सातवा वेतन आयोग – मरा बाबू सव्वा लाख का

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
3 Jan 2016 - 12:56 pm

(कथेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत).

सातव्या वेतन आयोगाची रिपोर्ट आली. वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराशच केले. घरभाडे न घेणाऱ्या लाला दुखी चंद (LDC)च्या पगारात तर चक्क बामुश्कील १ टक्का वाढ झाली आहे. विम्याची रकम वजा केल्यास फक्त ५ रुपये. इतरांच्या बाबतीत जास्तीस्जास्त ४ टक्का. [(http://www. govtempdiary.com/2015/12/7cpc-pay-net-increase from-1-to-4/ 17400) The 7th CPC has cheated the 35 lakhs Central Government Employees and 50 lakhs pensioners, by announcing meagre 14.29% wage hike, in actual term of increase for serving employees after deduction of Income tax, enhanced subscription of CGEIS, licence fee, CGHS etc the net increase is actually varies from 1% to 4 % increase] असो.

हत्ती पाळणे भारी खर्चाचे काम. पण एकदा हत्ती मेला कि त्या मेलेल्या हत्तीच्या दाताला बाजारात भारी किमंत मिळते. म्हणूनच म्हणतात ‘मरा हाथी सव्वा लाख का’. सातव्या आयोगाच्या अनुसार कार्यरत कर्मचारी मेला तर त्याच्या आश्रितांना विम्याचे १५-५० लाखापर्यंत रकम मिळेल.

कालचीच गोष्ट ऊन खाण्यासाठी दुपारी लंच मध्ये खाली उतरलो. रस्त्यावर एका झाडाखाली खाली सुनील आणि मेथ्यु उभे होते, त्यांना पाहून कपाळावर आठ्या आल्या. शिकारीसाठी दबा धरून बसलेले हिंस्त्र जनावर आणि या दोघांमध्ये काहीही फरक नाही. त्यांची नजर चुकवून जाऊ लागलो. पण कसले-काय. डोळ्यांवर चष्मा असला तरी सुनीलची नजर उल्लू प्रमाणे दूरचा भक्ष्य ओळखण्यास समर्थ. त्याने दुरूनच आवाज दिली, पटाईत, नजर चुकवून कुठे पळतोस, आम्ही इथे तुझीस वाट पाहतो आहे. कपाळावर आलेल्या आठ्या दिसू न देण्याचा प्रयत्न करीत मी विचारले ‘माझ्यावर एवढी कृपा का?"
काहीही झाले तरी आम्ही तुझे सहकर्मी, तुझी काळजी आम्हाला राहणारच. कशी प्रकृती आहे तुझी.
‘मस्त’.
छाती वैगरेह तर दुखत नाही न?
‘नाही’.
दवा-दारू वेळच्या-वेळी घेतोस न.
‘हो’.
सुनील अत्यंत केविलवाणा चेहरा करून म्हणाला दारू घेणे तुझ्या प्रकृतीस योग्य नाही. तुला तर वास हि घेतला नाही पाहिजे.
मी रागानेच म्हणालो, तुला माहित आहे, मी दारूला स्पर्श हि करीत नाही.
सुनील: स्ट्राने दारू पिणार्यांना, दारूला स्पर्श करण्याची गरज नसते.
आता मात्र तळपायाची आग मस्तकात पोहचली, मी त्याला खडसावले, तुला म्हणायचे तरी काय आहे? परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे पाहून, मेथ्यु मध्ये टपकला, अरे पटाईत आम्ही तुझे सच्चे दोस्त, आम्हाला तुझी काळजी आहे, कालच चर्चमध्ये तुझ्यासाठी दुआ मागितली. गाॅड, पटाईतला निदान सातवे वेतन आयोग लागू होयेस्तो जिवंत ठेव, नंतर बेशक त्याला जहनुमला डीस्पेच केले तरी चालेल.
या पेक्षा अधिक काय अपेक्षा तुमच्या सारख्या मित्रांकडून ..
सुनील माझे वाक्य तोडत म्हणाला, पटाईत तुला कळत कसे नाही, तुझ्या सारखा टूटा-फूटा जिगरवाला जवळपास निकामी पुरुष आज गेला कि उद्या गेला कुणाला काहीही फरक पडणार नाही. आम्हाला तर वहिनीची काळजी आहे, जर तू आत्ता वर गेला तर वहिनीला विम्याचे जास्तीस्जास्त लाख रुपया मिळेल. पण पे कमिशन नंतर गेला तर, विचार कर, मोटी पेंशन, gratuty दहा लाखांपेक्षा जास्त आणि विम्याचे पन्नाssस लाख. पाहिले आहे का कधी? एवढे पैशे असले तर वहिनींना या वयात हि निदान तुझ्या पेक्षा चांगला नवरा भेटेल. शिवाय आमच्या सारखे देवर....

आता माझी सटकलीच. उगारायला हात वर केला. पण काय करणार दोघेही पसार झाले आणि दूर उभे राहून दात दाखवत माकडांसारखे खी-खी हसू लागले. माझे सहकर्मी मित्र म्हणजे एकापेक्षा एक नमुने. यांचे काय करावे कधी-कधी मलाच समजत नाही.

पण एकमात्र खरे, सातव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचार्यांना निराश केले असले तरी हि वाढलेल्या विम्याच्या रकमे मुळे ‘मरा बाबू पन्नास लाखाचा’ होणार हे निश्चित'.

विडंबनआस्वाद

प्रतिक्रिया

मरे आप के दुश्मन, पटाईतकाका.

एक शंका - सरकारी नोकरांचे पगार इन्फ्लेशन लिंक्ड का नसतात? दर दोनतीन वर्षांनी वेतन आयोग बसवायची वेळ का येते?

सत्याचे प्रयोग's picture

3 Jan 2016 - 1:48 pm | सत्याचे प्रयोग

सरकारी वेतन आयोग दर दोन तीन वर्षांनी नाही दर दहा वर्षांनी लागू होतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Jan 2016 - 2:35 pm | कैलासवासी सोन्याबापु

दर दहा वर्षांनी आमचे पे अप्रैज़ल होते हो! ह्यावेळी सरकार ने निराशाच केली आहे एकंदरीत , तरीही फील्ड मधे काम करणारा म्हणून मला एक आनंद आहे तो म्हणजे ज्यांना आपण "बाबु" म्हणतो त्या सगळ्या मिनिस्टीरियल स्टाफ ला लैच माणुसकीत आणले आहे ह्या पे कमीशन ने! आजवर सर्वाधिक पे हाइक देणारे पे कमीशन म्हणजे ५वे पे कमीशन ज्याने माझ्यामते ५४% पे हाइक दिला होता

विवेकपटाईत's picture

3 Jan 2016 - 6:49 pm | विवेकपटाईत

पाचवे पे कमिशन सर्वात चांगले होते. दर ५०% महागाई वाढल्या वर DA मर्जची व्यवस्था होती. तीच सुरु राहिली असती तर कर्मचार्यांना जास्त फायदा होता. ७व्या आयोगात नौकरीमध्ये मरणार्या कर्मचारीला जास्त फायदा आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jan 2016 - 7:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सरकारी कर्मचार्‍यांचे हाबिणंदन. आता तरी सामान्य लोकांची कामं वेळेत करतील ही आशा.
टेबलाखालुन खा खा खाणार्‍यांना आणि सामान्य जनतेला नाडणार्‍या "पिंपांना" आता {तरी} लाज वाटु दे रे म्हाराजा.
टोकन सिस्टीम सगळ्या सरकारी हापिसात होउ दे रे म्हाराजा.
सामान्य नागरिकांचं शोषण करणार्‍या एजंटांचं शोषण होउंदे रे म्हाराजा. एजंटाना साथ देणार्‍या "शिट्स्टिम" ला रोग येउंदे रे म्हाराजा.
प्रामाणिक (दुर्मिळ) सरकारी अधिकार्‍यांना बढती मिळुं दे रे म्हाराजा.
स्वतःचा जीव धोक्यात घालणार्‍या सैनिकाला, पोलिसाला, अग्निशामक दलाला, होमगार्डांना अजुन चांगली बढती मिळु दे रे म्हाराजा.

नाखु's picture

4 Jan 2016 - 12:30 pm | नाखु

ल्हिण्यासाठीही चिम्ण्या मिपावर येऊ दे रे महाराजा!!!

देवाक काळजीवाला नाखु

tushargugale's picture

4 Jan 2016 - 4:08 pm | tushargugale

Hi

विवेकपटाईत's picture

4 Jan 2016 - 7:21 pm | विवेकपटाईत

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. २००४ नंतर केंद्र सरकारात रुजू होणार्या कर्मचार्याना पेंशन नाही या दृष्टीने विचार करून अकाली मरण पावणार्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराचे हित पाहण्यासाठी विमा रकम १५-५० लाखांपर्यंत निश्चित केली आहे. बाकी निराशाच.

केंद्र सरकारच आहे जिथे कर्मचार्यांची इमानदारीने होते. कर्मचारी हि निष्ठेने कार्य करतात. कधी हि रायसीना पर्वतावर या. रात्री ९ वाजतां हि गजबज दिसेल. कर्मचारी १२-१२ तास काम करतात. ते हि बिना कसला हि भत्ता घेता. गरज पडली तर कधी कधी घरी हि जात नाही. या सिस्टिमला रोग लागला तर देश कोलमडून पडेल.

श्रीरंग_जोशी's picture

4 Jan 2016 - 9:52 pm | श्रीरंग_जोशी

या मुद्द्यावरचं भाष्य भावलं.

लेखातले हिंदी संवाद अन वाक्प्रचार खूप आवडले.

राघवेंद्र's picture

4 Jan 2016 - 10:09 pm | राघवेंद्र

२००४ नंतर केंद्र सरकारात रुजू होणार्या कर्मचार्याना पेंशन नाही पण राज्यपाल, खासदारांना ४ वर्षे झाली की पेंशन. यावर काही करू शकत नाही का ?