आपणच जेव्हां दगड बनतो
तेव्हां कोणीहि उपटसुंभा क्रांतिसूर्य होतो
आणि भिरकावतो आपल्याला
कोणाच्या तरी घरावर
सार्वजनिक मालमत्तेवर
कारण त्याला वाटत असते
विध्वांस म्हणजेच क्रांती...!
पण दगडालाच पंख फुटले
अन घेतली झेप त्याने स्वबळावर
मोकळ्या आकाशात
कुठल्याश्या हिरव्या गार फांदीवर
बसला गात.... तर..?
वाटतं क्रांती म्हणजे असच काहीसं
कि...
दगडांनाही पंख फुटुन
पक्षी होउन उडावं..
पर्वतांनी वितळून
नदी होउन वहावं..
नगरातील प्रेतांनी
अचानक उठावं
मुठी वळवून चालावं..
मानातील तटबंदीनी
पडदे होउन झुलावं...
क्रांती म्हणजे असच
काहिस असावं..
मला खात्री आहे
असं नक्की होइल....!
कारण अजुनही माझा श्वास चालु आहे
आणि माझ्या श्वासावर माझा विश्वास आहे
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळले सुर्यासी
याचा अर्थ हाच असावा..
क्रांती!!!
प्रतिक्रिया
30 May 2009 - 12:52 pm | जागु
आवडली कविता.
30 May 2009 - 5:54 pm | क्रान्ति
खूप आवडली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
31 May 2009 - 12:32 pm | बट्ट्याबोळ
छान !!
-बट्ट्या.
9 Jun 2009 - 10:26 am | विसोबा खेचर
जबरा कविता..!
9 Jun 2009 - 11:40 am | मराठमोळा
एकदम मस्त.. छान सामाजिक संदेश देणारी कविता
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
9 Jun 2009 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी
मस्त, आवडली !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग ३: http://www.misalpav.com/node/8094