पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.
प्रतिक्रिया
27 Apr 2022 - 5:23 am | कंजूस
भोंगे आणि सार्वजनिक शांतता याचे कायदे तपासल्यावर कळलं की कुणालाच कायमची परमिशन नसते. काही मशिदिंनी भोंगे काढायला सुरुवात केली आहे.
25 Apr 2022 - 8:31 pm | sunil kachure
राजकीय नेत्यांची पात्रता काय असावी ह्याची व्याख्या करण्याची वेळ आली आहे.
25 Apr 2022 - 9:20 pm | sunil kachure
अशी अवस्था bjp नी हिंदुत्व ची करू नये,हिंदू चेष्टेचा विषय ठरतील असे वागू नये.
थोडे तारतम्य पाळा.
काय चाललं आहे देशात.
हनुमान चालीसा बांद्रा मध्ये बोलली तर च श्री हनुमान प्रसन्न होतात का?
हिंदुत्व आणि हिंदू धर्म ह्यांची इज्जत चव्हाट्यावर मांडू नका.
सत्तेसाठी.
25 Apr 2022 - 11:00 pm | कॉमी
पण दुसरे हनुमान चालिसा म्हणत असल्यास राजद्रोहाचा खटला भरायचे काय कारण आहे ? ज्यांना म्हणायची आहे त्यांना म्हणू द्या कि.
25 Apr 2022 - 11:40 pm | श्रीगुरुजी
राणा दांपत्य मूर्खपणा करीत आहेच, परंतु मुख्यमंत्री या पदाकडून प्रगल्भतेची व संयमाची अपेक्षा असते.
दोन निशस्त्रांना मारण्यासाठी हजारोंना लाठ्या काठ्या दगड घेऊन पाठविणे, आईमाईवरून शिवीगाळ करणे, रस्ते अडवून तमाशा करणे, राणा दांपत्याला २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणे, राणा दांपत्यासाठी ऍम्ब्युलन्स व गोवऱ्या आणणे, पोलिसांनी हा तमाशा थंडपणे बघत निष्क्रीय उभे राहणे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ समर्थकांना जाहीर पाठिंबा देणे, घरातून बाहेर सुद्धा न आलेल्या दांपत्याला चक्क राजद्रोहाच्या कलमांखाली अटक करणे आणि या दांपत्याला भेटण्यासाठी गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करून काचा फोडून त्यांना जखमी करणे या घटना पाहता राज्यात अराजक माजले आहे असे दिसते.
त्याआधी सोमय्यांना दोनवेळा मारहाण केली आहे. मोहीत कंबोजलाही आईमाईवरून अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण केली. एका ६२ वर्षांच्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यालाही बेदम मारहाण केली. संजय कुरमेसेला उचलून घरात आणून आव्हाडने बेदम मारले. शिवसेना नेते इतरांवर अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करीत असतात, पण यांच्या नेत्यावर कोणी साधी टीका केली तरी हे धुडगूस घालून बेदम मारहाण करतात. यांना पोलिसही सामील आहेत. यांच्याशी अजूनही जुळवून घेऊन सत्तेत परतता येईल या भ्रमात फडणवीस/चंपा असल्याने भाजप यांना फक्त तोंडदेखला विरोध करतोय.
राज्यात अक्षरशः अनागोंदी व अराजक माजलंय. महाराष्ट्राच्या नशिबी अत्यंत अपात्र सत्ताधारी आलेत. हे नालायक सरकार तातडीने घालवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणून काही काळ राज्य लष्कराच्या नियंत्रणात देणे अत्यावश्यक आहे कारण पोलिस व सर्व माध्यमे यांना सामील आहेत.
26 Apr 2022 - 7:31 am | कॉमी
सहमत आहे.
27 Apr 2022 - 5:19 am | सुक्या
मुख्यमंत्री हे पद व त्यावर बसलेली व्यक्ती ही केवळ एका पक्षाचे प्रतीनिधित्व करत नाही तर ते संपुर्ण राज्याचे प्रतीनिधित्व करते. त्यामुळे त्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीने वाहवत जायचे नसते. आताचे मुख्यमंत्री कमालीचे आळशी व कामचोर आहेत. गेले कित्येक महिने मंत्रालयात / दौर्यावर गेले नाहीत .. त्यांच्याच सरकार मधले बाकी मंत्री (छोटे पवार / मोठे पवार / त्यांचे नातु) महाराष्ट्रभर फिरत आहेत. हे म्हणजे "मला पहा नि फुले वाहा" प्रकारातले आहेत. बापाने कमावलेल्या पुण्यायीवर मला पण तसाच आदर द्या / माझ्या पाया पडा वगेरे अपे़क्षा असतात त्यांच्या ..
चमकोगिरि करणार्या आजीबाई ला भेटायला खुप वेळ आहे अगदी सहकुटुंब जातात पण एस टी कामगारांच्या संपात आत्महत्या केलेल्या एकाही कर्मचार्याच्या घरी जायला वेळ मिळाला नाही ..
27 Apr 2022 - 10:42 am | जेम्स वांड
मला कायम एक प्रश्न पडतो पण
मला ह्या नौदल अधिकाऱ्याची रँक कधीच कळली नाही, बातम्यात पण निवृत्त नौदल अधिकारी, रिटायर्ड नेव्हल ऑफिसर, असेच वाचले आहे, जनरली रिटायर्ड अधिकारी म्हणलं का रँक कंसात retd आणि मग पूर्ण नाव लिहायचा प्रघात आहे, मीडियानं (कुठल्याच) तो का पाळला नसावा कळेना, तुम्हाला काही कल्पना आहे का ?
27 Apr 2022 - 11:49 am | श्रीगुरुजी
Madan Sharma's ID card (MAH-01/013527) has the registration number "201814-W". On the ID card, Sharma's Regimen/Corps has been listed as "Navy" and his Rank was "CHEL(P) or Chief Electrical Power". Sharma's date of discharge was October 31, 1990.
His ID card clearly shows he is an ex-serviceman.
https://www.google.com/amp/s/www.freepressjournal.in/amp/mumbai/fpj-fact...
27 Apr 2022 - 11:54 am | जेम्स वांड
सज्जड पुरावा एकदम, अर्थातच मदन शर्मा हे मर्चंट नेव्हीत असते तरीही अरेरावी अन गुंडगिरी करत त्यांना मारहाण करण्याच्या प्रकारचा निषेध करावा तितका कमीच ठरला असताच.
26 Apr 2022 - 7:50 am | sunil kachure
उद्या राष्ट्रपती भवनासमोर किंवा पंतप्रधान ह्यांच्या निवास स्थनासमोर कोणी नवनीत Rana सारखे उद्योग केले तर सरकार कारवाई करेल की जावू ध्या तिकडे
म्हणून दुर्लक्ष करेल.
26 Apr 2022 - 12:47 am | sunil kachure
जी काही सज्जन लोकांची नाव श्री गुरुजी नी अन्यायग्रस्त म्हणून घेतली आहेत.
ती लोक खरोखर सज्जन,राज्य हिताची कळकळ असणारी लोक आहेत.
मग 11 कोटी लोक जी महाराष्ट्रात राहतात त्यांच्या वर सेने नी हल्ला केला नाही ह्या चारपाच सज्जन लोकांवर च का केला .
ह्याचे पाहिले आत्मपरीक्षण करा.
हा देश घटने नुसार चालतो कोणाच्या मर्जी नी चालत नाही.
केंद्रात बहुमत असेल तर कोणत्याही राज्यातील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट काही काळासाठी लागू करण्याचा अधिकार केंद्र सरकार ल घटनेने दिला आहे.
तो केंद्र सरकार नी वापरावा काही हरकत नाही.
पण राज्य लष्कराच्या ताब्यात द्यावे ही इच्छाच हास्यास्पद आहे.
लष्करी राजवट लागू करण्यासाठी राज्य घटनेत तरतूद नाही.
ह्याची कमीत कमी माहिती कॉमेंट करण्या अगोदर घेणे गरजेचे होते.
आंतरराष्ट्रीय सीमेवर जी राज्य आहेत आणि तिथे देश विरोधी कारवाया होत आहेत अशा राज्यात काही कायदे लागू करता येतात पण लष्करी राजवट तिथे पण लागू करता येत नाही.
महाराष्ट्र ना अंतर राष्ट्रीय सीमेवर आहे ना राज्यात देश विरोधी कारवाया चालू आहेत.
मग लष्करी राजवट लावा असे मत तरी कसे व्यक्त केले जाते.
आता चे राज्यसरकार योग्य काम करत आहे.
Bjp राज्यातील वातावरण बिघडवत आहे.
Bjp ल समर्थन देणारे पण आता bjp विरुद्ध गेले आहेत.
यूट्यूब वरील प्रतेक मराठी व्हिडिओ वरील कॉमेंट बघितल्या की हे लक्षात येणे काही अवघड नाही.
26 Apr 2022 - 8:16 am | अमरेंद्र बाहुबली
किरीट सोमय्या यांना झालेली जखम कृत्रीम?
https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/kirit-somaiya-car-attack-p...
26 Apr 2022 - 9:38 am | sunil kachure
Bjp ची लोक खोटे बोलण्यात phd केलेली आहेत.
नवनीत राणा.
मी sc असल्या मुळे पाणी दिले नाही.sc लोकांना आम्ही पाणी देत नाही असे पोलिस बोलले.
असे तिने मीडिया ल सांगितले.
महाराष्ट्र मधील शेंबड पोर तरी ह्या वर विश्वास ठेवेल का.
महाराष्ट्रात असे घडणे अशक्य आहे.
यूपी ,बिहार मध्ये घडू शकते.
इतके खोटे ह्या देशात दुसरे कोणी बोलत असेल ह्याची बिलकुल शक्यता नाही.
26 Apr 2022 - 1:00 pm | sunil kachure
एक खूप मोठी शंका विचारायची आहे.
बाकी दुसरा कोणताच हेतू नाही.
राणा दाम्पत्य ल कोर्टाने काहीच सवलत दिली नाही.
.महागाई आहेच.
धार्मिक विवाद ठरवून निर्माण केले जात आहे
हा विषय निघाला की
येथील काही अती active आयडी गायब होत आहेत .
चुकून पण एक शब्द पण बोलत नाहीत.
हे bjp चे पगारी नोकर तर नाहीत ना? अशी शंका आहे.
स्वतःची मतं ही स्वतःची मत असतात आणि ती स्थिती नुसार बदलता.
पण काही आयडी ची मत फेविकॉल सारखी एकच गोष्टीला चिकटलेली आहेत .
डाव उलटला की गायब होणे ही सोपी रीत त्यांनी शोधून काढली आहे.
26 Apr 2022 - 1:35 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ काही भाजपच्या पेड आयडी आहेत अशी शंका येते.
27 Apr 2022 - 5:26 am | कंजूस
कायद्याची माहिती करून घेऊन निवडून आलेले सभासद खूप काही करू शकतात. उगाच हुल्लडबाजी करून काय साधले?
26 Apr 2022 - 4:20 pm | sunil kachure
धर्म संसद मधील देश विरोधी कृत्यावरून सर्वोच्य न्यायालय नी पण bjp लं झापले आहे..
आता हिंदू च तुम्हाला कंटाळले आहेत
वर्तन सुधारा .
नाही तर bjp ल हिंदू च त्यांची जागा दाखवून देईल.
26 Apr 2022 - 5:11 pm | मुक्त विहारि
मंदिर हो या मस्जिद, योगी सरकार ने तेज आवाज पर लाउडस्पीकर उतारने का दिया आदेश
https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-yogi-adityanath-govern...
ध्वनी प्रदूषण, थांबवायलाच हवे...
26 Apr 2022 - 5:20 pm | मुक्त विहारि
धर्मस्थळांतील ध्वनिक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश
https://www.loksatta.com/desh-videsh/yogi-adityanath-issues-guidelines-f...
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असली तरी ध्वनिक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता कामा नये आणि त्याचा त्रास इतरांना होता कामा नये, असे योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड करू नये, असा स्पष्ट इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला.
-----
अतिशय योग्य निर्णय .... ध्वनी प्रदूषण थांबायलाच हवे ...
26 Apr 2022 - 6:14 pm | मुक्त विहारि
भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं…?
https://spreaditnews.com/2022/04/25/big-decision-of-thackeray-government...
“ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याने तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतल्यास तो संपूर्ण देशासाठी लागू असेल.. राज्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय नेत्यांना भेटून भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची भूमिका आहे..” असे ते म्हणाले.
-------
उत्तर प्रदेश मध्ये, योगी सरकार निर्णय घेऊन, मोकळे झाले..... इथे मात्र, "आलं अंगावर तर ढकल केंद्रावर..."
अर्थात, आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना जे समजते, ते घराणेशाहीच्या पित्त्यांना, समजेलच असे नाही....
26 Apr 2022 - 5:17 pm | मुक्त विहारि
कर्नाटक: मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष; VHP ने केली ‘ही’ मागणी तर प्रशासनाने केलं शांतता राखण्याचं आवाहन
https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-temple-like-structure-found-d...
No Comments...
26 Apr 2022 - 5:23 pm | मुक्त विहारि
महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
https://www.loksatta.com/maharashtra/police-case-against-congress-mp-bal...
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत अधिकाधिक दृढ होत चालले आहे ....
26 Apr 2022 - 5:25 pm | मुक्त विहारि
लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जात आहे की कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी”
https://www.loksatta.com/mumbai/bjp-amit-satam-letter-to-bmc-commissione...
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी आपण अत्याधुनिक टनेल लाँड्री बनवण्याचा कंत्राट १६० कोटींचा काढला आहे. पण ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी अशी विचारणा भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग यांना केली आहे. मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार हे कंत्राट काढण्यासाठी एका अधिकाऱ्याने १६ कोटींची रक्कम स्वीकारली आहे असा आरोपही अमित साटम यांनी केला आहे....
26 Apr 2022 - 5:28 pm | मुक्त विहारि
समान नागरी कायद्याबाबत अमित शहांचं मोठं विधान; म्हणाले, जे काही राहिलंय ते..
https://www.esakal.com/desh/amit-shah-made-a-big-statement-on-the-issue-...
ह्या कायद्याला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, नक्कीच विरोध करणार....
26 Apr 2022 - 5:31 pm | sunil kachure
मुस्लिम द्वेष ह्या व्यतिरिक्त bjp कडे काहीच कार्यक्रम नाही.
देशाची आर्थिक प्रगती,शेतकरी ,कामगार ,ह्यांची उन्नती कशी होईल काहीच कार्यक्रम नाही
हिंदू असून पण bjp च्या फालतू एजेंडा चे समर्थन बहु संख्य हिंदू बिलकुल करणार नाही.
Bjp नेते आणि त्याचे अविचारी साथी दार तुम्हीच काय करायचे ते करा.
बाकी हिंदू ना काही देणे घेणे नाहीं
27 Apr 2022 - 5:03 am | सुक्या
https://www.loksatta.com/mumbai/supriya-sule-comment-on-msrtc-merger-in-...
एसटी विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात होता पण तो पुर्ण करयचा नव्हता .. मग कोरोना वर ढकलले . . . पुढे विचार करु असे गाजर आहे आता . .
ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ते मला नवल वाटते . .
चुना लाउन गाजर दाखवणे ते हेच असावे का?
27 Apr 2022 - 1:20 pm | sunil kachure
मोदी बोलले 15 लाख देवू अजून एक रुपया मिळाला नाही.
काळा पैसा नष्ट करू.
नष्ट करणे सोडा लाखो करोड ब्लॅक money मध्ये रुपांतर होत आहेत.
सरकार बदलले की बाहेर येईल च.
किरकोळ लोक जगात श्रीमंत लोकांच्या यदित येत आहेत.
सरकार बदलले की देशाची किती संपत्ती दान केली गेली आहे ते माहीत पडेल च.
त्यांना लाज वाटत नाही.
तर बाकी लोकांस का वाटावी.
27 Apr 2022 - 1:35 pm | धनावडे
कधी बोललेले १५ लाख देऊ म्हणून? कि तुम्हाला पण राऊत बाधा झाली आहे का?
27 Apr 2022 - 2:04 pm | श्रीगुरुजी
येथील काही जणांना कायमस्वरूपी राऊत बाधा झालीये.
27 Apr 2022 - 9:55 pm | सुक्या
मी १८८ व तत्सम आय डी च्या नादाला लागत नाही. एक तर ते काय बरळतात तेच त्यांना माहीत नसते. दुर्लक्ष हाच एक नियम मी पाळतो.
राउत पण त्यातलेच :-)
28 Apr 2022 - 1:10 pm | मुक्त विहारि
अशा लोकांबरोबर, वाद घालणे, म्हणजे वेळेचा अपव्यय....
Enronची जादू, अशा लोकांनी बघीतलेली नसते ....
संजय दत्तला माफी देणे, हे पण ह्या लोकांनी वाचलेले नसते ...
जहांगीरपुरी दंगल आणि आझाद मैदान दंगल, यांचा तौलनीक अभ्यास करणे, ही तर फार पुढची गोष्ट ....
जाऊ दे, काही लोकांच्या बरोबर वाद न घालणेच इष्ट ....अशा लोकांना अनुल्लेख करणे, हाच उत्तम पर्याय आहे...
28 Apr 2022 - 3:06 pm | कपिलमुनी
गोव्याच्या बाबू मोशाय बद्दल एकदा लिहा ना गडे
28 Apr 2022 - 3:18 pm | अमरेंद्र बाहुबली
तो भाजपात असल्याने मुवीकाका त्यांवर बोलणं टाळतील. त्यांच्यामते ते राष्ट्रहीत असावे.
28 Apr 2022 - 5:06 pm | मुक्त विहारि
की तो माणूस, भाजप मध्ये नको....
27 Apr 2022 - 3:02 pm | मुक्त विहारि
काही लोकांचा, अशा भाषेवर विश्र्वास बसतो ...
27 Apr 2022 - 5:30 am | कंजूस
पक्ष्याला पिंजऱ्यातून बाहेर सोडणार म्हणे. जुन्या ट्विटर मालकांना पैसे मिळणार एका पिसाचे 75 डॉलर्स.
28 Apr 2022 - 5:08 am | निनाद
काय मस्त भाषेत बातमी दिलीत कंजूस साहेब!
आवडली! :)
28 Apr 2022 - 12:06 pm | Trump
श्री ट्रंप पुन्हा टिवटिव करतील तो सर्व जगासाठी सुदीन असेल, आणि लवकर उजाडायला हरकत नसावी.
28 Apr 2022 - 12:29 pm | अमरेंद्र बाहुबली
तात्यांना चिवचिवाट बंदी केली गेली हा समस्त तात्यासमर्थकांचा अपमान होता. तात्यांनीच मस्कला चिवचीवाट विकत घेण्याचा सल्ला दिला असावा. हे करून तात्यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. - तात्याभक्त.
28 Apr 2022 - 4:11 pm | कॉमी
मी इलेक्शन जिंकलो अश्या थापा लावत गरीब समर्थकांकडून डिफेन्स फंडासाठी पैसे काढणे सोपे होईल, नई का ?
त्यांच्याकडून दंगे करवून घेणे पण सोपे होईल.
27 Apr 2022 - 1:45 pm | sunil kachure
राणा जी bjp ची स्टार आहे तिने मुंबई पोलिस ची तक्रार दिल्ली पोलिस कमिशनर ला केली आहे.
सवयी नुसार .
आज तक,अर्णव भक्त, आणि बाकी हिंदी मीडिया नी ही बातमी दिली असणार.
पाकिस्तान,आणि चीन आणि बाकी देश ह्यांची हसून हसून पुरती वाट लागली असेल.
भारतासाठी इतकी महागडी अस्त्र कशाला,आणि हा फालतू खर्च पण कशाला असाच प्रश्न त्यांना पडला असेल.
इतके बिनडोक जर लोक प्रतिनिधी भारतात असतील तर .
लष्कर तरी कशाला हवं.
हा दुसरा प्रश्न पडला असेल.
महाराष्ट्र सरकार नी ह्या मंद बुद्धी लोकांना काहीच उत्तर देवू नयेत.
अगदी विधान सभेत पण मौन व्रत घावे.
ह्यांना काय गोंधळ करायचा आहे तो करू ध्या.
ह्यांच्या प्रश्नांना पण कोणीच उत्तर देण्याची गरज नाही.
आमदार निधी बंद करावा आणि सरकार नी स्वतः पूर्ण महाराष्ट्रात विकास काम करावीत.
मीडिया वर पूर्ण बहिष्कार टाकावा.
लोकांस माहीत आहे सर्व काही.
सरकार नी बाजू मांडण्याची गरज नाही.
27 Apr 2022 - 2:03 pm | sunil kachure
सरकार आपले सर्व आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघात पाठवून द्यावेत.
जिथे bjp चे आमदार आहेत तिथे राज्याच्या मंत्र्याने स्वतः लक्ष द्यावे,स्थानिक आमदार कडे दुर्लक्ष करावे
आणि फक्त विकास काम,सुविधा ह्या विषयी च बोलावे.
विरोधी पक्षांना पूर्ण दुर्लक्षित करावे जसे मोदी करतात.
वीज निर्मिती किंवा बाकी काही सुविधा साठी केंद्राची मदत लागते.
त्याची माहिती रोज प्रसिद्ध करावी.
मग वीज निर्मिती साठी कोळसा हवा केंद्र देत नाही.
लगेच जाहीर करा.
इम्पोर्ट करायचा आहे केंद्र अडचणी आणत आहे.
ह्याची खरी माहिती रोज प्रसिद्ध करा.
शेतमाल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या वर केंद्र कसे निर्णय घेत आहे.
ह्याची माहिती रोज प्रसिद्ध करा.
बाकी कोणाला उत्तर देत बसू नका
28 Apr 2022 - 5:48 am | निनाद
मोदी सरकाराने एप्रिल २०२२च्या महिन्यात विविध वाटाघाटी आणि करार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठेच यश मिळवले आहे वाटते.
एकुणच दिल्लीमध्ये परदेशातील लोकांची सतत लागलेली रीघ पाहून लवकरच भारताला जागतिक अर्थ आणि राजकारणात ठळक भूमिका आहे असे वाटते.
प्रामुख्याने प्रदीर्घ कालीन संरक्षण विषयक निर्यात घडवून आणण्यासाठी वेगवान घडामोडी होत आहेत असे दिसून येते आहे.
जागतिक राजकारणात भारताची ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका उठून दिसते आहे.
28 Apr 2022 - 1:00 pm | मुक्त विहारि
युक्रेन आणि रशियाच्या युद्धात देखील, तेलाचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी योग्य ती उपाययोजना नक्कीच केली गेली...
हे केंद्र सरकार, योग्य ते निर्णय जनतेच्या भल्यासाठी, घेत आहे... हे माझे वैयक्तिक मत आहे ...
28 Apr 2022 - 12:55 pm | sunil kachure
कोळसा पुरवठा हे केंद्र सरकार चे काम आहे.
देशभरातील वीज निर्मित केंद्रांना कोळसा पुरवठा होत नसल्याने देश अंधारात जाण्याची खूप मोठी शक्यता आहे.
2022 मध्ये विजेसारखी अतिशय प्राथमिक गरज भारत सरकार पूर्ण करी शकत नसेल तर.
बाकी तःत्र ज्ञान मध्ये कसे स्वयंपूर्ण होत आहे ते पण झालो नाही अजून
ह्या वर फुशारक्या मारण्यात काही अर्थ नाही.
साधी वीज पुरवण्याची क्षमता नसेल तर आज पण आपण 19 वाव्या शतकात च आहोत.
कोळसा management सरकार ला जमू नये.
लाजिरवाणी गोष्ट आहे.
28 Apr 2022 - 1:17 pm | असा मी असामी
https://www.moneycontrol.com/news/business/companies/its-not-a-power-cri...
28 Apr 2022 - 1:14 pm | मुक्त विहारि
जहांगीरपुरी हिंसा मामले में 2 और आरोपी गिरफ्तार, शोभायात्रा में शामिल लोगों पर कांच की बोतलों से हमला करने का आरोप
https://www.abplive.com/news/india/jahangirpuri-violence-2-more-accused-...
दिल्ली पोलीस, सगळी पाळेमुळे खणून काढत आहे ...
आझाद मैदान दंगल प्रकरणात, महिला पोलीसांना देखील त्रास दिला गेला होता.... त्या प्रकरणाचे पुढे काय झाले? ते मला तरी अद्याप समजले नाही ....
28 Apr 2022 - 1:38 pm | sunil kachure
हिंदू मुस्लिम वाद निर्माण होईल असे स्टेटमेंट देणे .
आणि दोन्ही धर्मातील सामान्य लोकांना.
महागाई,भ्रष्ट कारभार,बेरोजगारी .
ह्या वर विचार करण्यास वेळ च मिळू न देणे.
आणि भारताच्या घसरत जाणाऱ्या आर्थिक स्थिती वर,लोकांचे लक्ष जावू नये.
मित्र च कसे जगातील श्रीमंत व्यक्ती बनत आहेत.
ह्याचा विचार धार्मिक द्वेष निर्माण केल्यावर येणार नाही.
असा विचार करून एकच प्रकारचा एजेंडा राबवला जात आहे.
लोक सर्व ओळखतात.
28 Apr 2022 - 1:17 pm | sunil kachure
भारतात कोळसा management व्यवस्थित करण्यासाठी,कोळसा पुरवठा,उत्पादन योग्य रीती व्हावे ह्या साठी.
नेहरू,इंदिराजी, ह्यांना परत स्वर्गातून परत भारतात यावे लागेल काय?
आता च्या नेतृत्व la तर हे साधे काम पण जमेनासे झाले आहे.