वाद

केजरीवाल / राज ठाकरे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
10 Feb 2015 - 1:18 pm

दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला.
याची कारणे काय याची चर्चा होईल.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
25 Jan 2015 - 11:10 am

मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो.

बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे:

तुकडाबंदी व गुंठा जमीन

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
15 Jan 2015 - 10:52 pm

नॉन एन ए प्लॉट गुंठेवारीवर विकले जातात. तेंव्हा आपण आपल्या कुवतीनुसार एक दोन गुंठा जमीन घेतो.

पण आज एक नवी माहिती मिळाली की शेतकी जमिनीचे प्लॉट विकताना तुकडाबंदी कायदा पाळला जातो. म्हणजे त्या एरियात १६ गुंटे , २१ गुंटे असाच तुकडा विकावा / घ्यावा लागतो.

बिल्डर बोलला की हो असा कायदा आहे. त्यामुळे खरेदीखत हे अनेक लोकांचे मिळुन केले जाते.

यातुन अडचणी येउ शकतील का ? भविष्यात असा प्लॉट डेवलप करताना वा विकताना काय त्रास होऊ शकेल ?

अशा एक गुंट्यासाठी कर्ज मंजुर होऊ शकते का ?

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
11 Jan 2015 - 4:02 am

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच.

आरक्षणा संबंधी नवीन विचार

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in काथ्याकूट
19 Dec 2014 - 4:23 pm

माझे हिंदु/पुरुष/उच्चवर्गीय/ऊच्चवर्गीय/पहिला मुलगा असणे हीसुद्धा matter of fact च आहे. आणी त्याचे 'परिणाम भोगणे' असली काही परिस्थिती आलेली नसून त्याचे वट्ट फायदे मी 'enjoy' करत आहे. तरी काळजी नसावी.

भीडस्तपणा, स्वानुभव व प्रश्न

येडाफुफाटा's picture
येडाफुफाटा in काथ्याकूट
18 Dec 2014 - 2:02 am

भीडस्तपणा व अधिसत्ता(dominance) यान्च्या संघर्षातून निर्माण होणारे काही प्रश्न.

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
25 Nov 2014 - 3:56 am

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

शिंच्याचं पत्र.

Targat Porga's picture
Targat Porga in जनातलं, मनातलं
21 Nov 2014 - 10:35 pm

होय रे बेण्या!

कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच…

कथालेखवाद

साचेबंद बुध्दिबळ ?

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
13 Nov 2014 - 1:06 am

आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं.

राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.