अळुची भाजी खाऊन वाचलो तर…...

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
8 Nov 2015 - 8:04 am

अण्णांचं नुकतंच लग्न झालं होतं.नेहमीच्या रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांच्या सासरवाडील एका लग्नाच्या निमीत्तानं जेवायला बोलावलं होतं.ताट, पाट मांडून पंगत तयार झाली होती. सर्वांना आपआपल्या पाटावर बसायला आमंत्रण दिलं होतं.जांवयाचा मान म्हणून त्यांच्या ताट्पाटा सभोवती रांगोळी घालून त्याची जागा सुशोभीत केली होती. प्रत्येकाच्या ताटात थोडं मीठ,लिम्बाची फोड,बाजुला चिमुटभर ताज्या खोबर्‍याची चटणी, ताटाच्यामध्यभागी गरमागरम वाटी भरून भात,त्यावर पिवळंधमक वरण,वरणावर चमचाभर साजुक तूप,वरतीकडेला दोनही बाजुला वांग्याचा मसालेदार भात,आणि बटाट्याची भाजी असा थाट होता.ताटाच्या बाहेर लक्ख पितळेच्या वाटीमद्धे तांदळाची खिर,ताकाची वाटी आणि एका मोठया वाटीत घरच्याच बागेतली लोण्यासारखी मऊ शिजलेली अळुची भाजी वाढलेली होती.ही अळुची भाजी अण्णांच्या सासुबाईची खास डिश होती.
”पुंडलीक वरदे हरी विठ्ठल”
अशी घोषणा केल्यावर मंडळीनी जेवायला सुरवात केली.अण्णांना अळुच्या भाजीचा पुर्वी पासून तिट्कारा होता.जे आपल्याला आवडत नाही ते ताटातून पटकन खाऊन टाकायचं ही त्यांची संवय.त्यानुसार ते अळुची वाटी पटकन रिकामी करून टाकीत होते.सासुबाईना खूप आनंद व्हायचा आपल्या जांवयाना आपण केलेलं अळु खूपच आवडलं म्हणून त्या परत परत त्याना वाटीत अळु वाढायच्या.आणि अण्णा तिची पाठ फिरल्यावर पट्कन अळु फस्त करायचे.असे खूप वेळ झाल्यावर त्यांना कळेना,
”काय करावं की सासुबाईना आता पुरे झालं ,मला अळु मुळात आवडत नाही आणि तुम्ही मला नका वाढू.हा त्यांना कसा संदेश देऊ?”
तेव्हड्यांत काही तरी विषय बोलावं म्हणून एकाने अण्णांना विचारलं,
”काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?”
अण्णानी ह्या संधीचा फायदा घेवून ते म्हणाले,
“तसं म्हटल तर आम्ही पांच भावंडं ह्या अळुवातून वाचलो तर! नाही पेक्षा चार.”

प्रश्न करत्याला काय कळलं असेल ते कळो पण अण्णांच्या सुबुद्ध सासुबाईला याचा अर्थ कळला नसेल तर नवलच.तिने त्यांना अळु वाढायचं थांबवलं.
बोलून चालून ती अण्णांचीच सासुबाई होती म्हणा.

पण नंतर अण्णांना खूपच वाईट वाटलं.आपण असं बोलायाला नको होतं.असं त्याना वाटू लागलं.त्यांनी सासूबाईंची माफी मागितली.
ते म्हणाले,
“आपण एव्हडं आवडिने अळू वाढत होता.आणि मी ते मला आवडत नाही म्हणून ताटातून फस्त करीत होतो.यापुढे मला जो पदार्थ आवडत नाही तो शेवट पर्यंत ठेवण्याची संवय लाविन.म्हणजे तो पदार्थ ताटात असल्याने कुणी मला परत वाढणार नाही.”
संध्याकाळी चहाच्या वेळेला अण्णांच्या थाळीत बेसनाचे लाडू,आणि काजूचे लाडू होते.अण्णा काजूचे लाडू आवडतात म्हणून खात होते,बेसनाचे लाडू आवडत नाहीत म्हणून त्याला हात लावत नव्हते. काजूचे लाडू जांवयाना आवडतात म्हणून सासूबाई परत परत आणून वाढत होत्या,आणि अण्णा लाडू फस्त करीत होते.
“काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?”
असा परत प्रश्न विचारील का कुणी म्हणून अण्णा परत वाट बघत होते.

श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

विनोदलेख

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

8 Nov 2015 - 8:30 am | चांदणे संदीप

सासूबाई भलत्याच वाढाळू! अळू काय काजूचे लाडू काय!

'जावयकी जान लेंग्या काय?' ;-)

एक एकटा एकटाच's picture

8 Nov 2015 - 8:41 am | एक एकटा एकटाच

लयभारी प्रतिसाद

एक एकटा एकटाच's picture

8 Nov 2015 - 8:40 am | एक एकटा एकटाच

मस्तय

पद्मावति's picture

8 Nov 2015 - 1:31 pm | पद्मावति

मस्तं मजेदार कथा.