स्पंदने आणि कवडसे
आपल्या मनात अनेक विचार व त्याची स्पंदने येत असतात. स्पंदने म्हणजे vibrations, मनातील कंपने. काही विचार मनात घर करतात. वाचताना - दुसऱ्याशी बोलताना हि विचारधारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्यासारखी शब्दरूप धारण करतात.
ह्याच भावनेतून जन्मलेले हे वाक्य आहे आणि ते अनेक लोकांच्या बाबतीत सत्यही आहे असे मला वाटते.
---------------------------------------------------
बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीच गोष्ट संपत नाही - त्याचा शेवट होत नाही. ज्याला आपण शेवट म्हणतो तेव्हा ह्या शब्दात नवीन सुरवातीच्या पाऊल खुणा दडलेल्या असतात. बघा विचार करून.
प्रतिक्रिया
2 Jan 2016 - 10:37 am | मुक्त विहारि
मान्य...
2 Jan 2016 - 12:07 pm | हेमंत लाटकर
सुधीर वैद्य, असे विचारांचे दवबिंदू सारखे धागे टाकण्यापेक्षा मुसळधार पावसासारखा मोठ्ठा धागा टाका.
2 Jan 2016 - 12:39 pm | मुक्त विहारि
पुढे आहेच पावसाळा..