आज तु आठवलीस
आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले
कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले
खंत यासाठी की,
मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी
गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी
भीती नव्हती बोलण्याची,
हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची
भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही
अन् आनंदाचे यासाठी की,
आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस
अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस,
ताल बिघडले मनाचे,
हो तालचं बिघडले मनाचे
कारण तु सुरचं घेऊन गेलीस
आता आजही शोधत असतो फक्त तुला,
कधी मोगर्याच्या गंधात
कधी फुलांच्या पाकळ्यात
कधी सागराच्या लाटेत
कधी चंद्राच्या चांदण्यात
तर कधी तार्यांच्या अंगणात
अन तु भेटतेसही मला
कधी एकांताच्या कोन्यात
कधी विरहाच्या तळात
कधी मौनाच्या शब्दात
कधी सुरांच्या मैफलीत
तर कधी या कवितेच्या पानात.
आज फक्त तुला आठवतो
कारण वेळ माझी केव्हाच गेली
पण वाट पाहतो तुझी आजही
कारण तुझी वेळ अजुन नाही गेली
कधीतरी तुला कळेलही
सुर माझा गवसेलही
शब्द माझा एेकशीलही
मागे वळुन पाहशील ही
मी उभा असेन तिथेच
जिथे तुला पाहीले
अन् शब्द माझ्या कवितेतील
जिथे पुर्वी हरवले
मी असेन तिथेच
वाट पाहत फक्त तुझी.
-प्रदिप काळे.(मुक्त कलंदर)
माझा ब्लाॅग : मुक्त कलंदर