पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
25 Aug 2019 - 3:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातींतर्फे (युएई) त्या देशाचा, "ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान, २४ ऑगस्ट २०१९ रोजी, प्रदान करण्यात आला.

मोदींना त्यांच्या कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रिय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही महत्वाचे असे आहेत :

१. Order of Zayed, २०१९ : संयुक्त अरब अमिरातींचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.

२, Order of St Andrew the Apostle, २०१९ : रशियाचा सर्वोच्च व १६९८ सालापासून आस्तित्वात असलेला सर्वात जुना सन्मान.

३. Seoul Peace Prize, २०१८ : दक्षिण कोरिया.

४. UN Champions of the Earth Award, २०१८ : संयुक्त राष्ट्रसंघ (युएन).

५. Grand Collar of the State of Palestine, २०१८ : पॅलेस्टाईन.

६. Amir Amanullah Khan Award : अफगाणिस्तान.

७. King Abdullaziz Sash Award, २०१६ : सौदी अरेबियाचा सर्वोच्च मुलकी पुरस्कार.

८. TIME Person of the Year, २०१६.

इत्यादी.

महत्वाचे म्हणजे वरच्या यादीतील ८ पुरस्कारांपैकी ४ मुस्लीम राष्ट्रांचे आहेत. इतकेच नव्हे तर त्यातील सौदी अरेबिया आणि युएई हे दोन देश इस्लामी देशांचे धुरीण आहेत !

१९६९ साली स्थापन झालेल्या Organisation of Islamic Cooperation या ५७ इस्लामी देशांच्या संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांची काही महिन्यांपूर्वी अबू धाबीत परिषद झाली होती. मुस्लिम लोकसंखेने दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारताला त्या संघटनेत स्थान मिळू नये यासाठी, त्या संघटनेचा संस्थापक सभासद पाकिस्तान, सुरुवातीपासूनच सक्रिय होता आणि त्यात तो २०१८ पर्यंत यशस्वीही झाला होता. मात्र, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्या संघटनेने पाकिस्तानचा कडवा विरोध मोडून, किंबहुना, संस्थापक सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या सभेवर बहिष्कार टाकण्याची टाकण्याच्या धमकीची पर्वा न करता, तत्कालीन भारतिय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना, केवळ आमंत्रितच केले असे नाही तर, मुख्य भाषण (की नोट अ‍ॅड्रेस) देणार्‍या अतिथीचा सन्मान देऊन आमंत्रित केले होते, हे आठवत असेलच.

या वेळीही, काश्मिरसंबंधिची ३७० आणि ३५अ कलमे रद्दबातल केल्यामुळे पाकिस्तान जगभर, युएनमध्ये आणि विशेषतः इस्लामी जगात विषारी आणि विखारी भाषेत आकांडतांडव करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या या रडगाण्याला ICO आणी चीनसकट कोणत्याही देशाने फारशी भीक घातलेली नाही. मात्र, याच वेळेस, युएईने मोदींना हे पारितोषिक देऊन, पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावलेली आहे, हे नक्की.

एकीकडे मोदींच्या राज्यकारभाराची आणि आंतरराष्ट्रिय मुत्सेद्दीगिरीची (पाकिस्तान आणि चीन सोडून) जगभर प्रशंसा चाललेली असताना, भारतातले विरोधी पक्ष; विशेषतः कॉन्ग्रेस, कम्युनिस्ट आणि कडवे मुस्लिम नेत्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना; त्यांच्यामध्ये एकही गुण दिसत नाही आणि हिटलर, जातियवादी, मुस्लीमविरोधी, इत्यादी अर्थांची नवनवीन विशेषणे शोधून काढण्याचा त्यांचा व्यवसाय जोरात चाललेला आहे ! आणि भारतात वाढत असलेल्या असहिष्णूतेमुळे अनेक "तथाकथित विचारवंत, कलाकार, इत्यादींना देशात राहणे मुश्किल होत आहे !! "पिकते तिथे विकत नाही" ही म्हण सर्वार्थाने सिद्ध करणारा भारत हा सर्व जगात एकमेव विशेष देश असावा !!! :( सुदैवाने, हे फक्त मोदी विरोधकांच्या बाबतीत खरे आहे, जनतेला मोदींबद्दल काय वाटते आहे ते तिने निवडणूकांत दाखवून दिले आहेच. :)

या अतिरेकी मोदी विरोधाला कंटाळून, काही वरिष्ठ कॉन्ग्रेसी नेते हल्ली जरासा सकारात्मक सूर लावू राहिले आहेत, हा त्यातल्या त्यात एक आशेचा विवेकी (sane) किरण म्हणावा काय ?

राजकारणबातमी

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

25 Aug 2019 - 4:11 pm | जालिम लोशन

+१

प्रसाद_१९८२'s picture

25 Aug 2019 - 4:16 pm | प्रसाद_१९८२

"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते.

"ऑर्डर ऑफ झायेद" हा सर्वोच्च मुलकी बहुमान देण्यामागे नक्की criteria काय आहे ? कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते.

criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे .

परवेज मुशर्र्फ यांनी जागतिक शांततेसाठी जे योगदान दिलेले होते त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आजही ते इंग्लंडमध्ये राहुन जागतिक शांततेसाठी कार्यरत आहेत. ते लोकशाहीचे सत्याग्रहाचे कडवे समर्थक होते. त्यांना पुरस्कार दिला २००७ मध्ये त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला होता तेव्हा ज्या अहिंसक रीतीने मुशर्रफ यांनी पाकिस्तानात निवडणुक जिंकलेली होती त्याचा ही प्रभाव पुरस्कार देतांना पडलेला होता.

चायनाचे पंतप्रधान यांनी चायनीज जनतेला जे व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा दिली त्यासाठी त्यांना जुलै २०१८ या एकाच महीन्यात जे तीन ऑर्डर ऑफ झायेद दिले होते त्यापैकी एक दिला होता. त्यातुनच प्रेरणा घेऊन आज ते हाँगकाँग च्या नागरीकांना चायनाहुन अधिक स्वातंत्र्य देण्याचा मनापासुन प्रयत्न करत आहेत.
मोदी यांनी देखील जागतिक शांततेसाठी केलेली कामगिरी विचारात घेण्यात आली असावी.
मागच्या वर्षी एकाच महीन्यात ३ दिले होते
यावर्षी या महीन्यात बघु अजुन कोणाचा झायेद साठी नंबर लागतो ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2019 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय हे मारवासायेब,

या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय राजकारणातले महत्व, मोदींना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीखालच्या तीन परिच्छेदांत बर्‍यापैकी विस्ताराने लिहिले आहे. ते वाचायचे विसरलात की ते सोयीचे नाही असे ठरवून दुर्लक्ष केलेत ?!

तुमच्यासारख्या राजकारणात मुरलेल्या भिडूकडून ही अपेक्षा नव्हती (कोण म्हणतोय रे तो, की हीच अपेक्षा होती म्हणून, आँ ?!) .

पण असो. =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2019 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि हो... त्या तीन परिच्छेदांनंतरच्या चवथ्या परिच्छेदात लिहिलेल्या दुर्दैवी वास्तवाचे कटू सत्य लगेच सिद्ध करून दाखविल्याबद्दल, सखेद धन्यवाद ! :(

रविकिरण फडके's picture

26 Aug 2019 - 10:15 am | रविकिरण फडके

"criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे"

श्रीमान मारवाजी,
इतकी टोकाची भूमिका, आणि तीही केवळ प्रसाद १९८२ ह्यांनी 'कारण हा बहुमान पाकिस्तानचा माजी राष्ट्रपती परवेज मुशरर्फला देखील देण्यात आला होता असे वाचले होते' असे लिहिले म्हणून? काय चुकीचे लिहिले त्यांनी? भारत व पाकिस्तान ह्यांच्यात सुरु असलेल्या बोलण्यांत कोलदांडा घालावा ह्या हेतूने कारगिल युद्ध सुरु करणारे ते हेच मुशरर्फ ना? ह्यांना शांततेचा पुरस्कार? आणि त्याच पंक्तीत मोदी? बाकी, हा सगळा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून तितपतच गाम्भीर्याने घ्यावा हे उचित पण criterion विचारणाऱ्याचा मुद्दा गैरलागू नाही, राष्ट्रद्रोही वगैरे विशेषणे लावावीत इतका चुकीचा तर नाहीच. (उद्या शंकर महादेवन आणि रविकिरण फडके ह्या दोघांनाही गायनाचे बक्षीस एकाच व्यासपीठावर मिळाले तर शंकर महादेवनचा बहुमान होईल की अपमान, हे तुम्हीच ठरवा. ही फक्त उपमा आहे हे लक्षात घावे.)
असो. जे मिपावर समोर आले त्यावर माझी ही प्रतिक्रिया. बाकी आपली जी काही equations बाहेर असतील ती असोत.

जॉनविक्क's picture

25 Aug 2019 - 4:42 pm | जॉनविक्क

यथोचित असो वा नसो वैयक्तिक लाभ नसता सारखे सारखे कौतूक करणे मनाला झेपत नाही म्हणून थोड़े दुर्लक्ष करूया आता मोदींकड़े.

पुढील कौतुक अर्थव्यवस्था रुळावर आल्यावर अथवा 370 प्रमाणे एखादा उत्तुंग शटकार ठोकल्यावर मनापासून करूच. तोपर्यंत आवश्यक असलेल्या पण एकेरी दुहेरी धावा साठी उठून उभे राहणे आता तब्येतीला झेपणार नाही असं वाटते.

उपेक्षित's picture

26 Aug 2019 - 12:53 pm | उपेक्षित

१०० वेळा सहमत, अर्थात जे चांगले काम केले आहे ते आहेच आणि त्या बाबत वाद नाहीच पण अजेंडा असल्यासारखे सारखे सारखे त्याच झाडावर याचा कंटाळा येतो आता.

डँबिस००७'s picture

25 Aug 2019 - 5:18 pm | डँबिस००७

Pakistan Senate chief cancels UAE visit to protest Modi award

Chairman Senate Sadiq Sanjrani has cancelled his scheduled visit to the United Arab Emirates a day after the country gave Indian Prime Minister Narendra Modi highest civilian award.
Sanjrani was to depart on a four-day visit to the UAE with a parliamentary delegation yesterday but it was called off to express solidarity with people of Kashmir and protest the Gulf state's decision to give Modi highest civilian award.
According to a press release issued, the Chairman Senate said that Pakistan fully supported the freedom movement of Kashmiris. He said the Modi government has carried out unprecedented atrocities against Kashmiris and imposed a curfew in the occupied territory.

पाकिस्तानची चांगलीच जळलेली आहे !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2019 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानला पुरते कळून चुकले आहे की, युएई आपल्याला मुस्लिम बंधुराष्ट्र म्हणून फारतर बिरयानी खिलवेल, पण भिकेच्या कटोरीत छदामही टाकणार नाही. तेव्हा, मोदींना दिलेला पुरस्कार, हे तिथे न जायला एक छान कारण मिळाले, इतकेच ! तसेही, रिकाम्या हाताने परतल्यावर, डेलिगेशनला पाकिस्तानी जनतेच्या चपला खायला लागणार होतेच... ते टळले म्हणून त्यांनी आतापर्यंत एखादी गुप्त पार्टी सुद्धा केली असेल. :)

सौदी युवराज महंमदने, फेब्रुवारीच्या पाकिस्तान भेटीत देवू केलेले २० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन, अजूनही (अपेक्षेप्रमाणेच) हवेतच आहे !

प्रकाश घाटपांडे's picture

25 Aug 2019 - 7:30 pm | प्रकाश घाटपांडे

मोदींना बाहेर पुरस्कार मिळतात पण देशात तिरस्कार मिळतात.पुरस्कार मॅनेज करतात हा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2019 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

म्हणजे भारतातले काही लोक अगदीच अन-मॅनेजिएबल झाले आहेत, हे सिद्ध झाले तर ! ;)

नाखु's picture

26 Aug 2019 - 10:48 am | नाखु

मोदींना मिळालेले पुरस्कार, पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद सगळेच विकत घेतलेले आहेत यावर आमचा ठाम विश्वास आहे.

अखिल मिपा मोदी द्वेष संघाच्या " काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या नियतकालिकातून साभार

टपाली दूरस्थ नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

नाखुसाहेब,

केस, "काळा चष्मा न काढता शुभ्र कसे दिसत नाही" या स्टेजच्या फार पुढे गेली आहे आणि आता ती, "आम्ही इतका गडद काळा चष्मा घालून बघतो तरी, (जगाला) शुभ्र कसे दिसते?" या स्टेजला पोहोचली आहे. ;) :)

धागालेखात असलेला बाल वॉशिंग्टनी उत्साह भावला.
लगे रहो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

अभ्या,,

इथे हा प्रतिसाद एक वेळ ठीक आहे. कारण, काहीजण राजकारणाचा चष्मा झोपतानाही काढून शकत नाही, त्याला नाईलाज आहे. तेव्हा जळजळ समजू शकतो.

पण, हाच प्रतिसाद पी व्ही सिंधूच्या जागतिक विजेतेपदाच्या विक्रमी कामगिरीच्या धाग्यावरही कॉपी पेस्ट केला आहेस (जिथे भारतिय मनात केवळ अभिमान सोडून इतर कोणतिही भावना अपेक्षित नव्हती), यावरून केस हाताबाहेर जाऊ लागली आहे. प्रकृतीची काळजी घे. ;) :)

शुभेच्छांसह !

******

अवांतर : इतर कोणत्याही भारतिय नेत्याबद्दल जर असे काही अभिमानस्पद घडले असते तर, एक भारतिय म्हणून तेवढ्याच उत्साहाने धागा टाकला असता. आता, एखाद्या नेत्याचे कर्तृत्व जग मान देण्याइतके समजत नाही, याला आम्ही काय करणार ? =))

उपेक्षित's picture

27 Aug 2019 - 6:49 pm | उपेक्षित

एक्का जी,
वरती मी सुद्धा थोडा (माझ्या दृष्टीने थोडा :) ) निगेटिव प्रतिसाद टाकला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ? आता राजकीय ताज्या घडामोडींसाठी खास धागा आहे न ? हे प्रश्न मला पडले म्हणून मी वरचा प्रतिसाद टाकला.(बाकी मला सल्ला द्यायचा काही अधिकार नाही हे मी जाणून आहे)

इतके दिवस मुद्दाम बोललो नाही पण जेव्हापासून मला समजत आहेत तेव्हापासून बघतोय घरचे आणि जवळचे नातेवाईक BJP शिवाय कुणालाही मत देत नाहीत RSS चे बाळकडू तर लहानपणापासून मिळत होते कारण कर्वेनगर येथे सम्राट अशोकच्या मैदानात तेव्हा शाखा भरायची, शाखेच्या निवासी शिबिरांना सुद्धा जायचो अगदी पानशेत वगैरे तेव्हाच्या थोड्या दुर्गम भागी जाऊन श्रमदान वगैरे करून आलोय.

पण, नंतर नंतर बर्याच गोष्टी मला वयक्तिक खटकू लागल्या कधीतरी कट्ट्यात सांगीन त्या.

सो हे सर्व सांगायचा उद्देश एक आणि एकाच आहे कि आपण आपल्या जवळच्या मित्राला सुद्धा चुकला तर ओरडतो किंवा खूप कौतुक टाळतो. मग इथे का नाही ? बस्स.

आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची )
असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न.

खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये. आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.

जॉनविक्क's picture

27 Aug 2019 - 8:20 pm | जॉनविक्क

आणि तिकडे पी व्ही सिंधूच्या धाग्यावर अभ्याची पोस्ट बघून मला पण धक्का बसला तुमच्या इतकाच (पोस्ट समयोचित नव्हतीच त्याची )
असो ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न.

नसेलही समयोचित पण धक्का बसणे तरीही चूकच. एकदा ही कायम समयोचितच असण्याची सवय लागली की...

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 12:38 am | डॉ सुहास म्हात्रे

@ उपेक्षित :

थोडे काही झाली कि मोदींची बाजू घेऊन कौतुकाचा धागा टाकला जातो असे का ?

हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!!

"आपल्याला न आवडणारा माणूस/नेता असला की त्याचे कधिही काही दिसले की ते सगळेच 'थोडे' असते" ही फॅशन हल्ली काही लोकांची आवडती आहे. तुमच्या वरच्या म्हणण्याला काही आधार देवू शकला नाहीत तर, नाही नाही म्हणत, तुम्ही त्यांच्या कळपात सामील झाला आहात असेच होईल.

भारताच्या बाबतीत काही चांगले झाले तर त्याचे कौतूक करताना मला अजिबात वाईट वाटत नाही... केवळ अभिमानच वाटतो. जात, धर्म, पक्ष, आवडती/नावडती व्यक्ती, इत्यादी चौकशी करून मगच, ते कौतूक करावे की करू नये, हे मी ठरवत नाही.

याशिवाय, तुमचे भाजप किंवा आरएसएसबद्दल काय मत आहे हे इथे अत्यंत गैरलागू आहे... किंबहुना, माझ्याबाबतीत ते मत पूर्वग्रहदृष्टीने आलेले आहे. कारण, माझा भाजप अथवा आरएसएस यांच्याशी दुरान्वयानेही पूर्वी कधीही संबंध नव्हता आणि आताही नाही... माझी बांधिलकी माझ्या देशाशी आणि देशाच्या तिरंग्याशी आहे. अर्थातच, माझ्या मतांवर भाजप अथवा आरएसएस यांच्या विचारसरणीचा तडक काहीच प्रभाव नाही, तरीही तुमचे त्यांच्यासंबंधीचे काही बरे-वाईट अनुभव सामान्यज्ञान म्हणून ऐकायला माझी ना नाही. तसेच अनुभव इतर कोणी, इतर कोणत्या पक्षा/संस्थेबद्दल सांगितले तरीही मी ते ऐकू शकतो. कारण, माहिती/ज्ञानाचा विस्तार केव्हाही स्विकार्य असतो.

माझी विचारसरणी फार साधी आणि सोपी आहे... भारतासंबंधी कोणतीही सकारात्मक कृती झाली तर मला त्याचा अभिमान वाटतो आणि तो व्यक्त करायला मला शरम वाटत नाही. "कोण्या एका नेत्याचा/पक्षाचा झेंडा सतत डोळे मिटून खांद्यावर घेण्याइतका, माझ्या बुद्धीचा अपमान, मी कधीही करणार नाही". त्यामुळे, चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणताना ते कोणत्या राजकिय नेत्याशी/पक्षाशी निगडित आहे, याची खात्री करण्याची मला गरज अजिबात वाटत नाही. इतरांना आंधळेपणाने कोणा नेत्या-पक्षाची पाठराखण करायची असली तर, आणि ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला पचत असेल तर त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा असतील.

भारतातील सद्य वस्तूस्थिती अशी आहे...

१. देशाबद्दल किंवा मोदींबद्दल जरा काही चांगले म्हटले की हल्ली काही लोकांना अत्यंत जळजळ होते आणि लगेच "मोदीभक्त किंवा भाजप/आरएसएस समर्थक" अशी लेबले लावून टीका सुरू होते. तुमचा प्रतिसाद हेच सिद्ध करत आहे की, त्या ट्रॅपमध्ये तुम्हीही अडकला आहात (हे विचारत नाही, सांगत आहे). अन्यथा, भाजप किंवा आरएसएसच्या बद्दल मी आतापर्यंत कधीच काहीच लिहिले नाही, हे तुमच्या ध्यानात आले असते... निदान वरचा प्रतिसाद लिहिण्याअगोदर, मी तसे काही लिहिले आहे का, हे समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न तरी केला असतात.

२. अंध विरोधामुळे, लेबले लावणार्‍या लोकांच्या हे सुद्धा ध्यानात येत नाही कि, भारताच्या, त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या दुर्दैवाने, विरोधक नेते त्यांना नावाजावे असे स्वतः काही करण्याचा प्रयत्नही सद्या करत नाहीत... त्यांची सर्व शक्ती फक्त नकारात्मक बोलणे व नकारात्मक कृतीने सरकारची/मोदींची नालस्ती करण्यातच खर्च होते आहे... आणि तसे करताना त्यांचा इतका तोल जात आहे की, बर्‍याचदा आपण आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोचवत आहे, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही... किंबहुना, ध्यानात येते आहे पण त्यांना त्याची पर्वा कराविशी वाटत नाही. अश्या नेत्यांबद्दल त्यांच्या पाठिराख्यांनाही काही लिहिणे कठीण होत आहे तर इतरांनी कौतुकाने लिहायला आपली बुद्धी गहाण टाकावी लागेल, नाही का?

३. दुसर्‍याची मोठी रेषा खोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, स्वतःची कमीत कमी एखादी लहान रेषा तरी आखण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तर, त्यांच्या त्या सकारात्मक कामाबद्दल अभिमानाने लिहायला मला आवडले असते. हल्लीची अशी एक-दोन सकारात्मक उदाहरणे सांगा, मी स्वतः त्यांच्याबद्दल कौतुकाचा लेख लिहेन. अन्यथा, वर सांगितलेल्या ट्रॅपमध्ये अडकायला तुम्ही मोकळे आहातच, दुर्दैवाने ! :(

खाजगीत सांगितले तेच इथे पण सांगतो आपला काहीही वयक्तिक वाद आणि आकस नाहीये फ़क़्त मतभेद आहेत ते हि वैचारिक सो आपण राग मानू नये.

हे खरेच खरे असले तर, विनाकारण/गैरसमजाने लेबले लावण्याअगोदर माझ्या लेखनातला मजकूर जसा आहे तसाच वाचून त्याचा अर्थ समजावून घ्या... त्यात नसलेले भलतेसलते काल्पनिक अनर्थ काढू नका. कारण, काही न लपवता स्पष्ट लेखन करण्याचा माझी शैली आहे, हे माझ्या इथल्या आणि खाजगीत लिहिलेल्या मजकूरावरून तुमच्या ध्यानात आले असते आणि मग तुम्हाला वरचा प्रतिसाद लिहिवासा वाटला नसता, हे सांगताना खरेच खेद होत आहे. :(

आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.

हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. कारण, माझ्याबद्दल ममत्व असणार्‍याने, कोणत्याही बाबतीत, कोणाही व्यक्तीबद्दल,
(अ) काल्पनिक अर्थ शोधून गैरसमज करून घेणे आणि
(आ) त्या गैरसमजावर आधारित लेबले लावणे,
अश्या प्रकारच्या मानसिक ट्रॅप्समध्ये अडकू नये, असे मला प्रकर्षाने वाटते.

याबाबत, मी नेहमी लिहीत नाही, याचा अर्थ असा नाही की लेबले मला मान्य आहेत. तर, त्याची कारणे अशी आहेत...
(अ) जगातिल प्रत्येकाला सुधारण्यासाठी माझा जन्म झाला नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे आणि
(आ) विशेषतः, झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :)

इतके लिहिल्यावरही तुमचे समाधान झाले नाही तर, माझ्या दृष्टीने तुम्ही वरच्यापैकी एक किंवा दोन्ही कारणात बसाल.

बाकी, तुम्ही काय करावे किंवा करू नये, हा निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे, याबाबत संशय नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 2:05 am | डॉ सुहास म्हात्रे

Modi 'praise': 'Respect my approach,' says Shashi Tharoor as Kerala Congress seeks explanation

वरिष्ठ कॉन्ग्रेस नेते जयराम रमेश यांनी काही दिवसापूर्वी, "मोदींच्या सर्वच गोष्टींवर नकारात्मक टीका करू नये, त्यांच्या चांगल्या गोष्टींची स्तुतीही करावी", अश्या अर्थाचे विधान केले होते. त्याला शशी थरूर आणि अभिषेक मनु सिंघवी या आणखी दोन वरिष्ठ कॉन्गेस नेत्यांनी पाठिंबा देणारी वक्तव्ये केली होती.

आता त्या नेत्यांवर कॉन्ग्रेसमधून सडकून टीका होत आहे. शशी थरूर यांना तर केरळ कॉन्ग्रेसने कारणे द्या नोटीस बजावली आहे ! तेव्हा अंधविरोध, ही उच्च स्तरावरून सुरू होऊन खालपर्यंत झिरपलेली सवय आहे, हे परत एकदा सिद्ध झाले आहे. :)

मग मिपावर तोच व्यवहार पाहून दोष तरी कोणाला देणार ?!

(आ) विशेषतः, झोललेल्याला जागे करण्यात, व्यर्थ वेळ आणि श्रम खर्च करणे, माझ्या तत्वात बसत नाही. :)

झोललेल्याला म्हणजे झोल करणार्‍याला का? :प

ह घ्या हे वे सां न ल

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

झोपेचे सोंग घेतलेला काय किंवा झोललेला काय, सेम डिफरन्स. ;)

स्वगत : हायला, आजकाल सर्वांनाच काकदृष्टी प्राप्त झालेली दिसतेय ! वातावरणात काकदृष्टीचा इतका प्रादुर्भाव झाला आहे, त्याला लोक तरी काय करणार, म्हणा ! =)) =)) ;)

जॉनविक्क's picture

28 Aug 2019 - 2:17 pm | जॉनविक्क

ऑस्कर मिळाले म्हणून रेहमानचे प्रत्येक गाणे सुपरहिट अवीट मानणे योग्य नाही, काही गाणी सुमार, काही कामचलाउ, काही छान आणि काही अफलातून असणे अनपेक्षित नाही.

आणि भलेही प्रत्येकाची आवड निवड वेगळी असेलही याचा अर्थही रेहमान फक्त सुपरहिट गाणे देतो असा ही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 2:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

काहीही हा जॉनविक्क ! तुम्ही (हल्ली पडलेल्या एका प्रथेला धरून) भावनेच्या भरात फारच वाहत जाऊन, वरचा प्रतिसाद लिहून, आमचे मनोरंजन करण्याचा फारच जोराचा प्रयत्न चालू ठेवला आहात. :)

एखाद्या व्यक्तीबद्दल कधितरी एखाद्या खरेच चांगल्या असलेल्या गोष्टीवर एखादा लेख लिहिण्याने, "त्या व्यक्तीच्या सर्व कृतींची स्तुती केली असे होत नाही", इतके जाणण्याइतके तुम्ही हुश्शार आहात असा आमचा समज आहे. पण, आमचा तो समज खोटा आहे, असे सिद्ध करण्याचा तुमचा हा प्रयत्न असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी होत आहात, हे नक्की. =)) =)) =))

जॉनविक्क's picture

28 Aug 2019 - 3:01 pm | जॉनविक्क

मी चुका करत नाही अथवा करायच्या नाहीत असे काही व्रत घेतलेले नाही, माझ्याकडून चूक होउ शकते, तुम्ही म्हणता ते ही इथे घडले असावे.

तेंव्हा आहो जाओ सोडून बाकी काहीही बोललात तर खटकणार नक्कीच नाही. "_/\_

हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ???!!! >>>> पुरावा ? अहो जे जाणवले ते लिहिले आहे मी लगीच आपले कोर्टांत उभ करून साक्षी पुरावे कसले मागताय ?

आपल्याबद्दल नितांत आदर आणि अभिमानच आहे मला.
हे खरे आहे असे गृहित धरूनच वरचा जरासा दीर्घ प्रतिसाद लिहिला आहे. >>>>>>>> जे आहे तेच लिहिले आहे आणि याचा काहीही पुरावा नाहीये माझ्याकडे सो तुम्हाला कसे बघायचे माझ्या विधानाकडे हा तुमचा लुक आउट.

असो माझ्याकडून इथेच पूर्णविराम बाकी खरडीवर धुमाकूळ घालू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 6:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणून आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली.

व्यक्ती तितक्या प्रकृती ! सर्वांसाठी धन्यवाद !

असो. त्यानंतर लगेच अजून एक घटना घडली आहे...
PM Modi conferred with top Bahraini award

युएईनंतर पंतप्रधान मोदींनी बहारेन या अजून एका खाडी देशाला भेट दिली. तेथिल राजे हामाद अल खलिफा यांनी मोदींना, भारत-बहारेन मैत्रीसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल, त्यांच्या देशाचा "King Hamad Order of the Renaissance" हा सर्वोच्च बहुमान प्रदान केला.

अर्थातच, वरच्या सर्वांनाच आपापली भावना अधिक प्रबळ करण्याची अजून एक संधी मिळाली आहे. :)

मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य. ज्या देशामध्ये त्यांच्या कार्याचा प्रभाव पडतो त्या देशात त्यांच्या योजना, त्यांची प्राथमिकता, अंमलबजावणी या बद्दल विवाद आहेत. अशा परिस्थितीत का म्हणून लोकांनी या पुरस्कारांमुळे हुरळून जावे आणि जे जात नाहीत त्यांना तुम्ही हिणवावे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 9:49 am | डॉ सुहास म्हात्रे

या बाबतीत मिपाप्रथेप्रमाणे, "अभ्यास वाढवा" इतकेच सांगू इच्छितो. थोडी तसदी घेवून जालावर पाहणी केली तर बरीच विश्वासू माहिती मिळेल. सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :)

परदेशातल्या भारतिय नागरिकांना भारत व मोदींबद्दल हल्ली काय वाटते आहे, हे पहायला मोदींच्या त्या देशातल्या सभांच्या चित्रफिती जालावर पोत्याने आहेत.

भारतातून वैध/अवैध मार्गाने परदेशात धन नेण्यार्‍या नागरिकांच्या कथा तर अनेक दशके "भारतिय लिजंड्स" झालेल्या आहेत, हे सांगायला नकोच.
पण, परदेशस्थ सधन नागरिकांना भारतात धन गुंतवण्याबद्दल हल्ली काय वाटू लागले आहे हे पण स्वतःच जालावर जरूर पहा. केवळ उदाहरणादाखल, ही काही दिवसांपूर्वीची चित्रफीत पहा...

बाकी, मुक्त संस्थळावर, आभासी आयडीच्या मागे लपून, विनापुरावा सरसकट विधाने काय कोणीही करू शकतो. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 9:55 am | डॉ सुहास म्हात्रे

परकिय सरकारांना भारताबद्दल काय वाटते याची दोन ताजी उदाहरणे...

सुबोध खरे's picture

28 Aug 2019 - 10:24 am | सुबोध खरे

ज्या देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना मिळत आहेत त्या देशातील जनतेचे जीवन स्तर उंचावण्यामध्ये मोदींची भूमिका शून्य.

कायम मोदी द्वेषच दिसत असतो तुमच्या प्रतिसादात

नेल्सन मंडेलाना भारतरत्न पुरस्कार दिल्यामुळे भारतीय किंवा दक्षिण आफ्रिकी जनतेच्या आयुष्यात काय फरक पडणार होता?

मोंगलाना जसे जिथे तिथे संताजी धनाजी दिसत तसं झालंय तुमचं

सर टोबी's picture

28 Aug 2019 - 10:47 am | सर टोबी

तितके त्याचा प्रत्यय येण्याचा लढा कठीण. येणार काळच ठरवेल कुणाचे प्रेम किंवा कुणाचा द्वेष दुराग्रही होता.

सुबोध खरे's picture

26 Aug 2019 - 7:37 pm | सुबोध खरे

कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाच्या नेत्याला सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्या नेत्याला फारसा फरक पडत नसतो.
पण हा देश असा सर्वोच्च पुरस्कार देतो आहे म्हणजे वारा कोणत्या दिशेने वाहत आहे याचा हा वातकुक्कुट आहे असेच गुप्तनिती चे तज्ञ समजतात.
बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया यांनी असे पुरस्कार श्री मोदी याना दिले याचा अर्थ हे देश भारताच्या परराष्ट्र नीती शी एकसंघ (ALIGN) आहेत असे तात्पुरते तरी मानता येईल.

सध्या कश्मीर चा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना याचे महत्त्व अनन्य साधारण आहे कारण पाकिस्तान तुमच्याशी युद्ध करू शकत नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात हे तेलाने श्रीमंत झालेले इस्लामिक देश त्यांना भीक घालत नाहीत तर इतर कुणी तसे करण्याची शक्यता सुतराम नाही.
तेंव्हा पाकिस्तानची कोंडी करून आपला कार्यभाग साधण्यात मोदी सरकार सध्या तरी यशस्वी झालेले आहे असेच म्हणावे लागेल.

उद्या हे देश तुम्हाला हवे तसे वागतील अशी अपेक्षा चूक आहे. शेवटी राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.

उद्या पाकिस्तानने जर येमेन मध्ये आपले सैन्य सौदी अरेबिया च्या बाजूने ( हौदी बंडखोरांशी लढायला) पाठवले तर त्यांची वाऱ्याची दिशा बदलेल हे सत्य आहे.

किंवा कतार आणि इराण विरुद्ध सौदी अरेबिया आणि बहारीन, संयुक्त अरब अमिराती या दोन गटांमध्ये पाकिस्तान जिथे वजन टाकेल( वजन शिल्लक असले तर) ते देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू शकतील.

त्यामुळे जोवर ऊन पडलंय तोवर आपले पीक वाळवून घ्या हीच वस्तुस्थिती आहे.

रविकिरण फडके's picture

26 Aug 2019 - 8:13 pm | रविकिरण फडके

म्हात्रेसाहेब, तुम्ही लिहिता,

"अनेकांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांना दुसर्‍या देशाने पुरस्कार दिला याने आनंद झाला, तर काहींना, त्यामुळे भारताची जागतिक स्तरावर पत वाढली म्हणू न आनंद झाला... तर, इतर काहींना त्याबद्दल उदासिनता किंवा जळजळ वाटली."

तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ.

डॉक्टर खरेंचा प्रतिसाद समर्पक आहे. तात्पुरत्या गोष्टींचा हर्ष-खेद किती मानायचा ह्यावर चर्चा करण्याजोगे काही नाही.

सुबोध खरे's picture

26 Aug 2019 - 9:05 pm | सुबोध खरे

माझ्या अल्पमतीप्रमाणे काही लोक केवळ मोदीद्वेषातून आपले प्रतिसाद लिहीत असतात
त्याला उद्देशून डॉक्टरांनी प्रतिसाद लिहिला आहे.

मोदी द्वेष नसणारेही प्रतिसादात वाचून गोंधळू शकतात की त्याचे काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 9:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

तर, ह्याव्यतिरिक्त अन्य काही genuine पर्याय असू शकत नाहीत का? जसे, कुतूहल (की नेमका कशासाठी हा पुरस्कार दिला गेला), त्याचे निकष काय आहेत, आणखी कुणाकुणाला हा पूर्वी दिला गेला, इ.

कुतुहल नक्कीच असू शकते. मात्र, ते शमवण्यासाठी त्याबद्दल जालावर पोत्याने माहिती आहे आणि मिपावर राजकारणावर टीप्पणी करणार्‍या कोणालाही ती सहजपणे उपलब्ध आहे. किंबहुना, उपरोधीक/तिरके प्रश्न करणार्‍यांना तर ती नीट माहित असतेही. किंबहुना, त्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रिय महत्व मी लेखातच लिहिलेले आहे. पण, ती माहिती सोईस्कर नसल्यास, तिच्याकडे डोळेझाक करून, सहाजिकपणे, तिरके आणि/अथवा उपरोधी प्रश्न विचारले जातात. मानवस्वभाव ! असो. :)

अजून थोडे...

वर एका प्रतिसादात तुम्ही, criteria चा आग्रह अनावश्यक अप्रस्तुत व द्वेषमुलक राष्ट्रद्रोही प्रेरणेतुनआलेला आहे, ही मारवा यांची टीप्पणी खरीखरी व सरळ आहे असे मानून प्रतिसाद लिहिला आहे, हा तुमचा चांगूलपणा आहे. पण, त्या टीप्पणीच्या खालचा मजकूर आणि मारवा या आयडीच्या आतापर्यंतच्या लिखाणाचा कल पाहता, ते उपहासात्मक वाक्य होते, हे सहज ध्यानात येईल. ती टीप्पणी लिहून, मारवांनी सुरू केलेला वितंडवाद वाढविण्यात मला रस नव्हता, म्हणून तेथे काही लिहायचे हेतुपुर्रसर टाळले होते. आता, केवळ तुम्ही नावानिशी विचारणा केली आहे म्हणून इथे काही लिहिणे भाग पडले आहे, इतकेच... तिथला वितंडवाद इथे आणण्यासाठी हे लिहिलेले नाही.

तुमच्या सर्वच प्रतिसांदांतील निरागस प्रश्नांबद्दल काहीच असहमती/आक्षेप नाही, हे वेगळे सांगायला नकोच. :)

रविकिरण फडके's picture

26 Aug 2019 - 9:44 pm | रविकिरण फडके

हे सगळं इतकं complex/ complicated आहे माहीत नव्हतं. निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, म्हात्रेसाहेब. मी फारच भोट आहे असं वाटतं मला!
ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. शक्यतो देणारच नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

मग, (विशेषतः काही) मिपाकरांना इतके 'हे' समजलात की काय ?! ;) =))

ह्यापुढे प्रतिसाद देताना जपून देईन. हे ठिक आहे, पण...

शक्यतो देणारच नाही. असे मात्र अजिबात करू नका, मिपा आपलाच आसा, बेधडक लिवा ! :)

हरवलेला's picture

26 Aug 2019 - 11:45 pm | हरवलेला

रवीश कुमार ला मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर तुम्ही धागा काढला नाही पण मोदींना झाएद बहुमान मिळाल्यावर लगेच धागा काढलात. म्हणून तुमचं घर उन्हात बांधण्यात येत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 6:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरं बोलणार्‍याचं घर, दोन्ही बाजूची माणसं, नेहमी उन्हातच बांधतात... त्यामुळे, समजायला लागल्यापासून आम्ही उन्हातल्या घरातच कायमची वस्ती करून आहोत... त्यामुळे, पर्वा इल्ले. =)) =))

किंबहुना, (उन्हातल्या आभासी घराची का होईना, पण) अजून एक रियल इस्टेट आमच्या नावावर झाल्याबद्दल आनंदच आहे. ;) :)

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2019 - 8:40 pm | प्रकाश घाटपांडे

खो खो खो खो खो! जाम आवडला!

हरवलेला's picture

28 Aug 2019 - 10:07 pm | हरवलेला

:)

थोडे विचित्र वाटत आहे ना की मुस्लिम राष्ट्रांना चांगल्या कार्याची पारख .
म्हणजे वाईट कार्य आणि चांगले कार्य ह्यातील फरक त्यांना समजत आहे .
पण इतिहास काही वेगळेच सांगतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2019 - 10:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

यात विचित्र असे फारसे काही नाही.

आंतरराष्ट्रिय राजकारणात मित्र बदलत राहतात, कायम राहतात ते आपल्या देशाचे हितसंबंध... आणि चांगल्या नेत्याने स्वतःच्या देशाचे (स्वतःचे किंवा स्वतःच्या पक्षाचे नव्हे) हितसंबंध सर्वतोपरी ठेवून वागणे अपेक्षित असते.

जो नेता स्वार्थ सोडून असा खंबीरपणे वागतो, त्याची आणि त्याच्या देशाची पत आंतररष्ट्रिय स्तरावर वाढते. मोदींशी आणि भारताशी उघडपणे दोस्ती करण्यात हल्ली अनेक देश रस दाखवत आहेत, त्याचे हे कारण आहे.

आजच्या बातम्या पाहिल्यात तर, मोदींनी ट्रंपबरोबरच्या पत्रकार परिषदेत, "भारत आणि पाकिस्तानामधील सर्व वाद द्विराष्ट्रिय वाद आहेत. त्यासाठी आम्ही इतर कोणा राष्ट्राला कष्ट देवू इच्छित नाही" असे सुनावले... या मुत्सद्दी भाषेचा साध्या सोप्या मराठीत अर्थ, "भारत-पाकिस्तान वादांत तुम्ही नाक खुपसू नका", असा होतो. ट्रंपने गेले काही आठवडे भारत-पाकिस्तान वादात, अगदी लोचटपणे, मध्यस्थाची भूमिका करण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर हे वाक्य मोदींची "नो नॉनसेन्स निति" अधिकच ठळकपणे दाखवून देते. अशी हिम्मत पूर्वी भारत तर सोडाच पण इतर कोणत्या देशाच्या नेत्याने (यदाकदाचित् दाखवली असेल तर) अतीविरळपणेच दाखवली असेल.

ही वस्तूस्थिती दुर्दैवाने अनेक भारतिय नेत्यांना आणि त्याच्या पाठिराख्यांना समजून घ्यावी असे वाटत नसले तरी, इतर राष्ट्रांच्या नेत्यांना बरोबर कळते आणि वळतेही !

हितसंबंध हा शब्द महत्वाचं आहे .
आणि हित जपण्यासाठी खंबीर नेता लागतो तो डगमगत नाही विरोधी मताना .
आणि असा खंबीर पना मोदी मध्ये आहे हे सर्व जाणतात त्या मुळे आपली पत जगात वाढली आहे हेच मला सुचवायचे आहे

राजकारणातील किड्यांनी मार्गदर्शन करावे

पण तुम्हाला किड्यांची अपेक्षा असल्याने आपला पास.

Rajesh188's picture

26 Aug 2019 - 10:19 pm | Rajesh188

किडे म्हणजे जाणकार असा अर्थ आहे

मोदींजीवर तोंडसुख घेणार्यांना अजुन एक संधी !!

फ्रांस मध्ये मोदीजींच स्वागत फ्रांसचे चांसलर मॅक्राॅंन यांनी घट्ट मिठी मारुन केल ते पहाण्या जोग होत !
त्यानंतर ट्रंप बरोबर झालेली मिटींग व त्यानंतरची प्रेस काॅंफेरेंस मध्ये मोदीजींचे
ट्रंप बरोबरचे संबंध कसे आहेत हे सर्वांना दिसले !!

जॉनविक्क's picture

27 Aug 2019 - 12:53 am | जॉनविक्क

हेच ना ? वा वा वा.

अभिमान

मीडिया ची विरोधी मते .
विरोधी पक्षांची टीका न,वरिष्ठ सरकार किंवा नेत्यांची विरोधी टीका जो शांतपणे ऐकून निर्णय बदलत नाही तोच खरा नेता .
फक्त त्याचे निर्णय जनहिताचे असवेत्त .
आणि हे गुण मोदी मध्ये आहेत .म्हणून ते लाडके आहेत जनते चे

मी काय म्हणतो, ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यातून ' मोदी ' आहेत हा भाग तूर्तास बाजूला ठेवला तर एका भारतीयाला हे बहुमान मिळत आहेत याचा अभिमान वाटायला काय हरकत आहे?

भंकस बाबा's picture

27 Aug 2019 - 10:33 am | भंकस बाबा

खाडी देशातील राजकारणाचे यथार्थ समीकरण मांडले आहे तुम्ही.
तरीही मला हेच वाटते की हा सर्व खटाटोप खनिज तेलाचे संभाव्य खरीददार पकडण्यासाठी चालले आहे. मागे एका धाग्यावर या अनुषंगाने आपली चर्चा झाली होती. चीन व भारत हे तेलाचे प्रचंड मोठे आयातदार आहेत. चीन अतिशय वेगाने विद्युत वाहनाच्या बांधणीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी भविष्याकडे बघून जिथे लिथियमच्या खाणी आहेत तिथे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना विद्युतवाहने भारताच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त मिळतात. पण आता नवीन संशोधनानुसार सोडियमवर आधारित विद्युतघट चलनात येणार आहेत. त्यामुळे विद्युत गाड्याची किंमत पुष्कळ खाली येईल. नेमका हा बदल खाडी देशांच्या अर्थव्यवस्थेला मारक आहे. त्यामुळे भारतासारख्या देशात प्रचंड गुंतवणूक करून आपले तेल खपवायचे हा खाडी देशांचा अग्रिम कार्यक्रम असेल. सौदी अरमाको देखील भारतात यायला हेच कारण असावे. दूसरे म्हणजे खनिज तेल खपवणे हा धंदा अमेरिका व युरोपला देखील फ़ायदेशीर आहे. जर भारताने आक्रमकरित्या विद्युत वाहने आणण्याचे ठरवले तर खाडी देशांची मोठी कुंचबना होईल. कारण फक्त भारतच नाही तर दक्षिण आशियतील देशदेखील तेलावरचे परालंबित्व कमी करतील.
तर हे जे पुरस्कार आहेत ते तुम्ही खुश रहा आणि आमचा पिछवाडा सांभाळा असाच संदेश देतात.
वेनेजुएला देशाने देखील भारताला स्वस्तात खनिज तेल देण्याची ऑफर दिली होती , पण त्यांना चलन वेनेजुएलाचे आभासी चलन आहे ते पाहिजे होते.
मोदीनी निःसन्देह भारतासाठी भरीव कामगिरी केली आहे. पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2019 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबाजी,

तुमचे म्हणणे बरोबर आहे पण परिपूर्ण नाही. हितसंबंधी सामरिक व व्यापारी समिकरणे आंतरराष्ट्रिय राजकारणात फार महत्वाची असतात, यात वाद नाही. पण, त्याचबरोबर व्यवहारात संतुलित, निष्पक्ष व न्याय्य विचार असणे आणि त्या विचारांचा कोणाला निष्कारण न दुखावता पण ठामपणे व सातत्याने पाठपुरावा करणे, हे फार कमी वेळा दिसते. हे जो करू शकतो इतरांच्या आदराचा धनी होतो. भारताची गेल्या सहाएक वर्षांची मुत्सद्देगिरी याच तत्वांवर चालू आहे आणि त्याची फळे वारंवार दिसत आहेत. खालील घटना पाहिल्या तर हे समजायला मदत होईल :

युएनः

१. युएनमधले गेल्या काही वर्षांचे निर्णय पाहिले तर, केवळ खाडी देशच नाही तर चीन आणि पाकिस्तान सोडून जगातले देश एक/बहुमताने भारताच्या बाजूने उभे राहताना दिसतात असेच दिसते. यापैकी, अनेक देशांचे भारताशी फारसे व्यापारी किंवा सांस्कृतिक संबंध नाहीत.

२. यामुळे, पाकिस्तानचा "ऑल वेदर फ्रेंड" असलेल्या चीनलाही अनेकदा त्याची पाठराखण करणे कठीण होत आहे. उदा :

अ) युएनमध्ये चीनने दीड-दोन वर्षे घातलेला खोडा सोडवून, अझर मसूदला अतिरेकी घोषित करणे.

आ) पाकिस्तानची ३७० कलम रद्दबातल केले त्याबद्दलची तक्रार युएनच्या सुरक्षा समितीने १४-१ ने फेटाळणे. तो एक विरोधी देश चीन होता, हेवेसांन. इतकेच नव्हे तर, त्या बैठकीत युकेनेही विरोधी शेरा मारला अशी वावडी उठली होती, तेव्हा ब्रिटनने "आम्ही भारताविरुद्ध काहीही बोललो नाही" असे निवेदन केले. सुरक्षा समितीचा कायम सदस्य असलेल्या युकेने असे काही करणे काही वर्षांपूर्वी स्वप्नातही शक्य नव्हते ! किंबहुना, खाडी देश आणि चीनसकट सर्व राष्ट्रांनी ३७० आणि ३५अ रद्दबातल केल्याबद्दल भारताच्या विरुद्ध विधानही केलेले नाही.

युके :

युएनने स्थापन केलेल्या हेग मधील आंतरराष्ट्रिय न्यायालयात (International Court of Justice) काही महिन्यांपूर्वी दलविर भंडारी या भारतिय न्यायाधिशाची नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक न करता, त्यांच्या जागी Christopher Greenwood या ब्रिटिश न्यायाधिशाची नेमणूक करावी, यासाठी ब्रिटनने जोराचे प्रयत्न केले होते. पूर्वी, ब्रिटनने प्रयत्न करणे सोडाच, पण त्याने जाहीर केलेल्या उमेदवाराविरुद्ध कोणी उभे राहणेही अशक्य गोष्ट होती. निवडणूकीचा आग्रह घरला तर भारताचा उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होईल अशी खात्री झाल्याने, युकेने त्यांच्या उमेदवाराचे नाव मागे घेतले.

युएसए :

अमेरिकन प्रेसिडेंट ट्रंपचा काश्मिर प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न कसा उलटवला गेला, आणि त्याला भर पत्रकारपरिषदेत, "काश्मिर आमची द्विराष्ट्रिय समस्या आणि त्यासाठी आम्ही इतर कोणाला कष्ट देऊ इच्छित नाही (उर्फ, कीप युवर ब्लडी नोझ आउट ऑफ काश्मिर)" असे सांगितले. तरिही त्याच पत्रकारपरिषदेत ट्रंपचे विधान अश्या अर्थाचे होते, "मी मोदींचा चांगला मित्र आहे. त्यांनी काश्मिरमधील परिस्थिती ताब्यात आहे असे मला सांगितले आहे. भारत-पाकिस्तानने सहकार्याने त्यांच्या समस्या सोडवाव्या" !

वर दिलेल्या फक्त काही प्रातिनिधीक घटना आहेत. जालावर थोडेसे उत्खनन केले तर अशी अनेक उदाहरणे मिळतिल. अश्या घटनांतून जगभरचे देश बोध घेत असतात. जगातले आपले स्थान, पोकळ बोलबच्चनगिरी करून नाही तर, अश्या कृतींनी ठरते. अगदी बाळबोध शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की...
१. जेव्हा एखादा देश आपल्या तत्वांवर ठाम राहतो आणि आपल्या बळावर सबळ देशांना त्यांचे मत बदलायला भाग पाडतो, तेव्हा सहाजिकच इतर देश त्याच्याकडे आदराने पाहतात.
२. इतरांच्या दबावाला घाबरून आपली साथ सोडणार नाही आणि सबळ असला तरी आपला विश्वासघात करणार नाही, अश्या देशाशी संबंध ठेवायला इतरांना सुर्क्षित वाटते. अनेक दशके भारताची, "ताकदवान पण अत्यंत घाबरट आणि केवळ नितीमत्तेच्या पोकळ गप्पा मारणारा देश" अशी भारताची परगेशातली प्रतिमा होती, ती गेल्या काही वर्षांत, "ताकदवान आणि आपल्या नितिमान तत्वांवर खंबीरपणे उभा राहणारा विश्वासू देश" अशी झाली आहे. हे मी माझ्या २१+ वर्षांच्या आणि २४ देशांतल्या स्वानुभवांवरून आणि जगभरच्या मित्रांच्या बोलण्यावरून खात्रीने सांगू शकतो.
३. त्याविरुद्ध, पाकिस्तानने स्वत:ची छबी इतकी बिघडवून घेतली आहे की इतर मुस्लिम देशांना तो "अतिरेकी, अविश्वासू, अत्यंत धोकादायक आणि सुधारण्यापलिकडे गेलेला धर्मबंधू" वाटत आहे. वेळ आली तर पाकिस्तान आपल्याला विकायला कमी करणार नाही पण भारत आपल्या हक्कांच्या बाजूने उभा राहील, अशी भावना खाडी देशांत निर्माण झाली आहे. ही वस्तूस्थिती पाहता त्या देशांनी भारताच्या बाजूला झुकणे सहाजिक आहे.

आता थोडे खनिज तेलाबद्दल...

खनिज तेल ही भारताची मोठी गरज असली आणि त्या व्यापारातला हिस्सा काबीज करण्यासाठी अनेक देशांची चढाओढ असली तरीही...

१. खाडी देश जवळ असल्याने त्यांच्याकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे.

२. भारतिय तेलशुद्धिकरण प्रणाली (रिफायनरी) मुख्यतः खाडी देशातून मिळणार्‍या तेलासाठी तयार केलेल्या आहेत. इतर ठिकाणचे वेगळे तेल घेतल्यास त्यांच्यामध्ये खार्चिक बदल करावे लागतिल. तेव्हा खाडी देशांकडून तेल विकत घेणेच भारताला सोईचे आणि कमी खर्चाचे आहे.

तेव्हा, तेलाच्या बाबतीत भारताची खाडी देशांना जितकी गरज आहे तेवढीच भारताला त्यांची गरज आहे.

आंतरराष्ट्रिय राजकारणातील मैत्रीसाठी कळीचा नियम :

एखाद्या परिस्थितीत, (अ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध ठेवण्याने आपल्या देशाचे हितसंबंध राखले जातात, आणि/किंवा (आ) ज्या देशाशी मैत्रीचे संबंध न ठेवल्याने आपल्या देशाचे हितसंबंध धोक्यात येतात; तो प्रत्येक देश, त्या परिस्थितीत, आपला मित्र असतो... आपल्या देशाचे हितसंबंध सर्वतोपरी असतात, परिस्थिती बदलल्यास मित्र बदलू शकतात. पूर्णविराम.

रुस्तम's picture

27 Aug 2019 - 9:50 pm | रुस्तम

भारतिय न्यायाधिशाची नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 1:10 am | डॉ सुहास म्हात्रे

नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? जरा इस्काटून सांगतो...

१. भारतिय न्यायाधिशाची...

दलबिर भंडारी सन १९९१ पासून दिल्ली हाय कोर्टात न्यायाधिश होते, २००४ मध्ये ते बॉम्बे हाय कोर्टाचे सरन्यायाधिश झाले आणि २००५ मध्ये सर्वोच्च न्यायलायात न्यायाधिश झाले.

हेगच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील न्यायाधिश हे, त्यांच्या मायदेशाने सुचवलेले अधिकृत उमेदवार असतात. रिकाम्या जागांपेक्षा जास्त उमेदवार सुचवले गेल्यास, न्यायाधिशांची निवड युएनमधील सर्व देशांच्या मतदानाने होते.

२. ...नोव्हेंबर २०१७ मध्ये पुनर्नेमणूक

दलबिर भंडारी यांची इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमधील प्रथम नेमणूक २०१२ मध्ये झाली. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर, २०१७ मध्ये भारताने त्यांचे नाव परत सुचवले... अर्थातच, २०१७ मध्ये त्यांची पुनर्नेमणूक (पक्षी : परत एकदा नेमणूक) झाली..

रुस्तम's picture

28 Aug 2019 - 1:22 am | रुस्तम

तुम्ही वर चुकून २०१७ ऐवजी १९१७ लिहिलं आहे... 100 वर्षांचा फरक दुरुस्त करा. एवढंच..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 1:51 am | डॉ सुहास म्हात्रे

असे आहे होय ? अनेक धन्यवाद !

आधीच असे स्पष्ट लिहिले असतेत तर माझा गोंधळ/गैरसमज झाला नसता. :)

रुस्तम's picture

28 Aug 2019 - 6:31 pm | रुस्तम

या पुढे काळजी घेइन... धन्यवाद एक्का काका...

सुबोध खरे's picture

27 Aug 2019 - 11:23 am | सुबोध खरे

पण खाडी देशासाठी अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे की ज्याबद्दल त्यांना त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळावा?

https://www.business-standard.com/article/economy-policy/aramco-adnoc-in...

https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/abu-dhabi-o...

https://www.business-standard.com/article/news-ians/india-bullish-on-str...

खाडी देशांना आपले अतिरिक्त क्रूड ऑइल साठवण्यासाठी स्वतःच्या देशाबाहेर एखादी सुरक्षित जागा हवी होती. कारण देशांतर्गत उलथापालथ झाली/ राजगादी गेली किंवा युद्धमन स्थिती झाली तरी अशी ठेव ठेवणारा देश म्हणून भारत त्यांना सुरक्षित वाटतो त्यातून भारत रशिया अमेरिका चीन सारख्या दुसऱ्यांच्या उठाठेवी करीत नाही म्हणून भारताबरोबर मैत्री हवी असते.

खनिज तेलाचे साठे भविष्यात संपणार आहेत .
पृथ्वी वरील घडामोडी मुळे जे खनिज तेलाचे साठे भूगर्भात निर्माण झाले ती निर्मिती आता थांबली आहे .
आखाती देशांमध्ये सुद्धा ह्याची जाणीव आहे आणि त्या नुसार ते पुढे काय करायचे ह्या वर नक्कीच नियोजन करत असतील .
दुबई चे उदाहरण घेतले तर लक्षात येईल .
दुबई आता तेला च्या उत्पादनावर अवलंबून नाही .
आखाती deshani भारताला पाठिंबा देण्या मागे खूप कारण असू शकतात .
धार्मिक कट्टरवादी देशात शिरजोर झाले तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडतो ते वेगळं .
बाकी देश सुद्धा अशा देशांशी संबंध ठेवायला कचरतात ..
त्या मुळेच आखाती देश पाकिस्तान च्या जास्त जवळ जावू इच्छित नाहीत .
युरोपियन देशाशी मैत्री आणि भारता सारख्या देशाला न दुखावणे हेच त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य आहे

तुम्ही नक्की डु आयडी नाही ना? कधीकधी इतके सखोल बोलता की एखादी वर्षनुवर्षे अभ्यास करत असलेली अनुभवी व्यक्ती बोलते आहे असे वाटते
आणि कधी असले बाळबोध प्रश्न विचारता की तुमचा संगणक / मोबाइल फोडुन टाकावासा वाटतो.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Aug 2019 - 11:26 am | प्रकाश घाटपांडे

एकदा तुम्ही डू आयडी, मल्टिपल आयडी, बहुटोपणनावे अशा किंदम ऋषीप्रवृत्तीवर लिहा ना!

आनन्दा's picture

29 Aug 2019 - 3:37 pm | आनन्दा

अभ्यास कमी पडतो. नाहीतर लिहिलेच असते.

भारताच्या वतीने मोदींकडुनही इतर राष्ट्र प्रमुखांना दिल्लीत बोलवून पुरस्कार द्यावयास हवेत. त्या त्या नेत्यांचे चहाते प्रसन्न झाले तर परस्पर संबध मजबुत होण्यास हातभार लागतो.

मी पण माझ्या घरी कुणाला तरी बोलवून सत्कार करावयास हवा आहे. चला लागतो कामाला सत्काराच्या

( व्यक्ती पुजक नसल्याने असे काही लिहितो म्हणजे व्यक्ति द्वेष करतो असा नव्हे त्यामुळे ह. घ्या. हेवेसानल)

नेमका कशाने सत्कार करणार आहात?

सुबोध खरे's picture

27 Aug 2019 - 6:23 pm | सुबोध खरे

भारत सुद्धा असे पुरस्कार विविध लोकांना देत असतो त्यावर खोचक टिप्पणी अनावश्यक आहे असे वाटते.
एक उदा.
https://www.financialexpress.com/india-news/padma-awards-for-16-under-nr...

सुबोध खरे's picture

27 Aug 2019 - 6:28 pm | सुबोध खरे

श्री नेल्सन मंडेला आणि खान अब्दुल गफार खान याना भारतरत्न हा पुरस्कार दिल्याचे स्मरते.
इस्माईल कमर गिली या जिबूती च्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचा पदमविभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे.
He was awarded with the Padma Vibhushan, India's second highest civilian award on 25 January 2019 for his role in the safe evacuation of Indian citizens from Yemen.

सुबोध खरे's picture

27 Aug 2019 - 6:34 pm | सुबोध खरे

यात नॉर्मन बोरलॉग, होसई नोरोटा , जॉन गालब्रेथ, व्हॉल्टर सिसुलु , राजे जिग्मे वांगचुक इ महान लोकांना पण पदमविभूषण दिले गेलेले आहे

इस्माईल कमर गिली या जिबूती च्या राष्ट्राध्यक्षांना या वर्षीचा पदमविभूषण हा पुरस्कार दिला गेला आहे.

असे म्हणजे पॉलीटीकली महत्वाचे पुरस्कार अधिक प्रमाणात म्हणजे भारताला डिफेन्स उत्पादने विकली जावीत किंवा इतर निर्यात वाढावी म्हणून किंवा भारतीयांना काम करण्यासाठी व्हिसा दिल्यासाठी म्हणून (खोचक नव्हे शेवटी व्यवहार आहे ) पुरस्कार दिले पहीजेत .

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 1:26 am | डॉ सुहास म्हात्रे

किमानपक्षी...

(अ) राजकिय-आर्थिक-सामरिकरित्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या नेत्याला, व

(आ) ज्यांच्याशी आपले संबंध घनिष्ठ व्हावे असे प्रकर्षाने वाटत असलेल्या नेत्याला हे पुरस्कार दिले जातात,

(इ) आणि त्याचबरोबर, हे पुरस्कार सहज मजा म्हणून विनाकारण अजिबात कोणालाही दिले जात नाहीत,

(पक्षी : ज्या नेत्याशी संबंध उघडपणे घट्ट करण्यात जागतिक आणि/किंवा द्विपक्षिय स्तरावर मोठा फायदा आहे आणि ते संबध उघड केल्याने दुसरा कोणी देश/नेता नाराज होणार असेल तरी त्याची फिकीर करण्याची गरज नाही, याची खात्री करूनच हे पुरस्कार दिले जातात)

इतका साधा सोपा "लघुत्तम साधारण भाजक (lowest common denominator) अर्थ" ध्यानात आला तरी, या पुरस्कारांमुळे बनणारी आंतरराष्ट्रिय राजकारणातली समिकरणे उलगडायला मदत होते.

कौतुक आणि अभिमान (कि हुरळूनजाणे) हिंदी चिनी भाई भाई होणार नाही इतपतच करणे श्रेयस्कर असेल का? बेसिकली कौतुकाच्या भरात बेसावध होणार नाही या बद्दलचि दक्षता सदैव असावी असे माझे व्यक्तिगत मत.

दुसरे अजुन असे की व्यक्तीगत पातळीवरील मैत्री प्रदर्शन आणि गळाभेटीनेही बर्‍याच मंडळींना लगेच हुरळून जायला होते आहे असे दिसते, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळेच दिसते तसे असतेच असे नाही हे चिमुटभर मीठासोबत घेण्याची तयारी असलेले बरे असू शकेल का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 10:01 am | डॉ सुहास म्हात्रे

बापरे, किती ती काकदृष्टी ???! जणू, सगळ्याच सरकारांमधले सगळे अगदीच बुद्धीहीन/भ्रष्ट असतात !

गेल्या काही दशकांच्या अनुभवांवरून तसे वाटत असेल तर ते समजू शकतो... पण, तशी टीप्पणी आताच्या घडीला करण्याअगोदर सद्य स्थितीतील बदललेली समिकरणे ध्यानात घेतली असतीत तर, वेगळा मजकूर लिहिला असतात, आणि मग त्याला वजनही प्राप्त झाले असते. वडाची साल जबरदस्तीने पिंपळाला लावण्यार्‍या लेखकाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतात, इतकेच नोंदवू इच्छितो.

माहितगार's picture

28 Aug 2019 - 3:57 pm | माहितगार

:) अस्मादिकास लगेच खीस पाडण्याची घाई असण्याचे कारण नाही. तुर्तास केवळ रुमाल टाकून ठेवतो

जालिम लोशन's picture

27 Aug 2019 - 10:00 pm | जालिम लोशन

हेवेसानलगे.

मोदींना पुरस्कार मिळालाय याचं कौतुक आहेच.
पण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्यास बरंच काही समजून येतं. जसं -

- इराण बरोबर चा तेलाचा सौदा अमेरिकेच्या दबावामुळे बंद झालाय. त्यामुळे तेलाची आवक बाकी देशांकडून वाढवावी लागणार. इराण भारता च्या मुख्य पुरवठादारांपैकी एक होता हे विशेष.
- इराण आणि सौदी यांच्यात विस्तव जात नाही. इराणचे भारतातले मोठे मार्केट साधायची ही चांगली संधी आहे. किंबहुना या साठीच इराणचा सौदा बंद करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव बनवल्या गेला असल्यास नवल नाही.
- सौदी भारतात तेलाचे reservoirs बनवण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करणार होते असं ऐकून होतो. तो भाग आता प्रत्यक्षात येऊ शकतो.
- भारताला जर कमी किंमतीत तेल उपलब्ध होणार असेल तर भारत नाही कशाला म्हणणार?
-पाकिस्तानला भीक देण्यापेक्षा भारतात गुंतवणूक कधीही फायद्याची. त्यात पाकिस्तानला मदत म्हणजे पर्यायाने चीनला मदत असे असेल तर ते अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवते. सौदी बाकी काहीही करेल पण अमेरिकेच्या विरोधात फार काही करेल असे वाटत नाही.
- सौदी ला जवळ केल्याने पाकिस्तान ला मुस्लिम राष्ट्रांकडून मिळणारा फायदा चांगलाच कमी होईल, कारण हितसंबंधांचे सुकाणू भारताच्या दिशेनं फिरलंय. पाकिस्तानवर आणि पर्यायाने चीनवर सुद्धा यामुळे दबाव वाढवता येतो.
.
.
.
असो. भरपूर आहे लिहिण्यासारखं.

माहितगार's picture

28 Aug 2019 - 4:02 pm | माहितगार

...कारण हितसंबंधांचे सुकाणू भारताच्या दिशेनं फिरलंय….

धीर धरलेला बरा - माझे मत

...कारण हितसंबंधांचे सुकाणू ….

धीर धरलेला बरा - माझे मत

***
@ मिपा मालक

वरचा प्रतिसाद प्रतिसादातील उर्वरीत वाक्य गिळून का प्रकाशित झाला ते उमगले नाही काही तांत्रिक समस्या असावी असे दिसते.

उपेक्षित's picture

28 Aug 2019 - 8:21 pm | उपेक्षित

आता या सर्व पुरस्कारांमागचा मला उलगडलेला स्पष्ट अर्थ सांगतो,

मोदी आणि शहा हि जोडगोळी स्वकेंद्रित आणि स्वप्रेमी आहे त्यामुळे यांना खुश करायचा हा एक सोप्पा मार्ग आहे. त्यामुळे बहुतेक आखाती देशांनी हा सोप्पा मार्ग अवलंबलेला आहे.
असो उगाच नसलेले अर्थ शोधात बसत काही काही भक्त मेगाबायटी प्रतिसाद रचत आहेत ते पाहून गम्मत वाटत आहे.

अजून एक गोष्ट हे भक्त लोक गेले कित्येक दिवस अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडालाय / देशात असलेले मंदीचे वातावरण यावर सोयीस्कर मौन अल्गुन असतात त्यामुळे हल्ली मिपाववर पूर्वीचे क्लिंटन सारखे निष्पक्ष विवेचन वाचायला मिळताच नाही.
हल्ली कस कारण जोहरच्या पिक्चर प्रमाणे देशात सगळ गुडी गुडी चालू आहे असे इथले काही ID अजेंडा असल्यासारखे दर्शवित आहेत.

नाही तर, ?

मारवा's picture

28 Aug 2019 - 10:32 pm | मारवा

शब्दकोशात दिलेला या शब्दाचा अर्थ खालील प्रमाणे आहे.
Praise Singer =
​(in traditional African society) a person who writes and performs music and poetry
in order to praise a chief or other important person
Traditionally, a praise singer accompanies the chief on important occasions.
या व्याख्येला शब्दशः जागणार्‍या लीव्हींग लीजंड साउथ अफ्रिकेच्या Jessica Mbangeni या स्तुती गायिकेने मोदीजींच जे अभुतपुर्व / दमदार / जोशपुर्ण / जल्लोषपुर्ण /आक्रमक / भावनिक/ उत्कट / चिवट/ स्वागत केलं होतं त्यामुळे मी त्यांचा कायमचा फॅन झालो. हे त्यांच स्वागत स्तुती अनुभवुन
क्षणभर
मोदीजी स्वतःही
स्तिमित झाले होते किंचीत गांगरले की काय अशी शंका देखील उगीचच मनाला चाटुन जाते.
आजही तो स्वागताचा व्हिडियो पाहीला की अंगावर रोमांच येतात.
वाटतं की बस बस
भिरकावुन द्याव सर्व काही
हॅट्स ऑफ टु जेसीका !!!
फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट
हा घ्या व्हिडीयो
https://www.youtube.com/watch?v=GN6d5dg7Ubo

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2019 - 11:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

हल्ली तुमचा आवडता नेता त्याच्याच पाठिराख्यांची सतत गोची करत असल्याने, तुमची सततची जळजळ आणि ओढून ताणून केलेला उपरोध, दोन्हीही अगदीच समजून घेण्याजोगे आहेत. आताही त्याने केलेल्या फियास्कोचे डॅमेज कंट्रोल चालू आहेच.

त्यानेही एकदा तरी, काहीतरी उत्तम करावे आणि त्याच्यावरही एखादा तरी लेख लिहावा, ही आमची इच्छा पुरी करावी, असे खुद्द त्यालाच वाटत नाही, त्याला आम्ही काय करणार बरे ?

त्यामुळे सद्यातरी, आमच्या सद्भावना आणि शुभेच्छा व्यक्त करणेच केवळ आमच्या हाती आहे !

एकंदरीत, आतापर्यंत तुम्ही काही मुद्देसूद वाद-प्रतिवाद लिहिलेला नसला तरी, मिपाकरांचे मनोरंजन मात्र उत्तम चालवले आहे. हाती बरे मुद्दे नसले की असे काहीबाही सुचते. पण, मिपाकरांच्या चेहर्‍यावर हलकेफुलके स्मितहास्य उमलवणे हे सुद्धा उत्तम काम आहे. त्यासाठी धन्यवाद ! :)

सुबोध खरे's picture

29 Aug 2019 - 9:40 am | सुबोध खरे

डॉक्टर साहेब,
कुठे प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद करायला लागलाय?

मोदी आवडत नाही पण त्यांना पर्याय शोधायला गेले तर पहिले पर्याय श्री राहुल गांधी ते सतत सेल्फ गोल मारत असल्याने त्यांना स्ट्रायकर म्हणून घेणे अशक्य झाले आहे.

दुसरा पर्याय श्री केजरीवाल. हे सध्या १००० रुपयाच्या नोटे सारखे चलनातून बाद झालेले आहेत.

तिसरे राहिले ते महाठगबंधन त्यात एक ना धड भाराभर चिंध्या.

यामुळे विरोधकांची स्थिती ( यात मिपाधुरीण हि येतात)हि सध्या च्या आय एल एफ एस मध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांसारखी झाली आहे.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचलेल्या पक्षांची तळी उचलायची तर जनात हसं होईल हि भीती.

आणि आता टोपी फिरवून मोदींची स्तुती केली तरी तीच स्थिती.

मग काहीही करून श्री मोदी कसे चूक आणि आम्ही कसे पुरोगामी तटस्थ आणि प्रगतिशील हे दाखवायचा आटा पिटा चालू आहे.

बहुसंख्य पुरोगामी डावे तटस्थ घेत असलेले मुद्दे च्युईंग गम सारखे निघतात.

निश्चलनीकरण झालं,रफाल झालं, इ व्ही एम झालं, जि एस टी वर तोंडघशी पडून झालं.

सध्याचा त्यांचा रवंथ करायचा मुद्दा रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकार घेत असलेले पैसे आहेत. ते चावून चोथा झाला कि नवीन काहीतरी घेणार.

कितीही चावलं तरी पोट भरत नाही/ पोटात काहीच जात नाही आणि काही वेळाने तोंडात स्वादही राहत नाही. मग नवीन च्यूईंग गम

चालू द्या त्यांचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2019 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसं जुगाड जमवतो हा माणूस खूप आश्चर्य वाटतं.

अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

उपेक्षित's picture

29 Aug 2019 - 1:14 pm | उपेक्षित

आश्चर्य काही नाही बिरुटे सर कारण इथल्याप्रमाणेच बाहेरही त्यांचे भक्तगण आहे म्हटल ;)
मी तर ऐकलय इथले काही भक्तगण आता आरती पण रचणार आहेत आपल्या सर्वगुण संपन्न मोदींवर. :P

खरं आहे बुवा. आम्ही आरत्या रचायला पण कमी करत नाही.
ममो एक मध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेने उच्चांकी दर गाठला तेव्हा आम्ही ममोंची आणि रेल्वे फायद्यात आली तेव्हा आम्ही लालूंची आरती रचायला पण कमी केले नव्हते, पण काळाच्या ओघात त्या दोन्ही फसव्या क्लृप्त्या असल्याचे लक्ष्यात आले आणि आम्ही नवीन देव शोधला.
सध्या तरी आमचा देव आम्हाला हवा तसा प्रसाद देतोय. प्रसाद यायचा थांबला तर मग बघु.. सध्या कौतुक करण्यात काटकसर कशाला?

जालिम लोशन's picture

29 Aug 2019 - 3:48 pm | जालिम लोशन

येवढे साधे कळत नाही? बहुतेक डोळ्यावरची पट्टी काढावी लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2019 - 3:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरं आहे. उगाच परदेशात जाऊन त्यांना पुरस्कार देण्यासाठी तयार करण्यापेक्षा आजून भारी पण सोपी आयडीया या भाजपेयी लोकांना का बरे सुचत नाही... परक्यांनी आपल्याला पुरस्कार वैग्रे देण्याची गरजच काय. आणि आयडियाची कल्पना पण सुचण्याची गरजच काय... त्या आयडियाची शेकड्यांनी उदाहरणे देशभर विखुरलेली आहेत. तो उच्छाद पाहिला तर, खुद्द अंधभक्तांनाच प्रचंड घेरी येईल. ;)

काही निवडक उदाहरणे खाली पहा...

संवैधानिक सूचना : खालील मजकूर वाचताना कुठल्यातरी मजबूत वस्तूला घट्ट पकडून बसा. वाचताना घेरी येऊन पडून काही इजा झाल्यास आम्ही जबाबदार नाही.

List of things named after Jawaharlal Nehru

From Wikipedia, the free encyclopedia
This is a list of things named after Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of Nehru–Gandhi family.[1]

Awards
• Jawaharlal Nehru Award
• Jawaharlal Nehru Fellowship

Educational institutions
• Jawahar Bal Bhavan Thrissur, Kerala
• Jawahar Bharati College, Kavali, Andhra Pradesh
• Jawaharlal Nehru Engineering College, Aurangabad, Maharashtra
• Jawaharlal Nehru Government Engineering College, Sunder Nagar, Himachal Pradesh
• Jawaharlal Nehru Krishi Vishwa Vidyalaya, Jabalpur, Madhya Pradesh
• Jawaharlal Nehru Medical College, Ajmer
• Jawaharlal Nehru Medical College, Aligarh
• Jawaharlal Nehru Medical College, Belgaum
• Jawaharlal Nehru Medical College, Bhagalpur
• Jawaharlal Nehru National College of Engineering, Shimoga, Karnataka
• Jawaharlal Nehru Rajkeeya Mahavidyalaya, Port Blair
• Jawaharlal Nehru Technological University, Anantapur, Andhra Pradesh
• Jawaharlal Nehru Technological University, Hyderabad, Telangana
• Jawaharlal Nehru Technological University, Kakinada, Andhra Pradesh
• Jawaharlal Nehru University, New Delhi
• Nehru Arts, Science and Commerce College, Hubli, Karnataka
• Nehru Memorial College, Puthanampatti, Tiruchirappalli, Tamil Nadu
• Nehru Memorial College, Sullia, Karnataka
• Pt. Jawahar Lal Nehru Memorial Medical College, Raipur, Chhattisgarh
• Pt. Jawaharlal Nehru Institute of Business Management, Ujjain, Madhya Pradesh
• Shri Nehru Maha Vidyalaya College of Arts & Sciences, Coimbatore, Tamil Nadu

Jawahar Navodaya Vidyalayas
• Jawahar Navodaya Vidyalaya, Ahmednagar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Alappuzha
• Jawahar Navodaya Vidyalaya, Alipurduar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Amroha
• Jawahar Navodaya Vidyalaya, Ashok Nagar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Bagudi
• Jawahar Navodaya Vidyalaya Bahraich
• Jawahar Navodaya Vidyalaya, Ballia
• Jawahar Navodaya Vidyalaya, Bankura
• Jawahar Navodaya Vidyalaya, Barabanki
• Jawahar Navodaya Vidyalaya, Basdei
• Jawahar Navodaya Vidyalaya, Belpada
• Jawahar Navodaya Vidyalaya, Bhogaon
• Jawahar Navodaya Vidyalaya, Bilaspur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Birbhum
• Jawahar Navodaya Vidyalaya, Bohani
• Jawahar Navodaya Vidyalaya Canacona
• Jawahar Navodaya Vidyalaya, Car Nicobar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Churu
• Jawahar Navodaya Vidyalaya, Chamba
• Jawahar Navodaya Vidyalaya, Chamoli
• Jawahar Navodaya Vidyalaya, Champhai
• Jawahar Navodaya Vidyalaya, Chandigarh
• Jawahar Navodaya Vidyalaya, Chendayadu
• Jawahar Navodaya Vidyalaya, Cooch Behar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Daman
• Jawahar Navodaya Vidyalaya, Dakshin Dinajpur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Dhalai Tripura
• Jawahar Navodaya Vidyalaya, Deoghar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Diu
• Jawahar Navodaya Vidyalaya, Doda
• Jawahar Navodaya Vidyalaya, Durgapur
• Jawahar Navodaya Vidyalaya, East Sikkim
• Jawahar Navodaya Vidyalaya, Ernakulam
• Jawahar Navodaya Vidyalaya, Gajanur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Golaghat
• Jawahar Navodaya Vidyalaya, Gomati
• Jawahar Navodaya Vidyalaya, Hamirpur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Hooghly
• Jawahar Navodaya Vidyalaya, Idukki
• Jawahar Navodaya Vidyalaya, Indore
• Jawahar Navodaya Vidyalaya, Jaffarpur Kalan
• Jawahar Navodaya Vidyalaya, Jaswantpura
• Jawahar Navodaya Vidyalaya, Jojawar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Jorhat
• Jawahar Navodaya Vidyalaya Kanpur
• Jawahar Navodaya Vidyalaya Kanpur Dehat
• Jawahar Navodaya Vidyalaya, Karaikal
• Jawahar Navodaya Vidyalaya, Karauli
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kangra
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kasaragod
• Jawahar Navodaya Vidyalaya, Khowai
• Jawahar Navodaya Vidyalaya, Khurai
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kinnaur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kodagu
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kollam
• Jawahar Navodaya Vidyalaya, Korba
• Jawahar Navodaya Vidyalaya, Korlahalli
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kothali
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kothipura Bilaspur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kottayam
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kozhikode
• Jawahar Navodaya Vidyalaya, Kullu
• Jawahar Navodaya Vidyalaya, Lahaul and Spiti
• Jawahar Navodaya Vidyalaya, Madhubani
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mahe
• Jawahar Navodaya Vidyalaya, Malappuram
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mandaphia
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mandi
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mandya
• Jawahar Navodaya Vidyalaya, Megdong
• Jawahar Navodaya Vidyalaya, Middle Andaman
• Jawahar Navodaya Vidyalaya, Minicoy
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mirzapur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mokokchung
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mothuka, Faridabad
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mundali
• Jawahar Navodaya Vidyalaya, Mungeshpur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Narla
• Jawahar Navodaya Vidyalaya Nizamasagar
• Jawahar Navodaya Vidyalaya, North 24 Parganas
• Jawahar Navodaya Vidyalaya, North Goa
• Jawahar Navodaya Vidyalaya, North Sikkim
• Jawahar Navodaya Vidyalaya, North Tripura
• Jawahar Navodaya Vidyalaya, Pailapool
• Jawahar Navodaya Vidyalaya, Palakkad
• Jawahar Navodaya Vidyalaya, Paota, Jaipur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Panchavati
• Jawahar Navodaya Vidyalaya, Patan
• Jawahar Navodaya Vidyalaya, Patiala
• Jawahar Navodaya Vidyalaya, Pathanamthitta
• Jawahar Navodaya Vidyalaya, Peddapuram
• Jawahar Navodaya Vidyalaya, Pfukhro Mao
• Jawahar Navodaya Vidyalaya, Porbandar
• Jawahar Navodaya Vidyalaya, Prakasam
• Jawahar Navodaya Vidyalaya, Puducherry
• Jawahar Navodaya Vidyalaya, Raichur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Rampura
• Jawahar Navodaya Vidyalaya, Rayagada
• Jawahar Navodaya Vidyalaya, Sahibganj
• Jawahar Navodaya Vidyalaya, Shyampur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Silvassa
• Jawahar Navodaya Vidyalaya, Sirmaur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Sitapur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Solan
• Jawahar Navodaya Vidyalaya, South 24 Parganas
• Jawahar Navodaya Vidyalaya, South Andaman
• Jawahar Navodaya Vidyalaya, South Garo Hills
• Jawahar Navodaya Vidyalaya, South Sikkim
• Jawahar Navodaya Vidyalaya, Theog
• Jawahar Navodaya Vidyalaya, Thiruvananthapuram
• Jawahar Navodaya Vidyalaya, Thrissur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Una
• Jawahar Navodaya Vidyalaya, Uttar Dinajpur
• Jawahar Navodaya Vidyalaya, Valasapalle
• Jawahar Navodaya Vidyalaya, Veleru
• Jawahar Navodaya Vidyalaya, Wayanad
• Jawahar Navodaya Vidyalaya, West Champaran
• Jawahar Navodaya Vidyalaya, West Sikkim
• Jawahar Navodaya Vidyalaya, Yanam

Museums
• Jawaharlal Nehru Museum, Itanagar
• Nehru Memorial Museum & Library
• Nehru Museum of Science and Technology

Ports
• Jawaharlal Nehru Port

Parks and gardens
• Jawaharlal Nehru Memorial Botanical Garden
• Jawaharlal Nehru Tropical Botanic Garden and Research Institute
• Nehru Park, Burnpur
• Nehru Park, Delhi
• Nehru Park, Thrissur
• Nehru Zoological Park

Schemes
• Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission

Sports
• Nehru Cup (cricket)
• Nehru Cup (football)
• Nehru Trophy Boat Race

Stadiums
• Jawaharlal Nehru Stadium (Chennai)
• Jawaharlal Nehru Stadium (Coimbatore)
• Jawaharlal Nehru Stadium (Delhi)
• Jawaharlal Nehru Stadium (Kochi)
• Jawaharlal Nehru Stadium (Shillong)
• Jawaharlal Nehru Stadium, Ghaziabad
• Jawaharlal Nehru Stadium, Tiruchirappalli
• Nehru Smarak Stadium
• Nehru Stadium, Durgapur
• Nehru Stadium, Guwahati
• Nehru Stadium, Hubli
• Nehru Stadium, Indore
• Nehru Stadium, Kottayam
• Nehru Stadium, Pune
• Nehru Stadium, Shimoga
• Nehru Stadium, Tumkur

Others
• Jawahar Chowk
• Jawahar Circle
• Jawahar Dweep
• Jawahar Kala Kendra
• Jawahar LPS kurakkodu
• Jawahar Planetarium
• Jawahar Sagar Dam
• Jawahar Setu
• Jawahar Tunnel
• Jawaharlal Nehru Road, Kolkata (Chowringhee Road)
• Jawaharnagar (Gujarat Refinery)
• Nehru Brigade
• Nehru jacket
• Nehru Foundation for Development
• Nehru Nagar
• Nehru Place
• Nehru Planetarium
• Nehru Science Centre
• Nehru Setu
• Pandit Nehru bus station

List of things named after Indira Gandhi

From Wikipedia, the free encyclopedia
The following things have been named after Indira Gandhi, who was Prime Minister of India from 1966–1977 and from 1980 until her assassination in 1984. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of Nehru–Gandhi family.[1]

Awards, prizes, and competitions
Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director
Indira Gandhi Award for National Integration
Indira Gandhi Boat Race
Indira Gandhi Paryavaran Puraskar[citation needed]
Indira Gandhi Prize

Event venues
Indira Gandhi Arena
Indira Gandhi Athletic Stadium
Indira Gandhi National Centre for the Arts
Indira Gandhi Stadium, Alwar
Indira Gandhi Stadium, Solapur
Indira Gandhi Stadium (Una)
Indira Gandhi Stadium, Vijayawada
Indira Priyadarshini Stadium

Hospitals
Indira Gandhi Childrens Hospital
Indira Gandhi Co-operative Hospital
Indira Gandhi Institute of Medical Sciences
Indira Gandhi Medical College
Indira Gandhi Memorial Hospital
North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health and Medical Sciences

Government programmes
Indira Gandhi National Old Age Pension Scheme
Indira Canteens
Museums and parks
Indira Gandhi Planetarium
Indira Gandhi Rashtriya Manav Sangrahalaya
Indira Gandhi Wildlife Sanctuary
Indira Gandhi Wildlife Sanctuary and National Park
Indira Gandhi Zoological Park
Transport infrastructure
Indira Gandhi Canal
Indira Gandhi International Airport

Universities, colleges, and research institutes
Indira Gandhi Agricultural University
Indira Gandhi Centre for Atomic Research
Indira Gandhi Institute of Developmental Research
Indira Gandhi Institute of Medical Sciences
Indira Gandhi Institute of Technology (Delhi)
Indira Gandhi Institute of Technology (Orissa)
Indira Gandhi Medical College
Indira Gandhi National Forest Academy
Indira Gandhi National Open University
Indira Gandhi Rashtriya Akademi
Indira Gandhi Institute of Physical Education and Sports Sciences (University Of Delhi)[2]
North Eastern Indira Gandhi Regional Institute of Health and Medical Sciences
Gandhi Memorial International School

List of things named after Rajiv Gandhi

From Wikipedia, the free encyclopedia
The following things have been named after Rajiv Gandhi, who was the Prime Minister of India from 1984 to 1989. A Right to Information query raised in 2013 was answered saying that over 450 schemes, building, projects, institutions, etc. were named after the three family members (Jawaharlal Nehru, Indira Gandhi and Rajiv Gandhi) of the Nehru–Gandhi family.[1]

Airports
• Rajiv Gandhi International Airport at Hyderabad, Telangana.[2]

Awards
• Rajiv Gandhi National Quality Award
• Rajiv Gandhi National Sadbhavana Award

Educational Institutions
• Assam Rajiv Gandhi University of Cooperative Management, Sivsagar, Assam
• Govind Guru Tribal University, (formerly Rajiv Gandhi Tribal University), Banswara, Rajasthan
• Indian Institute of Management Shillong, (formerly Rajiv Gandhi Indian Institute of Management) Shillong, Meghalaya
• Rajeev Gandhi Memorial Boarding School, Sheopur, Madhya Pradesh
• Rajiv Gandhi Academy for Aviation Technology, Trivandrum, Kerala[3]
• Rajiv Gandhi Centre for Biotechnology, Thiruvananthapuram, Kerala.
• Rajiv Gandhi College of Engineering, Sriperumbudur, Tamil Nadu
• Rajiv Gandhi College of Engineering and Technology, Puducherry
• Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology, Chandrapur, Maharashtra
• Rajiv Gandhi College of Veterinary and Animal Sciences, Puducherry
• Rajiv Gandhi Degree College, Rajahmundry, Andhra Pradesh
• Rajiv Gandhi Education City, Sonipat, Haryana
• Rajiv Gandhi Foundation, Delhi
• Rajiv Gandhi Government Engineering College Kangra, Himachal Pradesh
• Rajiv Gandhi Government Polytechnic, Itanagar, Arunachal Pradesh
• Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Adilabad, Telengana
• Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Ongole, Andhra Pradesh
• Rajiv Gandhi Institute of Medical Sciences, Srikakulam, Andhra Pradesh
• Rajiv Gandhi Institute of Petroleum Technology, Rae Bareli, Uttar Pradesh.[4]
• Rajiv Gandhi Institute of Pharmacy, Trikaripur, Kerala
• Rajiv Gandhi Institute of Technology, Kottayam, Kerala[5]
• Rajiv Gandhi Institute of Technology, Mumbai, Maharashtra
• Rajiv Gandhi Medical College, Kalwa, Maharashtra
• Rajiv Gandhi National Aviation University, Amethi, Uttar Pradesh
• Rajiv Gandhi National Cyber Law Center, Delhi
• Rajiv Gandhi National University of Law, Patiala, Punjab[6]
• Rajiv Gandhi Polytechnic, Kavalkhed, Udgir, Maharashtra
• Rajiv Gandhi Proudyogiki Vishwavidyalaya, Bhopal, Madhya Pradesh
• Rajiv Gandhi School of Intellectual Property Law, Kharagpur
• Rajiv Gandhi Technical University, at Bhopal, Madhya Pradesh.[7]
• Rajiv Gandhi University, Doimukh, Arunachal Pradesh.[8]
• Rajiv Gandhi University of Health Sciences, Bangalore, Karnataka.
• Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Basar, Telangana
• Rajiv Gandhi University of Knowledge Technologies, Nuzvid, Andhra Pradesh

Hospitals
• Rajiv Gandhi Cancer Institute and Research Centre, Delhi
• Rajiv Gandhi Government General Hospital, at Chennai, Tamil Nadu.[9][10][11]
• Rajiv Gandhi Government Women And Children's Hospital, Pondicherry
• Rajiv Gandhi Chest Hospital, Bengaluru

Museums and parks
• Nagarhole National Park (Rajiv Gandhi National Park), Kodagu and Mysore districts, Karnataka
• Rajiv Gandhi Garden, Udaipur, Rajasthan
• Rajiv Gandhi Regional Museum of Natural History, Sawai Madhopur, Rajasthan
• Rajiv Smruthi Bhavan, Visakhapatnam

Schemes
• Rajiv Gandhi Equity Savings Scheme
• Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana
• Rajiv Gandhi Mahila Vikas Pariyojana
• Rajiv Yuva Kiranalu
• Rajiv Gandhi Panchayat Sashaktikaran Abhiyan
• Rajiv Gandhi Grameen Vidyutikaran Yojana

Sports
• Rajiv Gandhi Khel Ratna

Stadiums
• Rajiv Gandhi Government Polytechnic, Kochi, Kerala
• Rajiv Gandhi International Cricket Stadium, Dehradun, Uttarakhand.
• Rajiv Gandhi International Cricket Stadium, Hyderabad, Telangana.[12]
• Rajiv Gandhi Sports Complex, Rohtak, Haryana
• Rajiv Gandhi Stadium, Aizawl, Mizoram.[13]

Others
• Rajiv Chowk metro station, Delhi
• Rajiv Gandhi Charitable Trust, Delhi
• Rajiv Gandhi Container Terminal, at Kochi, Kerala.[14]
• Rajiv Gandhi Bhawan, Delhi
• Rajiv Gandhi Combined Cycle Power Project, at Alappuzha district, Kerala.[15]
• Rajiv Gandhi Container Terminal, at Kochi, Kerala.[16]
• Rajiv Gandhi Infotech Park, Pune, Maharashtra
• Rajiv Gandhi National Institute of Youth Development, Delhi
• Rajiv Gandhi Memorial, Sriperumbudur, Tamil Nadu
• Rajiv Gandhi Salai, Chennai
• Rajiv Gandhi Setu, Mumbai
• Rajiv Gandhi Thermal Power Station

(कोण म्हणतोय रे ही मंदभक्तांनी केलेली चाटूगिरी म्हणून ? पण, आमी अजाबात नाय म्हन्नार तसं बरंका.)

यात अजून काही नावे अनावधाने राहिली असतीलच, यात शंका नाही. अंधभक्तांनी भर घालून यादी पूर्ण करावी. :)

भंकस बाबा's picture

29 Aug 2019 - 5:55 pm | भंकस बाबा

डायरेक्ट कासोटयाला हात घातलात तुम्ही सुहासजी!
निषेध, निषेध, त्रिवार निषेध सुहासजी तुमच्या अशा वागण्याचे! अशाने तुम्ही विरोधक ही जमात नष्ट करत आहात!
किती आठवतात ते मोगा खान , तर्राट जोकर