हुश्श्य! मी तर वाचता वाचताच मनातल्या मनात ती ती कामे करत होते. छान लेखन!
अबोली रंगाच्या चंदेरीवर दूध? मनातल्यामनात कसतरीच झालं. जणू माझ्याच चंदेरीवर दूध सांडले होते.;) अरूंधतीचा प्रसंग झकास जमलाय!
बाकी लहानपणापासून 'वेळच्या वेळी, जागच्या जागेवर' हे ऐकलं असेल तर फायदा खूप होतो. मलाही सासरी " किती चांगले वळण लावलेय तुला आई-बाबाने " अशी शाबासकी मिळाल्याचे अंधुकसे स्मरते आहे.;) आणि त्या धाकाने सुधारणा होण्या ऐवजी "चला, आता कितीही पसारा केला तरी आवरायला हक्काचं माणूस आलं" असच वाटलं सगळ्यांना! लग्नं ठरताना आईने चिडवले होते, " तुझ्या घर आवरण्याच्या गुणांना (?) चांगलाच वाव आहे इथे."
नंतर नंतर सगळ्यांना इतकी सवय झाली.......पसारा करण्याची की एखादे दिवशी चुकुन आवरला नाही गेला तर "हे काय? आज आवराआवर नाही झाली का घराची? बरीयेस ना?" असे प्रश्न ऐकू येऊ लागले. जाऊ दे! फार मोठा विषय आहे तो!:)
अवांतर: मी निदान दुसर्यांच्या घरचा पसारा तरी आवरत नाही, माझी चुलतबहिण तर ओळखीपाळखीच्या लोकांकडेही म्हणते की जरा हे कपाट आवरून देऊ का वगैरे.;) काकूनं तीला खूपवेळा तंबी दिलीये..... दुसर्यांकडेतरी निदान असं न करण्या बद्दल!
रेवती
तुम्ही मस्त लिहता... :)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
बात तो पते की है। एकदम मस्त लिहीलं आहे!
लहानपणी असा काही ओरडा मिळाला की मी एकदम निरागस(?)पणे बाबांना म्हणायचे, "बाबा, समोरच टाकलेल्या गोष्टींमधून हवी ती गोष्ट पटकन दिसते. शिवाय सगळ्या गोष्टी एकाच जागी असतात, हा फायदा आहे का नाही?" ...
अदिती
मस्त
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
एकदम मनातलं सगळंच लिहिलं आहेत की!
इंजिनिअरिंगला माझा रूममेट होता तो त्याचे टेबल कधीही आवरत नसे
त्याच ३*४*दीड फूट उंच ढिगातून हवी ती वस्तू, पुस्तक, जर्नल, कागद, शीट्स शोधणे सोपे जाई त्याला. एकदा माझ्या सल्ल्याला बळी पडून त्याने चुकून ते आवरले, साफसूफ करुन कपाटात लावले आणि तेव्हापासून बरेच दिवस त्याला त्याच्या गोष्टी सापडेचनात!! मला जाम शिव्या घालायचा तो की तुझ्यामुळे मला वस्तू सापडत नाहीत. शेवटी महिन्याभराने पुन्हा पहिल्यासारखा सगळा पसारा झाल्यावर त्याच्या शिव्या थांबल्या आणि मी कानाला खडा लावला की दुसर्या कोणाला आवरण्याचा सल्ला द्यायचा नाही किंवा निदान सल्ला दिल्यानंतर तिथून आपण गायब व्हायचं! :D
चतुरंग
मस्त लिहिलयं. लग्नाआधी आई ओरडायची पसार्यावरुन. इथे आल्यावर आपण केलेला पसारा आवरायला, हरवलेली वस्तू शोधायला कुणीही येणार नाही हे लक्षात आल्यावर आपोआप घेतली वस्तू जागच्या जागी ठेवायची सवय लागली.
अडाणि,मदनबाण, क्रान्ति :), सहज, प्राजू :), तात्या, सुमीत, नेहमी आनंदी,स्नेहराणी, अमोल, भाग्यश्री :),पर्नल नेने मराठे, प्रभो, स्वाती, लवंगी, विक्षिप्त आदिती, श्रावण मोडक :), रेवती व चतुरंग तुम्हां सगळ्यांचे अनेक आभार. प्रोत्साहनाने धीर आला.:)
रेवती, हे हे...पण होते खरेच असे माझेही ( मनात हं का..प्रत्यक्षात मी स्वतःला बजावूनच जाते नोंद न घेण्याबद्दल..हा..हा...)
चतुरंग कधी कधी मी मुलाला भेट देऊन आले( डॉर्म मध्ये ) की सगळे आवरून येते मग पुढचे पंधरा-वीस दिवस दिवसातून दहा-बारा फोन," अगं ममा, अमूक कुठे ठेवलेस गं? काय वैताग झालाय......" मी दरवेळी ठरवते पुढच्यावेळी कानाला खडा पण...... :(
प्रतिक्रिया
मस्त...
हुश्श्य!
तुम्ही
मस्त!
फार
सह्हीये!!
भाग्यश्री,
मस्त
:)
खुपच छान...
सुंदर
मस्तच
मस्त मजा
बात तो पते
मस्त --प्रभ
छान
मस्तच!
मस्त
छान लिहिलय ग ..
खूप खूप आभार.
+१
धन्यवाद.