"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
11 Mar 2009 - 7:52 am

आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली.
प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले,
"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल.
माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद्राच्या किनार्‍यावर सोनेरी वाळूत बसून ओहटीच्यावेळी पाणी किना‍र्‍यापासून खूपच दूर गेल्याने परिसरात एक प्रकारची पोकळी येऊन शांत वातावरणात सर्व भकास वाटायचं.पण एखादी थंड वार्‍याची झुळूक आल्यावर मन प्रसन्न व्हायचं.आमच्या बरोबर आलेली बरीच मुलं आणि मुली समुद्रात पोहायला गेल्या होत्या काही मुलं आणि मुली किनार्‍यावर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत गोष्टी करीत करीत चालत फेरफटका मारीत आणि वाटेत दिसल्या तर वाळुतून रंगीबेरंगी शंख,कवड्या कुतूहल म्हणून गोळा करीत फिरत होत्या.

कमला पारसनीस,अतुल शृंगारपूरे आणि संजय साखळकर हे ह्या गर्दीत नव्हते.चौकशी केल्यावर मला कळलं की ते तिघेही गावात गेले आहेत कारण संजय साखळकरची नातेवाईक मंडळी गावात राहतात.त्यांना भेटायला म्हणून आणि कमला,अतुल यांना समुद्राचं इतकं आकर्षण वाटत नव्हतं म्हणून ती दोघंही त्याच्या बरोबर गांव धुंडायला गेली होती.
यायला बराच उशिर झाल्याने ती तिघं संजयच्या ओळखीच्या होटेलमधे राहिली.गावात राहाणार्‍या प्रभाकर तांब्यांचा मुलगा शरद हा त्या होटेलमधे मॅनेजरची नोकरी करीत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो मुंबईहून दोन महिन्यांसाठी आला होता.वडलांना तेव्हडाच हातभार लागावा म्हणून त्याने होटेल मालकांच्या ओळखीने जॉब पत्करला होता.खरं तर तो मुंबईत पवईला आय.आय.टी मधे दुसर्‍या वर्षात शिकत होता.
शरद हा खूपच लाघवी स्वभावाचा होताच,आणि कुणाशीही गोड बोलून त्याला आत्मसात करण्याची त्याची हातोटी वाखाणण्यासारखी होती.मला तांब्यांची माहिती असण्यांचं कारण माझी मेहूणी गणपतीपुळ्याला गेली कित्येक वर्षं राहाते.तिची तिकडे शेतीवाडी आहे.तांब्यांचा आणि माझ्या मेहुणीचा घरोबा होता.त्यामुळे मी शरदला लहानपणापासून ओळखतो.

आता मुळ मुद्दाकडे वळताना सांगायचं म्हणजे,शरदने त्या तिघाना तिन बेड असलेली एक खोली एक रात्री साठी दिली.खरं म्हणजे एका खोलीत दोन बेड्स असतात पण शरदने त्याना आणखी एक बेड देऊन त्यांची सोय केली होती.एका खोलीचाच चार्ज त्यांना लावला.
कमलाला एकटं एका खोलीत झोपायला भिती वाटत होती आणि एकट्या पुरुषाबरोबर राहायची तयारी नव्हती म्हणून ही सगळी सोय केली गेली होती.मधूनच वेटर चहापाणी आणि इतर सोयी साठी खेपा मारून गेला होताच,आणि शरद पण एक दोनदा त्यांची चौकशी करून गेला होता.कमलला त्याचा स्वभाव खूपच आवडला होता.जेवणं वगैरे झाल्यावर हातपाय मोकळे करण्यासाठी जरा बाहेर जाउन येऊया असं अतुल शृंगारपूरेने सुचवलं.आणि संजय साखळकर कबूल झाला पण रात्र बरीच झाली होती आणि नवख्या गावात जायला कमलाने नाकमुरडलं आणि दिवसभर दमल्यामुळे मी इथेच रेस्ट घेते म्हणाली.
ते निघून गेल्यावर जराशी पडते म्हणून अंग टेकलेल्या कमलाला गाढ डुलकी लागली.तिला जाग आली तेव्हा तिला कळलं कोण तरी आपल्या बेडकडे उभा राहून एक नजरेने बघत आहे.तो कसा आत आला कुणास ठाउक त्या खोलीतल्या जेमतेमच्या उजेडात तो कोण आहे हे कळण्यापूर्वीच त्याने तिच्याशी अतिप्रसंग केला.आणि नंतर पळून गेला.अतुल आणि संजय खोलीत परत आल्यावर त्या भयभयीत आणि हुमसून हुमसून रडणार्‍या कमलाला पाहून अचंबीत झाले.

झालं,पोलीस आले केस झाली,आणि ओळख परेडमधे तिने शरद तांब्याचा संशय घेतला.वेटर वयस्कर असल्याने तिला त्याचा संशय आला नाही.
ओळख परेडमधे शरद फिट येऊन पडला.तो नाटक करीत असल्याचं कमलासकट इतराना वाटलं.
केसचा निकाल लागून शरद अकरा वर्षं सहा महिन्यांच्या तुरंगात गेला.मला तर ह्या घटने नंतर गणपतीपुळं म्हटलं की ही सर्व घटना आठवून दुःख वाटायचं.कारण तांब्यांचा शरद एव्हड्या खालच्या पातळीला जाईल असं स्वपनातही वाटत नव्हतं.
पाच वर्षानंतर डीएनए टेस्ट वरून शरद निरपराध आहे हे लक्षात आलं.आणि त्याला शिक्षा पूरी करावी लागली नाही.
तो सुटून आल्यावर मला भेटला.आणि त्यापूर्वी कमलालाही भेटला होता.मी कमलाची आणि त्याची माझ्या घरी एकदा भेट करून दिली.

शरद म्हणाला,
"आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला.दोघं मिळून आम्ही एकमेकाला सुधारत आहो."

कमला म्हणाली,
"माझा क्षमा करण्य़ावर विश्वास आहे.ज्यामुळे क्रोध आणि द्वेष होण्यापासून मुक्त करून माणसाला मनःशांती मिळायला त्या क्षमेमधे क्षमता आहे."

शरद म्हणाला,
"मलाही तसंच वाटतं.मी एक क्रोध घेऊन तुरंगात गेलो होतो.आणि त्यात माझ्या मला समाधान करून घेत होतो.परंतु,ह्या मनोभावनेने तुरुंगात मी माझ्या मनाला निराळ्याच तुरुंगात जखडून ठेवीत होतो.मी माझ्यातल्या द्वेषभावनेला सुटका देऊन आणि क्षमा मनात ठेवून जीवन जगायच्या प्रयत्नात होतो.

कमला म्हणाली,
"मी शरदला माझ्यावर अतिप्रसंग करणारा म्हणून निवडलं आणि आता पाच वर्षानी माझी चूक माझ्या लक्षात आली.ते मला असहनीय होतं.माझ्या मनात शरद हा एक पशू वाटत होता.पाच वर्षाच्या तिनशे पासष्ट दिवस त्याला मृत्यु यावा म्हणून मनात प्रार्थना करायची. खरं कळल्यावर मला मी प्रचंड अपराधी समजू लागले आणि माझी मला लाज वाटू लागली.एका निरपराध्याला माझ्या चूकीमुळे तुरुंगवास भोगावा लागला.मध्यंतरी खरा अपराधी इतर स्त्रीयावर अत्याचार करीतच राहिला.हे पाहून माझ्या मला मी क्षमा करूच शकले नाही.

शरद म्हणाला,
"मला त्या ओळख परेड मधून मी तिचा अत्याचारी म्हणून निवडून काढल्यावर कमलाला मला क्षमा करायला इतराना वाटेल त्यापेक्षा खूपच कमी वेळ लागला.मला ठाऊक होतं की तिच्यावर अत्याचार झाला होता आणि त्याचं तिला भारी दुःख होत होतं.पण मला पण दुःख दिलं गेलं होतं.मी माझे नातेवाईक गमावून बसलो होतो.माझं स्वातंत्र्य गमावून बसलो होतो.पण मी कोण होतो आणि मी तो पशू नव्हतो हे मला माहित होतं.मला हा कमलावर अतिप्रसंग कुणी केला होता ते माहित होतं. तो मला तुरुंगात ठेवून गेला आणि कदाचीत त्याने स्वतः काय केलं त्या गोष्टीचा कबुली जबाब न देतां नरकातही जाण्याचं पत्करलं असेल. त्याचा द्वेष न करणं मला कठीण जात होतं.परंतु,माझ्या मनात मी मोकळा राहावा की नाही हे केवळ माझ्याच हातात होतं.

कमला म्हणाली,
"मी शरदला म्हणाले तुझ्याकडे मी क्षमेची याचना केली तर ती पूरी करशील का?
ते ऐकून, जगात उरली सुरली असलेली दया कोळून पिऊन त्याने माझा हात आपल्या हातात घेत ढळढळा अश्रूची धार आपल्या डोळ्यातून वाहू दिली.वर मला म्हणाला,
"मी तुला केव्हांच क्षमा केली होती."
आणि त्या क्षणापासून माझ्यात सुधारणा होऊ लागली.सर्व दुःख कसं हजम करावं ते शरदने मला शिकवलं.त्या रात्री मला त्याने क्षमा केल्याने मी वेदनाहीन झाले,मी माझ्या मनावरच्या भारापासून मोकळी झाले.शरदने मला क्षमा केली नसती तर मी त्या घटनेने मला बंधनात ठेवलं असतं.आणि ते सुद्धा ते बंधन माझ्या आयुष्यभर राहिलं असतं.नंतर माझ्या हे ही लक्षात आलं की ज्याने माझ्यावर अत्याचार केल होता त्यालाही मी क्षमापात्र करू शकते-त्याच्याकडून विचारलं जाईल म्हणून नव्हे,अथवा तो तसं करून घ्यायला लायक आहे म्हणूनही नव्हे- तर मला स्वतःला द्वेषाच्या तुरुंगात जखडून ठेवावयाला इच्छा नव्हती म्हणून.

शेवटी शरद म्हणाला,
"मी आणि कमला आता मित्र झालो आहो.आणि काही लोकाना हे समजत नाही.आम्ही दोघंही त्याच माणसाच्या त्याच अन्यायाचे बळी झालो आहो.त्यामुळे आम्हा दोघांना खंबीरपणे उभं राहायला एकच मंच मिळाला.दोघं मिळून आम्ही एकमेकाला सारख्याच अनुभवाच्या प्रक्रियेतून सुधारत आहो.मला कडवटपणा ठेवता आला असता,मला त्या तुरुंगातल्या शिपायांशी आणि त्या तुरूंग पद्धतीशी द्वेषाने राहता आलं असतं.पण त्या सर्वांना मी क्षमा करायचं ठरवलं.कारण असं केल्याने मी स्वतः मोकळा झालो आणि माझ्या उरलेल्या जीवनात माझ्या मला तुरुंगवासी म्हणून राहायचं नव्हतं."

अगदी पीन-ड्रॉप-सायलेन्ट राहून मी भाऊसाहेबांच सगळं ऐकून घेऊन झाल्यावर कुतूहलाने विचारलं,
"पण भाऊसाहेब,शेवटी खरा गुन्हेगार कोण तो सांपडला का?"

त्यावर प्रो.देसाई म्हणाले,
"शरदने मला मोठ्या मुष्किलीने सांगतलं की तो अपराधी त्या होटेल मालकाचा एकोणीस वर्षाचा मुलगा होता.ह्या होटेलात संधी मिळताच तो असाच बायकांवर जबरद्स्ती करायचा. एका गुन्ह्यात एका बाईने त्याचे अतिप्रसंग करताना डोक्यावरचे केस ओढले.आणि साक्षीपुरावा म्हणून त्या केसाचा उपयोग डीएनए टेस्टसाठी वापरायला उपयोगात आणले.कारण ती बाई एक फोरेन्सीक एक्सपर्ट होती.शरदची अपराधी म्हणून अटक झाल्यावरही त्या होटेलमधे असेच गुन्हे होऊं लागले.पाच वर्षानंतर सबंध होटेलशी संबंधात येणार्‍या सर्वांची डीएनए टेस्ट घेतल्यावर त्या बाईने ओरबडलेल्या केसांच्या आधारावर मालकाच्या मुलाला पकडलं गेलं.आणि तशीच शरदची डीएनए टेस्ट घेतल्यावर सुटका झाली.खरं म्हणजे कमलावर झालेल्या अतिप्रसंगात शरदला ह्या मालकाच्या मुलाचा संशय होता.पण पोलिसाना सांगूनही त्यानी पैसे खाऊन त्या मुलाला ओळख परेडमधे आणलं
नाही."

हे ऐकून मी प्रो.देसायाना म्हणालो,
"आता मला कळलं खर्‍या पुराव्या आभावी न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर ती बहिरी आणि मुकी पण असते. असं तुम्ही का म्हणालात ते."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Mar 2009 - 8:06 am | सहज

http://today.msnbc.msn.com/id/29613178/?GT1=43001

अजुन एका खेड्यात हे असे घडले होते की काय?

:-)

सुनील's picture

11 Mar 2009 - 9:53 am | सुनील

कथांतील साम्य विस्मयकारक!

असो, पण हे कुठेही घडू शकते हेही खरेच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

11 Mar 2009 - 9:32 am | चिरोटा

..पण पोलिसाना सांगूनही त्यानी पैसे खाऊन त्या मुलाला ओळख परेडमधे आणलं
नाही

बहुतान्शि केसेस मधे घोडे इकडेच पेन्ड खाते.पैसे न खाता प्रामणिक्पणे पोलिस जेव्हा केस सादर करतात तेव्हा न्याय मिळाय्ला सहसा अडचण येवु नये.परन्तु हल्लि न्यायमुर्ती पण भुकेले असल्याने काहिच सान्गता येत नाही.
भेन्डि
बेन्गळुरु,बे एरिया,लन्डन सह् विशाल महाराश्ट्र झालापाहिजे.

अडाणि's picture

11 Mar 2009 - 11:48 am | अडाणि

विष्षण्ण करायाला लावणारी कथा आहे ... सत्यकथा असल्याने तर अजूनच....
-
अफाट जगातील एक अडाणि.

chipatakhdumdum's picture

12 Mar 2009 - 2:05 am | chipatakhdumdum

गेल्या तीस वर्षात गणपतीपुळ्याला अशी कुठलीही घटना घडलेली नाही. रत्नागिरीच्या सेशन्स कोर्टात अशी कुठलीही केस गेल्या तीस वर्षात चाललेली नाही. डी एन ए हे प्रकरण आपल्याकडे येउन फक्त पाच वर्ष झालेली आहेत. सामन्त साहेब कुठल्याही गावाच नाव खराब करण्यापूर्वी जरा विचार करा..

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Mar 2009 - 7:02 am | श्रीकृष्ण सामंत

नमस्कार chipatakhdumdum,
आपल्याला माझी "खोटी गोष्ट" खरी वाटून गणपतीपुळ्याचा "पुळका" येणं स्वाभाविक आहे. त्याबद्दल आपल्याला राग आला असेल तर मला त्याचं खूपच वाईट वाटतं.
अहो,मी कथा असं टायटलमधे लिहिलं आहे. सत्यकथा नाही.
आता कथेत समुद्रावर ट्रिप जात असेल तर मी गणपतीपुळ्याचा सुंदर समुद्र निवडला.
कमाल आहे बुवा.ती मुलांची नांव ती मुलं खरीच असतील तर असं कोण उघड उघड लिहिल कां?.
आणि कथेचा आशय "न्यायदेवता आंधळी नव्हेच तर बहिरी आणि मुकी आहे " ती कशी हे दाखवायचा होता.
आता एव्हडं खरं,
"ह्या कथेतलं गांव तसंच पात्रांची नांवं आणि इतर गोष्टी काल्पनीक आहेत.आणि कुणाशी याचा संदर्भ आल्यास तो केवळ योगायोग समजावा,ही सत्यकथा नव्हे."
असं लिहायला हवं होतं.
आता मी इतक्या कथा लिहिल्या आहेत मिपावर. किती लोकांची आणि किती गावांची नावं लिहिली आहेत सांगू.वरील प्रमाणे कुठे कुठे मी असं लिहित जाऊं.?
माझ्या सुबुद्ध वाचकांना हे कळतं अशी माझी समजूत मी करून घेतली.
ह्या कथॆची सव्वादोनशे वर वाचनं झाली असावीत.पण त्यातले तुम्ही "चिपटाखडमडम"(उच्चारात चूक असेल तर माफ करा.बरं का) एकच भेटलां बूवा.
शेवटी मी एव्हडंच म्हणेन,
मला आवडणार्‍या अनेक गांवापैकी माझ्या कोकणातल्या गणपतीपुळ्याला बदनाम करण्यासारखं काहीच मी लिहिण्याचं मनात आणलं नाही.आणि बदनाम करण्यासारखं कांही ही नव्हतं.अशा गोष्टी अनेक गावात होतात.झुम्रितलयात -ज्या गांवाचं नांव हिंदी "फिलमच्या ष्टोरीत" नेहमी वापरतात- त्यात सुद्धा.
एक विनंती,
"दिल-पे -मत- ले -यार"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

chipatakhdumdum's picture

12 Mar 2009 - 10:48 pm | chipatakhdumdum

सामन्त साहेब, माझी प्रतिक्रीया ही त्यावरील तीन प्रतिक्रीयान्च्या सापेक्ष होती..
पण मग खोटी गोष्ट खरी वाटावी हे तुमच यश...

भडकमकर मास्तर's picture

13 Mar 2009 - 12:42 am | भडकमकर मास्तर

गणपतिपुळे समुद्र ज्या वेळी कमी गर्दीचा होता वगैरे त्यावेळी अशी सर्रास डी एन ए टेस्ट होत होती काय ?
......
आता याला ह.घ्या. / दिल पे मत ले म्हणू नका

अवांतर :
काका, प्लीज कथा सांगायचा कधी वेगळा फॉर्म ट्राय करून बघा...
अमुक माणूस मला भेटला आणि त्याने तमुक गोष्ट सांगायला सुरुवात केली, असं सोडून काहीही...

अगदी पंचतंत्री कथा वाटते...
मग क्षपणक कोल्हा ऋष्यमूक नावाच्या मुंगुसाला म्हणाला," खरं प्रेम हे मृत्यूवरही विजय मिळवते ,हेच खरे.!!.."
"असं का बरे?" ऋष्यमूक म्हणाला.
" रे मुंगसा, ऐक.. फार पूर्वी विदिशा नगरीत ..................................................................................................................................... सारी कथा ऐकून न राहवून ऋष्यमूक क्षपणकाला म्हणाला,"खरं प्रेम हे मृत्यूवरही विजय मिळवते ,हेच खरे.!!.."

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Mar 2009 - 8:07 am | श्रीकृष्ण सामंत

सरजी,
पूर्वीच्या चित्रपटात हिरोईनचा तिन मिनटांचा गाण्याचा शॉट घ्यायला तिन चार दिवस किंवा तिन चार आठवडे लागायचे.तिने साडी कुठली नेसली होती.?वेण्या घातल्या होत्या की आंबाडा होता?
कुंकू गोलाकार होतं की लंबाकार होतं?.ह्याची पूर्ण यादी आणि नोंद ठेवावयला लागायची.असं असून सुद्धा
जरा बदल झाला की चित्रपटावर टिका लिहिणारे लेखक -पत्रकार भरपूर समाचार घ्यायचे.अहो त्या झाडाखाली तिची लाल साडी होती तिथून ईकडे धावत आल्यावर साडी निळी कशी झाली? तिच्या आंबाड्याची वेणी कशी झाली?
झालं डायरेक्टरवर हीss टिका व्हायची.
आणि वाचक पण खूप स्वारस्य घेऊन वाचायचे आणि स्वारस्य घेऊन चर्चा करायचे.
आणि आताच्या चित्रपटात त्याच तिन मिनिटाच्या गाण्यात हिरोईनच्या साडीचा (रंग) सोडाच- जे काय घातलंय ते- गाण्याच्या दुसर्‍या ओळीत बदलेलं असतं.पण कोण दखल घेत नाही.कारण त्यांना गाणं ऐकायचं असतं.म्हणून टिकाकारही असलं काही निदर्शनाला आणून द्दायला आपला वेळ घालवत नाहीत.
सरजी,
सांगण्याचा मतितार्थ असा की,
समजायचं हो! डिएनए काय आणि हाताचे ठसे काय
कथेची दिलचस्पी घेताना वाचकाला कथा भावली म्हणजे झालं.हल्लीच्या फास्ट जगातल्या प्रेक्षकाप्रमाणे हल्लीच्या फास्ट जगातल्या वाचकाला कुठे वेळ आहे?
"हाताचे ठसे" म्हणजे काय हे समजून घेण्याऐवजी-हल्लीतर हाताचे ठसे घेतही नाहित-डिएनए म्हणजे काय ते पटकन कळतं.अशी मी आपली समजूत करून घेतली झालं.
डिएनए लिहिताना हे माझ्या लक्षात आलं नाही अशातला प्रकार नव्हता. असो,
आता कथेच्या फॉर्म बदल म्हणत असाल तर ठिक आहे आपली सुचना.आपण उदाहरण दिलं आहे ते "पंचतंत्र" आहे आमचे हे नुसतंच " तंत्र" होतं.तुम्ही माझे मायबाप वाचक आहात तुम्हाला हवं तसा फॉर्ममधे बदल करण्याचा मी प्रयत्न अवश्य करीन.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

12 Mar 2009 - 7:56 am | प्राजु

ही कथा ही चांगली आहे.
या कथेतून बोधही मिळाला की, "क्षमा करायला शिकलं पाहिजे"
आवडली कथा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Mar 2009 - 8:52 am | श्रीकृष्ण सामंत

सहज,सुनील,भेन्डिबाजार,अडाणि,chipatakhdumdum,आणि प्राजु
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सँडी's picture

12 Mar 2009 - 9:15 am | सँडी

विषय चांगला!
मांड्णी विस्क्ळीत! अविश्व्सनीस मुद्दे बरेच!

पुढिल लिखाणाला शुभेच्छा!

अवांतरः सत्यकथा नसल्यास तसा उल्लेख करावा, गैरसमज होत नाहित.