अन्नपुर्णा

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
27 Mar 2013 - 2:37 pm

अन्नपुर्णा

आपल्या येथे भक्त व देव यांचे एक अतूट नाते आहे. देव आपला माय-बाप असतो, बंधु-भगिनी आणि सखा-शेजारीही असतो, आपल्यातलाच एक असतो. आता शेजारी म्हटले की आपण शेजारच्या घरांत चाललेले नवरा-बायको यांचे तंटे-बघेडे जेवढ्या चवीने ऐकतो व इतरांना रसभरीत भाषेत, थोडा पदरचा मसाला घालून, सांगतो, तेचढ्याच तन्मयतेने कवींनी देवांच्या घरी चाललेली भांडणे रंगविली आहेत. आता घरांत लक्ष्मीची चणचण असेल तर भांड्याला भांडे जास्त वेळेला लागणार व आवाजही मोठा होणार हे ओघानेच आले. एकदा काय झाले

आता शंकर हा "विश्वनाथ", विश्वाचा अधिपती, पण यांनी त्याच्या हातात दिले काय तर भिक्षापात्र ! " जा, चार घरांत जाऊन भिक्षा माग, मिळेल काय ते घरी आण, मगच जेवण !" बिचारा हिंडायचा खरा, पण रोज मिळेलच याची खात्री काय ? एक दिवस हात हलवत घरी आले व पार्वतीला म्हणाले " मला तर काय मिळाले नाही, आज तू जा व बघ काही सोय होते कां." घरांत काहीच नाही म्हटल्यावर चरफडत का होईना पार्वती बाहेर पडली, जगन्माता घरी आली म्हणून लोकांनी भरभरून दिले. पोटभरून खावयाला मिळाले म्हटल्यावर खुष होऊन शंकर म्हणाले, " देवी, तू खरी "अन्नपूर्णा" ". आता मात्र पार्वती भडकली. आधीच लोकांकडे जाऊन पदर पसरावा लागला म्हणून अपमान झाला असे वाटणाया प्रजापतीदुहितेला संताप आवरेना. ती जरा तडकलीच व रागाने, थोड्या तिरस्कारानेच म्हणाली

रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्ला
रामाद्याचय् मेदिनीं धनपतेर्बीजं बलाल्लाङ्गलं
प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभ:फालं त्रिशुलं तव !
शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोस्तिगोरक्षणे,
खिन्नाहं हर भिक्षया कुरू कृषिं गौरीवच: पातु व: !
( रामात्. ..परशुराम, मेदिनी ..पृथ्वी, धनपती ..कुबेर, बालाल्लाङ्गलं .. बलरामाकडून् नान्गर, प्रेतेश् .. यम
फालं ..नान्गराचा फाळ, गोरक्षणे .. गाय-रेडा राखावयाला, स्कन्द् ...कार्तिकस्वामी, पातु व: जगाचे कल्य़ाण करो.)

या जगताच्या मातापित्यांचे गीर्वाणभारतीतील संभाषण जरा मराठीत बघू.
गौरी म्हणते, " देवा, या भीक मांगण्याचा खरचं कंटाळा आला आहे. थोडी शेती कां करत नाही ?" आता बायकोने कुठलेही काम सांगितले की नवरा ते टाळण्याकरित सबबी शोधतोच. शंकर म्हणतो, " बाई, तू म्हणतेस ते ठीक माहे पण माझ्याकडे जमीन कुठे आहे ?" गौरी म्हणते " तो परशुराम, तुमचा शिष्य, तर सगळी पृथ्वीच वाटावयास निघाला आहे, मागवा त्याच्याकडून ".( क्षत्रिय संहारानंतर परशुरामाने सगळ्या पृथ्वीचे दान केले होते) "अग, पण बियाणे ? " शंकराचा प्रश्न. शेतकरी सावकाराकडून बियाणे उसने आणतो, ते लक्षात ठेऊन गौरी म्हणते " आणा कुबेरा (जगाचा सावकार)कडून " "आणि नांगराचे विचारू नका, बलरामाकडून मिळेल." पुढच्या प्रश्नाचे उत्तर आधीच. "पण माझ्याकडे तर एकच बैल आहे ". "मग ? यम देईल की त्याचा रेडा नांगरणीपुरता." आणि हां, फाळाचे विचारू नका, तो काय तेथे त्रिशुल पडलाय !"

शंकराला काळजी आपल्या न्याहरीची, गौरी म्हणते, " मी आणीन बांधून". आता प्रश्न न्याहरीच्या वेळी बैल-रेड्याकडे कोणी लक्ष द्यावयाचे. गौरी म्हणते, "तो रिकामटेकडा कार्तिकेय, त्याला काय उद्योग आहे, बघेल त्यांच्याकडे."
असा गौरी-शंकराचा॒ संवाद जगाचे कल्याण करो.

मित्रहो, " नवरा काय प्रश्न विचारणार व त्याचे उत्तर काय " हे बायकांना आधीच कसे माहित असते या तुम्हाला नेहमी सतावणार्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले ? आदीमातेने ते बाळकडून आपल्या सगळ्या लेकींना जन्मजातच पाजलेले असते !

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2013 - 2:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, संवाद आवडला.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 2:44 pm | नाना चेंगट

समस्त नवर्‍यांवर डाफरण्याची शिकवण देणार्‍या आदिमायेचा निषेध ! :)

सस्नेह's picture

27 Mar 2013 - 4:27 pm | सस्नेह

आणि समस्त नवर्‍यांना आळशीपणाची संथा देणार्‍या शिवशंभूंचे काय ?

नाना चेंगट's picture

27 Mar 2013 - 10:17 pm | नाना चेंगट
ऋषिकेश's picture

27 Mar 2013 - 3:00 pm | ऋषिकेश

ठ्ठो!ऽऽऽ

वा अमीट गोडी असलेला लेख. खूप सुंदर.

अभ्या..'s picture

27 Mar 2013 - 4:32 pm | अभ्या..

ब्येस्ट :)

धन्या's picture

27 Mar 2013 - 4:38 pm | धन्या

संवाद छानच आहे.

देवांना माणसानेच निर्मिले आणि मग माणसांचेच गुणावगुण त्यांना चिकटवले याचा हा पुरावा.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Mar 2013 - 8:09 am | अत्रुप्त आत्मा

+१

बाकि वाचताना लै मज्जा आली... http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/wave.gif

सव्यसाची's picture

27 Mar 2013 - 6:23 pm | सव्यसाची

छान संवाद आहे. आवडला :)

प्रचेतस's picture

27 Mar 2013 - 6:35 pm | प्रचेतस

लै भारी.
मजा आली वाचून.

पैसा's picture

27 Mar 2013 - 6:44 pm | पैसा

मस्त संवाद आहे. देवांना मानवी गुण अवगुण लावून लिहिलेले असे खूप मजेचे संवाद आहेत. आणखी येऊ द्या.

स्पंदना's picture

28 Mar 2013 - 5:35 am | स्पंदना

एक फार मोठा बदल म्हणजे बदललेली भाषा. इतकी खेळीमेळीची इतकी छान की बस!
सर तुम्हाला ९८/१०० भाषेसाठी.
लेख आतिशय आवडला. देव झाला तरी काय झाल? जरा शरीराला कष्ट पडले तर काय बिघडल नाही का?
का सगळ्यांनीच राहुल गांधीचा मार्ग धरायचा नाही का?

जेनी...'s picture

31 Mar 2013 - 9:30 am | जेनी...

भारी वाटलं लेखन एकदम ...
शरद मस्तच ....

श्रिया's picture

31 Mar 2013 - 10:53 am | श्रिया

मस्त आणि मजेदार.

व्वा शरदकाका, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी गोष्ट एकदम मस्त सांगितलीत.

झक्कास!

इन्दुसुता's picture

1 Apr 2013 - 8:30 am | इन्दुसुता

शरद, लेख आवडला.
पण मी म्हणत्ये आदिमायेने सौम्य भाषा वापरलीन बरीक !! ( नाही म्हणजे काये की मला संस्कृत समजत नाही म्हणून तसं वाटलं ). तस्मात् आदिमायेचा मिपाप्रथेनुसार निषेढ ! :)