मजा वाटली वाचून.
एकदा आमच्या घरच्या देवाची एक प्रतिमा निर्माल्यात गेली होती.
माझा मुलगा देवाला नैवेद्य दाखवताना ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवतो.
फिरवताना १,२,३,आणि मग `स्टार्ट` असं म्हणतो.
मीनल.
फारच मजेदार गोष्टं.
अगदी प्रामाणिकपणे सांगितलेली आहे असे कळते.
वरचे प्रतिसादही आवडले.
आमच्या लहानपणी आधी आजी, आजोबा, पुजा करायचे.
नंतर बाबा पुजा करायचे. अधी गडबडीमुळे त्यांना जमलं नाही तर
आम्ही तिघं मिळून दोन मिनिटात पुजा उरकायचो.
मिनल,
आजी, आजोबा यांचं वय झाल्यावर त्यांना दिसायचं नाही तेंव्हा
आमच्याकडेही कधीकधी देव निर्माल्यात जायचे.
बर्याचवेळा आई निर्माल्य तपासायची ते आठवलं.:)
रेवती
एकदम मजेदार अनुभव.
शैलीही छान आहे. अजूनही आवडेल वाचायला.
माझ्या आजीने बळजबरीने माझा भावाला एकदा पूजा करायला लावली.
त्याने तोपर्यंत कधीही देवघरात पाऊलही ठेवले नव्हते. आजीने रागावून त्याला आज पूजा तूच करायची असं सांगितलं. धुसफुसत काहीशा ना खुशीने त्याने आजीला पूजा कशी करतात हे विचारलं. तीनं सांगितलं.
झालं!!!! हा गेला देवघरात. आणि समोर पाटावर बसून छान पूजा करून बाहेर आला. थोड्यावेळाने आजी पुन्हा त्याला रागावू लागली.
काय झालं म्हणून विचारलं तर, "अगं!!!! कार्ट्यानं निरांजनाची ज्योत बघ कशी मशाली सारखी लावली आहे. इतकी मोठी काढतात का वात?? आणि सगळे देव एकमेकाशी गोल करून गप्पा मारत बसल्यासारखे एकमेकाकडे तोंड करून ठेवले आहेत. असे ठेवतात का? देवांची तोंड आपल्याकडे नकोत का?" असं म्हणून आजीने पुन्हा तिचं रागावणं कंटीन्यू केलं.. ;)
मी मात्र तिच्या भितीने पळत पळत बाहेर आले आणि मगच जोरजोरात हसू लागले. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान लेख...
आवडला...
अवांतर : हे वाचून अजून तरी कोणी चिडलं नाही, कोणाच्या भावना दुखावल्य नाहीत आणि कोणी शापवाणी उच्चारली नाही हे पाहून खूपच आनंद झाला.
काय आहे, हल्ली काय फास्ट भावना दुखावतात ना..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मास्तर काय बोलावं अशा लोकांपुढे. ह्यांच्या घरी झालेले देवाचे हाल बघून देवाबद्दल सहानुभूती वाटली. इच्छा नाही तर नका आणू मूर्ती घरी. पण आणली की मग तिची व्यवस्थीत पूजा करा. रोज स्वत: ला अंघोळ घालायला वेळ आहे, देवासाठी ५ मिनीटं नाहीत. चांगलं आहे.
शेवटी गणरायाच्या बुडाला फेवीकॉल लावून
अशी भाषा देवाच्या बाबतीत वापरावी ह्याचं दु:ख आहेच. पण बोलून काहिही फायदा नाही.
देवावर पूजा करून आपण उपकार करत नाही हे लक्षात ठेवा.
उंदराचा किस्सा भारी आहे हो! अगदी मनापासून हसू आलं गणपतीची मूर्ती हलणं वाचून! :)
चांगले लिहीलेत..
मलाही देवपूजा कशी करायची गंध नव्हता..
आई बाबा महीना दिड महीना नव्हते तेव्हा मी पूजा करून करून इतकी पटाईत झाले..
आणि त्याहीपेक्षा मला आवडायला लागलं ते सगळं करणं.. छान मनापासून पूजा केली, देवांना नीट आंघोळ घालून गंध, अष्टगंध लावून, फुलं वाहीली.. उदबत्तीचा वास आला.. आरत्या म्हटल्या शेवटी मंत्रपुष्पांजली म्हटली की काय शांत वाटतं!
देवघर एका विशिष्ट जागी असावं असं म्हणतात.. घराचं इंटेरिअर करताना आर्कीटेक्टने सांगितली होती ती दिशा.. व तसंच अप्रतिम डिझाईन केलं होतं देवघर ! त्याचाही फरक पडला की काय माहीत नाही, नाहीतर काही वर्षांपूर्वी मी देव-बिव मानत नसे..
रम्याचा लेख आणी त्यावरच्या प्रतीक्रिया एक से बढकर एक !!
:-D :-) :-D
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सर्वांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
बाकी भडकमकर मास्तरांना वाटणारी भिती मला तर पहिल्यापासूनच वाटत होती. पण अजून तरी मी सुदैवीच आहे!!
असो. प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा आभार!!
आम्ही येथे पडीक असतो!
मस्त लिहिलाय लेख.
मी पण पुजा करत नसे.पन लग्न झाल्यापासुन जसा वेळ मीळेल तशी आणि जमेल तशी पुजा करते
देवांना राग नाही आला म्हणजे मिळवल ... :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
आवडला लेख!
मी काही पूजेच्या भानगडीत पडत नाही, डोळा कायम प्रसादावरच (गैरसमज नको, डोळा कायम फुटाणे, बेदाणे आणि पेढ्यांवर)!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लेख अंमळ मजेशीर आहे. बहुदा लिखाळ यांच्यामते बदलत्या काळातील बदलत्या मुल्यांचे प्रांजळकथन. अश्या लेखाला प्रतिसादातुन फारसा विरोध दिसत नसल्याने कर्मकांडातुन आजचा समाज स्व:ताला किती वेगळा करु पहात आहे याचे प्रत्यंतर येते आहे.
गणपती बाप्पा मोरया!
आवडला अनुभव. एकेकाळी मी खूप उत्साहाने देवपूजा करायचो. पण फुले नसतील तर मला पूजा करायला कंटाळा येत असे. खूप फुले असतील तर मी अगदी मन लावून पूजा करत असे. ताज्या, रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं देवघर, चंदनाच्या सहाणीवर तयार केलेले गंध आणि त्याचा मंद दरवळ, शांत तेवत असलेली समई, दोन-तीन उदबत्त्यांचा पसरलेला धूर आणि सुवास आणि नुकत्याच झालेल्या आरतीचे आणि कापराचे तबक...वा, खूप छान आणि प्रसन्न वाटते. असं वाटतं की तो देव सतत आपल्या पाठीशी आहे. आता माझी बायको पूजा करते आणि तितक्याच तन्मयतेने करते. सकाळी ऑफीसला जाण्यासाठी निघतांना एक उदबत्ती लावून मनोभावे नमस्कार करून निघालं की मन प्रफुल्लित होऊन जातं. दोन्ही एकादशी आणि महाशिवरात्रीला मी देव उजळून काढत असे. पितांबरी, चिंच आणि रांगोळी वापरून २-२.५ तास बसून मी देवाची पूजा करत असे. लख्ख झालेले देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असल्याचा भास होत असे. मनोभावे केलेली पूजा मग ती गणपतीची असेल, किंवा मनातल्या मनात निसर्गापुढे नतमस्तक होणे असेल; शेवटी एका चांगल्या शक्तीची श्रद्धेने केलेली उपासना एक वेगळेच बळ देऊन जाते हे खरे! नकळत झालेला नमस्कार ही किती बळ देऊन जातो...चांगले वागण्याची बुद्धी मिळणे म्हणजेच देवाची कृपा आहे असे मला वाटते. यश-अपयश, संपत्ती, सुख, प्रसिद्धी इत्यादी सगळं हा आपल्या प्रयत्नांचा, प्रामाणिक इछाशक्तीचा आणि नशीबाचा भाग आहे.
--समीर
शेवटी देव देव म्हणजे तरी काय रे ! अरे आपल्याच मनातल्या चांगल्या विचारांचा, आपल्या आपेक्षांचा आपण बनवलेला एक आकृतीबंध ! (वा ! अकृतीबंध हा शद्ब कुठेतरी पेरावा अशी इच्छा होतीच.. देवा तुझ्या कृपेने संधी मिळाली.) अरे निर्गुणाला गुणच नाहित रे. पण मग त्या निर्गुणाचे आपण रे काय करणार. म्हणून सगुणोपासना बरं. अरे देव चराचरात आहे असे मानले तर मूर्तीच्या डोळ्यांतूनच तो पाहतो असे कसे? अरे तो पाहतो असे तरी कसे म्हणावे मग? तो आहेच जिकडे तिकडे.
ऋषींनी म्हणून ठेवले आहे पाहा, ब्रह्मरुपी आहुती ब्रह्माला अर्पण करु, यज्ञाग्नी ब्रह्म आणि आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच. म्हणजे आपणच देव, फुलांत देव, वाहतो आहोत देवाला.. वाहवा ! सगुणोपासनेची ही मजा आहे बरं ! सगुणोपासनेत मन रमावे म्हणून कर्मकांड. मन रमले की कसले आले आहे कर्मकांड. देवघराचे खांब सुद्धा देव आणि धक्का देणारा उंदीर सुद्धा त्याचा अंश.
आता प्रवचनाची वेळ संपत आली आहे. पण जाता जाता एक रामायणातली कथा सांगुन मग थांबुया !
राम आणि हनुमानाची भेट होते तेव्हा राम हनुमानाला विचारतो, 'तू कोण आहेस?'
त्यावर हनुमान उत्तरतो, देहबुद्धीने सांगता मी तुझा दास आहे, जीवबुद्धीने पाहता मी तुझा अंश आहे. आत्मबुद्धीने पाहता मी आणि तू वेगळे नाहीच. !
-- लिखाळ.
लिखाळमहाराज आजकाल कौनस्या चक्कीचा आटा खातात ?
असेच आपले भोचकपणाचे महान कार्य म्हणुन विचारतो ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
ऋषींनी म्हणून ठेवले आहे पाहा, ब्रह्मरुपी आहुती ब्रह्माला अर्पण करु, यज्ञाग्नी ब्रह्म आणि आहुती देणारा सुद्धा ब्रह्मच. म्हणजे आपणच देव, फुलांत देव, वाहतो आहोत देवाला.. वाहवा ! सगुणोपासनेची ही मजा आहे बरं ! सगुणोपासनेत मन रमावे म्हणून कर्मकांड. मन रमले की कसले आले आहे कर्मकांड. देवघराचे खांब सुद्धा देव आणि धक्का देणारा उंदीर सुद्धा त्याचा अंश.
हम्म, खरेच आहे.
मनीषशी सहमत ..
लिखाळमहाराज की जय...
...
हे प्रवचन पुन्हा पुन्हा म्हणूनही पाहिले... मजा आली...
माझ्या पुढल्या प्रवचनात काही ओळी वापरेन म्हणतो
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
आजोबा व वडिल यांची तासभर चालणारी देवपुजा पहाणे हा माझा छंद होता. सुरवातीच्या काळात मी बदली कामगार तत्वावर पुजा करीत असे. त्यावेळी कद नेसण्यात होणारी तारांबळ होई. स्टँडर्ड कद हा प्रौढ माणसाच्या साईझला डिझाईन असल्याने मी नेसला कि तो पायात अडकत असे. देवघरातुन पुजा करुन झाले की आमच्याच रामाच्या देवळात पुजा करायला जावे लागे. हातात तांब्या, भांडे ,पळी व तबक सावरत चालताना मधल्या वाटेत ते वारंवार पायत अडके. कधी पडायला होत असे. मग वडिलांनी मला सोवळ्याची अर्धी चड्डी शिवुन घेतली. त्याची नाडी बांधली की झाले. तेव्हा विलॅस्टीक ची आयडिया मला सुचली नव्हती. रम्या जी आपल्या गमतीदार देवपुजा आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
>>रम्या जी आपल्या गमतीदार देवपुजा आवडली<<
धन्यवाद!
रम्या जी वगैरे काही म्हणु नका हो. कॉलेज सोडून फक्त सात वर्ष झालीत!! लगीन व्हायचं आहे अजून.
आम्ही येथे पडीक असतो!
एखादा धार्मिक विधी जर शास्त्रवत करायचा झाल्यास त्यात सहसामुग्री ते नियम पालन यात अनेक व्यावहारिक अडचणी यायच्या. खेडेगावात ग्रामजोशी पूजा घालताना रेशीम वस्त्र, अत्तर, चंदन, बदाम अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्याकडे करु लागला तर कसे जमायचे? कारभारणीला जर मम, आत्मना, स्मृतीश्रुती, पुरोणोक्त, फलप्राप्त्यर्थम् असे जर म्हणायला सांगितले तर ते परिस्थितीशी कसे बर सुसंगत होईल? मग ''काका! घ्या चालतं करुन!`` साहजिकच त्यावर तोडगे निघाले. सुपारी कारभारनीचं काम करु लागली. धूतलेलं कापडं सोवळ्याच / पीतांबराच काम करू लागला. खारीक खोबर चालायला लागलं. असे धूप दीप नैवेद्यांना विविध पर्याय निघाले. कायद्यात जर "पळवाटा " सापडतात तर धर्मशास्त्रात का बरं "तोडगे "निघू नये? कालपरत्वे तोडगेच अधिक सामर्थ्यशाली व्हायला लागले.
लग्नपत्रिका द्यायला एखादा माणुस घरी आला तर "शास्त्रापुरती"टोपी डोक्यावर घालावी लागते. मगच ती पत्रिका अक्षदा त्यावर ठेउन दिली जाते. तर अस हे तोडग्याच शास्त्र आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
देवपुजा खरोखरच गमतीदार आहे. त्यावेळी तुमच्या घरातल्यांना किती हसु आले असेल तुमचा हा पराक्रम पाहुन ह्याची कल्पना येऊ शकते. :)
माझ्या सासरी मोठा देवारा आहे, देवांची गर्दी आहे देवार्यात, दारात फुले, तुळस, बेल असल्याने नेहमी सर्व देवांना इतकी फुले वाहतात की देव त्या फुलांमध्ये गुदमरतो कि काय असे वाटते. :)
लांकडी देव्हारा होता. कर्नाटकांत मिळणारा. भिंतीला ब्रॅकेट ठोकून त्यावर ठेवलेला. चि. प्राथमिक शाळेंत असतांना सौ. घरात नसतांनां आम्हीं घरांत देखील चेंडूफळी खेळत असूं. एकदां त्यानें जोरदार फटका लगावला आणि देवघर सुटे होऊन त्याचे सुटे भाग आणि सगळे देव इतस्तत: पडले होते. सुदैवानें सौ. परत यायच्या आंत त्वरित व्यवस्थित लावून होतें तसें व्यवस्थित करून ठेवलें. देवादिकांची टिंगल करण्याचा हेतु नाहीं. पण घरांत खेळणारीं मुलें असल्यास घडीचा देव्हारा ठेवूं नये हे तात्पर्य.
नंतर अर्थातच घरांत खेळलों नाहीं. आतां देव्हारा तोच आहे. पण चि. मोठा झाला.
सुधीर कांदळकर.
रम्या,आवडली तुझी देवपुजा. तुझी नर्मविनोदी भाषाही आवडली. असल्या भाषेने देखिल कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर त्यांच्याकडे दूर्लक्ष कर.
आपल्या शरीरात पाच चक्र असतात असे योगात म्हटलंय. ह्या पाच चक्रांत त्या त्या चक्रांच्या स्वामीचे स्थान असते असे म्हणतात. त्यातले सर्वात पहिले चक्र म्हणजे मुलाधार चक्र जे आहे आपल्या गुदद्वारात म्हणजे जिथून आपण मलोत्सर्जन करतो. ह्या मुलाधार चक्राचा स्वामी आहे गणपती. आता गंमत पाहा आपल्या शरीरातील अत्यंत घाणेरड्या(आपण समजतो म्हणून) भागातच गणपतीचे स्थान योजणारे जे कुणी असतील त्यांना आजपर्यंत ना गणपतीने जाब विचारला ना इतर कुणी. ह्या अशा गोष्टीनेही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत की जातही नाहीत. आणि तू म्हटलेस की 'गणपतीच्या बुडाला फेविकॉल लावला' तर लगेच इथे काही लोकांच्या भावना दुखावल्या,श्रद्धेला तडे गेले. छ्या! ही कसली श्रद्धा? इतक्या क्षुल्लक गोष्टीने जी दुखावली जाते वा तिला तडे जातात म्हणजे ह्या लोकांची श्रद्धाच मुळी डळमळीत असते..आधीपासून.
अशा महाभागांना दूर्लक्ष करूनच मारावे. उगाच भाव देऊ नये.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
प्रतिक्रिया
निर्गुणाची सगुण पूजा
नैवेद्य
फारच
मजेदार आठवण
मस्त लिहिले आहेस.
देवांना
खरंच
छान
.
उंदराचा
सही !!
धन्यवाद!
मस्त
आवडला
लेख
छान अनुभवकथन
शेवटी देव
लिखाळ महाराज की जय!
+१,
खरे आहे...
लिखाळमहाराज की जय...
सोवळ्याचे कॉश्चुम
>>रम्या जी
अरेच्चा
अगदी बरोबर
शास्त्रीबोवा...
मस्त लिहिले आहे.
आमच्या घरांत घडीचा - फोल्डिंगचा .......
देवपूजा..
देवपुजा आवडली.