Skip to main content

डंकर्क

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 06/06/2010 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क हून लाखो ब्रिटीश - फ़्रेंच सैनिकांची जर्मनांच्या तावडीतून झालेल्या सहीसलामत सुटकेला काल ( ४ जून ) ७० वर्षं झाली, दुसया महायुदधाच्या घटनाक्रमातील एक अत्यंत महत्वाची घटना. १९३९ पासून फ़्रेंच आणि ब्रिट्ननं जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटीश सैन्य फ़्रेंच हद्दीत तळ ठोकून बसलय आणि तिकडे जर्मन सैन्य युद्धाची कसून तयारी करतय अशी अवस्था.. १० मे ला चर्चिल पंतप्रधान झाले आणि जवळजवळ त्याच मुहूर्तावर हॉलंड,लक़्झंबर्ग आणि बेल्जियम वर जर्मनीचा हल्लाबोल झाला. ब्रिटीश सैन्य अर्डेन जंगलाकडं जर्मन सैन्याकडून काहीही विरोध न होता रवाना झालं आणि हाच एक पूर्वनियोजित सापळा होता, इकडे हजारो नाझी रणगाडॆ मित्रराष्ट्रांच्या सैनिकांची वाटच पहात होते. बेत असा की मित्रसैनिकांच्या तुकडयांना वेगवेगळं पाडून नंतर यथेच्छ सावकाश समाचार घेणे. मध्यंतरीच्या काळात ब्रिटीश हवाइदलाचे पूल, रेल्वेलाइन्स उडवून नाझींची घोडदौड रोखायचे प्रयत्न चालू होते पण यानं जर्मन काही फ़ारसे बधत नव्हते कारण त्यांच्या कारवाइचा अतिप्रचंड वेग. मित्रसैनिकांच्या फ़ळ्या फ़ोडायला सुरूवात झालीच ... German advance ब्रिट्नच ७५ % सैन्य फ़्रेंच हद्दीत अड्कून पडलय आणि जर हिटलरची ब्रिटन्वर हल्ला करण्याची योजना सफ़ल झालीच तर लढायला सैन्यच नाही अशी अत्यंत आणीबाणीची परिस्तिथी पंतप्रधान्पद हाती घेतल्यावर पहिल्या आठवड्यांतच चर्चिल समोर आ वासून उभी ठाकली.जर जर्मनीनं फ़्रान्सची बंदरं ताब्यात घेतली तर समुद्रकिनायावरून सैन्याची सुटका करायच्या आपत्कालीन योजनेवर इकडे लंडन मध्ये १४ तारखेपासूनच पर्यायी उपाययोजनांवर तर्क वितर्क चालू झाले, व्हाइस एड्मिरल रामसेंच्या नेतृत्वाखाली ह्या योजनेला आकार द्यायला चालू झाला, अर्थातच वेळ खूप कमी. समुद्रकिनार्‍यावरून सैन्याची सुटका करायची हा एकमेव मार्ग पण समुद्रकिनार्‍याजवळ उथळ पाण्यात युद्धनौका नेणं तेही वरून बॉम्बफेक होत असताना पराकोटीच अशक्य होत. जनतेला सगळ्या वैयक्तिक मालकीच्या नावांची ची माहिती सरकारजमा करायच आवाहन केलं गेलं. याचदरम्यान जनरल गोर्ट ( फ्रेंच हद्दीतल्या ब्रिटीश फौजेचे कमांडर ) ना फ़्रेंचांनी मोर्चा दक्षिणेकडे वळविण्याची विनंती केली पण ह्यात पूर्ण मित्रसैन्य जर्मन फ़ौजांनी वेढलं जाउन घात होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून जनरल गोर्टनी आपल्या सैन्याला २३ मे ला डंकर्क कडे मोर्चा वळ्वायची आज्ञा दिली आणि चर्चिल कडे तत्काळ मदतीची मागणी केली, चर्चिलचा माघार घ्यायला जोरदार विरोध होता पण जनरल गोर्ट् वास्तवाची जाणीव करून देउन निर्णयावर ठाम राहिला ... पण हा परतीचा प्रवास अत्यंत अवघड होउन बसला, ब्रिटीश वायुदळ जर्मन सैन्याला कूच करायला अवघड जावं म्हणून पूल, रेल्वेलाइन उडवत होते पण आता त्यामुळं मित्रसैनिकांचा मागं येण्याचा मार्ग अजूनच खडतर झाला. जर्मन वायुदळाची मात्र प्रचंड बॉम्बफेक चालू होती, आणि डंकर्क कडे जाण्याचा मार्ग तासागणिक दुष्कर होत चालला. पण २४ मे ला हिटलरनी नाझींच्या घोडदौडीला लगाम घातला आणि थांबायला सांगितलं( हा एक कलाटणी देणारा क्षण आणि वादाचा मुद्दा ). या सगळ्या भानगडीत ब्रिटीश संसदेत आपण हिटलरशी बोलणी करून हे सगळ मिटवून घेउ असा सूरही दिसायला लागला, पण चर्चिलन व्हाइस ऎड्मिरल रामसे ना त्यांची योजना कार्यरत करायची प्रवानगी दिली, पुढच्या ३ दिवसांत जनतेच्या मालकीच्या (हौशी, लाइफ बोट्स, मासेमारीच्या नावा ) नावा ताब्यात घेउन त्यावरील अनावश्यक असं सगळं सामान काढून घेतल गेलं ( तितके जास्त सैनिक वाचतील म्हणून), योजना ४५००० सैनिकांची सुट्का समुद्रकिनायावरून छोट्या नावांतून खोल पाण्यात असणाया युद्धनौकेपर्य़ंत करणे अशी; अगदी टॅक्सी सर्व्हिस सारखी. शेकडो नावांची चाचणी घेण्यात आली आणि सुयोग्य अशा ( मच्च्छिमार बोटी, हौशी बोटी इ.) बोटी तयार करण्यात आल्या. पण सैन्यदलानं सामान्य नागरिकांना युद्धभूमीवर कायदेशिर रित्या घेउन जाता येत नाही म्हणून जागच्या जागी बोट्मालकांना नौदलात नोकरी दिली गेली. आंणि २६ मे ला, पंतप्रधानपद हाती घेतल्याच्या १६ व्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ऑपरेशन डायनॅमोचा 'आर या पार' असा चर्चिलनं श्रीगणेशा केला, नौदलाच्या नेतृत्वाखाली या छोट्या नावा सैन्याला वाचवायला रवाना झाल्या.. little ships २ दिवसांत ४५००० जवानांची सुटका असं टार्गेट ठरलं गेल पण खाडीच्या पलीकडे साडेतीन लाखांनी अगोदरच मोर्चा डंकर्क कडे वळवला होता.सैनिकांकडं नकाशे नाहित, काही तुकड्या चुकून उलट्या दिशेकडे निघाल्या..प्रचंड गोंधळाच वातावरण पसरलं. सैनिकांजवळ्ची शस्रास्र्त जागे अभावी आणि जर्मनांच्या कामी येउ नयेत म्हणून परतीपूर्वी निकामी करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान जर्मनांनी सगळा बेत ओळ्खला आणि धुवांधार बॉम्ब्फ़ेक चालू झाली..प्रथमदर्शनी ठरवलेला मार्ग ( शॉर्ट्कट )बदलण्यात आला आणि लांबच्या मार्गान मोहिम रवाना करण्यात आली.. अन्नपाण्याविना २-३ दिवस चालून, वरून जर्मन विमानं बॉम्बिंग करतायत अशा अवस्थेत सैनिक या छोट्या बोटींची रांगेत वाट डोळ्यांत जीव आणून पहातायत, अशा वेळी शिस्त पाळली जावी म्हणून रांग मोडणार्‍याला जागीच गोळ्या मारण्याचे आदेश दिले गेले... On job queue जर्मन फौजा घडोघडी पुढं सरकत होत्या, अशात अडीच लाखांवर ब्रिटीश सैनिक्म्ची सुटका झाली. यात बर्‍याच छोट्या नावा,वाट पहाणारे सैनिक जर्मन बाँम्ब ना बळी पडले..व्हाइअस अॅडमिरल रामसेच्या अंदाजानुसार ४ दिवसानंतर छोट्या नावा पाठवण अत्यंत अवघड होत पण फ़्रेंच सैनिकांसाठी आजून १ दिवस मोहिम चालवली आणि एकून जवळ जवळ साडेतीन लाख सैनिक सोडवले गेले. ४ जून ला पहाटे मोहिम संपली आणि सकाळी ९ ला जर्मनांनी डंकर्क ताब्यात घेतलं. या सगळ्यात जवळजवळ ६५००० सैनिक मारले गेले, बरेच युद्धकैदी झाले, पण जे साडेतीन लाख सुटले त्यांच्या सुटकेत या छोट्या नावांचा सिंहाचा वाटा होता. बर्‍याच नावांनी आणि नाव चालक धारातीर्थी पडले. या सुटकेशिवाय ब्रिटनची ७५% आर्मीच सफाचट झाली होती. सामान्य नागरिकांनी देशाच्या हाकेला ओ देउन केलेली खरी हिरोगेरी, परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि निर्णयक्षमतेला आजही म्हणूनच डंकर्क स्पिरीट म्हणतात. * सगळ्यांच्या माहितीचा इतिहास आहे पण माझी 'वन ऑफ द फेवरेट' आहे ही घटना म्हणून लिहितेय.. * संदर्भः डॉक्युमेंट्री : 'बॅटल ऑफ ब्रिटन', 'लिटील शिप्स' चित्र : आंतरजालावरून साभार,
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 47902
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by II विकास II

अगदी अगदी. जर जर्मेनी युध्द जिंकली असती तर किती राष्ट्रे पारतंत्र राहीली असती, देवालाच माहीती. आपण असे आंतरजालावर चर्चा करत असतो का, हाही एक प्रश्न आहे. नंतरचे शीतयुद्ध तिरंगी झाले असते. आणि ती राष्ट्रे मुळात स्वतंत्र कुठे होती ? मुघलकालीन भारताप्रमाणे एका बादशहाचा अंमल संपून दुसर्‍याचा झाला असता एवढेच. पण मुद्दा तो नाहीये.

In reply to by पुष्करिणी

आंदमान बेटांवर सुभाष बाबूंनी जपान्यांच्या मदतीनं १९४५ सालीच तिरंगा फडकावला . तिकडे स्थानिक लोकांवर आणि स्वातंत्र्य चळ्वळीतल्या लोकांवर जपान्यांनी बरेच अत्याचार केले, लोकांच यामुळे अझाद हिंद सेनेबद्द्लच मत बरच वाइट झालं होत. अर्थात सुभाषबाबूंना या बद्द्ल काही माहिती नव्हती असं म्हणतात. ही माहिती कुठे मिळाली ? जपान्यांनी चीनच्या जिंकलेल्या भागावर अनन्वित अत्याचार केले, भारताच्या नाही. त्यांचे इतके सैनिक पोचलेच नव्हते. त्यांनी विमानहल्ला, ब्रिटीश फौजेतले भारतीय कैदी सोडणे, प्रशिक्षण, साधनसामुग्री याप्रकारे मदत केली.

पुष्करिणी, लेख उत्तम आणि अभ्यासपूर्ण झाला आहे. डंकर्कबद्दल मला विशेष काहीच माहिती नव्हती. असेच अजून अनेक लेख येत राहू देत.. मिपावर स्वागत आहे.

वाचलेल्या एका पुस्तकाच नाव आत्ता आठवतय The Japanese in the Nicobars , लेखक सिमरन सिंग ( बहुतेक ) . पुष्करिणी

In reply to by पुष्करिणी

पुस्तकाचे नाव दिल्यामुळे गुगलल्यावर विकीचा हा एक प्राथमिक दुवा मिळाला, ज्यात ही माहीती आहे. अजूनही खाली असतील पण ते बघत बसलो नाही. मात्र हा सगळा प्रकार कधी वाचनात न आल्याने नक्कीच माहितीपूर्ण आहे. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

यावरून इअन मक्यूअनच्या 'अटोनमेंट' या कादंबरीची आठवण आली. यात काही कळीचे प्रसंग डंकर्कच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स व लंडनमध्ये घडतात. डंकर्कमुळे ब्रिटिशांचे धैर्य वाढले असेलही कदाचित, पण पुस्तकातली परतणार्‍या सैनिकांची वर्णनं हृदयद्रावक आहेत. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

बरीच माहिती मिळाली. दुसर्‍या महायुद्धाबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे. मध्यंतरी त्याविषयावरील मिळेल ते चित्रपट शोधुन धडाधड पाहिले होते. दहा भागांची ’बॅण्ड ऑफ द ब्रदर’ ही अप्रतिम मालिकाही पाहीली. ह्या विषयावर तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल. ह्या लेखासाठी आणि प्रतिसादातील माहितीसाठी धन्यवाद.

In reply to by दिपक

तसेच त्याच काळात झालेल्या ’कॅटीन मानवसंहा्रा’बद्दल अजुन माहिती मिळाली तर वाचण्यास आवडेल.
आंद्रे वायदा या विख्यात पोलिश दिग्दर्शकाचा यावर आधारित चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, तो जरूर पाहावा. पोलंडच्या अभिज्ञ वर्गाची एक सबंध पिढी यात मारली गेली. हत्याकांड जिथे घडले तिथे श्रध्दांजली वाहायला जाणारे पोलंडचे राष्ट्रप्रमुख, सेनाप्रमुख, राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष वगैरे नुकतेच विमान अपघातात मरण पावले, हा आणखी एक विलक्षण हृदयद्रावक योगायोग! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

(सातत्याने प्रवासात असल्याने या अतिशय अभ्यासपूर्ण ध्याग्यावर इच्छा असूनही सविस्तर प्रतिक्रिया देऊ शकलो नव्हतो, ती आता देत आहे.) सुरुवातीसच हे स्पष्ट करणे गरजेचे आहे कि श्री. पेन, श्री वेताळ आणि त्याच बरोबर श्री. विकास यांच्या लेखन पद्धतीने कित्येकांच्या मनात असा संभ्रम निर्माण झाला की ही मंडळी "हिटलरधार्जीणी" आहेत की काय? मात्र असे मला तरी कुठेही जाणवले नाही, कारण यांनी कुठेही हिटलरला सौम्य रंगाच्या ब्रशात रंगविलेले नाही. हिटलर क्रूरकर्माच होता हे निर्विवाद सत्य आहे, पण म्हणून "विन्स्टन चर्चिल" म्हणजे कुणी पंख छाटलेला देवदूत होता असे समजणे फार भाबडेपणाचे होईल. हिटलर फावड्याला फावडेच म्हणत होता, तर चर्चिल त्याला कृषिकर्मातले अवजार, इतकाच फरक. मात्र दोघेही त्याचा वापर एकाच कारणासाठी करत होते. एकाला झाकावा अन दुसर्‍याला काढावा अशीच दोघांची लायकी. ...आणि आपण "जर्मनी पेक्षा इंग्लंडचे गुलाम झालो हे चांगले झाले" हे म्हणण्यात आपण काय मिळवितो? शेवटी नशिबात गुलामच होणे होते या देशाच्या तर मग ते अहिरावणाचे झालो काय वा महिरावणाचे, दोघेही आम्हाला आपल्या पायाखालीच दाबणार ना? इंग्लंडच्या अगोदर आम्ही मोगलांचे गुलाम होतो, आता उद्या कुणी त्यावर धागा काढला तर असे म्हटले तर चालेल का की, 'बरे झाले आपण चेंगीज खानपेक्षा बाबरचे गुलाम झालो." गुलामी मनोवृत्तीला कुणीही जेता खतपाणीच घालत असतो...आणि शेळीमेंढ्यासारख्या जनतेला धरून आपली होतील ती कामे करून घेणे हाच उद्देश त्याच्याकडे असतो. हिटलरने ज्यूंचा संहार केला तसाच आपलाही केला असता असा एक मुद्दा चर्चेत दिसून येतो. होय ती शक्यता नाकारता येत नाही, पण असेही आहे की कुणी सांगावे त्यातून इथे त्या काळात असे नेते निर्माण झाले असते की ज्यांनी त्या नरसंहाराला तोंड देण्यासाठी या प्रचंड देशातील शक्तीला एकत्रित आणण्यासाठी विविध प्रयत्न केले असते. अर्थात ही जर-तर ची भाषा झाली, त्यामुळे प्रत्यक्षात काय स्थिती होती ते पाहणे क्रमप्राप्त आहे. युरोपचा इतिहास साक्षीदार आहे की फासिझमच्या आणि नाझी तत्वज्ञानाच्या वाढीला इंग्लंड आणि फ्रांस या "लोकशाहीवादी" राष्ट्रांनीच फार मोठे खतपाणी दिलेले आहे. हिटलर आणि मुसोलिनी यांच्या सुरुवातीच्या आक्रमक आणि अत्याचारी राजकारणाकडे दीर्घकाळ डोळेझाक करण्याचे धोरण इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारलेले होते. तो भस्मासुर जगाचा ग्रास करील एवढे अक्राळविक्राळ रूप धारण करून उभा राहिला त्यामुळे त्या पापाची जबाबदारी इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेने स्वीकारणे भाग होते. याचा दुसरा अर्थ असा की जे रोज लोकशाहीच्या नावाने जप करतात ते लोकशाहीवादी असतीलच असे नाही. हिटलर आणि मुसोलिनी दोघेही कम्युनिस्ट विरोधात होते, त्यामुळे युरोप मधून क्म्युनिस्टांचे उच्चाटन झाले तर इंग्लंड आणि फ्रांसला आनंदाच्या उकळ्याच फुटणार होत्या ना, त्यामुळे मुसोलिनीने अ‍ॅबिसिनियावर केलेले आक्रमण आणि हिटलरने र्‍हाईनलँडमध्ये घुसविलेल्या सेना इंग्लंड आणि फ्रांसने मिळून रोखण्याचे प्रयत्न केले असते तर सुरुवातीलाच हिटलरच्या महत्वाकांक्षेला लगाम बसला असता (हे वाक्य खुद्द चर्चिलचे आहे, माझे नव्हे...). मात्र हां... इथे हेच चर्चिल महाराज हे त्यावेळी तसे का घडले नाही याचे उत्तर मात्र देत नाही, त्याला कारण असे की युरोपात वाढत्या कम्युनिझमचा नायनाट करण्यासाठी नाझीचा उदय आणि फासिझामचा फैलाव हे हत्यार चांगले आहे असे ह्या आपले साम्राज्य जतन करण्याची इच्छा असणार्‍या चर्चिलसारख्या लोकशाहीवाद्यांना वाटत होते. एक असूर दुसर्‍या असुराचा नाश करत आहे हे यांना टेम्स नदीकाठी मासेमारी करत पाहायला त्यावेळी आवडलेच होते. चर्चील सारख्या धूर्त लोकांच्या पुतना मावशी-प्रेमाचे गोडवे गाण्यापूर्वी हेही लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे की हिटलरनेसुद्धा जर्मनीत निवडणुका लढविल्या होत्या त्यादेखील संसदीय लोकशाहीने जनतेचे प्रश्न सोडविण्यात दाखविलेले अपयश याच मुद्द्यावर. पहिल्या महायुद्धात झालेली आपल्या देशाची मानहानी आणि त्यात ज्यु जमातीविषयी त्याच्या मनात खदखदणारा संताप या दोन बाबी त्याची पाठराखण करणार्‍यांना पुरेशा होत्या. दुसरा मुद्दा आहे तो ब्रिटिशांनी भारतात खूप सुधारणा केल्या ! म्हणजे काय केले? गोर्‍या साहेबासाठी आणि त्याच्या इंग्लंडमधील पिलावळीसाठी "हिंदुस्तान" ही बारमाही दुभती गाय होती आणि या गायीला हिरवागार चारा २४ तास दिला तरच ती दुध देणार हे त्याच्या धंदेवाईक प्रवृत्तीला नक्कीच माहित होते, म्हणून त्याने आमच्यातीलच गोपालक हाती धरून गाय कायम गुबगुबीत कशी राहील हे पाहिले. ज्यावेळी गायीने दावे सोडून माळावर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आमच्याच लोकाकडून तिला चाबकाचे फटकारे कसे मारले जातील हेही पाहिलं. एका विशिष्ट मुद्यावर इथल्या त्यावेळेच्या ३०-४० कोटी लोखाना खुष ठेवायचे... तो मुद्दा म्हणजे 'राणी' ने १८५७ च्या उठावानंतर दिलेले वचन की, हिंदुस्थानातील प्रजेच्या "धार्मिक" बाबीत कंपनी सरकार ढवळाढवळ करणार नाही. झाले, मग या गुलामांना तर दुसरे काय पाहिजे होते? अशी दोन तीन सुवासाची पाने आमच्या तोंडाला पुसली म्हणजे आम्ही मोकळे झालो "भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य ! विबुधामान्य सार्वभौम भूवर !" असे जर होते तर चर्चिलच काय मग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता? डॉ. प्रसाद दाढे यांच्यासाठी. ~~~~ मी आपले अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले व ते निश्चितच विचारपूर्वक आणि प्रभावशाली आहेत यात संदेह नाही. तरीही त्यातील पुढची एक बाब म्हणजे "डंकर्क" या विषयावर आपण चर्चा करत असताना ज्यावेळी नेत्यांच्या मनोवृत्तीचा प्रश्न आला त्यावेळी कशाला आपल्या देशाच्या चालू तारखेच्या "महान नेत्यांना" या चर्चेत आणला? अहो सर, काय लायकी आहे या क्षुद्र आणि रक्तपिपासू लोकांची की ज्यांची नावे आपल्यासारख्या एका अभ्यासू वृत्तीच्या व्यक्तीने इथे टाईपला घ्यावी? मरू दे त्यांना त्यांच्या कर्माने !! आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे, किंवा इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वश्री पेन, विकास, वेताळ, पुष्कीरिणी आदींच्याकडे असा काय प्रमेय आहे की, सध्याच्या या "गार्बेज"ला जनतेने काढून टाकल्यावर नव्याने येणारे नंदनवनातील संत्री असतील, जी खाताच सारा भारत समाधानाचा ढेकर देईल? बिलकुल आशा बाळगू नका आपल्या मतदाराकडून. ह्या नेत्यांना पक्के ठाऊक आहे की किती नोटा टाकल्या तर कसे मतदार पाळीत उभे राहतात. ४० आणि ५० टक्के मतदानावर इथले सरकार राज्य करते आणि त्यावेळी कितीजण खंत बाळगतात की आपण मतदान केले नाही याची? आणि जे करतात त्यांच्या सारासार बुद्धीबद्दल तर काय बोलायचे. मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतून "गोविंदा" सारखा एक उल्लू नट श्री. राम नाईक सारख्या अभ्यासू संसदपटूला पराभूत करून निवडून येतो तेव्हा आपल्यासारख्या वैचारिक लोकांची वाचाच बसते ना? काय तो धर्मेंद्र, काय तो विनोद खन्ना, काय ती "तुलसी", अन काय तो "रावण" !!! हे जर खासदार आपले आजचे तर मग उद्या जॉनी लिवर आणि हिमेश रेशमिया तुम्हाला संसद भवनात वावरताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

मला ख्.व. ची सुविधा उपलब्ध नसल्याने इथेच प्रतिसाद देत आहे. आपल्या व्यस्त जीवनक्रमातून वेळ काढुन सविस्तर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही कोणीच उल्लेख न केलेले नवीन मुद्दे तुम्ही टेबलावर आणलेत. इतरांप्रमाणे मी हिटलर आणि त्याच्या क्रुरकर्मांची भलामण करतोय/ अनभिज्ञ आहे असा तुमचा गैरसमज झाला नाही हे पाहून बरे वाटले. बाकी इंग्लंडच्या गुलामगिरीची तरफदारी करण्यापर्यंत गेलेले लोक पाहून थक्क झालो.

असे जर होते तर चर्चिलच काय अग हिटलर जरी इथे आला असता तर काय फरक पडला असता?
हिटलर काय्/चर्चिल काय दुसर्‍या देशांवर आपला हक्क आहे असे म्हणणारे साम्राज्यवादी होते.ब्रिटिशांनी भारताला लुटले हे खरे पण त्यांच्या साम्राज्यवादी धोरणांत माणसांना सरळ ठार मारणे,माणसे नाहिशी करणे,concentration camp वगैरे प्रकार नव्हते.थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता. क्रांतिकारक असोत वा टिळक्,गांधी ,बोस असोत, त्यांच्यावर खटले ब्रिटिश सरकारने रीतसरच त्यांच्या कायद्यानुसार भरले(त्यांना खटला लढण्याचे स्वातंत्र्यही दिले) आणि मगच निकाल दिला्. हिटलर/जर्मनीने भारतावर राज्य केले असते तर खरोखर असे झाले असते का हा प्रश्न निश्चित उभा राहतो. P = NP

In reply to by चिरोटा

"...थोडक्यात ब्रिटिशांचा सुसंस्कृत साम्राज्यवादाचा मुखवटा होता...." श्री.भेंडीबाजार.... मला प्रामाणिकपणे वाटत आहे की इथे आपली थोडी गल्लत होत आहे. लक्षात घ्या ~~ हिटलर सत्तेवर आला तो जर्मनीला पूर्ववैभव देण्याच्या घोषणेवर आणि त्याच्या व समर्थकांच्या नजरेत होते "त्याच" देशाचे ज्यू नागरिक, ज्यांच्यामुळे पहिल्या महायुध्दात आपला मानहानीकारक पराभव झाला असे त्यांचे मत होते. त्यामुळे सत्तेवर आल्यावर त्यांचे शिरकाण करणार ही त्याची घोषणा होती. युरोपमध्ये "आर्यन रेस"चे वर्चस्व व कम्युनिझमचा नाश हे त्याचे स्वप्न. दुसरीकडे ब्रिटाशांची साम्राज्यशाही "सूर्य मावळणार नाही" या तत्वावर चालली होती आणि महत्वाचे म्हणजे त्यांची पहिली नजर ही "व्यापार्‍या" ची असल्याने आपल्याला अंकीत असलेल्या राष्ट्रातून जितकी लूट नेता येते तिला प्राधान्य द्यायचे असे असल्याने हिटलर स्टाईल 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प" आदी संकल्पना ते या खंडप्राय देशात लागू करूच शकत नव्हते. हिटलरच्या वेळी एकसंध जर्मनीची लोकसंख्या होती केवळ ७ कोटी व तीमध्ये ज्यू सह अन्य धर्मीय होते दीड कोटीच्या आसपास. याच काळात भारताची महाप्रचंड लोकसंख्या होती तब्बल ४० कोटी. विचार करा...चर्चिल सोडाच, पण हिटलर तरी या देशात तसल्या कॅम्पची शक्यता विचारात घेऊ शकला असता का? चर्चिलला तर हिंदुस्थानाला इंग्लंडची टांकसाळ समजायचा. ब्रिटीश संसदेत ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विषय आला, त्यावेळी तो ताडकन उदगारला होता : "ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे पुकारावयाला काही मी ब्रिटनचा पंतप्रधान झालो नाही !" ~~ याचाच अर्थ इंग्लंड कायम आमच्याकडे "सोन्याची अंडी देणारी कोंबडी" याच नजरेने पाहत असे, त्यामुळे कशाला असल्या लुटारूंची तरफदारी करायची की त्यांनी इथल्या जनतेला कायद्याने वागवले म्हणून. वागवले असेल तर निव्वळ त्यांच्या पोळीवर इथल्या भटटीतील तूप अनायासे पडत होते म्हणून. अहो, इतकी लोभी जात आहे ब्रिटिशाची की आज इथून जावून ६०-६५ वर्षे झाली तरी सरकारी पातळीवरून मागणी करूनही (मजूर असो वा हुजूर पक्ष) तिथले सरकार भारताला "कोहीनूर हिरा" अन् "शिवाजीची भवानी तलवार" द्यायला तयार नाही, कारण ते त्याला आपली "लूट" समजतात... हा त्यांचा सुसंस्कृतपणाचा मुखवटा ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

पुष्करिणीताई, मी बर्‍याच वर्षांपूर्वी दुसर्‍या महायुद्धावर बरेच वाचले होते, पण आता स्मरणशक्ती दगा देईल अशी भीती वाटते. माझ्या आठवणीप्रमाणे "बॅटल ऑफ ब्रिटन" हे नांव हिटलरने जो इंग्लंडवर बाँबवर्षाव केला (July 10, and lasting until early August 1940) त्या अटीतटीच्या युद्धाला दिलेले होते. त्याच्याशी डंकर्कचा संबंध फक्त डंकर्कनंतर कांहीं महिन्यात ते सुरू झाले इतकाच असावा! http://info-poland.buffalo.edu/britain/airbattle.html या दुव्यावर माहिती आहे. "Winds of War" व "War and Remembrance" ही दुसर्‍या महायुद्धावर हर्मन वूक याने लिहिलेली पुस्तकें वाचल्याखेरीज दुसर्‍या महायुद्धाबद्दलचे वाचन अपुरेच राहील असे मला वाटते. "Winds of War" हे युरोपमधील युद्धाबद्दल असून "War and Remembrance" हे पॅसिफिक भागातील युद्धाबद्दल आहे. हे सगळे लिहायचे कारण कीं त्यात दिलेली एक 'थेअरी' फार पटण्यासारखी आहे. वूक म्हणतात कीं जपानने 'पर्ल हार्बर'वर हल्ला करण्याऐवजी जर व्लाडिवोस्टॉकवर हल्ला केला असता तर रशियाला आपली फौज जर्मन सैन्यापुढून काढून व्लाडिवोस्टॉककडे न्यायला लागली असती व जर्मन सैन्यावरचा भार हलका झाला असता. शिवाय 'पर्ल हार्बर'वर हल्ला केला नसता तर अमेरिकेलाही युद्धात पडायला सबब मिळाली नसती. या दोन गोष्टींमुळे दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा पराजय झाला! ज्यांना दुसर्‍या महायुद्धावरील वाचनात रस आहे त्यांनी ही दोन पुस्तके जरूर वाचावीत. ------------------------ सुधीर काळे 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/36uoebc (प्रकरण सातवे)

खुपच चांगला लेख आहे.

या धाग्यावरील काही मुद्दे अचानक गार्डिअन या ब्रिटिश वर्तमानपत्रात एका लेखात दिसले. हिटलरमुळे भारताचा कसा फायदा झाला, हे दर्शवणारा एक चित्रपट भारतात बनतो आहे. त्या निमित्त्ताने लेखकाने ब्रिटिश सत्ता, हिटलर आणि त्याचे भारताविषयीचे विचार याविषयी काही म्हटले आहे. उदा:
  • गांधी आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांना गोळ्या घाला, असा सल्ला हिटलरने ब्रिटिशांना दिला होता.
  • 'आम्ही जर भारताचे राज्यकर्ते बनलो, तर लवकरच भारतीयांना आधीचे ब्रिटिश राज्य बरे वाटू लागेल', अशी धमकीही हिटलरने दिली होती.
- चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पण चर्चेतुन सुधधा बरीच माहीती मिळाली. सर्वांचे आभार