कोण म्हणतो रात्र झाली
आत्ताच आमुच्या जीवनाची
आत्ता कुठे सुरवात झाली
फिरुनी पुन्हा या यौवनाची
नुकतीच साठी मागे सरुनी
यौवनाला जाग आली
बहर पुन्हा आला असा की
जीवनाची बाग झाली
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
रात्र थोडी जाहली पण
एक बाकी प्रहर आहे
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 2:02 pm | अनिल हटेला
गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे =))
पण छान मांडलीये कविता ......:-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
2 Mar 2009 - 3:16 pm | दिपक
सुंदर आहे!
प्रियेस माझ्या आजवरी मी
फुले कैक हो वाहिली
गंध ऐसा त्या फुलांचा
धुंदी आजही राहीली
मस्तच ! :)
--(वय फक्त २७) दिपक
3 Mar 2009 - 2:02 am | शरदिनी
खूप आवडली...
आपल्या कवितेतून असेच आनंद देत राहा
.. धन्यवाद...
3 Mar 2009 - 9:13 am | पिवळा डांबिस
त्याच गंधाने अजुनी
जेवनाचा बहर आहे
(गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे)
ते मुद्दाम सांगायची गरजच नाही!
ह. घ्या...
:)
3 Mar 2009 - 9:33 am | प्राजु
कविता तर सुंदरच आहे.. पण डिस्क्लेमर एकदम छान आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 11:05 pm | क्रान्ति
मस्त कविता आहे.
क्रान्ति
4 Mar 2009 - 6:50 pm | पुष्कराज
सर्वांना धन्यवाद