जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे.
ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील?
सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे?
मराठी माणसांनी एवढा विरोध करुनही व तो विरोध योग्य असुनही जर 'व्यक्तीस्वातंत्रा'च्या नावाखाली हे अस छापुन येणार असेल हा कायदा का पाळायचा?
कोणता कायदा बंदी आणलेल्या पुस्तकाचे समर्थन करतो? कोणता कलम वगैरे वापरुन हे मराठी इतिहासाला बदनाम करणार पुस्तक छापु दील जातय,त्याबद्दल कोर्ट का नाही सांगत?
जेम्स लेन्,सुप्रीम कोर्ट्,ऑक्सफर्ड प्रकाशन व त्या लेखकाला लिखाणात मदत करणारे सर्व लोक ह्या सर्वांचा निषेध!!
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!! X(
प्रतिक्रिया
10 Jul 2010 - 2:37 am | अर्धवटराव
असं काय आहे या पुस्तकात ?? महाराजांबद्दल काहि भलतंसलतं लिहिलं असेल तर राजवाडे-कुरुंदकरांच्या महाराष्ट्राला ते खोडुन काढायला कितीसा वेळ लागेल ?? आपल्याला आपल्या बुद्धिवर विश्वास नाहि कि महाराजांवर आपली भक्तीच पोकळ आहे ? मराठी सारस्वतांपुढे कोण जेम्स लेन टिकणार ? कळु देत कि या गोर्या माकडांना मराठी मनगट आणि मेंदु काय चिज आहे ते.
(युद्धोत्सुक) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
10 Jul 2010 - 8:35 am | शानबा५१२
हपुस्तकात महाराजांच्या आईची प्रतिमा मलिन करण्यात आलेय.बस्स अजुन नाही लिहु शकत.
माझी महाराजांवरची भक्ती आहे म्हणुनच काहीतरी लिहतो,संताप व्यक्त करणार पण क्रुतीही करणार.
_________________________________________________
![]()
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 4:49 pm | ऋषिकेश
सहमत. कोणत्याही पुस्तकावर / कलाकृतीवर कोणत्याही कारणाने बंदी नसावी व असल्या पुस्तकांचा बोभाटाही होऊ नये असे वाटते. जर पुस्तक वाचण्याजोगे नसेल तर आपोआपच कोणी घेणार/वाचणार नाहि. जर पुस्तकात चुकीची माहिती असेल तर लेखणीवर लेखणीनेच हल्ला करावा.
अशी बंदी राजकीय पक्षांना फुकटचा मुद्दा तर एखाद्या साध्याशा पुस्तकाला फुकटची प्रसिद्धी मिळवून देते.
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
10 Jul 2010 - 11:13 pm | नितिन थत्ते
>>राजवाडे-कुरुंदकरांच्या महाराष्ट्राला ते खोडुन काढायला कितीसा वेळ लागेल ??
दुसर्या एका संकेतस्थळावरील प्रतिसादात राजवाडेच या कुचाळकीचे कर्ते असल्याची शंका उपस्थित केल्याचे वाचले. :(
(खोडलब्बर) नितिन थत्ते
11 Jul 2010 - 9:22 am | अप्पा जोगळेकर
थत्तेसाहेब,
तुम्ही दुवा दिला आहे त्या धाग्यावर खूपच शांततेने चर्चा चालू आहे असं दिसतं आहे.
राजवाडेच या कुचाळकीचे कर्ते असल्याची शंका उपस्थित केल्याचे वाचले.
हे असे असणे शक्य आहे. राजवाडेंचे एकही पुस्तक मी वाचलेले नाही. पण सदानंद मोरे यांच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या लेखमालिकेमधला 'सोशल इंजिनिअरिंगचे उस्ताद' नावाचा लेख वाचला होता. तो वाचून तरी माझे असे मत झाले की राजवाडे जातीयवादी असावेत आणि त्यांनी त्यांच्या जातीयवादी मतांना पुष्टी मिळेल असा सोयीस्कर अर्थ लावून इतिहास लिहिला असू शकेल. या लेखाचा दुवा 'साप्ताहिक सकाळच्या' साईटवर शोधण्याचा ट्राय मारला पण सापडला नाही.
तुम्ही दिलेल्या धाग्यावरचा हा प्रतिसाद आवडला.
मुळात "आईचा पती हा जीवशास्त्रीय पिता नसल्याचे विधान बदनामी करते" हे गृहीतकच तपासले पाहिजे. अर्थात सध्याच्या समाजात तसे विधान त्या व्यक्तीस हानिकारक आहे हे मला मान्य आहे.
कलाकृती (सत्य असल्याचा दावा न केलेले लेखन) वर बदनामीच्या कारणाने किंवा इतर कोणत्याच कारणाने बंदी येऊ नये.
- रिकामटेकडा
लहानपण किंवा मोठेपण कर्तृत्वाने ठरावं जन्माने नव्हे. आणि कर्तॄत्वाच्या कसोटीवर तर राजे आकाशाएवढे उंच होतेच.
11 Jul 2010 - 9:32 am | शानबा५१२
अप्पा,
इथे जाउन पुढारीमधला भाग १ व भाग २ वाचा, कांडी कोणी जळवली ते सरळ लिहलय.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 11:05 am | अप्पा जोगळेकर
तुम्ही जो धागा दिला आहे त्याच्याखाली 'भांडारकर तो झाकी है' वाला दुवा पाहा. हा घ्या -
जातीयवादी लिखाण
अहो, हे इतकं जातीयवादी लिखाण आहे की बोलायची सोय नाही. तालिबानी लिखाण म्हणता येईल.
11 Jul 2010 - 11:24 am | अप्पा जोगळेकर
हो आडनावे घेऊन अमुक जातीच्या लोकांनी हे कारस्थान केलं असं लिहिलं आहे. मी स्वतःदेखील त्या अमुक जातीचा आहे. मला त्या अमुक जातीच्या(म्हणजे माझ्याच जातीच्या) लोकांचं हे कारस्थान आहे असं अजिबात वाटत नाही.
माहितीसाठी हेही सांगतो की राजवाडे देखील अमुक(म्हणजे माझीच जात) जातीचे होते. पण मोरे मात्र तमुक जातीचे आहेत. तरीदेखील मोरे या तमुकजातीय माणसाचे अमुकजातीय माणसावर केलेले आरोप मला लॉजिकल वाटले.
सांगायचा मुद्दा हा की तुम्ही नथीतून तीर मारु नका. करायचा असेल तर धडधडीत पणे जातीचं नाव घेउन आरोप करा. मी अमुक्,तमुक असा उल्लेख केला कारण मी जात मानत नाही. तुम्हीदेखील मानत नसाल तर असे जातीयवादी दुवे कशाला देताय?
आडनावं वाचून निष्कर्ष काढायचे, नंतर पुस्तक वाचायचं आणि मग निष्कर्ष जाहीर करायचे. ही जुनी भारतीय सवय आहे.
11 Jul 2010 - 11:40 am | शानबा५१२
अप्पा थंड व्हा जरा.
मी हे वाचलच नव्हत्,शप्पथ!
मी म्हणुन तर दोन लेख म्हणुन लिहल होत.त्यात व्यक्तींची नाव आहेत.जमातीच/जातीच काही नाही हे आपणच पहा.मला संभाजी बिग्रेडच लिखाण वाचने अपे़क्षित नव्हत,अणि ना मी वाचल होत.
तरी अशा निमित्ताने 'हे' वाचनात आलच आहे तर त्यात माझी चुक आहे कींवा मी ते हेतुपुर्वक वाचनात आणल आहे अस समजु नका.
मी ती फाईल एखादवेळ तुम्हाला व्यनी केली असती अण अशी प्रकाशात नसती आणली.............आक्षेप असल्यास प्रतिसाद उडवतो.
पण अशा लिखाणालाच 'लिखाणाच लिखाणातुन उत्तर' अस म्हणतात की?
अप्पा, तुम्ही माझ्यवर रागवु नका.मी मुद्दाम ती लिंक दीली नाही.मी वाचायला बोललो ते वेगळ होत्,तुम्ही भलतच उकरुन काढलत
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 11:44 am | अप्पा जोगळेकर
असो असो. मला वाटतं काहीतरी घोटाळा आणि गैरसमज झालाय. किंवा मी करुन घेतलाय.
13 Jul 2010 - 12:02 am | अर्धवटराव
हे पेटवापेटवीचे दोन्ही भाग वाचले... आणि हसावे कि रडावे हेच समजेनासे झाले. शहाजीराजे दूर बंगलोरला असल्यामुळे शिवाजीला त्यांचा प्रत्यक्ष सहवास फारसा लाभलाच नाहि. दादोजींनि बाल शिवाजीचे शिक्षण प्रशिक्षण योग्य प्रकारे करुन आपले कर्तव्य चोख बजावले, यात त्यांचा काय दोष ?? बालशिवाजीच्या कुठल्याहि चित्रात शहाजी नसणे स्वाभावीक नाहि काय ?? राहिली गोष्ट समर्थांची... माझ्या पाहाण्यात तरी शिवजीने एक समर्थांव्यतीरिक्त इतर कोणालाही आपला किल्ला कायमस्वारुपी वास्तव्याला दिला नाहि. शिवाजीच्या मनात समर्थांचे काय स्थान होते याला आणखी काहि पुरावा हवाय का? आता कोणि असे म्हटलं कि समर्थांनी सज्जनगड फंदफितुरी करुन मिळविला तर त्यावर न बोलणेच बरे.
शिवाजीचे सर्वात मोठे कर्तुत्व कुठले... तर त्यांनी मराठा घराण्यात जन्म घेतला. अन्यथा आज जी संभाजी ब्रिगेड त्यांचे गोडवे गातेय तिनेच हजारो जेम्स लेन तयार करुन शिवाजी मराठी मनातुन पार हद्दपार केले असते.
थोडक्यात काय, तर दलीतांना आंबेडकर, मराठ्यांना शिवाजी, ब्राम्हणांना सावरकर... आणि समस्त हिंदुंना ही सगळी मंडळी कधी पचलीच नाहि.
आणखी एक वादः शिवाजी स्वतःला सिसोदीया वंशीय राजपूत समजत (असं मी वाचलय.. त्यांनी स्वतः मला अस कधी सांगितलं नाहि. आता संभाजी ब्रिगेड माझा पत्ता शोधेल बहुतेक :( )
-रेडि टु थिंक
13 Jul 2010 - 9:09 am | अप्पा जोगळेकर
सावरकरांच्या काळात थोड्या वेगळ्या टाईपचे ब्रिगेडवाले होते. ते शिवाजी अस्सल क्षत्रिय नव्हेच असंही म्हणायचे. म्हणजे पुन्हा तेच जात पहा कर्तृत्व पाहू नका असंच काहीसं. 'संभाजी ब्रिगेड' ही आमच्या (म्हणजे मराठी लोकांच्या) संभाजी राजांना दिलेली शिवी आहे. मराठी जनतेला दिलेली शिवी आहे. (माझा पण पत्ता शोधणार नाहीत ना?)
- (घाबरलेला) अप्पा
13 Jul 2010 - 10:30 am | शिल्पा ब
संभाजी ब्रिगेड म्हणजे कोणत्यातरी क्लबात मुलामुलींवर हल्ला केला तेच का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
10 Jul 2010 - 11:14 pm | विकि
मला काही संकेतस्थळ सापडली आपल्या माहितीसाठी येथे देत आहे.
येथे क्लिक करा
इथेही पाहा
आपला
या संकेतस्थळावरिल नविन सदस्य
विकि
10 Jul 2010 - 11:45 pm | शानबा५१२
विकी मस्त साईट दीलीत/दीलीस.
सर्व वाचुन खुप काही नवीन समजेल.......असो.
तुझे मनापासुन स्वागत..आता तु/आपण इतर कुठे जाणार नाही हे नक्की!
नवीन सदस्य?????? पोपट झाला........
........मी प्रतिसाद उडवु शकत नाही.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
12 Jul 2010 - 2:56 pm | मृगनयनी
"सी-ग्रेडपेक्षाही खालच्या लेवलच्या- सम्भाजीब्रिगेड " वाल्यांचे "अगाध" विचारमन्थन पुन्हा एकदा दिसल्यामुळे डोळे पाणावले! ;)
म्हणतात ना.... विनाशकाले विपरित बुद्धी!
:)
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! :|
___________________
पण एरवी या "सी-ग्रेडी"लोकांना पाठीशी घालणार्या "राष्ट्रवादी आणि आय"वाल्यां वर हे प्रकरण चांगलेच शेकले आहे!
;)
शिवाजी महाराज काय :-? सगळ्यांचेच आहेत!
जय भवानी | जय शिवाजी| जय शिवगुरु दादोजी कोन्डदेव | जय जय रघुवीर समर्थ | जय परशुराम |
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
12 Jul 2010 - 3:07 pm | मितभाषी
कोणाला कशाचे आणि बोडकीला केसाचे.
.
.
.
ए ग्रेड भावश्या.
12 Jul 2010 - 4:38 pm | मृगनयनी
=)) =)) =)) =)) =)) =))
भावश्या! ;)
सुसंस्कृत समाजात , सम्भाजी ब्रिगेड' सारखे 'केसा' ने गळा कापणारे अतिरेकी (की पशू) असले, की बोडक्याला काय किन्वा इतर केसाळ प्राण्यांना( किन्वा माणसांना ;) ) काय चिन्ता वाटणारच! :)
कदाचित आपण अनभिज्ञ असाल... पण थोर इतिहासतज्ञ "निनाद बेडेकर", "बाबासाहेब पुरंदरे" यांच्या सारख्या ज्येष्ठांवरती "जेम्स लेन"ला खोटी माहिती पुरविल्याचा आरोप झालेला होता... तो ही सम्भाजी ब्रिगेड'सारख्या थर्डक्लास सन्घटनेकडून! :@
" बाबासाहेब पुरंदरे- हाच खरा जेम्स लेन"... इ. मुक्ताफळे या ब्रिगेडी टोळीकडून उधळली गेलेली होती....
obviously, कारण एकच बाबासाहेब, निनादजी... हे अमुक एका ज्ञातीचे आहेत म्हणुन! :-? ;)
सम्भाजी ब्रिगेड, शिवधर्म,... इ. शी सम्बन्धित असलेल्या मिपा'वरील काही सदस्यांनी वर दिलेल्या लिन्क्स आपण पाहिल्यात... तर आपल्याही (कदाचित) लक्षात येइल.
आणि १००% खात्री आहे... की सध्याचा चालू असलेला वाद परत फिरून (नेहमीप्रमाणे ) "अमुक"एका जातीवर आणि तिच्यातल्या उच्चभ्रूंवर येऊन आदळणार!
असो...
सूज्ञास अधिक सांगणे न लगे! :)
टीप : आपण स्वयंघोषित ए-ग्रेड आहात... हे वाचून
--
--
---
---
---
डोळे अजिबात पाणावले नाही... कारण आम्ही अफवांवर अजिबात विश्वास ठेवीत नाही! ;) =))
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
12 Jul 2010 - 6:04 pm | मितभाषी
मॄबै,
आपला राम युध्द करणार आहे, दत्तगुरुंचा आधार आहे. रावण मरणार हे पण खात्रीशीर आहे. मग आपण माकडांनी उड्या मारुन काही होणार आहे का???? ;)
.
.
.
.
भावश्या.
12 Jul 2010 - 6:13 pm | शानबा५१२
भावश्या व मुगनयनी,
याहु पीसीवर व येहबा मोबाइलवर वापरा व चॅटींग करत रहा इथे जागा कशाला भरताय?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
12 Jul 2010 - 9:55 pm | विकि
मी काही प्रतिसाद वाचले.त्यात संभाजी ब्रिगेडवर टिका करण्यात आली आहे.पण शिवरायांबद्दल आजपर्यंत आपण शालेय पुस्तकात जो इतिहास वाचत आलो तोच खरा असे आपण कसे म्हणू शकतो? किंवा संभाजी ब्रिगेड आणि इतर मंडळी म्हणतात तो इतिहास खरा हे ही आपण म्हणू शकत नाही.
मग खरा इतिहास कोणता?हा विषय या निमित्ताने पुढे आला आहे.
आपला
मिपा.नविन सदस्य.
विकि
13 Jul 2010 - 1:31 pm | मृगनयनी
आपला राम युध्द करणार आहे, दत्तगुरुंचा आधार आहे. रावण मरणार हे पण खात्रीशीर आहे. मग आपण माकडांनी उड्या मारुन काही होणार आहे का????
आपण माकड! 8| नाही हो... भावश्या.... म्हणजे तुम्ही असाल कदाचित... ;)
पण मी माझ्या अनिरुद्धाची "वानरसैनिक" आहे.. :)
वानर आणि माकड यामध्ये फरक आहे. :|
आपले केसाळ अंग विक्षिप्तपणे खाजवून चेष्टा करणारे, उड्या मारणारे- ते माकड :D
आणि , रामनामाला परमपवित्र मानून प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाच्या विनाशासाठी मदत करणारे ते "वानर" ! :)
असो....
पण समाजातल्या "रावणां"चा, दैत्यांचा नाश होणार आहे... हे नक्की आहे...
अर्थात हे दैत्य आपापसातल्या वैरामुळे म्हणजे स्वतःच्या कर्माने मरतील की "वानरसैनिकां"कडून मारले जातील... हे येणारा काळच ठरवेल! :W :W :W :)
|| जय श्रीराम || || जय परशुराम || || जय हनुमान ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
13 Jul 2010 - 10:50 pm | पंगा
तसे नसावे. "माकड" आणि "वानर" यांत काही जैवशास्त्रीय फरक असतो, असे वाटते. हा फरक नेमका काय आहे, ते मला या क्षणी नक्की माहीत नाही, पण या दोन वेगवेगळ्या (परंतु तरीही एकाच गटातल्या) प्रजाति आहेत असे वाटते.
नेमका फरक जालावर शोधल्यास बहुधा सापडावा. माकडाला इंग्रजीत monkey म्हणतात, तर वानराला ape असे संबोधतात, या माहितीचा शोधसूत्राकरिता बहुधा उपयोग व्हावा. इच्छा असल्यास जरूर शोध घ्यावा.
आता एक शंका. आफ्रिकेत वानर खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे कळते. ही आफ्रिकन वानरे रामनामाला परमपवित्र मानून प्रभू श्रीरामचंद्रांना रावणाच्या विनाशासाठी मदत करतात किंवा कसे, याबद्दल काही खात्रीलायक माहिती आहे का? कारण तशी ती करत नसल्यास 'वानरा'च्या आपल्या व्याख्येस धक्का पोहोचू शकतो, या धोक्याची पूर्वसूचना आपणास देणे इष्ट वाटते.
भारताच्या विविध आफ्रिकन देशांतील वकिलातींतील संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय? की त्यांचेही दोन्ही हात केळी खाण्यात गुंतलेले आहेत?
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
12 Jul 2010 - 8:37 pm | वेताळ
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना!
प्रतिसाद देण्याच्या नादात आपण संभाजी ब्रिर्गेटपेक्षा खालची पायरी गाठलीत.
वेताळ
13 Jul 2010 - 10:13 am | मितभाषी
अगदी अगदी वेताळ मला हेच म्हणायचे होते.
.
.
.
भावश्या
.
.
.
13 Jul 2010 - 3:22 pm | मृगनयनी
असो... आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना!
प्रतिसाद देण्याच्या नादात आपण संभाजी ब्रिर्गेटपेक्षा खालची पायरी गाठलीत.
वेताळ
:-? अं हो का! :-? काजव्याला सूर्यप्रकाशाचे वावडे असायचेच! ;)
अहो, आमच्या परमदैवताला- परशुरामाला केलेली, ही तर फक्त एक प्रार्थना आहे.... :)
आपण नवरात्रात नाही का, देवीला विनन्ती करत... की समाजातल्या दुष्ट शक्तींचा समाजाला घातक असणार्या पाशवी पशूंचा नाश कर!
त्याचप्रमाणे त्या रेणुका-मातेच्या सुपुत्राला केलेली ही एक विनंती!
_/\_
पण वेताळ, तुम्हाला का बरं ती प्रार्थना सी-ग्रेडी लोकांपेक्षाही खालच्या दर्जाची वाटली ?
बहुजन समाजाने गुढीपाडवा साजरा करू नये.... कारण ते भटांनी सुरू केलेलं एक षडयंत्र आहे..... सावरकरांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं?.. त्यांना माफीवीर किन्वा संडासवीर म्हणा......
तुकारामांना देहूतल्या ब्राह्मणांनी ठार मारले... ...
अशी आणि याप्रमाणे अनेक बेलगाम वक्तव्ये करणार्या, भांडारकर उध्वस्त करून शनिवारवाड्यावरही हल्ला करू इच्छिणार्या, समर्थ रामदासांबद्दल अश्लील शब्द वापरून दासनवमीची मिरवणूक रोखणार्या "सम्भाजी ब्रिगेड" सारख्या अतिरेकी संघटनांना अजून किती दिवस सहन करणार?
त्यामुळे या अतिरेकाचा आणि अतिरेकींचाही नाश व्हावा.. अशी माझी मनापासून इच्छा आहे... आणि यापुढेही राहील. :|
__________
वरकरणी दाखवत नसले, तरी संभाजी ब्रिगेड'बद्दल, (मायावती'च्या बसपाबद्दल ) कुणी काही वाईट बोलल्यावर दुखावले जाणारे आणि चडफडणारे अनेक महाभाग मिपावरती आहे, आणि याची पूर्ण कल्पना सुजाण मिपाकरांना नक्कीच आहे.... :)
काय हो वेताळ? तुम्ही यातले तर नाही ना? :-?
|| जय परशुराम ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
13 Jul 2010 - 3:42 pm | मितभाषी
बहुजन समाजाने गुढीपाडवा साजरा करू नये.... कारण ते भटांनी सुरू केलेलं एक षडयंत्र आहे..... सावरकरांना स्वातंत्र्यवीर का म्हणायचं?.. त्यांना माफीवीर किन्वा संडासवीर म्हणा......
तुकारामांना देहूतल्या ब्राह्मणांनी ठार मारले... ...
>>>>>>>>>>>
मृबै,
हे कदापीही समर्थनिय नाहीये.
तद्वत आपले "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते.
भावश्या.
13 Jul 2010 - 4:31 pm | मृगनयनी
तद्वत आपले "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते. हीच शुभकामना! " हे वाक्य वैचारीक स्थीतीत दारीद्र्यरेषेच्या खालची पातळी दाखवते.
भावश्या,
आपण येवढा त्रागा का करत आहात? आपण त्या "दुर्जनां"पैकीच एक आहात की काय? :-? की आमच्या "परशुरामा"कडून मुक्ती मिळणार म्हणून वैचारिक भोवळ आली ?
असो... "आमचे परमदैवत"रेणुका-जमदग्नि-पुत्र - महाचिरंजिवी- भगवान परशुराम" या दुर्जनांना लवकर मुक्ती देवोत... हीच शुभकामना! "
ही आम्ही आमच्या दैवताजवळ केलेली प्रार्थना आहे...
आणि त्याचे स्प्ष्टीकरण वरच्या एका प्रतिसादातही दिलेले आहे.
आपणास त्याबद्दल काय वाटते... ह्यापेक्षा आम्हाला काय वाटते, हे महत्वाचे आहे.
कारण या सी-ग्रेडी दुर्जनांचा त्रास सर्वांत जास्त आम्हाला होतोये...
त्यामुळे या दुर्जनांचा "समूळ नाश" होणे गरजेचे आहे......
__________
असो... आमच्या परमदैवत परशुरामांकडून तुम्हाला काय पाहिजे?
सुबुद्धी की मुक्ती ? :-? :|
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
10 Jul 2010 - 3:49 am | पुष्करिणी
तुम्ही हे पुस्तक स्वतः वाचलेलं आहे का की आपली माहिती ऐकीव आहे?
तुम्ही कारवाई करणार म्हणजे नक्की काय करणार?
पुष्करिणी
10 Jul 2010 - 3:57 am | Nile
काय प्रश्न विचारता! अहो म्हणजे ते इथे फुटकळ धागे काढणार.
-Nile
10 Jul 2010 - 4:04 am | पुष्करिणी
अच्छा अशीच कुठलीही कारवाई कराचीय होय्...मला बापडीला वाट्लं की संबधित पुस्तकाबद्दल काहीतरी करायचय ( बाजारातून सगळ्या प्रती विकत घेणं म्हणजे इतरांच्या नजरेला वाईट्-साईट पडणार नाही इत्यादी )
पुष्करिणी
10 Jul 2010 - 9:35 am | शानबा५१२
'त्यांचे' मार्ग आम्ही पुस्तकात दडपुन आलोत.
एकदा एका रद्दीच्या दुकानापाशी उभा होतो मोबाइल वर बोलत होतो.रद्दीवाल्याने दाखवलेल्या पुस्तकावरचे चित्र पाहुन लहान मुलाने तोंड वाकड केले.मी काय आहे त्या पुस्तकावर म्हणुन वर मान करुन बघितल तर ते सेक्स मॅगझिन होत........
मी: "क्या दीखाया तुने बच्चे को?"
"कुछ नही ऐसेही मजाक कर रहा था"
सट्टाक करुन एक त्याच्या कानाखाली वाजवली.बाजुलाच पोलिस होता हे माहीती असुनही त्याला सांगितल नाही म्हणुन तो म्हणाला"अरे मी आहे ना इथे?लफडी काय करतोस?"
"तो लपवतोय ते पुस्तक पहा असली पुस्तक ठेवतो वरुन लहान मुलांना दाखवतोय" हवालदाराने मग आपले काम सुरु केले.मी निघालो.
स्वःताच्या शर्टाची इस्त्री शाबुत रहावी म्हणुन पाय गुंडाळुन बसणारा मी नाही!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 9:40 am | क्रेमर
अतिशय विनोदी प्रतिसाद.
शर्टाची इस्त्री, पाय गुंडाळणे. कशाचाच पाय कशात नाही.
10 Jul 2010 - 9:53 am | शानबा५१२
तो कसाही असो,खर आहे!
_________________________________________________
![]()
'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 8:40 am | शानबा५१२
आम्ही आध्यात्मिक काही लिहल की "चालु द्या तुमच थोतांड"........
टेनिसपटुबद्दल लिहल की."काय हा बालिशपणा"........
आता हे लिहल की " फुटकळ धागे"
.......आणि हे मात्र लेख वाचुन,अशा प्रतिक्रीया देउन कुठल घोडं मारतायत अस त्यांना वाटत कोण जाणे.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
12 Jul 2010 - 4:58 pm | सविता
तु लहानपणी डोक्यावर पडला होतास काय?
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......
जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
12 Jul 2010 - 5:16 pm | शानबा५१२
उत्तर पाठवलय
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 4:41 am | हुप्प्या
पहिल्यांदा जेव्हा हे प्रकरण उद्भवले तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या शूरवीरांनी भांडारकर संस्थेचा सत्यानाश केला. आता हे घडल्यावर हे नरपुंगव सुप्रीम कोर्टाची नासधूस करणार का? का यावेळेस शनिवारवाड्यावर संक्रांत आहे?
कारण त्यांची घोषणा होती भांडारकर तो झाकी है शनिवारवाडा बाकी है!
बघू या काय करतायत ते. निवडणूका जवळ असत्या तर जरा जास्त "ज्वलंत" प्रतिक्रिया आली असती.
10 Jul 2010 - 8:50 am | Pain
भांडारकर संस्थेची नासधूस झाली ना, "सॉफ्ट टारगेट" ला दहशत बसवली, समाजात फूट पडली म्हणजे झाले. महाराजांची प्रतिमा मलीन झाली तर काय फरक पडतो ?
पती माझे छत्रपती या नावाला विरोध करणारे संभाजी बिडीबाबत चकार शब्द काढत नाहीत. हे सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी.
10 Jul 2010 - 9:26 am | शानबा५१२
पेन,
अर्ध्या गावाची माहीती नाही आणि सातबारा बद्दल काय बोलता??
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 11:50 am | Pain
आचार्य बाबा बर्वे, भडकायला काय झाले ?
10 Jul 2010 - 9:01 am | आण्णा चिंबोरी
तू पुस्तक वाचले आहेस का? नाहीतर समजत नसेल त्या विषयावर बोलण्याऐवजी गप्प बस.
10 Jul 2010 - 10:52 am | हुप्प्या
परदेशात ह्या पुस्तकावर बंदी नाही आणि मी ते पुस्तक परदेशात वाचले आहे. आता सांग, तू हे पुस्तक वाचले आहेस का? नाहीतर उगाच नको तिथे नाक खुपसू नकोस. एक तर ते इंग्रजीत आहे.
10 Jul 2010 - 12:02 pm | आण्णा चिंबोरी
'एक तर ते इंग्रजीत आहे.'
अच्छा. तुझी अडचण लक्षात आली. पुस्तकाचे मराठीत भाषांतर झाल्यावर वाच, मग तुला ते कळेल.
10 Jul 2010 - 1:22 pm | मितभाषी
परदेशात ह्या पुस्तकावर बंदी नाही आणि मी ते पुस्तक परदेशात वाचले आहे. आता सांग, तू हे पुस्तक वाचले आहेस का? नाहीतर उगाच नको तिथे नाक खुपसू नकोस. एक तर ते इंग्रजीत आहे.
>>>>>>>>>>
मोठा पराक्रम केला तुम्ही. यावरुन एक कळले तुम्ही परदेशात अस्ता आणि इग्रजीबाबत आनंद आहे. माझ्यासारखा.
पुस्तकातील मजकुराबद्दल विस्ताराने लिहा कि मग.
10 Jul 2010 - 2:12 pm | सागर
अरे हा भाऊबंदकीचा मराठी बाणा बंद करा आणि ज्या मूळ मुद्द्यावर तुमची चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करा. कोण परदेशात रहातो कोण इंग्रजी जाणतो हे महत्त्वाचे आहे काय?
पुस्तकावरचा रिव्ह्यू:
http://dannyreviews.com/h/Shivaji.html
या दुव्यावर सगळे पुस्तक दिसते... १२७ पाने
वस्तुनिष्ठ पुराव्यांची आवश्यकता वाटणार्या सर्व बुद्धीवंतांनी हे वाचून झाले की मग प्रतिक्रिया द्या.
10 Jul 2010 - 2:26 pm | शानबा५१२
९३ व्या पानावर तो मजकुर आहे,ते इथे उपलब्ध नाही.आपण १२७ पर्यंत कस वाचलत?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 2:38 pm | सागर
पुस्तक मी वाचलेले नाहीये
पान क्रमांक १४ पर्यंत सगळे दिसते आहे
किमान या पुस्तकाबद्दल थोडीफार कल्पना येईल म्हणून सापडलेला दुवा दिला.
कोणाकडे अजून माहिती असेन तर माहिती करुन घ्यायला आवडेल
भालचंद्रराव पटवर्धन यांनी जेम्स लेनला लिहिलेले पत्र मायाजालावर आहे
त्यावरुन अंदाज येईल या वादळाचा... हेच ते पत्र
अजून एक दुवा आहे. पण ऑफिसात गूगलपेजेस ब्लॉक असल्यामुळे किती उपयोगी आहे ते माहित नाही.
11 Jul 2010 - 10:56 am | वेताळ
तोडफोड ,मारामारी किंवा गुंडागर्दी ह्या विरोधात मी पण आहे.पण शिवाजी महाराज हा एक वेगळाच विषय आहे.
रामकृष्ण परमहंस ह्याच्या विषयीची एक गोष्ट इथे सांगतो. कलकत्त्याच्या काली घाटावर ते कालीमातेच्या मंदीरात रहात होते. त्याना भेटायला त्याचे शिष्यगण कलकत्त्याहुन येत असत. त्यावेळी मंदीराकडे येण्यास त्याना नावेतुन यावे लागत असे.
एकदा त्याचे दोन तरुण शिष्य नावेतुन त्याना भेटायला आले. रामकृष्णजी त्याना पाहुन उत्साही झाले. त्यानी प्रेमाने त्याची विचारपुस केली.थोड्यावेळाने परमहंसाच्या लक्षात आले कि ते दोघेजण खुपच नाराज आहेत्.त्यानी खोदुन खोदुन त्याचे कारण त्या दोघाना विचारले.त्यावर त्यातल्या एकाने सांगितले कि नावेत ज्यावेळी ते बसुन परमहंसाना भेटायला येत होते त्यावेळी नावेतील इतर लोकांशी त्याचा परमहंसांवरुन वाद झाला. त्यात काही लोकानी परमहंसा विषयी अपशब्द वापरले. त्यावरुन दोघे खुप नाराज आहेत.त्यावर परमहंसाना खुप राग आला व त्यानी आपल्या शिष्यांची निर्भत्सना केली. तुमच्या समोर जर कोणी तुमच्या गुरुची चेष्टा करत असेल्,त्यांना अपशब्द वापरत असेल तर तुम्ही त्याचे तिथेच मुस्काट फोडायला हवे होते. भलेही त्यावेळी तिथे मारामारीत नाव बुडाली तर बेहत्तर.
ह्यावरुन एक लक्षात येते कि आपल्या गुरुची किंवा दैवताची असा एक विनोद सांगुन चेष्टा होत असेल तर अश्या भांडारकर संस्था मोडतोड करुन कसे भागेल? ह्याच्या पेक्षा ज्यादा विरोध अपेक्षित आहे.
निव्वळ लोकशाही म्हणुन काही मुर्खपणाच्या गोष्टीना थारा किंवा संरक्षण दिले तर देशात यादवी माजायला वेळ लागणार नाही.
वेताळ
11 Jul 2010 - 11:06 am | शानबा५१२
अरे वेताळा,
खुप खुप आभार........एकच गोष्टीचे नाहीत खुप काही शिकवुन गेलास.
पण शिवाजी महाराज हा एक वेगळाच विषय आहे.
अतिशय महत्वाच वाक्य्,हेच तर मलापण वाटत.
आणि गोष्ट वाचताना "म्हणून काय झाल मला कुणी नाव ठेवल तर तुम्ही राग मानायला नको' अस वाचायला मिळेल अस वाटल.पण गुरु/आदर्शाला कोणी काही बोलत असताना एकुन घेणारे काय ते शिष्य?..............का विनाकारण सहन करणार आपण?
निव्वळ लोकशाही म्हणुन काही मुर्खपणाच्या गोष्टीना थारा किंवा संरक्षण दिले तर देशात यादवी माजायला वेळ लागणार नाही.
१००% हेच मला बोलायच आहे.काहींना हे पटत नाही.
गप्प राहीलो तर दबलो अस समजतील व नंतर आपल्या संतापाला गाडायला बघतील!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 12:07 pm | Pain
अश्या भांडारकर संस्था मोडतोड करुन कसे भागेल? ह्याच्या पेक्षा ज्यादा विरोध अपेक्षित आहे.
????
तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते.
भांडारकर ही इतिहास संशोधन संस्था आहे. फक्त महाराजच नव्हे तर अतिशय पुरातन काळातील ग्रंथ आणि इतर गोष्टी तिथे आहेत / होत्या.
हा लेन तिथे जेव्हा कधी गेला आणि काही पुस्तके मागितली असतील तर एक अभ्यासू म्हणुन त्याला ती दिली गेली असावीत. आता त्या मुर्खाने असे लिखाण केले त्यात संस्थेचा काय दोष ? त्याचे हुसेन सारखे ट्रॅक रेकॉर्ड नाहीये. संस्थेला थोडीच प्रत दिली होती प्रूफरीडींगसाठी ? परत गेल्यावर त्याने लिखाण प्रसिद्ध केले.
हे समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रात राहणारा कोणीही महाराजांबद्दल असे बोलणार नाही आणि खपवून घेणार नाही. आपापसात भांडणे आणि आपल्याच पैशाने बांधलेल्या संस्था, बसेस इ. फोडून काय मिळणार ?
हिंदू-मुस्लिम, दलित-दलितेतर याबरोबर ही नवीन दरी मराठी माणसांमधे पाडण्यात येत आहे.
10 Jul 2010 - 5:36 am | मेघवेडा
तुम्ही वाचलं आहे का हे पुस्तक?
10 Jul 2010 - 6:23 am | Manoj Katwe
कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी भारताची गत झाली आहे.
तो नालायक हुसेन सुद्धा भारत मातेचा आणि संस्कृतीचा अपमान करून गेला, तरी सगळे ढिम्म
शानबा आम्ही तुमच्या बरोबरीला आहोत. खांद्याला खांदा लाऊन.
( तुम्ही व्हा पुढे , आम्ही तुमचे कपडे सांभाळतो, हि असली भाषा आम्हाला जमत नाय )
जग काय नावे ठेवायचे ते ठेऊ दे, पुण्यात काय आम्ही हे पुस्तक विकू देणार नाय
बाकी पुण्यात कुठे कुठे विकले जाण्याची शक्यता आहे ते कळवा, म्हणजे आमचे काम जरा सोपे होईल
crossword , आप्पा बळवंत चौक, कॅम्प, आणि अजून कुठे कुठे
मनसे प्रमुखाला गाठतो आता. फिल्डिंग लावतो आता जमेल तिथे,
अर्धवटराव रावांनी जे सुचविलेले आहे ते सुद्धा अंमलबजावणी करायचा प्रयत्न करू .
10 Jul 2010 - 9:36 am | शानबा५१२
हेच अपेक्षित आहे.
साला विकत घ्यायच सोडा,कोणी विकायला ही तयार नाही झाला पाहीजे!!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 3:29 pm | समंजस
आणखी एक उपाय सुचवतो अश्या लोकांबद्दल(लेखकांबद्दल) जे इतरांकडून (फक्त) ऐकीव (बदनामीकारक) गोष्टींवर आधारीत पुस्तकं लिहीतात, त्यांना त्यांच्याच हत्याराने त्रासून सोडावे :)
म्हणजे उदा. असे की जेम्स लेन हा काही स्वतःच्या वैयक्तीक आयुष्यात संत/त्यागी/सगळ्याच वाईट गोष्टींपासून दुर असलेला असा शक्यतोवर नसेलच. त्याची सुद्धा काही लफडी/कृष्णकृत्ये/लपवण्यासारखे आयुष्यातील काही प्रसंग(पालकांबद्दल चे सुद्धा चालतील) असतीलच किंवा किमान काही अफवा तरी असतील ज्या ईतरांमधे चर्चील्या जात असतील तर अशा गोष्टींची/घटनांची माहिती काढून त्या वर पुस्तक लिहावे आणि जमेल तेवढी किंमतीत सुट देउन ती पुस्तके त्याच्या देशात/गावात विकली जाणार याची काळजी घ्यावी.... :)
कुठलं न्यायालय मग अश्या पुस्तकांवर बंदी घालणार? काय म्हणून?
काय म्हणताय ? उपाय पटला का? बघा जमतंय का :)
[शिवाजी महाराजांबद्दलच्या बदनामीकारक माहिती बद्दल आणि ती सुद्धा ऐकीव अश्या माहितीवर आधारीत पुस्तक लिहिण्या मागचा लेखकाचा उद्देश नाही कळला :? कदाचीत कोणा विचारवंतास ठाउक असल्यास सांगण्याची कृपा करावी]
10 Jul 2010 - 4:02 pm | शानबा५१२
नावातला गुण वापरा ना सर!
सर्व प्रतिसाद वाचा मी दीलय ह्याच उत्तर,उगाच री ओढुन फायदा नाही.आपल्याला काय वाटत ते पुस्तक आक्षेपार्ह नाही?
मी वाचलय पुस्तक..........बोला अजुन काही?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 4:43 pm | समंजस
आपल्याला काय वाटत ते पुस्तक आक्षेपार्ह नाही?
>>आपण माझ्या प्रतिसादातील शेवटच्या दोन ओळी वाचल्या नाहीत वाटतं
--
मी वाचलय पुस्तक..........बोला अजुन काही?
>>आपण पुस्तक वाचलं किंवा नाही याबद्दल मी काहीच विचारणा केलेली नाही
-----------------------------------------------------------------------
धन्यवाद. तुमचे सर्वच प्रतिसाद वाचलेत मी. नंतरच माझा प्रतिसाद टाकला.
कृपया माझा प्रतिसाद पुर्ण वाचावा, व्यवस्थीत. मग विचार करावा आणि मग ठरवावं काय उत्तर द्यावे ते.
10 Jul 2010 - 7:30 am | अविनाशकुलकर्णी
महागाईच्या प्रश्णा वरुन लोकांचे लक्ष दुसरी कडे वलवन्या साठी तर हे टायमिंग साधले नसेल
10 Jul 2010 - 11:19 am | कवितानागेश
पुस्तक विक्रेत्यांना 'योग्य' शब्दात 'समजावून' सांगावे लागेल!
नाहीतर..................
============
(वाघाची मावशी)माउ
10 Jul 2010 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
काल अशाच एका धाग्यावर एका 'महात्म्याने' दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला होत :-
ह्यालाच लोका सांगे ब्रम्हज्ञान असे म्हणत असावेत काय ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Jul 2010 - 12:19 pm | शानबा५१२
अच्छा हे पहील आपल्याला सुचल तर.....असो,म्हणुनच मी लिहल आहे..
नोंद : मी फक्त निषेध नाही करणार जिथे ते पुस्तक दीसेल तिथे 'कारवाई' करणार,परीणाम काहीही होओत!!
मी सर्व काही भानावर ठेउन लिहल आहे/होत्(निदान ह्यावेळी).खर म्हणजे असा काही लेख लिहुन मला काही जाग्रुती वगैरे अपे़क्षित नाही,ज्यांना तळमळ आहे ते नक्की जाणुन आहेत काय करायच ते!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणजे तुम्ही नक्की काय करणार हे जाणुन घ्यायला आवडेल. तसेच जागृती वगैरे अपेक्षीत नसताना हे लेखन का केले गेले हे देखील जाणुन घ्यायला उत्सुक आहे.
स्वंयस्फुर्तीने लोक जी शिक्षा ह्या पुस्तकाला देतील ते अधिक योग्य ठरणार नाही काय ? बाकी ह्या पुस्तकात जे काय 'अयोग्य' लिहिले गेले आहे ते तुम्ही इथे लिहु शकत नाही असे तुम्ही म्हणत आहात. (ते योग्यही आहे) पण मग निदान संदर्भासाठी पान क्रमांक व परिच्छेद क्रमांक तरी देउ शकाल काय ??
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Jul 2010 - 12:44 pm | शानबा५१२
मी हा वाद ताजा होता तेव्हा वाचनात आलेले काही संदर्भ आपल्याला कळवतो.

मी त्यानंतर ते पुस्तक कुठेच शोधल नाही कारण शोधयच नव्हत अगदी हीन पातळीवर जाउन काही विधान लिहली गेली आहेत.कोणी अपेक्षाही नाही करु शकत असे शब्द जसे "नॉटी" वगैरे वापरले आहेत.
मित्राच दुकान असो वा गावच घर आम्ही महाराजांची प्रतिमा आग्रहाने लावतो.ही घरातली महाराजांची प्रतिमा.........
माझा कुठल्याही सेनेशी राजकीय संबंध नाही.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणजे तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचलेले नाहीत. ह्याचाच अर्थ तुम्ही लेखात लिहिलेला सर्व मजकुर हा ऐकीव माहितीवर आधारीत आहे. त्याचे पुरावे तुमच्याकडे नाहीत अथवा हा लेख लिहिण्याचा आधी तुम्ही ते जवळ ठेवण्याची तसदी देखील घेतलेली नाहीत.
ह्यालाच ते 'हिअर-से एव्हिडंस' का काय म्हणतात ना हो ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
10 Jul 2010 - 1:11 pm | शानबा५१२
पुरावे माझ्याकडॅ हवेत हे खर आहे.काही संदर्भ देतो.
*पान क्रमांक ९३
*एका व्रुत्तपत्राच्या अग्रलेखामधे नीट उल्लेख आला होता.
*एका ब्लॉग साइट वर स्कॅन्ड कॉपी ज्यात 'तो'भग अधोरेखीत केला गेला होता तो वाचला आहे.(ह्याला आपण 'मी वाचल आहे' अस म्हणण्यास हरकत नाही)
आपणास सर्व संदर्भ देण्यासाठी प्रयत्न करतोय.'मी बरोबरच आहे' हे दाखवण्यासाठी नाही तर 'तो' भाग कीती आक्षेपार्ह आहे ते दाखवण्यासाठी.
प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद!
________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 1:20 pm | पुष्करिणी
ज्या वरून वाद चालू आहे ते सगळं मटेरियल वृत्तपत्र, ब्लॉग्ज इत्यादी ठिकाणी उपलब्ध आहे ( तेही फुकट ) तर पुस्तकांवर बंदी घालणं / उठवणं याच प्रयोजन काय?
म्हणजे ज्यांना हे वाचायच होतं / आहे त्यांना पुश्तक विकत घेण्याची अजिबात गरज नाही, त्यांनी ऑलरेडीच वाचल असावं . मग इतका आकांड्तांडव कशाला करायचा?
पुष्करिणी
10 Jul 2010 - 1:46 pm | शानबा५१२
पहील गोष्ट म्हणजे कोणत्याच व्रुत्तपत्रात ते लिखाण तेव्हाही जपुन लिहल गेल होत व आज ते लिहलच जात नाही.
ब्लॉग्स मधुन ते आता नाही भेटत्/मिळत,काहींनी लिंक्स काढल्या आहेत हे आपणास मान्य करावे लागेल.
महारांजाच्या पोषाखात युट्युब वरचा विडीओ सह्या करुन आरडाओरड केल्यावरच लगेच काढला गेला ना!
इथे इतर नॉनसेन्स गोष्टींवर होइल ती 'चर्चा' व ह्या विषयावरच 'तांडव' असेल तर तसच म्हणा..........आपल आपल मत असत.
I hope it's not crap acc. to you!!!!
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 1:54 pm | पुष्करिणी
महाराजांबद्द्ल अपार आदर आहेच. कुणीही, कधीही, काहीही लिहिलं तरी.
प्रश्न फक्त इतकाच आहे की हे सगळं म्हणजे तुम्ही ज्याला 'कारवाई' असं म्हणताय ते कुणासाठी चाललयं, यानं काय सिद्ध होइल?
महाराजांचा फोटो आणि सह्यांच प्रकरण मला माहित नाही.
पुष्करिणी
10 Jul 2010 - 2:19 pm | शानबा५१२
ह्या पुस्ताकातला हीन पातळीवर उतरुन लिहलेल्या भागाचा प्रसार थांबेल आणि तेच हव आहे.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 11:50 am | कवितानागेश
असे बोलुन तू लोकाना 'कृती' करायला उचकवतोयस!
हे चिथावणीखोर कृत्य आहे!
................
खरे तर काम करणारे आणी बोलणारे असे २ पंथ प्रत्येक ठिकाणी असतातच.
असुदेत बापडे!
मीमात्र मघाचपासूनच माझ्या नख्यांना धार लावायला सुरुवात केली आहे.
हा बघा चुरा पड्तोय, .............
============
माउ
10 Jul 2010 - 12:17 pm | शैलेन्द्र
खरंतर ह्या विषयावर काय बोलावं हा प्रश्न पडतो. ज्या गोष्टी केवळ आणी केवळ विश्वासावरच चालतात तीथे आपल्या मताची पिंक टाकत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कुल्ले बडवण्यात काय अर्थ आहे, आणी ही माहिती आपल्याच लोकांनी दिली असा दावा करत क्षुद्र राजकीय हिशोब पुरे करणे तरी कुठे शहाणपणाचे आहे? या गोष्टीचा गाजावाजा केलाच नसता तर ते टीन्पाट पुस्तक कधीच गायब झाले असते. पण असा शहाणपणा हल्ली दुर्मीळ आहे. आमच्या बाल-पौंगंडावस्थेत जी शंकाही आम्हाला शिवली नाही ती आजच्या मुलांच्या मनात येणार. दीड दमडीचे भैय्ये/ मद्रासी महाराजांबद्दल बोलताना गालात हसणार.
सुर्याला ग्रहण लागुच शकत नाही, तो फक्त आभास असतो... आपण मात्र फुकट आंघोळी करत सुटलोय..
10 Jul 2010 - 12:24 pm | शानबा५१२
गाजावाजा नाही केला तर कुणीही काहीही लिहेल्,सर्वाकडे दुर्लक्ष करायच का?
एखादा महान माणुस एका पामराने केलेल्या निंदेने काय बदनाम होणार अशी आशा बाळगुन राहीलो तर आपलेच हसे होइल अशा पुस्तकांतुन!
मधे सावरकर-गांधी संबंधित वाद का जोर धरत होता??
जयंत्या ज्यांच्या साज-या केल्या जातात ते सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 12:45 pm | नितिन थत्ते
>>सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का?
चला. मूळपदावर गाडी आली म्हणायची ;)
नितिन थत्ते
10 Jul 2010 - 2:24 pm | शानबा५१२
गाडी पहील्यापासुन ह्याच पदावर आहे.आपणच नको तिथे भटकताय! 8}
नितिन सर,प्राधान्य महाराजांनाच मिळाव अस नाही वाटत का तुम्हाला?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 4:12 pm | भोचक
येस्स. उत्तर भारतात भूतकाळात बव्हंशी मुसलमानी सत्ता असूनही हिंदू लोक अजूनही कसे काय आहेत ब्वॉ. काय कळत नाही.
(भोचक)
जाणे अज मी अजर
10 Jul 2010 - 6:53 pm | अप्पा जोगळेकर
जयंत्या ज्यांच्या साज-या केल्या जातात ते सर्वजण महारा़ज नसते तर हींदु म्हणुन जन्माला तरी आले असते का?
शिवाजी जन्माला आला नसता तर या देशात हिंदू राहिलेच नसते हा एक गैरसमज आहे. मुसलमानांची भारतावरची पहिली स्वारी सन ६३७ मध्ये झाली. (अब्दुल अझीझ्ची स्वारी) त्यानंतर महंमद बिन कासीम(सन ७१२), गझनीचा महमूद(सन १००१ पासून केलेल्ञा पंधरा स्वार्या) आणि त्यानंतर सुद्धा महंमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, बाबर, अकबर आणि अशाच आत्ता मला आथवत नाहीयेत अशा अनेक मुस्लिम आक्रमकांनी स्वार्या केल्या. शिवाजीचा जन्म सन ६२७ मधला आहे. तोपर्यंत हिंदू टिकून होतेच की. सन ६३२ च्या सुमारास मुसलमानांनी जी घोडदौड सुरु केली ती पश्चिम आशिया आणि स्पेनपर्यंतचा युरोप आणि पूर्वेला सिंध प्रांतापाशी येऊन सन ७१२ मध्ये थांबली. पण सगळा भारत जिंकायला ६५० पेक्षाही जास्त वर्षे लागली(सन १३१०). हे होतत नाहोतय तोच विजयनगरचं साम्राज्य उदयाला आलंच. राणा प्रताप उदयाला आलाच. गुरू गोविंदसिंग जन्माला आलेच. बाप्पा रावळ, खुष्रूखान आणि असे असंख्य हिंदू सम्राट ज्यांच्यापैकी कित्येकांची नावं लिहायला बसलो तर दमायला होईल. सांगायचा हेतू हा की शिवाजी जन्माला आला नसता तर दुसरा कोणीतरी जन्माला आला असताच.
बाकी थोरवीबद्दल म्हणाल तर शिवाजी हा एक अति थोर राजा होता यात वादच नाही. जे त्याला दैवत मानतात (मी शिवाजीला दैवत मानत नाही, महामानव मानतो. एकदा दैवत्व मान्य केलं की तिथे तर्कबुद्धी कुंठित होते आणि श्रद्धेला सुरुवात होते. महामानव चु़का करु शकतो. देव चुका करु शकत नाही हे लक्षात यावे म्हणून हे लिहिले. ) त्यांना मी इतकेच विचारू इच्छितो की तुम्ही ज्याला देव मानलं तो कुणाच्याही टीकेमुळे छोटा असेल तर तुम्ही स्वतःची त्या देवावर असलेली निष्ठा एकदा तपासून घेतली पाहिजे.
एव्हाना जाळपोळ, तोडफोडीला सुरुवात झालीच असेल. त्यांच्यापैकी निदान पन्नास टक्के लोकांनी हे पुस्तक वाचलं नसणारच याबद्दल माझ्या मनात तरी अजिबात शंका नाही. म्हणे गृहमंत्र्यांना फिरु देणार नाही. अजमल कसाब, अफझल गुरु सारखी असंख्य झुरळं आपण जिवंत ठेवली आहेत. त्यांना फाशी दिली नाही म्हणून एकाच्याही पोटात दुखलेलं दिसत नाही. पण शिवाजीच्याबद्दल काहीतरी वेडंवाकडं लिहिलं असं नुसतं ऐकलं तरी मुंडकं तुटलेल्या मेंढ्यासारखे सगळे नाचायला लागलेत.
10 Jul 2010 - 9:01 pm | शानबा५१२
अप्पा व्यनी भेटला.व उत्तर पाठवले आहे.
मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतोय.
महाराष्ट्रात महाराज नसते तर मुसलमानांना कुणी विरोध केला असता?महाराज गेल्यानंतर त्यांनी केलेल्या कामामुळेच 'त्यांना' मान वर काढायला मिळाली नाही हे सत्य आहे.
दुसरा कुणी जन्माला आला असताच हो,आणि आम्ही त्याच्याही उदोउदो केला असता.आता तो दुसरा कुणी आमचे महाराज निघाले म्हणून त्यांचा उदोउदो करत आलो व करत राहणार.
आम्ही त्यांना देवाप्रमाणेच मानतो म्हणून काही 'देव' ह्या संकल्पनेशी त्यांची तुलना करणार नाही.
_________________________________________________
![]()
'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
11 Jul 2010 - 8:58 am | अप्पा जोगळेकर
महाराष्ट्रातसुद्धा शिवाजी राजांच्या आधी आणि नंतर देखील अनेक कर्तृत्ववान पुरुष निपजलेच होते याची नोंद घेतली पाहिजे. अर्थात सबंध महाराष्ट्र जेंव्हा पाच शाह्यांची गुलामी करत होता आणि तेंव्हा स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवून ती प्रत्यक्षात उतरवणारे शिवाजी राजे हेच होत. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात पायोनिअरला जो मान असतो तो त्यांना आणि त्यांनाच मिळालाच पाहिजे.
अधिक लिहित नाही. शिवाजी राजे जन्माला आले असते तर...... किंवा नसते तर ...... ही चर्चा अधिक लांबवली तर ते धाग्याच्या मूळ विषयाला सोडून होईल.
आता तो दुसरा कुणी आमचे महाराज निघाले म्हणून त्यांचा उदोउदो करत आलो व करत राहणार.
+१. 'आमचे' ऐवजी 'आपले' जास्त ठीक वाटलं असतं.
उदोउदो जरूर करावा. तोडफोड करु नये.
10 Jul 2010 - 2:37 pm | प्रशु
हे पहा काय अकलेचे तारे तोडले आहेत...
http://dannyreviews.com/h/Shivaji.html
Shivaji: Hindu King in Islamic India
James W. Laine
Oxford University Press 2003
A book review by Danny Yee © 2004 http://dannyreviews.com/
In the second half of the 17th century, Shivaji rose from a minor chieftain to an independent king, founding the Maratha kingdom. In this study Laine looks not at Shivaji directly, but at the stories that have been told about him and their development over the last three and a half centuries. These have become entwined with the construction of Maharahstrian, Hindu, and Indian identities, and Laine begins with these, and with the risks of attributing anachronistic self-identifications to Shivaji.
The earliest stories of Shivaji's life, from the 17th century, present him as an epic hero. Along with stories of his birth and boyhood, key episodes include the killing of Afzal Khan, the encounter with Shaista Khan, the escape from Agra, and his coronation.
"when [Shivaji] could, he attempted to rule as an independent Hindu monarch, to be a patron of his religious traditions, and to challenge the hegemony of the Islamicate world around him. His predecessors and successors were more accommodationist, less heroic, and less well remembered. Moreover, the stories of their bravery were nowhere near as good."
In the 18th century Shivaji became linked with the saints Ramdas and Tukaram, though "stories of the saints' role in Shivaji's life have more to do with eighteenth-century concerns than with actual events from a century before". The complex intertwining of the religious and political in the present encouraged the construction of a simpler past, as "part of a general tendency to oppose a single universalistic Hinduism to a single monolithic Islam".
In the last hundred and fifty years, biographies of Shivaji have expressed "a host of different political and cultural interests". Jatirao Phule used Shivaji's story as "a way of advancing an antibrahmin reading of Maratha history", emphasising his low-caste status, but "virtually every Maharashtrian writer after Phule saw Shivaji as the father of a nation, a liberationist". K.A. Keluskar downplayed his connection with the saints and emphasized his appeal to followers of every caste, Lokmanya Tilak used him to support opposition to British rule, and M.G. Ranade wedded his story to bhakti ("devotion"). Laine also looks at the presentation of Shivaji in school texts, in the fictional works of Babasaheb Purandare, and on web sites.
Looking at "cracks in the narrative", Laine explores the things left out of traditional stories — and what these absences show about the concerns of those who produced them. Shivaji came from a "broken family", with separated parents, he probably had a harem, he showed no interest in the bhakti saints, his ambition was to build a kingdom, not liberate a nation, and he did little to change the "cosmopolitan Islamicate world" he lived in.
The Shivaji stories have played a key role in the construction of "Islam" and "Hinduism" in Maharashtra.
"The narrative of Shivaji's life, already reshaped by bhakti writers by 1800, was thoroughly overtaken by the nationalist narrative in 1900 and has been sustained as a grand narrative of Hindu nationalist identity, despite all the inner inconsistencies, anachronisms, and communalism that imaginative enterprise has entailed."
It is hard to approach Shivaji without being influenced by the political furor the book has inspired. It has been withdrawn from the Indian market and banned in Maharashtra, while a scholar was assaulted and the Bhandarkar Oriental Research Institute in Pune ransacked just because of mentions in Laine's acknowledgements. This thuggery is a depressing illustration of the extent of communalism in Indian politics, but also demonstrates the continuing significance of the Shivaji stories — and the need to understand their evolution and history.
Laine's openness may explain some of the animosity: his introduction, for example, explicitly states his hope to "rescue [Shivaji's] biography from the grasp of those who see India as a Hindu nation at war with its Muslim neighbors". Shivaji is undeniably a scholarly work, however, and few of Laine's critics have engaged with its actual content. Though too slender to be entirely self-contained, it includes enough background to be accessible to anyone with a basic knowledge of modern Indian history.
March 2004
आणी मुख्य म्हणजे सुप्रिम कोर्टत जाऊन बंदि उठवणारा कोणी एक रुपवते नामक मराठी महाभाग आहे म्हणे....
रामदासांच्या चरित्र्यचे हनन करणार्या पुस्तकांचे काय करायचं???
10 Jul 2010 - 2:53 pm | शानबा५१२
हे सर्व प्रतिक्रीया म्हणुन लिहलेल आहे.पुस्तक वाचायला भेटण आता खुप क्ठीण कींवा अशक्य आहे.जो मजकुर सर्वात धक्कादायक आहे ते पान दीसतच नाही.
अरे काय करत अहेत मराठी नेते??
मला हे ठाउक नाही,पण खुप धक्कादायक आहे!
क्रुपया सविस्तर सागांवे.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 2:58 pm | शानबा५१२
TIMES NEWS NETWORK[ FRIDAY, JULY 09, 2004 11:08:09 PM ]
MUMBAI: The Bombay high court on Wednesday admitted a public interest litigation (PIL) filed by city-based advocate S D Rupwate, filmmaker Anant Patwardhan and activist Kunda Pramila against the state government's ban on US author James Laine's book Shivaji :Hindu King In Islamic India.
अरे तुमचे हेतु ढीग असतील,पण लिखानाचा अर्थ काय होतो ते नाही कळत तुम्हाला?
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 5:11 pm | जयंत कुलकर्णी
श्री बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या Riddles of Hinduism या पुस्तकात सीता ही रामाची बहीण होती अशासारखी अनेक विधाने केली आहेत, त्या पुस्तकावर बंदी घालणार का ? आहे का तशी हिंम्मत ? ज्या वारकर्यांनी यादवांना घालवले ते तर राम/कृष्णांचे नाव प्रत्येक पावलाला घेतात, त्यांच्यात आहे का हिंम्मत बाबासाहेबांच्या पुस्तकावर बंदी घाला ही मागणी करण्याची ?
दुर्गा भागवतांनी कुठलिही मारामारी केली नाही तर त्याला पुस्तकातूनच सडेतोड उत्तर दिलेले मला आठवतंय.
शिवधर्म असा सर्च देऊन ती साईट बघा, त्यावर काय अकलेचे तारे तोडलेत ते वाचा. कोणाच्या कानफटात मारणार ? ती हिम्मत कोणाच्यातही नाही कारण ही सगळी हवा तापवायचे खेळ आहेत आणि राजकारण्यांचे खेळ आहेत.
संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या बाहेर जी पुस्तके विकायला ठेवतात, घालणार का त्यांच्यावर बंदी ? (त्या पुस्तकांमुळे तर दोन समाजामधे तेढ याशिवाय काहीही होऊ शकत नाही) . आपण सगळे double Std. चे लोक आहोत हे मान्य करूया आणि गप्प बसुयात !
जेम्स लेनला या लिखाणाबद्दल कोर्टात खेचायला पाहिजे होते व त्याच्या कडून दंड वसूल करायला पाहिजे होता व शिक्षा सुनवायला हवी होती. त्याच्या पुस्तकाचा आपल्या येथील तज्ञांनी प्रतिवाद करायला पाहिजे होता म्हणजे कोर्टात त्याचा उपयोग झाला असता. असो.
गंमत म्हणजे काल IBN लोकमतवर या विषयावर चर्चा चालली होती त्यात एक महाराव का असेच काहितरी नाव होते, त्यांनी तर असे म्हटले होते की पान क्र. ९३ सोडले तर हे पुस्तक एक उत्कृष्ट पुस्तक आहे. ते james lane च्या लिखाणाचेही कौतुक करत होते. याचे मला मात्र आश्चर्य वाटले.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
10 Jul 2010 - 6:05 pm | शानबा५१२
आपण दीलेले उदाहरण माहाती आहे.
Rama's birth is thus accompanied by general debauchery if not in his case certainly in the case of his associates. His marriage to Sita is not above comment. According to Buddha Ramayana, Sita was the sister of Rama, both were the children of Dasharatha. The Ramayana of Valmiki does not agree with the relationship mentioned in Buddha Ramayana. According to Valmiki, Sita was the daughter of the king Janaka of Videha and therefore not a sister of Rama. This is not convincing for even according to Valmiki she is not the natural born daughter of Janaka but a child found by a farmer in his field while ploughing it and was presented by him to king Janaka and brought up by Janaka. It was therefore in a superficial sense that Sita could be said to be daughter of Janaka.
नास्तिकतेची भावना मनात रुजवणे,लोकांना रुढी पंरपरेतुन बाहेर काढणे हे 'त्या' रामायणाचे उद्दीष्ट आहे.आम्ही कधी त्याची दखल हेतली नाही व घेणार नाही.
(आज मला २-३ केमीस्ट्रीच्या व्याख्यांचा विसर पडणार वाटत!)
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 6:37 pm | जयंत कुलकर्णी
इतरांच्या (बहूसंख्यांच्या) भावना पायदळी तुडवून
//नास्तिकतेची भावना मनात रुजवणे,लोकांना रुढी पंरपरेतुन बाहेर काढणे हे 'त्या' रामायणाचे उद्दीष्ट आहे.आम्ही कधी त्याची दखल हेतली नाही व घेणार नाह////
हे कसे जमते बुवा ?
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
10 Jul 2010 - 6:57 pm | पुष्करिणी
तशीच लेन च्या पुस्तकाचीही अजिबात दखल घेउ नका, आपोआप प्रश्न सुटेल...
*हा प्रतिसाद चुकून जयंत कुलकर्णींना लिहिला गेलाय, हा शानबा५१२ ना आहे
पुष्करिणी
10 Jul 2010 - 9:49 pm | शानबा५१२
अप्पा व पुष्करणी,
आपली काहीतरी गफलत(?) होतेय.
आंबेडकरांनी लिहलेल्या लि़खाणात According to Buddha Ramayana, Sita was the sister of Rama, both were the children of Dasharatha. The Ramayana of Valmiki does not agree with the relationship mentioned in Buddha Ramayana.
म्हणजे 'ते' रामायण तस म्हणत.मुळ रामायणाचा त्यात उल्लेख नाही.'ते' रामायण 'बुद्धां'नी लिहलय व नंतर ते आंबेडकरांनी 'पटवुन' सांगितल.आंबेडकरांनी 'लिहल' अस तुम्ही नाही म्हणु शकत.'ते' रामायण मुळ रामायणाच वेगळ स्वरुप(वेगळा अनुवाद ह्या अर्थाने) नसुन रामायणाचा आधार घेउन आपली शिकवण सांगितली गेली आहे.
आंबेडकरांनी 'बुद्ध' हा विचार कसा वेगळा आहे ते प्राचिन महात्म्यांनी लिहलेल्या साहीत्याचा वापर करुन सांगितल आहे.
मी ह्यात काही तडजोड करतोय अस तुम्हाला वाटेल.तर त्यावर एवढच म्हणे न की मला जेवढ कळत ते लिहल आहे.आंबेडकरांनी लिहल त्याला विरोध नाही करु शकत आपण....हो नाही.....का ते सांगतो........
रामानुज ह्यांनी 'तयार' केलेल्या एका 'रामयणाच्या व्हर्जन'मधे (ह्याला भाषांतर म्हणन चुकीच आहे) त्यांनी 'सीता रावणाची मुलगी होती' अस लिहलय.ते कीती योग्य आहे?
मग जर 'त्या' धर्मात(?) 'बुध्द रामायण' नावाखाली 'काही बदल' झाले
तर आपण का बोंबा मारायच्या?आपलीच चुक नाही का निघणार?एकावरच आक्षेप घेतोय अस नाही का होणार?
अजुन काही राज्यात अस्तित्वात असलेल्या दंतकथा काही 'अज्ञान' गोष्टी सांगतात.
हे अस खुप वाचल आहे म्हणुन 'दखल नाही घेणार' अस लिहल आहे.
आता ह्याला तुम्ही 'माझी पळवाट' वगैरे नाव द्या,पण एक लक्षात घ्या की 'ज्यांचा अस्तित्वाबद्दल कोणी ठोस बोलु शकत नाही' तिथे हे असे लिखाण येणारच.शिवाजी महाराजांच तस नाहीये.
फरक आपल्या लक्षात येत असेल.दोन लेखांची तुलना होउच शकत नाही.
व अशा देवाबाबतीत लिहल्या गेलेल्या लिखाणाबद्दल भाष्य करायला माझा पुरेसा आभ्यासही नाही.मधे एका स्वर्गीय मराठी लेखकाने एका हींदु देवताबद्दल लिहलेल्या आक्षेपार्ह लि़खाणाचा उल्लेख करणारा लेख आला होता तेव्हा हे सर्व वाचण्यात आल वेगवेगळ्या माध्यमातुन म्हणुन आता इथे तिथे बघुन लिहु शकलो.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 10:49 pm | जयंत कुलकर्णी
साहेब, चर्चा माणसांनी लिहीलेल्या पुस्तकावर चालली आहे आणि त्याच्या बंदी वरची. माणसे अस्तित्वात नसली तरी ती पुस्तके अस्तित्वात आहेतच.
थोडक्यात त्यांनी जे लिहीले आहे त्या राम कष्णांच्या अस्तित्वाबद्द्ल तुम्हाला शंका असेल पण कोट्यावधीना नाही.
मुद्दा असा आहे की पुस्तकाला उत्तर पुस्तकांनीच द्यायला पाहिजे. मी उल्लेख केलेल्या बाकी पुस्तकांबद्दल काय ? त्याची ही उत्तरे पुस्तकानीच दिले पाहिजे. कारण तुम्ही एक दोघांच्या कानाखाली काढाल, पण हे पुस्तक जगभर पसरले आहे. त्या सर्व जगाभरात हे उत्तर पण पसरले पाहिजे हे महत्वाचे आहे. आपण मराठी लोक फार localized विचार करतो. प्रश्न जर जगभर पसरला आहे तर त्याचे उत्तर पण तेथेच पोहोचायला पाहिजे आणि ते फ्क्त पुस्तक याच मध्यामातून्च श्क्य आहे. म्हणून पुस्तकावर बंदी घालून काही फायदा होत नाही. आणि हा नियम सर्व जगात खरा आहे.
मला वाटतं की तुम्हाला माझे म्हणणे जर विचार केलात तर पटेल.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
10 Jul 2010 - 11:03 pm | शानबा५१२
नको त्या बाबतीत खिल्ली उडवु नका! ;)
माझ उत्तर हेच की आपण ठोसपणे ह्याचा विरोध नाही करु शकत.'रामसेतु'च्या वेळची परीस्थीती आठवते ना सर........सर्वांनी सोयीस्करपणे मत मांडली.....भाजप- राम होता.............कॉ. - राम अस्तित्वातच नव्हता...
म्हणुन 'नात्यां'च्या बाबतीत तरी मला 'करोडों'मधे नाही यायच.महाराजांचा प्रश्न आहे तर एकटाही बोलेन.....तशी वेळ नाही येणार ही वेगळी गोष्ट!
पुस्तकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलाल तर आपल्याला शक्य आहे तेवढ तरी नियत्रण ठेउ या........ह्या वदामुळे पुस्तकाची दुप्पट विक्री झाली आहे,जी वाद नसता तर नसती झाली.
ह्याबाबतीत तर होच..........कारण जगात बंदी आणु नाही शकणार आपण.इथे राज्य संभाळल तरी खुप आहे.
आपल्या म्हणण्याशी पटायच बोलाल तर ह्या विषयांत मी आपल्यासमोर तोकडा आहे.
पण रामायणाच बोलल तर आपल्याकडे(माझ्याकडे म्हणा!) ठोस कारण नाही(कधीच नव्हत) विरोध करायला
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
10 Jul 2010 - 11:11 pm | जयंत कुलकर्णी
अरेच्या एवढा संकुचित विचार करून कसा चालेल ? आपल्याला शिवाजी महाराजांनीच हेच शिकवले का ? आख्या जगाशी लढायची आपली हिम्मत आहे. सगळ्या जगालाच उत्तर ठणकावून दिले पाहिजे.
मराठ्यांच्या शौर्याविषयी मी एक Maratha Light Infantry वर एक मोठा लेख लिहीणार आहे. त्यात लढाईचे शौर्य वाचायला मिळेल. इथे लोखणीचे शौर्य गाजवायला लागेल. दुसरा मार्ग नाही.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
10 Jul 2010 - 11:17 pm | पुष्करिणी
सहमत..
साप सोडून भूईला कशाला मारायचं.
पुष्करिणी