प्रतिक्रिया

मिस्टर प्रामाणिक

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
15 Feb 2014 - 11:08 am

मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं?

संस्कृतीमुक्तकसमाजराजकारणप्रतिक्रियामतविरंगुळा

उध्वस्त इराक

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
12 Feb 2014 - 4:57 pm

२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली.

समाजजीवनमानराहणीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षामाहिती

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in काथ्याकूट
24 Jan 2014 - 12:57 pm

गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
18 Jan 2014 - 11:52 am

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत.

मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Jan 2014 - 1:30 pm

खुलं खुलं आभाळ तसा..
मीही खुला खुला..
दारं, खिडक्या, भिंती यांची..
सवय झाली तुला..
-कवीवर्य-ज्ञानेश वाकुडकर

कवीवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या उपरोक्त काव्यंपंक्ती माझ्या आवडत्या काव्यपंक्ती आहेत.येथे कवीची अपेक्षा गोपनीयतेचे (प्रायव्हसी राईट्स) व्यक्तीगत राईट्स सोडण्याची नाही तर मनाच्या खुलेपणाची आहे.नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.

भावनिक गुंता (सल्ला हवाय )

जेपी's picture
जेपी in काथ्याकूट
6 Jan 2014 - 3:16 pm

२००६ साली मी पुण्यात होतो . आमच्या भावकीतील एक मुलगा लातुरात राहता असे .घर ची हालत
चांगली नव्हती . हा मुलगा लहान सहान कामे करत असे
पण संगती मुळे, बिघडण्यास सुरवात झालती .
त्याच्या आईने मला विनंती केली कि मी त्यास पुण्यात बोलवून घ्यावे आणि कुठे तरी कामाला लावावे .
मी नकार देऊ शकलो नाही .
मी त्याला पुण्यात बोलावून घेतले आणि त्याच्या नोकरी साठी प्रयत्न करू लागलो . मला यश आले नाही
पण त्याने स्वतः एक वेल्डिंग हेल्पर ची नोकरी मिळवली . पगार जेमतेम होता पण त्याला पुरेस होता .

आपचा चाप!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
26 Dec 2013 - 10:23 pm

आप (आम आदमी पार्टी) ने सरकार बनवायचे मनावर घेतले आहे. पण कुणाही मंत्र्याला सरकारी बंगले देऊ नका असे सांगितले आहे. ह्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी महाराष्ट्रातील मंत्री आपल्या सरकारी निवासस्थानी काय दिवे लावत आहेत हे शोधले. तेव्हा उर्मट शिरोमणी, अर्वाच्यभाषाप्रभू अजितरावजीदादा पवार हे मंत्री सर्वात खर्चिक आहेत असे निष्पन्न झाले. एका वर्षात ३७ लाख खर्च. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर ३३ लाख खर्च. अर्थात हे सरकारने दिलेले आकडे आहेत. कुण्या खाजगी कंत्राटदाराने खास कृपादृष्टी करुन "वरचा" खर्च केला असेल तर ते पकडले जाणे कठिण!

'गाय' चे चोवीस कोटींचे चित्र, आणि साबरमतीच्या संताचे टमरेल

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
23 Dec 2013 - 9:35 pm

...

'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे.

'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार.
त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.