चार आण्याचा प्रसाद
देवाजीच्या दारात अन्
डोंगराएव्हढ्या कामना
भक्ताच्या मनात.
******************************
सगळ्यांच्याच जीवनाच एक
सामाईक धोरण
आयुष्याची दोन टोकं
जिवण आणि मरण.
******************************
साव कुनाला म्हणावं,
सगळेच हात बरबटलेले
साधु-संताचे मठही एथं
गुन्हेगारीत गुरफटलेले.
******************************
अशीच तु मला एकदा
उदास्-उदास दिसलीस
तेव्हा पासुन मला तु
माझ्यासारखीच भासलीस.
*******************************
आजकालचे प्रेमविवाह
चार दिवसात विटतात
त्याच्या तिच्या मनामध्ये
तिचे त्याचे दोष साठतात.
*******************************
भीती नावाची हडळ एक
आपल्याच मनात असते
रस्त्याकडेच झाडही तिला
भुतासारखे दिसते.
******************************
प्रतिक्रिया
6 Aug 2014 - 9:10 am | मनीषा
छान आहेत चरोळ्या
6 Aug 2014 - 9:27 am | कविता१९७८
मस्तच