बंद ओठ बंद कान मनही बंद का हो?
न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
का लढवय्या आता बदनाम होत आहे
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा आता दबला आवाज येथे
खोट्यांचाच येथे चित्कार आहे
------ शब्दमेघ
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 3:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात... क्या बात.....
जीवघेणी रचना आहे......
संपलो....
12 Apr 2011 - 3:50 pm | निनाव
अतिशय भन्नाट रचना.. आहाहा.. मस्त गणेशा.. चेंडु उंच फटका मारून दर्शकां कडे भिरकावण्यात आलेला आहे.. :)
12 Apr 2011 - 4:15 pm | प्रकाश१११
गणेशा -अति उत्तम
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
हे खूप आवडले .खूप शुभेच्छा !!
12 Apr 2011 - 5:01 pm | ajay wankhede
व्वा. गुरु़ जि जबरदस्त
13 Apr 2011 - 1:07 am | बन्या बापु
जबरदस्त
13 Apr 2011 - 7:05 pm | प्राजु
तुमच्या रचनांमध्ये मला सगळ्यात आवडलेली रचना.
अभिनंदन!
14 Apr 2011 - 11:47 am | हरिप्रिया_
मस्तच...