कविता - मानवी मनाच्या स्रुजन्शीलतेचा कल्पकतेचा एक कलाविष्कार. अगदी लहानपणापासून आपला या कवितान्शी सम्बन्ध येतो. तान्हे बाळ असताना अन्गाईगीत, बडबड गीते यान्च्याअ रूपानी. एकदा शाळेत जायला लागले की मग काय - बालभारती कुमारभारती मधुन पद्य विभागच सुरू होतो. यातील काही कविता निव्वळ ताप किन्वा डोकेदुखी वाटतात. पण काही मात्र मनात अगदी घर करून बसतात - त्यातील गेयतेमुळे, सुन्दर शब्दरचनेमुळे, शब्दचित्रान्मुळे , आशयगर्भतेमुळे.
अर्थात हे सगळे बारकावे वयानुसार लक्षात यायला लागतात. पण लहान वयातसुद्धा काही कविता वाचल्याक्षणी आवडून जातात. आपोआप लक्षात राहतात. अगदी मोठे झाल्यावर सुद्धा त्या सम्पूर्ण आठवत राहतात.
अशीच एक कविता ईयत्ता दुसरीतली - सायन्काळची शोभा - कवि भा. रा. ताम्बे
पिवळे ताम्बूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
झाडान्नी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
किरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुन्दर साळीचे
झोके घेती कसे चहूकडे हिरवे गालीचे
सोनेरी मखमली रूपेरी पन्ख कितीकान्चे
रन्ग किती वर तर्हेतर्हेचे इन्द्रधनुष्यान्चे
अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणू फुलती
साळीवर झोपली जणू की पाळण्यात झुलती
झुळकन सुळकन ईकडून तिकडे किती दुसरी ऊडती
हिरे माणके पाचू फुटुनी पन्खची गरगरती
पाहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा.
सुर्यास्ताचे हे वर्णन. सुर्यास्त - एक दैनन्दिन घटना - पण दररोज वेगळे दर्शन घडवणारी. निसर्गाची अफलातून किमया दाखवणारी. आपणही अनेक सन्ध्याकाळी निसर्गशोभा बघतो. हरखून जातो. निसर्गाची जादू छयचित्रात पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण कवि आणि त्यातूनही भा. रा. ताम्ब्यान्सारखे कवि केवळ लेखणीतून एवढे सुन्दर शब्दचित्र साकार करतात.
एका शेतातून दिसणारी सायन्काळ मुर्तिमन्त आपल्या समोर ऊभी करतात. वार्यावर डुलणारे हिरवेगार शेत, त्यामध्ये ईकडून तिकडे ऊडणारी लाल, हिरव्या अनेक रन्गान्ची फुलपाखरे, सन्ध्याकाळच्या ऊन्हाने त्यान्च्या पन्खान्वर, झाडान्च्या शेन्ड्याना , ओढ्याच्या पाण्याला चढलेला सोनेरी मुलामा.
आजच्या शहरी जीवनात दुर्मिळ असलेले असे हे द्रुश्य आपल्या नजरेसमोर ऊभे राहते.
काव्य या द्रुष्टीने बघतादेखील यात सगळे गुणविशेष बघायला मिळतात. यात भाषेवरची पकड जाणवते - उदा. गोळा हा एक शब्द क्रियापद आणि नाम म्हणून वापरलेलला आहे. यात यमक आहे, गेयता आहे, रेखीवपणा आहे, सुरेख उपमा आहेत, सहजता आणि सोपेपणा आहे. - आणि विशेष प्रयत्न करावे न लागता सहजपणे वाचकान्च्या स्मरणात राहण्यासाठी जे काही लागते ते ही.
यामुळेच आजही ही कविता लख्खपणे मला पूर्ण आठवते. आज मिपा वरील तुम्हा सर्व सुर्हुदान्सह ती आठवण आणि तो आनन्द वाटून घ्यावसा वाटला म्हणून हा प्रपन्च.
प्रतिक्रिया
24 Feb 2010 - 11:17 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्हाला अभिप्रेत असलेला आनंद नक्कीच पोचला... खूपच छान कविता.
बिपिन कार्यकर्ते
25 Feb 2010 - 9:36 am | पाषाणभेद
एकदम मस्त कविता आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
25 Feb 2010 - 10:09 am | प्र्दीप प्त्की
प्रिय मनिश
कविता सुन्दर तर आहेच ,
शिवाय ती सन्ध्याकाल आप्ल्याला अनुभवला लाव्ण्याचे साम्र्थ्य धरुन आहे .
शिवाय तुझी श्ब्दर्च्नच्ना पण सुन्दर .
लगे रहो दोस्त
प्र दी प
25 Feb 2010 - 9:59 pm | पक्या
मस्त रे भाऊ, छान आहे कविता.
आम्हाला १ ली बालभारतीच्या पुस्तकात 'केळीच्या बागा मामाच्या , हिरव्या घडांनी वाकायच्या' अशी सुरवात असलेली कविता होती.
कोणाला माहित असल्यास कृपया इथे द्यावी.
अजून २ अशीच लहानपणी शाळेत शिकलेली गाणी शोधत आहे..
१) झाड म्हणत धारा दे , पाखरू म्हणतं चारा दे
सॄष्टि मधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे.
२)वळिवाचे ढग आले वरती धरती खाली आसुसली
झाडासंगे वारा खेळे भिंगोर्या अन भातुकली.
ह्या सुंदर गाण्यांच्या पुढील ओळी अजिबात आठवत नाहीत. कोणाला माहित असल्यास कृपया इथे द्याव्यात.
जय महाराष्ट्र , जय मराठी !