श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत:
कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण.
डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com
http://drsanjayhonkalse.tripod.com
श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते. श्री शंकर भट्ट ,जे या चारीत्रामृताचे लेखक होते ते कुरवपुरी श्रीपादांच्या जलसमाधी पर्यंत त्यांच्या बरोबर होते जलसमाधी नंतर श्रीपाद गुप्त होऊन अनंत कोटी ब्रह्मांडात असलेल्या अणु रेणूंमध्ये एकरूप झाले व सर्वान्तर्यामी झाले.
त्यानंतर त्यांनी दिलेल्या पादुका विधीपूर्वक स्थापित करून आपण लिहिलेले श्रीपाद चरित्र शंकर भट्ट यांनी श्रीपादांच्या आजोळी समर्पित केले.
दुसरे चरित्रात अनेकानेक आध्यात्मिक व धार्मिक रहस्यांची सूक्ष्म विवरण व उकल केलेली आहे आध्यात्मिक साधकांना त्यांच्या साधनेत मदत करू शकणाऱ्या अनेक बाबींचे सरळ सोपे निरुपण केले आहे. अनेक संत महात्म्यांचे (ज्यांचे जीवनकार्य श्रीपादांच्या नंतर सुरु झाले) उल्लेख व अवतारकार्य विवरण १३ व्या शतकातच सांगून ठेवले आहे. अनेक धार्मिक सण व्रतांचे भावार्थ ,शास्त्रार्थ ,व परमार्थ सांगितला आहे.त्या प्रत्येकावर एक एक लेख होईल एवढये रहस्यभेद त्यात आहेत.
आपण येथे पंच महा पतीव्रतांचे कर्म रहस्य निरुपणावर प्रकाश टाकणार आहोत.
अहिल्या, द्रोपदी ,सीता, तारा, मंदोदरी तथा, |
पंच कन्या स्मरे नित्यं महा पातक नाशनम||
हिंदू धर्म इतिहासात अनेकानेक पतिव्रता मान्यताप्राप्त स्थानात विराजमान आहेत. सती अनुसूया, रेणुका, इ . सती सावित्रीने तरं धर्मराज यमाला जिंकून आपल्या सत्यवानाचे प्राण परत मिळवले व असे करून पतिव्रता धर्माचे पालन केले व पतिव्रता म्ह्मणून मानाचे स्थान प्राप्त केले त्यांचे पूजनही तरीही तिला पाच महा पतीव्रतामध्ये स्थान मिळाले नाही. मानाचे स्थान पटकावले ते वरील पंच कन्यांनी
खरे पाहता अनुसूया, सावित्री ,रेणुका यांचे चारित्र व पातिव्रत्य आचरण धर्माला अनुसरूनच होते., किंबहुना जास्त स्वच्छ ,निखळ,व पवित्र होते हे लक्षात येते.त्या मानाने वरील पाचही जणींच्या पती धर्मात निखळता , व पवित्रता काही अंशी कमतरीतच भासते. नव्हे ते तसेच आहे हे जाणवते.भौक्तिक अर्थी त्यात व्यभिचाराचे पडसाद स्पष्ट दिसून आणि तरी ही त्यांना पातिव्रत्य धर्मात मानाचे स्थान आहे यात नक्की काही गुढार्थ असणे शक्य आहे. नाहीतर तसे पहाता अहिल्या अत्यंत श्रेष्ठ पद्धतीने आपला पत्नीधर्म निभावत होती. तिला आपले पती गौतम ऋषी यांच्या व्यतिरिक्त परपुरुष स्पर्शही अधर्म होता .पतिव्रता धर्म निभावण्या व्यतिरिक्त त्या अत्यंत भावूक ,धार्मिक प्रवृतीच्या व उच्च अध्यात्मिक पातळी गाठलेल्या अश्या पतिव्रता स्त्री होत्या. तरीही त्यांच्या वर इंद्र देव मोहीत झाले व अहिल्येला प्राप्त करण्यासाठी त्यांनी मायेचा व्यापारी उद्योग केला होता. त्यामुळे गौतामांच्या शापाने अहिल्येची शिळा झाली हा इतिहास सर्वाज्ञात आहे आणि तरीही अहिल्या महापतिव्रता का? हा प्रश्न साध्या व्यक्तीला पडणे साहजिकच आहे.
सीता ही एक पत्नी व्रती श्रीरामाची पतिव्रता अर्धांगिनी अत्यंत आदरणीय व पूजनीय ,देवतुल्य . तिचे रावणाने अपहरण केले. त्याच्या कैद्येत कित्येक दिवस ती होती .तिचे अपहरण करून तिच्याशी लग्नाचा कुटील घाट घालण्याच्या कारस्थानाचाच भाग होता. परपुरुषाकडे अनेक दिवस राहिल्याने ती अपवित्र व अशुद्ध गणली गेली. जनतेच्या व धर्माच्या नजरेतून हे अयोग्य म्हणून रामाने तिचा त्याग केला तिला वनवासात धाडले ,तिथेच तिने लव व कुश यांना जन्म दिला.
तारादेवी ही तर २७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता .तिच्या यौवनात ज्येष्ठ ग्रह गुरु बृहस्पती तिच्यावर मोहीत झाले. त्या मोहापोटी त्यांनी तिच्याशी विवाह रचला .विवाहित असूनही तारादेवीचे मन २७ नक्षत्रात परिभ्रमण करण्याऱ्या चंद्राकडे आकर्षित झाले. मन गुंतल्यामुल्ये तिने स्वत:चे हृदय व स्वत:ला चंद्राच्या हवाली केले. हे असे आचरण धर्मबाह्य असूनही तिची पंच पातीव्रतेमध्ये गणना केली जाते व ती त्यासाठी पूज्य अशी आहे.
द्रौपदी तर पंच पांडव यांची प्रिया होती व तिने अत्यंत आत्मीयतेने त्यांच्याशी संसार केला. खरे तरं तिला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले होते, वरले होते. पण तिने संसार त्याच्या इतर भावांशीही इमाने इतबारे केला व त्या सर्वांचेही तिच्यावर तेवढेच प्रेम होते. तीही फक्त अर्जुनाशीच "एक"निष्ठ न राहता ती" पंच"निष्ठ "पांचाली"झाली आणि तरीही महापतिव्रता म्हणून ती महापातीव्रतांमध्ये स्थानमान्य झाली.
मन्दोदरीसुद्धा रावणाची पतिव्रता म्हणून प्रसिद्ध आहे. रावणाच्या बाबतीत ती आपला पत्नीधर्म निष्ठेने पाळत होती. पण तिलाही वाली पासून "अंगद "जन्मला होता. ती वालीची पत्नी होती.
रावण वधानंतर ती बिभीषणाची पट्टराणी झाली. एकाच जन्मात तिने तीन जणांशी संसार केला.हे हिंदू धर्माविरुद्ध आहे. आणि तरीही ती महा पतिव्रता म्हणून पूज्य आहे.
हा जर पाचही पातीव्रतांचा इतिहास लक्षात घेतला तरं सामान्य हिंदू गोंधळून गडबडून जाईल. त्यांना पडेल कि पतिव्रता धर्म लौकिक अर्थाने भ्रष्ट होऊनही ,त्यांना अनुसूया , सावित्री यांच्याही पेक्षा श्रेष्ठत्व मिळून वरचे व मानाचे स्थान प्राप्त होण्याचे काय कारण असावे?
श्रीपाद्प्रभूंनी नेमके याचे धर्म सूक्ष्मास अनुसरून व कर्म चक्र सिद्धांत परिणामांच्या आधारे उचित व योग्य विवरण केले आहे.
जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो.८४ लक्ष योनींच्या जीवन मृत्यूच्या चक्र पाशात गुरफटून मोहमायेच्या अज्ञान्मयी आवरणात फिरत असतो. त्यात तो जीव मनुष्य जन्मात कधी स्त्री तरं कधी पुरुष जन्म ,आपल्या कर्मानुसार , घेत असतो .मानव जन्माव्यातीरीक्त पशु-पक्षादिंचा जन्म पण घेत असतो.
स्त्रीने एक पतिव्रत व पुरुषाने एक पत्नीव्रत असले पाहिजे त्यामुळे बहुभार्या व बहुभार्तृत्वा निंदनीय आहे.एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिल्यास तो सप्त जन्म पर्यंत विधुर होतो.एखाद्या पुरुषाने चारपांच स्त्रियांशी विवाह केल्यास असे पुरुष स्त्री जन्म घेतात व त्या स्त्रिया त्यांची कामवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेउन त्या या जन्मात स्त्री झालेल्या त्या पूर्व जन्मीच्या पुरुषाचा उपभोग घेतात.तेच उलटपक्षी एखाद्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकते. माझ्या कडे ज्योतिष विचारण्यासाठी अशा अनेक केसेस येतात. काहींचे संसार सुरळीत चालले असूनही घरची श्रीखंड पुरी सोडून बाहेर पाणी पुरी खात असतात. तरं अनेक कमनशीब्यांना ना श्रीखंड ना पाणी पुरी लाभत असते अशा सर्व प्रश्नांची उकल पान महा पतीव्रतांच्या जन्म मरणाच्या कर्मविपाक सिद्धांतांच्या माध्यमातून केलेल्या विवरणातून केलेल्या खुलाशातून सुज्ञाच्या लक्षात येतेच पण अनुषंगाने येथे सांगणे योग्य ठरेल की यासाठी ज्योतिष शास्त्राचा उचित उपयोग तरं योग्यच आहे (अर्थात ज्योतिषी सुशिक्षित व योग्य हवाच )पण भगवान शंकरांनी सांगितलेली अद्भुत व गुप्त नाडी संहिता पण आहे नाडी संहिता हि भगवान शंकरांकडून १८ ऋषींनी ऐकली त्यांनी त्यांना कळली तशी लिहून ठेवली. त्यामुळे १८ संहिता - भृगु , अगस्त्य ,रावण इ- प्रसिद्ध आहेत.यातील अगस्त्य नाडी संहितेच्या प्रचार-प्रसाराचे अनमोल कार्य आमचे मित्रवर्य श्री प्रकाशजी खळदकर करीत आहेत. नाडी ज्योतिष हा वेगळ्या व संपूर्ण लेखाचा विषय आहे. असो हा कालचक्राचा प्रभाव आहे, कर्मवासना आहेत हे सर्वसामान्यांना पटतेच असे नाही. याच सिद्धांतानुसार पंच पतीव्रतांच्या पातीव्रताधार्माचे निरुपण व विवरण श्रीपाद चारीत्रामृतात केले आहे.
अहिल्येवर इंद्र मोहीत झाल्याने तिच्या प्राप्तीसाठी इंद्राने ,अहिल्येस एकटी गाठण्यासाठी , प्रथम मायेने कुकुट रूप धारण करून पहाटेच्या आधीच बांग दिली.पाहत झाली असे समजून गौतम ऋषी आपल्या नैमितीक साधना अनुष्ठान करण्यास गेले . पण अहिल्या एकटी असूनहि इंद्र तिला स्पर्श करू शकत नव्हता .तिच्या पातिव्रत्याची ताकतच तशी होती त्यातूनच तिची अध्यात्मिक पातळी उच्च कोटीची असल्याने तिचा मोह अथवा हव्यास करणे अशक्य आहे हे इंद्राच्या लक्षात यावयास वेळ लागला नाही .पण त्याची मोह ,वासना आवरण्यापलीकडे गेलीली असल्याने ती शमवण्यासाठी त्याने मायेने मायावी अहिल्या निर्माण केली आणि तिचा उपभोग घेऊ लागला नेमक्या त्याच वेळी गौतम महामुनी आपल्या अनुष्ठानाहून ,अवेळी तेथे गेल्याने ,परत आले व त्यांनी मायावी अहिल्येला
इंद्राच्या बाहुपाशात पहिल्याने ते क्रोधीत झाले व खऱ्या अहिल्येला तिची काहीही चूक नसताना ,कारण गौतम यांच्या आगमनानंतर मायावी अहिल्या लुप्त झाली होती, शिळा होण्याचा शाप दिला. त्यावर अहिल्याच क्रोधीत कारण तिचे पातिव्रत्य भंग झालेलेच न्हवते.त्यामुळे तिनेच उलट शाप दिला. गौतम मुनींना योगसामर्थ्याने सत्य लक्षात आल्यावर त्यांनी तिला रामाकडून उद्धार होण्याचा उ:शाप दिला. अहिलेच्या शापामुळे गौताम ऋषी १२ वर्ष भ्र्मिस्तासारखे वावरले ,मग श्री शिव शंकरांची आराधना करून स्थिर झाले. थोडक्यात अहिल्या व तिचं पातिव्रत्य भंग झालेच नाही उलट पक्षी तिच्या पातीव्रत्यामुळेच इंद्राला दुधाची तहान ताकावर भागवावी लागली.या तिच्या पातिव्रत्याच्या ताकतीमुळेच तिला महापतीव्रतांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले. देव गौतामांच्या शापामुळे इंद्र सहस्त्राक्ष झाले.
इंद्रदेव शापामुळे पांडव म्हणून जन्माला आले.द्रौपदी ही पांच पांडवाची पत्नी "पांचाली" झाली. तीपण पांच महापतीव्रतांमध्ये माननीय स्थान प्राप्त करती झाली .पांचाली असूनही पतिव्रता होण्यामागेही आध्यात्मिक गूढ आहे.
द्रौपदी ही पूर्वजन्मीची मेधावती ,जिचे लहानपणीच मातृछत्र पारखी झालेली ,शिवभक्त होती. दुर्वास ऋषींनी (जे स्वतः महान शिवभक्त आहेत) तिला तिच्या उध्धारासाठी पुरुषोत्तम मास व्रत करण्यास सांगितले पण मी शिवभक्त आहे मला पुरुषोत्तम व्रत करावयाचे नाही असे म्हणून तिने ते हसण्यावारी नेले . असे तिला दुर्वासांनी पांच प्रसंगी सांगितले आणि पाचहि वेळी तिने ते हसण्यावारी नेले . नंतर तिने तपस्चर्या करून शिव शंकरांना प्रसन्न करून घेतले व मला धार्मिक ,पराक्रमी, बलाढय ,शूरवीर व देखणा
पती मिळूदे असा वर मागितला पण एका व्यक्तीत हे सर्व गुण असणे कठीण असल्याने व दुर्वासांना पांच वेळा हसण्यावारी नेल्याने , तुला पुढील जन्मात पांच पती प्राप्त होतील असा वर दिला . तीच मेधावती द्रौपदी चा जन्म घेउन पांचाली झाली .इंद्राने पांडवाचा जन्म घेतला तर इन्द्रपत्नी शचीदेवीचा अविर्भाव यज्ञ कुंडात द्रौपदीच्या रुपाने झाला . तीचा जन्म अयोनिज होता .शापग्रस्त इन्द्र पांच पांडव म्हणून
जन्मला.पाच रूप पाच मनं असली तरी त्यास आधारभूत असलेला आत्मा एकच ,त्यामुले अणि द्रौपदी अयोनिज असल्याने टीला पातीव्रात्य भंगाच पटक नाही.
सीता माता तर साक्षात देवीरामाबरोबर मानव जन्म घेऊन ,जगाला मानवी आदर्शाचा पाठ घालून देण्यासाठी त्यांचा जन्म झालेला ,
खरया सितेस लंका गमनापूर्वी अग्नि देवतेने आपल्या गर्भात लपवले आणि मत्याच्या सीतेस रवानाने लंकेस नेले. लंकदहना नन्तर सितामातेने अग्नि प्रवेश केला त्यात मायावी सीता गुप्त झाली आणि खरी सीता परत आली. अश्यारीतीने तीची शुचिर्भुतता व पातीव्रत्य
अबाधित राहिले व मान्यताप्राप्त झाले.
तारादेविच्याबतीत पण असेच आहे.भुचक्रातील बारा राशिन्मध्ये गुम्फ्लेल्या २७ नक्शात्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी ,तीच्या भर यौवनात वरिष्ठ ग्रह गुरु यांची अधिष्ठात्री देवता असलेले बृहस्पती हे तीच्याकडे आकर्षित होउन तीच्याशी विवाहबद्ध झाले .ती यौवना व ते वृद्ध त्यामुले ते तय यौन्वतीस तृप्त करण्यास कमी पड़त होते. हा विषय धर्मं विरुद्ध आहे आणि म्हणून विवाह समई घेतलेल्या शपथेचे
उलंघन झाल्यास क्षति होंत नाही.ब्रुहस्पतिचा मोह व आकर्षण एकतर्फी असल्याने त्यांच्या बाबत टीला कधीच पतीत्व भाव निर्माण झाला नाही .या उलट सकल धर्माचे ज्ञान असुनही गुरु ब्रुहस्पती धर्म भाय्य आचरण केले
तारादेवींच्या शरीरातील पेशी आणि जीवाणुन चे तीच्या मन प्रवृतीं नुसारगेले बदल घडत गेले .२७ नक्षत्रात , ज्यांची ती अधिष्ठात्री देवता आहे ,सृष्टि नियमां प्रमाणे परीभ्रमण करणाऱ्या चंद्राचे रूप तीच्या मनात स्थीर झाले .व आपले ह्रदय तीने चंद्राधीन केले हअरदेवी प्रभावी बदल घडलेली व पूर्वीची तारादेवी भिन्न होत्या म्हणून चन्द्र+तारा मिलन धर्मबाह्य ठरत नाही. नक्षत्र भ्रमण हा चन्द्र धर्म आहे गुरुचा नव्हे. जर गुरुने असे केल्यास ते धर्मबाह्य ठरेल .कुठल्याही धर्म विरुद्ध कार्याची अधोगती होते .म्हणुनच२७ नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता तारा देवी चंद्रमंडलाचे अधिष्ठान दैवत चंद्रास पवने हा योग्य धर्म होय .या सूक्ष्मधर्मानुसार तारा देवी ही महापतीव्रताच ठरते.
मंदोदरी ही रावण याची पतीव्रता म्हणून सर्वांना माहित आहे. पण रावण धरून तीने एकूण तीन पती केले होते हे कदाचित सर्वश्रुत नसावे आणि ते म्हणजे वाली ,रावण, व बिभीषण . जन्म चक्र फेरयाच्या पूर्व्जन्मंतारी मंदोदरीचा पुरुष जन्म होता तीला तीन पती होते व त्या पुरुष जन्मात तीला चंचल,दुष्ट ,व मृदु स्वभावाच्या तीन विवाहित बायका होत्या . इह जन्मात त्या तीन स्त्रीया पुरुष होउन तीचे पती झालें चंचलेने वानर जन्म घेतला तो वाली वानराचा ज्याच्या पासून तीला "अंगद"हा पुत्र झाला.तद नन्तर दुष्ट प्रवृत्ती ने रावणाचा जन्म घेतला होता त्याची ती भार्या जाहली. रावण संहार नन्तर मृदु स्वभावाच्या स्त्रीने जो बिभीषण म्हणून जन्मला त्याची पटराणी झाली. परन्तु तीघांची पत्नी असतांना तीच्यातील जीवाणु भिन्न होते म्हणून मंदोदारीसुद्धा महापतीव्रता आहे. असे हे कालचक्राचे गणित आध्यात्मिक रहस्यान्नी परिपूर्ण आहे. कळल तर त्याच्या इतक दुसरकही सोप्प नाही नाही कळल तर त्याच्या इतक काहि कठीण नाही . कालचक्र हे कर्मानुसार स्पंदन निर्माण करत असते. ती सपादन चांगली व वाईट असतात सतकर्मा मुळ आनंदमय स्पंदन(vibrations)निर्माण करतात तर दुष्कर्म दुष्ट व पिदमय स्पंदन निर्माण करतात मान्साहरासाठी वध केलेली शेळी वित स्पंदन सोडते तीची हाय ,हळहळ सूद भावना निर्माण करते व मनुष्य जन्म घेउन मॉस भक्षण करणार्या मानुस ज्याची शेळी झालेली असते त्याचे मॉस भक्षण करते .असा हा कालचक्र फेरा ,लक्ष चौर्यांशीचा फेरा. त्यातून सुटका करावयाची तर क्षमा , सत्कर्म सद्भाव ,दया श्रद्धा व शरणागती भाव अत्यावाशक .सात्विकता शेळीस पहिल्यावार्ही मांस भक्षण करण्यास क्षमाशील भावनेपोटी प्रवृत्त करत नाही आशा वेळी तो जर पूर्व पूर्वजन्मीचा शेळी असताना ज्याचा ने मुले वध झाला असेल तर या जन्मिच्या क्षमाशील भावने मुळ प्राण दानाचे पुन्य लाभून त्याचे कालचक्र थांबते . --
dr.sanjay honkalse.
टिपः
वरिल लेखन हे "श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रामृत"या आद्य गुरुचरीत्रावर आधारीत आहे.हे चरीत्रामृत १३व्या शतकात लिहिले गेले व मुळ संस्कृत भाषेत असुन ते ७०० वर्षांनी ,२००७ सालि प्रथम प्रसिद्ध केले गेले.त्यात अनेकानेक धार्मिक व आध्यात्मिक रहस्यांचे विवरण केले गेले आहे.
पंच पातीव्रतान्बद्दल व इतर अनेक बाबींवर अनेक प्रवाद व मत प्रवाह आहेत.त्यालाआध्यत्मिक सामाजिक , व धार्मिक तसेच शब्दार्थ ,मतिथार्त, भावार्थ व परमार्थ असे चार अर्थ ग्राह्य अस्तात व काहि कथाना सामान्यांना आकर्षित करण्यासाठि काहि मुद्दे अस्तात.त्याच प्रमाणे वेगले मत प्रवाह(interpretation ) असतात .त्यातील आध्यात्मिक अर्थ व तत्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे ,आणि अश्या प्रकारचे विवरण दुसऱ्या कुठल्याही धर्मग्रंथात नाही व त्या प्रवाहातील व अनुसारयांना याचा उलगडा होत नाही ,त्यांची कुवत नसते , काळात नाही, कळले तरं पटत नाही ,व वळत नाही.(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे ) म्हणून ते सारासार पाने नाकारले जाते. व आपली आजची पिढी पण या पासून दूर आहे .
तात्पर्य वरील लेखन १३ व्या शतकातील आद्य गुर्चारीत्रातील विवरणावर आधारीत आहे हे कृपया लक्षात घ्यावे.
--
SILENCE, is, WITHIN......
Silence speaks always conveys something & is still speechless
Silence saves Energy, makes one SOUND, yet soundless.
Silence is a safetyzone of communication, it is GOLDEN.
It is a means through which one can have unison.
saying well produces laugh, doing well produces silence.
Silence is peace, a bliss, it adds to resilence.
If one understands silence, one understand everything by any standard.
Man is miniuniverse, silence is a window between his inner & outer world.
Silence is always within, never without.
Silence is AWARENESS no doubt,
One need not put effort to be silent, it is effortless.
To be effortless is to be AWARE, so silence is ABSOLUTE AWARENESS.
There was only silence before the Big Bang from which this world was born.
That is why Vedic Religion puts Shanti (Silence) before Om, Shanti Om.
Om - one of the thousand of meanings of Om is Big Bang.
Dr .Sanjay Pandurang Honkalse
प्रतिक्रिया
30 Aug 2010 - 6:33 pm | विसोबा खेचर
बाब्बो..!
चालू द्या..
तात्या.
30 Aug 2010 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते
लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही. पण एक मूलभूत शंका... पत्नीव्रता धर्माबद्दल कुठे काही आहे का? आय मीन कोणत्याही धर्मात असले तरी चालेल. तेवढंच तपासून बघता येईल हो.
30 Aug 2010 - 7:17 pm | अवलिया
अग्नीला साक्षी ठेवुन हातात हात घेवुन सात फेर्या मारतांना "धर्मे च अर्थे च कामे च नातिचरामि" अशी शपथ नाही घेतलीस का ? की तेव्हा भान विसरुन गेला होतास ?
अरे हो लेखाबद्दल बोलायचेच राहिले. अशा लेखांमुळे हिंदूंवर चिखल उडवायला काही लोकांना बळ मिळते. खरे हिंदू अशा लेखांपासुन दूर रहावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे.
30 Aug 2010 - 7:15 pm | मस्त कलंदर
अगदी अगदी!!!
मला पण आता हाच प्रश्न पडलाय. कुणीतरी प्लीज उत्तर द्या... अगदी युयुत्सुंनी दिले तरी चालेल.
30 Aug 2010 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या WPTA क्लबातल्या दोघांनी "लेख वाचला नाही. वाचेनच असेही नाही." असं लिहील्यावर मी लेख वाचण्याचा सवालच येत नाही.
पण एक प्रश्न आहे, १२-१३ व्या शतकातल्या लोकांनी आंग्ल भाषेतही काही लिहीलं आहे का?
30 Aug 2010 - 7:11 pm | विलासराव
SILENCE, is, WITHIN......आवडली.
30 Aug 2010 - 7:25 pm | परिकथेतील राजकुमार
हि कुठली तारा हो ? पंचकन्यांमधली तारा म्हणजे सुग्रीवाची पत्नी ना ?
30 Aug 2010 - 7:37 pm | चतुरंग
'तारे' असावेत! ;)
(खुद के साथ बातां : तोडलेले म्हणावे का रंगा? :?)
रंगा जमीन पर
30 Aug 2010 - 8:00 pm | परिकथेतील राजकुमार
पुन्हा काही प्रश्न उपस्थीत होतातच :-
१) कुठले तारे ?
२) सँडल खाल्ल्यावर दिसतात ते का?
३) ४ पेग नंतर दिसतात ते का ?
४) इथे काही सदस्य काथ्याकुटरुपी अकलेचे तोडतात ते का?
इ इ.
30 Aug 2010 - 8:03 pm | चतुरंग
ते ज्याची त्याची जाण....वगैरे वगैरे..;)
(अजाण)रंगा
30 Aug 2010 - 8:43 pm | पैसा
मीही लहान असल्यापासून असंच ऐकत आले. की तारा ही सुग्रीवाची पत्नी, आणि वालीने तिचं हरण केल्यामुळे समदु:खी म्हणून सुग्रीवाने रामाला मदत केली.
30 Aug 2010 - 7:55 pm | भाऊ पाटील
खूप दिवसात सत्यनारायण कथा आणि तत्सम पौराणिक कथा वाचल्या/ऐकल्या नव्हत्या..वाचून भरपूर करमणूक झाली.
ढन्यवाद! मंडळ आबारी हाये.
30 Aug 2010 - 10:28 pm | बबु
नाडीग्रन्थावर एखादा ले़ख लीहा राव!
30 Aug 2010 - 10:49 pm | नितिन थत्ते
हे असे नवीन सदस्य येतात. धडाधड तीनचार दीर्घ लेख लिहून गायब होतात. त्या लेखांवर चर्चा वगैरे काही करत नाहीत. आपणच इकडे काथ्या कुटत बसतो.
एवढे तीनचार लेख झाले की परत कुठलेही लेखन करत नाहीत.
पूर्वी सदानंद ठाकूर हे असेच सदस्य येऊन गेले.
31 Aug 2010 - 12:13 am | इन्द्र्राज पवार
व्वा.... काय अविश्वसनीय असा योगायोग नितीन जी. नेमक्या याच शब्दात मी डॉक्टर मजकुरांच्या येथील गांभीर्यपूर्वक अस्तित्वाबद्दल लिहिण्याच्या बेतात होतो (विशेषतः त्या 'ज्योतिषशास्त्रा'चा धाग्यावर, पण नंतर वाटले की ज्या या धाग्याला डझनभर मिळालेले प्रतिसाद पाहुन्/वाचून त्यांनी निदान एक ओळीची तरी प्रतिक्रिया दिली असेल तरी त्यांचे धागे वाचण्याची प्रेरणा मिळेल...पण नाही.) पण ते काम तुम्ही अगोदरच करून योग्य तो फटका दिला ते बरे झाले.
तुम्हाला या पठडीतील कुणीतरी 'सदानंद ठाकूर' आठवले अन् मला 'तो' शहाजहान बुद्रुक, ज्याने 'अल्लाच कसा सर्वश्रेष्ठ' असा १०० प्रतिसाद खेचक धागा दिला आणि तीवर एकही प्रतिक्रीया न देताच रमजान महिन्यात जणू काय अल्लालाच प्यारा झाला. आम्ही इकडे एकमेकाच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने भिंतीवर धडका देत बसलो.
सदरहू डॉक्टरदेखील त्याच बेनाम गाडीचे प्रवासी आहेत का?
इन्द्रा
31 Aug 2010 - 12:15 am | मिसळभोक्ता
(उदा. शांती म्हणजे नक्की काय हे पाश्चात्यांना काळात नाही शांती ही बाहेर नसते तर अंतर्गत असते व ती बाहेर शोधली जाते. खाली माझी अंतर राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कविता पहा जिला Inter national Library of Poetry ,U .S .चा पुरस्कार प्राप्त आहे )
माझ्या आठवणीप्रमाणे अमेरिका (ज्याला गुरुचरित्रात यू एस असे म्हणतात) पाश्चात्त्य देश आहे. ज्यांना शांती कळत नाही, त्यांना कुठल्या कवितेला पारितोषिक द्यायचे हे कसे कळेल ?
बाय द वे, हे विकीपीडियातून साभार.
Critics of the International Library of Poetry's business model describe their practices as "deceptive and misleading" in that they misrepresent their activities as a contest based on the quality of poetry submitted, whereas in fact the quality has little or no influence on the outcome. They are also accused of portraying the anthologies they publish as a "real literary credit that poets can be proud of" while simultaneously producing anthologies that are available on special order only and which are full of poor quality poetry.[2] Other critics point out that standard industry practice is for winners of poetry contests to receive gratis copies of any publication of their work, and that ILP fails to follow this protocol.[3]
The Better Business Bureau comments that it has received "hundreds" of complaints concerning ILP, and that it considers their business to be vanity publishing. In 2004, the New York State Consumer Protection Board launched an investigation into ILP, which it said "takes advantage of people both emotionally and financially," but suspended the investigation due to a shortage of complaints.[3]
31 Aug 2010 - 12:22 am | प्रियाली
मंदोदरी कोणत्या काळात वालीची पत्नी झाली? काहीहीहीहीहीही!!! काही आधार वगैरे आहे का याला? बंडलबाजी नुसती.
अंगद हा तारा आणि वालीचा पुत्र. कृपया तिच्या नावाने अधिक तारे तोडणे बंद करावे. तारा ही वालीची सहचारिणी आणि उत्कृष्ट सल्लागार होती. वालीच्या वधानंतर तिने सुग्रीवाशी विवाह केला किंवा त्याच्याकडे राहीली. सुग्रीवाच्या पत्नीचे नाव रुमा होते. तिचे अपहरण वालीने केले होते. त्याकाळात त्यांच्यावर झाले ते अत्याचार पुरे होते असे वाटते आता त्यांच्या नावांचे तारे तोडून पुढले अत्याचार थांबवावेत.
अहिल्या कोण बरे? उद्या होळकरांची अहिल्या ती हीच म्हणून लेखकमहाशय सांगतील. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. मायावी बियावी कसली? बंडलबाजी नुसती.
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!!
31 Aug 2010 - 12:49 am | मिसळभोक्ता
थांबवा रे ही बंडलबाजी कुणीतरी!!!!
तै, तुमचा व्यासंग कमी पडतोय.
अंबा, अंबिका, अंबालिका ह्यांच्यापैकी कुणीतरी शिखंडी झाला/ली होता/ती, बदले की आग मे जळून.
मग त्याचेच हे लॉजिकल एक्स्टेंषन समजा.
31 Aug 2010 - 12:52 am | प्रियाली
ती अंबा.
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही.
बाकी हे बरं आहे. एका बायकोला त्रास दिला म्हणून पुढच्या सात जन्मी बायकांनी मरायचं आणि या प्राण्याला विधुर बनवण्याची सोय करायची.
31 Aug 2010 - 12:59 am | मिसळभोक्ता
आई अंबाबाई उचल... या डॉक्टरला! सोबत मिभोंना उचललंस तरी माझं काही म्हणणं नाही.
या जन्मी लवकर उचलले, तर इतरांचे पुढचे सात जन्म नक्कीच बर्बाद होणार !
त्यामुळे, मांडवली करून टाकू इथेच.
(बाय द वे, आमच्या सात आयडींचे सात जन्म, म्हणजे एकूणपन्नास !)
31 Aug 2010 - 1:05 am | प्रियाली
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद.
चित्रगुप्ता सॉरी सॉरी नीलकांता बघतोयस ना! मिभो कन्फेशन देऊन राहिल्येत. हा प्रतिसाद त्यांच्याविरुद्ध कधीही वापरायची सोय झाली.. ;)
थांकु!!
31 Aug 2010 - 1:12 am | मिसळभोक्ता
आपण आपल्या बायकोला त्रास देतो हे कसलेही आढेवेढे न घेता मानल्याबद्दल शतशः धन्यवाद.
असे आम्ही म्हणत नाही, आमची बायकोच म्हणते. आणि ती म्हणते ते सगळेच आम्हाला शीरसावंद्य असते.
यावरून कुणीतरी सांगितलेला एक विनोद आठवला.
कपल्स थेरपीच्या क्लासमध्ये एकदा समुपदेशक म्हणाला. जे पुरुष स्वतःला बायकोच्या ताटाखालचे मांजर समजतात त्यांनी इकडे रांग करा. जे तसे समजत नाहीत, त्यांनी दुसरीकडे रांग करा.
सगळे पुरुष पहिल्या रांगेत जाता. फक्त एकच दुसर्या रांगेत जातो. त्याला समुपदेशक म्हणतो, " अभिनंदन ! माझ्या आयुष्यात मला पहिल्यांदा एक पुरुष दुसरीकडे उभा राहिलेला सापडला!". त्यावर तो पुरुष म्हणतो: "आधी मी पहिल्या रांगेत जाणार होतो, पण काय करणार ? बायकोनी सांगितलं तिकडे दुसरीकडे उभा रहा म्हणून !"
असो.
31 Aug 2010 - 12:42 am | इन्द्र्राज पवार
सो कॉल्ड "आय.एल.पी." ची लक्तरे बाहेर काढल्याबद्दल श्री.मिभोंचे अभिनंदन. मी समजत होतो की "मोरू" करणार्या मंडळींचा भरणा नवी दिल्ली आणि लखनौ येथेच प्रामुख्याने आहे, पण या मंडळीच्या भाऊबंदानी साता समुद्रापलिकडेही शाखा काढलेल्या दिसतात. दिल्लीतून काही वर्षापूर्वी "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" अशी गलेलठ्ठ नावाची एक वार्षिक डिरेक्टरी निघायची. तीमध्ये 'संत तुकारामा' चा "स्न्त टिकाराम" आणि वि.स.खांडेकर यांचा वि.स.खान्द्कर असे भन्नाट उल्लेख असायचे. याच्या प्रकाशनाच्या बगलबच्च्यांची आणि वर्तमानपत्रातून रविवार पुरवणीची जबाबदारी असलेल्या काही होतकरू उपसंपादकांचे साटेलोटे असायचे. मग ही दिल्लीकर मंडळी हुशारीने या उपसंपादकाकडून त्या त्या स्थानिक वर्तमानपत्राकडे येऊन पडत असलेल्या गाडीभर लिखाणाच्या कर्त्यांचे (जे 'धडपडणारे लेखक' या पदाला उत्सुक असत) घरचे पत्ते मिळवीत आणि मग नंतर केव्हातरी एका छानशा ग्लॉसी पेपरवर गोल्ड कलरचे एम्बॉसिंग केलेल्या लेटरपॅडवर 'महाराष्ट्रातील भावी आदरणीय लेखक' अशा शब्दांचे मोरपीस फिरवून "आम्ही तुमचे अमुकतमुक वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले लेखन वाचले असून तुमचा लेखन प्रवास विश्वसनीय आहे..." आदी मजकूर व नंतर "आम्ही अशा होतकरू लेखकांचा देशातील अन्य वर्तमानपत्रांना/नियतकालिकांना परिचय व्हावा म्हणून "इंडियाज् व्हूज व्हू इन लिटरेचर" नावाची डिरेक्टरी प्रसिद्ध करीत आहोत, त्यासाठी आपल्या आजवरच्या लेखनाची माहिती, एक फोटो व सोबत डिरेक्टरीची (डिलक्स क्वॉलिटी) किंमत रुपये ४००/- वरील पत्त्यावर पाठवावेत."
हा गब्रू आपले आता भारतवर्षात नाव होणार तर मग जाईनात का ४०० रुपये.... असा थोर थोर विचार करी आणि पैशे पाठवून मोकळा होई. चारसहा महिन्यानंतर एक सुमार दर्जाची पुस्तिका त्याच्या नावावर पार्सलने येई, ज्याचे पोस्टेज यानेच भरायचे असते. बस्स. आपला त्सुनामीसदृश्य फोटो व दोन ओळीचे भांडवल पैपाहुण्यात तर करीच पण पुढे नोकरीचा अर्ज करताना "माझे नाव अमुकतमुक डिरेक्टरीत झळकले आहे...' हा उल्लेख तो 'अचिव्हमेन्ट' सदराखाली करे.
त्याच पुठ्ठ्यातील ही आयएलपीची कमाई.
इन्द्रा
31 Aug 2010 - 12:56 am | चित्रा
इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ पोएट्री अशा संस्थेबद्दल माहिती मिळाली - खूपच इंटरेस्टिंग आहे. तुमची फसवणूक नाही ना झाली? कृपया तुम्हाला कविता पाठवल्यावरून आलेले अनुभव या सर्वाशी तपासून पहा. तुम्हाला भविष्य कळले होते का की तुम्हाला फसवले जाऊ शकते?
http://www.online-literature.com/forums/showthread.php?t=174
31 Aug 2010 - 3:26 am | राजेश घासकडवी
आयला, म्हणजे जे सगळं रामायण घडलं ते खोट्या सीतेपोटी? रामाला हे माहीत नव्हतं असं म्हणून तुम्ही रामाच्या बुद्धीमत्तेबद्दल वा देवत्वाबद्दल शंका घेत आहात का? की ज्याने रावणाला मारलं तोही खरा राम नसून या मायावी सीतेचा मायावी पती होता?
अशी देवांची बदनामी करणं बरं नाही.