मांडकुली एक खेडेगांव

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
13 Aug 2008 - 8:18 pm

दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बऱ्याच लोकानी पाहीले नसावं.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवं लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असतं.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरं पाण्याचे डबकं दसतं.

उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झाडाच्या खोडाची कमान बनवून एका टोकाला जड दगडाची रास बांधून दुसऱ्या टोकाला उभी लांब बांबूची काठी बांधून त्या बांबूच्या दुसऱ्या टोकाला कोळंबं लटकत राहील असं बांधायचं किंवा चामड्याची पखाल बांधायची.

आणि ही सर्व योजना दुसऱ्या एका गोल लाकडाला आडवं ठेउन दोन बाजुला आधार दिल्यावर त्याच्या मध्यभागी बांधल्यावर कोळंब्यावर बळेच पायाने ढकलून पाण्याचा उपसा करता येत असे.

बाबू मांडकुलकर पाहाटे पासून दुपारची तीरीप येयी पर्यंत पाण्याचा उपसा करायचा.घरून निघताना मडकं भरून उकड्या तांदळाची पेज आणि फणसाची भाजी घेउन यायचा आणि दुपारच्या वेळी फस्त करायचा. एव्हांना तो अख्या शेताला पाणी पुर्वावयाचा. ईलेक्ट्रीक पंप आल्यावर हे सर्व सोपं झालं.तर अशी ही नदी पार करून शेताच्या पायवाटेवरून चालत चालत गेल्यावर दोन एक मैलावर मांडकुली गांव लागतो.वाटेत उंच उंच आंब्याची झाडं,करवंदाची झुडपं,उभी सोट जांभळाची झाडं,काळ्याभोर जांभळांचा झाडाखाली पडलेला सडा.तो तुडवीत जाताना पुढे गांवकरी (मांडकुलकर) राम राम म्हणत भेटायचे. "वेंगुर्ल्याचे चाकरमानी मावशीकडे पाहुणचार घेउक ईलेले दिसतंत" असे पुढे गेल्यावर आपआपसांत पुटपुटायचे.

रानातून चालताना पायाखाली कुरकुर करणाऱ्या पाल्यापाचोळ्याचा आवाजांत हे त्यांचे संवाद ऐकू यायचे.वेंगुर्ल्याहून पहाटे पहाटे निघालं तर मावशीच्या घरी चालत चालत यायला सकाळचे आठ वाजायचे. तोपर्यंत घरची सगळी मंडळी चहा पिण्याच्या तयारीत असायची."आम्ही वेंगुर्ल्याहून ईलो रे"असे मालवणीत ओरडून सांगितल्यावर मावशीच्या कानांत बरोबर शब्द पडायचे.आणि बहिणीची मुलं आल्याचे पाहून अगदी खूष व्हायची.मग त्यांच्या बरोबर गरम गरम बटाटे पोहे खात गप्पा व्हायच्या.

आमची मावस भावंडपण खूष व्हायची.मग त्यांच्या बरोबर गाईला आणि अलिकडेच झालेल्या तिच्या पाडसाला घेऊन शेतातल्या कुंणग्यातून वाट काढीत नदी वर जायचो.थंडगार नदीच्या पाण्यात पोहायला खूप मजा यायची.कधी कधी नदीतले मासे पकडणाऱ्या लोकांकडून मासे "गुंजुले,बुरायाटे.कोलंबी "विकत घेऊन दुपारच्या जेवणाला मावशीकडे आणून द्यायचो.बरेच वेळेला घरातली मोठी मंडळी कुडाळला बाजार करायला जायची.कुडाळ तीन मैल लांब होतं.चालत जायला मजा यायची.भाताच्या शेतातून जमीन तुडवत जाताना, कोवळ्या तांदळाच्या रोपाच्या तुरावरच्या कणसाचा वास अजून नाकात घुमतो.

कुडाळचा बाजार सर्व द्रुष्टीने भरलेला असायचा. बटाटे,टोम्य़ाटो,मोठ्या ढबू मिरच्या आंणि जमल्यास मोठी मासळी "सरंगे,ईसवण,मोरी,बांगडे" यापैकी काही आणायला मावशी सांगायची.भरपूर नारळाचा रस घालून आंबट,तीखट तीखले किंवा आमटी करण्यात मावशीचा हातखंडा होता.कुडाळहून चालत तीन मैल आल्यावर तसं दमायला व्हायचे.पण मावशीच्या हातचे सुग्रास जेवण जेवल्यावर अशी काय झोप यायची की मग "चहाला उठा"
म्हणून मावशीच्याच मोठ्या आवाजाने जाग यायची.

संध्याकाळचा काळोख पडल्यावर मिणमिणत्या दिव्यात रात्रीचे किती वाजले ते कळ्त नसत.दुसऱ्या दिवशी काका बरोबर कवडे मारण्याच्या मोहीम वर जायला मजा यायची.काकांची छेरे वाली डबल ब्यारलची बंदुक हे मोठे आकर्षण असायचं.रानात फिरता फिरता उंच उंच झाडावरचे पांच सहा कवडे काका अचूक टिपायचे.लहानपणी ह्या निरप्राध पक्शाना मारण्याच्या ह्या क्रुर खेळाबद्दल दयेचा पाझर फुटत नव्ह्ता.त्यात गैर काय ते आता कळल्यावर वाईट वाटतं.

कधी तरी रानात जाऊन करवंदं,जांभळं,बोंडू,कैऱ्या आणून त्याची करमट करून खायला मजा यायची. दुसऱ्या दिवशी चहा झाल्यावर दुपारी दहा वाजतां उकड्या तांदळाची पेज वालीची भाजीत्याबरोबर खोबऱ्याची कातळी असा दुसरा ब्रेकफास्ट असायचा. ऊकड्या तांदळाचा पेजेचा नीवळ गोड आणि पोषटीक असायचा.असा आठवडा कधीच निघून जायचा.परत वेंगुर्ल्याला जायचे दिवस आले की आम्हाला आणि मावशीला खूप वाईट वाटायचं.अगदी निघण्याच्या घटकेपर्यंत डोळे पुसत पुसत घराच्या मागे आम्ही दिसे न दिसे पर्यंत ती उभी असायची आम्ही पण तिला मागे वळून पहात हाताने घरात परत जा म्हणून डोळे पुसत खूणवत असूं.पुन्हा तेच भाताचे कुणगे तुडवत तुडवत परतीच्या वाटेला लागत असूं.अर्ध्या मार्गावर पोहोचल्यावर मावशीची आठवण पुसट पुसट व्हायची आणि आई आता लवकरच दिसणार म्हणून आई डोळ्या समोर यायची.दुपार पर्यंत वेंगुर्ल्याला पोहोचायचो.आठ दिवसाच्या विरहाने कष्टी झालेली आई आमचे गोड कौतुक करायची. त्याने आम्ही ही सुखावयाचो.रात्री शांत झोपल्यावर स्वपनात मांडकुली, ते घर आणि मावशी यायची.आणि खडबडून जाग आल्यावर ते स्वप्न होते याचं वाईट वाटायचं.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

13 Aug 2008 - 8:47 pm | लिखाळ

मजा आली वाचताना.
--लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2008 - 9:39 pm | श्रीकृष्ण सामंत

लिखाळजी,
असं आपल्याकडून लिहिलेलं वाचून खूप बरं वाटतं.
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

13 Aug 2008 - 8:51 pm | रेवती

लहानपणी कोकणात काकांच्याकडे उन्हाळ्यात जवळजवळ दर वर्षी आंबे खायला जायचो. मनाने परत एकदा फिरुन आले. चूलीवर तापवलेल्या अंघोळीच्या पाण्याचा वास दरवळला. काही वर्षामागे काकांचे दोन्ही दवाखाने सिमेंट काँक्रिट्चे झाले आणि पेशंटस ओसरीऐवजी मोल्डेड खुर्च्यांवर डाक्तर साहेबांची वाट पाहू लागले. शेणाने सारवलेल्या घराचा बंगला झाला. चूलीच्या जागी गॅसचा सिलिंडर आला. सत्तरीचे काका आता जून्या आठवणीत रमतात. कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय.

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2008 - 9:51 pm | श्रीकृष्ण सामंत

रेवतीजी,
आपल्या अनुभवाचे फार सुंदर वर्णन केलंत.
"बदल" हा निसर्गाचाच नियम आहे.त्यामुळे आपण लिहिलेले कोकणात झालेले बदल अपेक्षीत आहेत.

"कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय."
बिचार्‍या काकांचा जीव हळहळतो."

हरकत नाही निदान आपल्या तोंडून "आखो देखा हाल"आपल्या लेकाने ऐकल्यावर त्यालाही मजा येईलच.
प्रतिक्रिये बद्दल आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

13 Aug 2008 - 8:58 pm | प्राजु

काका,
तुमचे असे कोकणांतल्या आठवणींचे लेख वाचले की एकदम फ्रेश वाटतं. अतिशय सुंदर आठवणी.
मस्त एकदम.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2008 - 10:09 pm | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
आपली अशी प्रतिक्रिया वाचून किती बरं वाटतं.कमीत कमी एका तरी व्यक्तिला आनंद देण्याचं श्रेय मिळाल्याने बरं वाटतं.
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com