सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
7 Jul 2022 - 9:03 am | ज्ञानोबाचे पैजार
अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपूर्वी चिंतामणी जयंती समारोहाच्या वेळी उस्ताद रईसखान यांचे सतार वादन ऐकताना झाली होती.
ते दोन तासांहुन अधिक काळ वाजवत होते आणि श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते, इतके की मैफिल संपली तरी टाळ्या वाजवण्याचेही कोणाला भान उरले नव्हते.
तुम्ही ती भावना शब्दात चपखल उतरवली आहे.
पैजारबुवा,
7 Jul 2022 - 5:41 pm | कर्नलतपस्वी
आवडली.
9 Jul 2022 - 9:39 pm | तुषार काळभोर
भान हरपून जायला लावतात.
उदा. महेश काळे यांनी (सारेगमप दरम्यान) सादर केलेलं कानडा राजा पंढरीचा.
किंवा आशा भोसलेंचं जीवलगा..
किंवा भीमसेन जोशींचं भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
किंवा लता मंगेशकरांचं सख्या रे घायाळ मी हरिणी