जणांच्या आयुःयात किती उलथा पालथी झाल्या असतील... मोजदादच नाही...

मी-सौरभ's picture

24 Aug 2016 - 3:01 pm | मी-सौरभ

असेच म्हणतो

क्षमस्व's picture

24 Aug 2016 - 1:37 pm | क्षमस्व

खूप छान लिहलय सर

जागु's picture

24 Aug 2016 - 3:20 pm | जागु

छान आहे.

अनुप ढेरे's picture

24 Aug 2016 - 3:36 pm | अनुप ढेरे

छान झालाय अनुवाद!

सुबक ठेंगणी's picture

24 Aug 2016 - 3:37 pm | सुबक ठेंगणी

काका, इस्मत चुगताईच्या कथानुवादाच्या धाग्याचे दुवे मिळतील का?

जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 3:48 pm | जयंत कुलकर्णी
जयंत कुलकर्णी's picture

24 Aug 2016 - 3:51 pm | जयंत कुलकर्णी

मस्त रुपांतर जयंतराव. आवडले.
बादवे आमीरखान ह्याच्यावर काही करणार होता का? यु ट्युबवर पाह्यलेले वाटते.

प्रीत-मोहर's picture

24 Aug 2016 - 4:05 pm | प्रीत-मोहर

__/\__
नेहमीप्रमाणेच अनुवाद भावला काका. पण एक अस्वस्थताही जाणवली

जव्हेरगंज's picture

24 Aug 2016 - 7:00 pm | जव्हेरगंज

जबरी कथा!!!

मृत्युन्जय's picture

24 Aug 2016 - 7:09 pm | मृत्युन्जय

आई गं. कथा वाचुन खरेच वाईट वाटले. काय कसदार लिहायचा हा माणूस. त्याला सलाम.

बबन ताम्बे's picture

24 Aug 2016 - 7:34 pm | बबन ताम्बे

.

तिमा's picture

24 Aug 2016 - 7:50 pm | तिमा

कथा वाचून मन विषण्ण झाले. त्या बिचार्‍यांना काय समजत होते ? त्या दुर्दैवी जीवाची सुटका झाली असेच मी म्हणेन.

वरुण मोहिते's picture

24 Aug 2016 - 9:15 pm | वरुण मोहिते

मंटो म्हणजे प्रश्नच नाही.खोल दो या कथेचाही असाच उत्तम अनुवाद करा सर हि विनंती

सुंड्या's picture

25 Aug 2016 - 12:12 am | सुंड्या

मीही 'याच' कथेचे भाषांतर करत होतो...

मराठमोळा's picture

25 Aug 2016 - 5:03 am | मराठमोळा

अनुवाद आवडला.
फाळणीमुळे वेडावलेले गदर चित्रपटातील कॅरॅक्टर आठवले.

राही's picture

25 Aug 2016 - 6:54 am | राही

मंटो!
सुंदर अनुवाद.
'जगी या खास वेड्यांचा पसारा माजला सारा'...
अनुवादातला सिनिसिझ्म(मूळ कथेतही असणारच) छान जमला आहे आणि कथेतील आशयाशी चपखल जुळतो.

चैतू's picture

25 Aug 2016 - 5:42 pm | चैतू

ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ जयंत सर अँड हिंदोस्थान!

पैसा's picture

25 Aug 2016 - 10:44 pm | पैसा

कसंसंच झालं वाचताना. अप्रतिम भावानुवाद!

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2016 - 8:03 am | पिलीयन रायडर

ही कथा सुद्धा आवडली! आधी खोल दो वाचलेली असल्याने थोडा ताण होताच. आधी थोडी विनोदी अंगाने जाणारी कथा शेवटी मात्र अस्वस्थ करुन गेली..

अभिजीत अवलिया's picture

28 Aug 2016 - 6:06 pm | अभिजीत अवलिया

जबराट

नो मॅन्स लॅन्ड या महान चित्रपटाच्या कथेची थीम ही याच्या काहीशी जवळ जाते असे मला वाटते. मात्र मंटो ची कथा अनेकपट जास्त इन्टेन्स आणि खोलवर जखम करते. आणि युद्धातील राष्ट्रवादाच्या उन्मादातील निरर्थकता भेदकतेने मांडते.

मुळ कथा इथे

बंटवारे के दो-तीन साल बाद पाकिस्तान और हिंदुस्तान की हुकूमतों को ख़याल आया कि सामान्य क़ैदियों की तरह पागलों का भी तबादला होना चाहिए, यानी जो मुसलमान पागल हिंदुस्तान के पागलख़ानों में हैं, उन्हें पाकिस्तान पहुँचा दिया जाए और जो हिंदू और सिख पाकिस्तान के पागलख़ानो में हैं, उन्हें हिंदुस्तान के हवाले कर दिया जाए।
मालूम नहीं, यह बात माक़ूल थी या गै़र माकूल़, बहरहाल दानिशमंदों के फ़ैसले के मुताबिक़ इधर-उधर ऊँची सतह की कान्फ़ेंस हुई और बिल आख़िर पागलों के तबादले के लिए एक दिन मुक़र्रर हो गया।
अच्छी तरह छानबीन की गई - वे मुसलमान पागल जिनके संबंधी हिंदुस्तान ही में थे, वहीं रहने दिए गए, बाक़ी जो बचे, उनको सरहद पर रवाना कर दिया गया। पाकिस्तान से चूँकि क़रीब-क़रीब तमाम हिंदू-सिख जा चुके थे, इसलिए किसी को रखने-रखाने का सवाल ही पैदा नहीं हुआ, जितने हिंदू-सिख पागल थे, सबके-सब पुलिस की हिफ़ाज़त में बॉर्डर पर पहुँचा दिए गए।
उधर का मालूम नहीं लेकिन इधर लाहौर के पागलख़ाने में जब इस तबादले की ख़बर पहुँची तो बड़ी दिलचस्प गपशप होने लगी।

एक मुसलमान पागल जो बारह बरस से, हर रोज़, बाक़ायदगी के साथ 'ज़मींदार' पढ़ता था, उससे जब उसके एक दोस्त ने पूछा, "मौलवी साब, यह पाकिस्तान क्या होता है?" तो उसने बड़े गौरो-फ़िक्र के बाद जवाब दिया, "हिंदुस्तान में एक ऐसी जगह है जहाँ उस्तरे बनते हैं!" यह जवाब सुनकर उसका दोस्त संतुष्ट हो गया।
इसी तरह एक सिख पागल ने एक दूसरे सिख पागल से पूछा, "सरदार जी, हमें हिंदुस्तान क्यों भेजा जा रहा है, हमें तो वहाँ की बोली नहीं आती।" दूसरा मुस्कराया, "मुझे तो हिंदुस्तोड़ों की बोली आती है, हिंदुस्तानी बड़े शैतानी आकड़ आकड़ फिरते हैं।"
एक दिन, नहाते-नहाते, एक मुसलमान पागल ने 'पाकिस्तान ज़िंदाबाद' का नारा इस ज़ोर से बुलंद किया कि फ़र्श पर फिसलकर गिरा और बेहोश हो गया।
बाज़ पागल ऐसे भी थे जो पागल नहीं थे, उनमें बहुतायत ऐसे क़ातिलों की थी जिनके रिश्तेदारों ने अफ़सरों को कुछ दे दिलाकर पागलख़ाने भिजवा दिया था कि वह फाँसी के फंदे से बच जाएँ, यह पागल कुछ-कुछ समझते थे कि हिंदुस्तान क्यों तक़्सीम हुआ है और यह पाकिस्तान क्या है, लेकिन सही वाक़िआत से वह भी बेख़बर थे, अख़बारों से उन्हें कुछ पता नहीं चलता था और पहरेदार सिपाही अनपढ़ और जाहिल थे, जिनकी गुफ़्तगू से भी वह कोई नतीजा बरामद नहीं कर सकते थे। उनको सिर्फ़ इतना मालूम था कि एक आदमी मुहम्मद अली जिन्नाह है जिसको क़ायदे-आज़म कहते हैं, उसने मुसलमानी के लिए एक अलहदा मुल्क बनाया है जिसका नाम पाकिस्तान है, यह कहाँ हैं, इसकी भौगोलिक स्थिति क्या है, इसके मुताल्लिक़ वह कुछ नहीं जानते थे - यही वजह है कि वह सब पागल जिनका दिमाग पूरी तरह बिगड़ा हुआ नहीं हुआ था, इस मखमसे में गिरफ़्तार थे कि वह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, अगर हिंदुस्तान में हैं तो पाकिस्तान कहाँ हैं, अगर वह पाकिस्तान में हैं तो यह कैसे हो सकता है कि वह कुछ अर्से पहले यहीं रहते हुए हिंदुस्तान में थे।
एक पागल तो हिंदुस्तान और पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान और हिंदुस्तान के चक्कर में कुछ ऐसा गिरफ़्तार हुआ कि और ज़्यादा पागल हो गया। झाडू देते-देते वह एक दिन दरख्त़ पर चढ़ गया और टहने पर बैठकर दो घंटे मुसलसल तक़रीर करता रहा, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के नाज़ुक मसले पर थी, सिपाहियों ने जब उसे नीचे उतरने को कहा तो वह और ऊपर चढ़ गया। जब उसे डराया-धमकाया गया तो उसने कहा, "मैं हिंदुस्तान में रहना चाहता हूँ न पाकिस्तान में, मैं इस दरख़्त पर रहूँगा।" बड़ी देर के बाद जब उसका दौरा सर्द पड़ा तो वह नीचे उतरा और अपने हिंदू-सिख दोस्तों से गले मिल-मिलकर रोने लगा - इस ख़याल से उसका दिल भर आया था कि वह उसे छोड़कर हिंदुस्तान चले जाएँगे।
एक एम.एस-सी. पास रेडियो इंजीनियर में जो मुसलमान था और दूसरे पागलों से बिलकुल अलग-थलग बाग की एक खास पगडंडी पर सारा दिन ख़ामोश टहलता रहता था, यह तब्दीली ज़ाहिर हुई कि उसने अपने तमाम कपड़े उतारकर दफादार के हवाले कर दिए और नंग-धड़ंग सारे बाग में चलना-फिरना शुरू कर दिया।
चियौट के एक मोटे मुसलमान ने, जो मुस्लिम लीग का सरगर्म कारकुन रह चुका था और दिन में पंद्रह-सोलह मर्तबा नहाया करता था, एकदम यह आदत तर्क कर दी - उसका नाम मुहम्मद अली था, चुनांचे उसने एक दिन अपने जंगले में एलान कर दिया कि वह क़ायदे-आज़म मुहम्मद अली जिन्नाह है, उसकी देखा-देखी एक सिख पागल मास्टर तारा सिंह बन गया - इससे पहले कि खून-ख़राबा हो जाए, दोनों को ख़तरनाक पागल क़रार देकर अलहदा-अलहदा बंद कर दिया गया।
लाहौर का एक नौजवान हिंदू वकील मुहब्बत में नाकाम होकर पागल हो गया था, जब उसने सुना कि अमृतसर हिंदुस्तान में चला गया है तो उसे बहुत दुख हुआ। अमृतसर की एक हिंदू लड़की से उसे मुहब्बत थी जिसने उसे ठुकरा दिया था मगर दीवानगी की हालत में भी वह उस लड़की को नहीं भूला था - वह उन तमाम हिंदू और मुसलमान लीडरों को गालियाँ देने लगा जिन्होंने मिल-मिलाकर हिंदुस्तान के दो टुकडे कर दिए हैं, और उसकी महबूबा हिंदुस्तानी बन गई है और वह पाकिस्तानी। जब तबादले की बात शुरू हुई तो उस वकील को कई पागलों ने समझाया कि वह दिल बुरा न करे, उसे हिंदुस्तान भेज दिया जाएगा, उसी हिंदुस्तान में जहाँ उसकी महबूबा रहती है - मगर वह लाहौर छोड़ना नहीं चाहता था, उसका ख़याल था कि अमृतसर में उसकी प्रैक्टिस नहीं चलेगी।
युरोपियन वार्ड में दो एंग्लो इंडियन पागल थे। उनको जब मालूम हुआ कि हिंदुस्तान को आज़ाद करके अंग्रेज़ चले गए हैं तो उनको बहुत सदमा हुआ, वह छुप-छुपकर घंटों आपस में इस अहम मसले पर गुफ़्तगू करते रहते कि पागलख़ाने में अब उनकी हैसियत किस किस्म की होगी, योरोपियन वार्ड रहेगा या उड़ा दिया जाएगा, ब्रेक-फास्ट मिला करेगा या नहीं, क्या उन्हें डबल रोटी के बजाय ब्लडी इंडियन चपाटी तो ज़बरदस्ती नहीं खानी पड़ेगी?
एक सिख था, जिसे पागलख़ाने में दाखिल हुए पंद्रह बरस हो चुके थे। हर वक्त उसकी जुबान से यह अजीबो-गरीब अल्फ़ाज़ सुनने में आते थे, "औपड़ दि गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मूँग दि दाल ऑफ दी लालटेन!" वह दिन को सोता था न रात को। पहरेदारों का यह कहना था कि पंद्रह बरस के तबील अर्से में वह एक लहज़े के लिए भी नहीं सोया था, वह लेटता भी नहीं था, अलबत्ता कभी-कभी किसी दीवार के साथ टेक लगा लेता था - हर वक्त खड़ा रहने से उसके पाँव सूज गए थे और पिंडलियाँ भी फूल गई थीं, मगर जिस्मानी तकलीफ़ के बावजूद वह लेटकर आराम नहीं करता था।
हिंदुस्तान, पाकिस्तान और पागलों के तबादले के मुताल्लिक़ जब कभी पागलख़ानों में गुफ़्तगू होती थी तो वह गौर से सुनता था, कोई उससे पूछता कि उसका क्या ख़याल है तो वह बड़ी संजीदगी से जवाब देता, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान गवर्नमेंट!" लेकिन बाद में 'आफ दि पाकिस्तान गवर्नमेंट' की जगह 'आफ दि टोबा टेक सिंह गवर्नमेंट' ने ले ली, और उसने दूसरे पागलों से पूछना शुरू कर दिया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जहाँ का वह रहनेवाला है। किसी को भी मालूम नहीं था कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, जो बताने की कोशिश करते थे वह खुद इस उलझाव में गिरफ़्तार हो जाते थे कि सियालकोट पहले हिंदुस्तान में होता था, पर अब सुना है कि पाकिस्तान में हैं, क्या पता है कि लाहौर जो आज पकिस्तान में हैं, कल हिंदुस्तान में चला जाए या सारा हिंदुस्तान ही पाकिस्तान बन जाए और यह भी कौन सीने पर हाथ रखकर कह सकता है कि हिंदुस्तान और पाकिस्तान, दोनों किसी दिन सिरे से गायब ही हो जाएँ!
इस सिख पागल के केश छिदरे होकर बहुत मुख्त़सर रह गए थे, चूँकि बहुत कम नहाता था, इसलिए दाढ़ी और सिर के बाल आपस में जम गए थे जिसके बायस उसकी शक्ल बड़ी भयानक हो गई थी, मगर आदमी हिंसक नहीं था - पंद्रह बरसों में उसने कभी किसी से झगड़ा-फ़साद नहीं किया था। पागलख़ाने के जो पुराने मुलाज़िम थे, वह उसके मुताल्लिक़ इतना जानते थे कि टोबा टेक सिंह में उसकी कई ज़मीनें थी, अच्छा खाता-पीता ज़मींदार था कि अचानक दिमाग उलट गया, उसके रिश्तेदार उसे लोहे की मोटी-मोटी ज़ंजीरों में बाँधकर लाए और पागलख़ाने में दाखिल करा गए।
महीने में एक बार मुलाक़ात के लिए यह लोग आते थे और उसकी खैर-ख़ैरियत दरयाफ़्त करके चले जाते थे, एक मुश्त तक यह सिलसिला जारी रहा, पर जब पाकिस्तान, हिंदुस्तान की गड़बड़ शुरू हुई तो उनका आना-जाना बंद हो गया।
उसका नाम बिशन सिंह था मगर सब उसे टोबा टेक सिंह कहते थे। उसको यह बिलकुल मालूम नहीं था कि दिन कौन-सा है या कितने साल बीत चुके हैं, लेकिन हर महीने जब उसके निकट संबंधी उससे मिलने के लिए आने के क़रीब होते तो उसे अपने आप पता चल जाता, चुनांचे वह दफादार से कहता कि उसकी मुलाकात आ रही है, उस दिन वह अच्छी तरह नहाता, बदन पर ख़ूब साबुन घिसता और बालों में तेल डालकर कंघा करता, अपने वह कपड़े जो वह कभी इस्तेमाल नहीं करता था, निकलवाकर पहनता और यों सज-बनकर मिलनेवालों के पास जाता। वह उससे कुछ पूछते तो वह ख़ामोश रहता या कभी-कभार 'औपड़ दि गड़ गड़ अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी लालटेन' कह देता।
उसकी एक लड़की थी जो हर महीने एक उँगली बढ़ती-बढ़ती पंद्रह बरसों में जवान हो गई थी। बिशन सिंह उसको पहचानता ही नहीं था - वह बच्ची थी जब भी अपने आप को देखकर रोती थी, जवान हुई तब भी उसकी आँखों से आँसू बहते थे।
पाकिस्तान और हिंदुस्तान का किस्सा शुरू हुआ तो उसने दूसरे पागलों से पूछना शुरू किया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जब उसे इत्मीनानबख्श़ जवाब न मिला तो उसकी कुरेद दिन-ब-दिन बढ़ती गई। अब मुलाक़ात भी नहीं होती थी, पहले तो उसे अपने आप पता चल जाता था कि मिलनेवाले आ रहे हैं, पर अब जैसे उसके दिल की आवाज़ भी बंद हो गई थी जो उसे उनकी आमद की ख़बर दे दिया करती थी - उसकी बड़ी ख़्वाहिश थी कि वह लोग आएं जो उससे हमदर्दी का इज़हार करते थे और उसके लिए फल, मिठाइयाँ और कपड़े लाते थे। वह आएँ तो वह उनसे पूछे कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, वह उसे यकीनन बता देंगे कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में - उसका ख़याल था कि वह टोबा टेक सिंह ही से आते हैं जहाँ उसकी ज़मीनें हैं।
पागलख़ाने में एक पागल ऐसा भी था जो खुद़ को ख़ुदा कहता था। उससे जब एक रोज़ बिशन सिंह ने पूछा कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में तो उसने हस्बे-आदत कहकहा लगाया और कहा, "वह पाकिस्तान में हैं न हिंदुस्तान में, इसलिए कि हमने अभी तक हुक्म ही नहीं दिया!"
बिशन सिंह ने उस ख़ुदा से कई मर्तबा बड़ी मिन्नत-समाजत से कहा कि वह हुक़्म दे दें ताकि झंझट ख़त्म हो, मगर ख़ुदा बहुत मसरूफ़ था, इसलिए कि उसे और बे-शुमार हुक़्म देने थे।
एक दिन तंग आकर बिशन सिंह खुद़ा पर बरस पड़ा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ वाहे गुरु जी दा खालस एंड वाहे गुरु जी दि फ़तह!" इसका शायद मतलब था कि तुम मुसलमानों के ख़ुदा हो, सिखों के खुद़ा होते तो ज़रूर मेरी सुनते।
तबादले से कुछ दिन पहले टोबा टेक सिंह का एक मुसलमान जो बिशन सिंह का दोस्त था, मुलाक़ात के लिए आया, मुसलमान दोस्त पहले कभी नहीं आया था। जब बिशन सिंह ने उसे देखा तो एक तरफ़ हट गया, फिर वापस जाने लगा मगर सिपाहियों ने उसे रोका, "यह तुमसे मिलने आया है, तुम्हारा दोस्त फज़लदीन है!"
बिशन सिंह ने फज़लदीन को एक नज़र देखा और कुछ बड़बड़ाने लगा।
फज़लदीन ने आगे बढ़कर उसके कंधे पर हाथ रखा, "मैं बहुत दिनों से सोच रहा था कि तुमसे मिलूँ लेकिन फ़ुरसत ही न मिली, तुम्हारे सब आदमी ख़ैरियत से हिंदुस्तान चले गए थे, मुझसे जितनी मदद हो सकी, मैंने की तुम्हारी बेटी रूपकौर..." वह कहते-कहते रुक गया।
बिशन सिंह कुछ याद करने लगा, "बेटी रूपकौर..."
फज़लदीन ने रुक-रुककर कहा, "हाँ, वह, वह भी ठीक-ठाक है, उनके साथ ही चली गई थी!"
बिशन सिंह खामोश रहा।
फज़लदीन ने फिर कहना शुरू किया, "उन्होंने मुझे कहा था कि तुम्हारी ख़ैर-ख़ैरियत पूछता रहूँ, अब मैंने सुना है कि तुम हिंदुस्तान जा रहे हो, भाई बलबीर सिंह और भाई वधावा सिंह से मेरा सलाम कहना और बहन अमृतकौर से भी, भाई बलबीर से कहना कि फज़लदीन राजीखुशी है, दो भूरी भैंसे जो वह छोड़ गए थे, उनमें से एक ने कट्टा दिया है, दूसरी के कट्टी हुई थी, पर वह छ: दिन की होके मर गई और मेरे लायक जो खिदमत हो, कहना, मैं हर वक्त तैयार हूँ, और यह तुम्हारे लिए थोड़े-से मरोंडे लाया हूँ!"
बिशन सिंह ने मरोंडों की पोटली लेकर पास खड़े सिपाही के हवाले कर दी और फज़लदीन से पूछा, "टोबा टेक सिंह कहाँ है?"
फज़लदीन ने कदरे हैरत से कहा, "कहाँ है? वहीं है, जहाँ था!"
बिशन सिंह ने फिर पूछा, "पाकिस्तान में है या हिंदुस्तान में?"
"हिंदुस्तान में, नहीं, नहीं पाकिस्तान में!" फज़लदीन बौखला-सा गया।
बिशन सिंह बड़बड़ाता हुआ चला गया, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान एंड हिंदुस्तान आफ दी दुर फिटे मुँह!"
तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं, इधर से उधर और उधर से इधर आनेवाले पागलों की फ़ेहरिस्तें पहुँच चुकी थीं और तबादले का दिन भी मुक़र्रर हो चुका था।
सख्त़ सर्दियाँ थीं जब लाहौर के पागलख़ाने से हिंदू-सिख पागलों से भरी हुई लारियाँ पुलिस के रक्षक दस्ते के साथ रवाना हुई, संबंधित अफ़सर भी हमराह थे - वागह(एक गाँव) के बॉर्डर पर तरफीन (दोनों तरफ़) के सुपरिटेंडेंट एक-दूसरे से मिले और प्रारंभिक कार्रवाई ख़त्म होने के बाद तबादला शुरू हो गया, जो रात-भर जारी रहा।
पागलों को लारियों से निकालना और उनको दूसरे अफ़सरों के हवाले करना बड़ा कठिन काम था, बाज़ तो बाहर निकलते ही नहीं थे, जो निकलने पर रज़ामंद होते थे, उनको सँभालना मुश्किल हो जाता था, क्योंकि वह इधर-उधर भाग उठते थे, जो नंगे थे, उनको कपड़े पहनाए जाते तो वह उन्हें फाड़कर अपने तन से जुदा कर देते - कोई गालियाँ बक रहा है, कोई गा रहा है क़ुछ आपस में झगड़ रहे हैं क़ुछ रो रहे हैं, बिलख रहे हैं - कान पड़ी आवाज़ सुनाई नहीं देती थी - पागल औरतों का शोर-शराबा अलग था, और सर्दी इतनी कड़ाके की थी कि दाँत से दाँत बज रहे थे।
पागलों की अक्सरीयत इस तबादले के हक़ में नहीं थी, इसलिए कि उनकी समझ में नहीं आ रहा था कि उन्हें अपनी जगह से उखाड़कर कहाँ फेंका जा रहा है, वह चंद जो कुछ सोच-समझ सकते थे, 'पाकिस्तान : जिंदाबाद' और 'पाकिस्तान : मुर्दाबाद' के नारे लगा रहे थे, दो-तीन मर्तबा फ़साद होते-होते बचा, क्योंकि बाज मुसलमानों और सिखों को यह नारे सुनकर तैश आ गया था।
जब बिशन सिंह की बारी आई और वागह के उस पार का मुताल्लिक़ अफ़सर उसका नाम रजिस्टर में दर्ज करने लगा तो उसने पूछा : "टोबा टेक सिंह कहाँ है, पाकिस्तान में या हिंदुस्तान में?"
यह सुनकर बिशन सिंह उछलकर एक तरफ़ हटा और दौड़कर अपने बचे हुए साथियों के पास पहुँच गया।
पाकिस्तानी सिपाहियों ने उसे पकड़ लिया और दूसरी तरफ़ ले जाने लगे, मगर उसने चलने से इनकार कर दिया, "टोबा टेक सिंह यहाँ है!" और ज़ोर-ज़ोर से चिल्लाने लगा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी टोबा टेक सिंह एंड पाकिस्तान!"
उसे बहुत समझाया गया कि देखो, अब टोबा टेक सिंह हिंदुस्तान में चला गया है, अगर नहीं गया है तो उसे फौरन वहाँ भेज दिया जाएगा, मगर वह न माना! जब उसको ज़बर्दस्ती दूसरी तरफ़ ले जाने की कोशिश की गई तो वह दरमियान में एक जगह इस अंदाज़ में अपनी सूजी हुई टांगों पर खड़ा हो गया जैसे अब उसे कोई ताकत नहीं हिला सकेगी, आदमी चूँकि सीधा था, इसलिए उससे ज़्यादा ज़बर्दस्ती न की गई, उसको वहीं खड़ा रहने दिया गया, और तबादले का बाक़ी काम होता रहा।
सूरज निकलने से पहले शांत पड़े बिशन सिंह के हलक के एक गगन भेदी चीख़ निकली।
इधर-उधर से कई दौड़े आए और उन्होने देखा कि वह आदमी जो पंद्रह बरस तक दिन-रात अपनी टाँगों पर खड़ा रहा था, औंधे मुँह लेटा है - उधर खरदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान, दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था।

जयंत कुलकर्णी's picture

31 Aug 2016 - 12:20 pm | जयंत कुलकर्णी

नशीब माझे, मूळ कथा नंतर टाकलीत ते. नाहीतर अनुवाद कोण वाचतय ?

मारवा's picture

31 Aug 2016 - 12:21 pm | मारवा

मुळ कुठल्याही भाषेतली असो
मराठीचा आनंद वेगळाच नाही का

अनुप ढेरे's picture

27 Sep 2016 - 3:18 pm | अनुप ढेरे

या गोष्टीवर एक लघुपट येतो आहे. पंकज कपूर टोबा टेक सिंहच्या भूमिकेत आहे.