सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.
लाख रुपये की बात!
आज अभिनय काय, संगीत काय, यांसारख्या फाईन आर्टस् मध्ये अनेकांना इन्स्टंट संधी आणि यश हवे असते. परंतु त्याकरता किती अपार जिद्द लागते, अखंड मेहनत, कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव फार कमी असते. या मंडळींना वर वर पाहता या गोष्टी अतिशय सोप्या आणि केवळ वशिलेबाजीने होणार्या वाटत असतात याची गंमत वाटते!
अतिशय सुंदर लेख..
तात्या.
या लेखात अभिनय क्षेत्रातील अनेक पैलूंचा आढावा लीलया घेतला आहे. अतिशय महीतीपूर्ण लेख. मला फार अवडला.
>>आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असत>>>
वा कमाल केलीत!!! हॅटस ऑफ!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
वा! लेख आवडला.
कुठल्याही क्षेत्रात जाणकारी मिळवायची तर कष्ट करावेच लागतात. त्यात नवीन काहिच नाही आणि अभिनय-क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाही.
पण बहुदा इतर क्षेत्रात नाव कमावलेले प्रतितयश लोक अभिनयात येऊ बघतात ते पूर्वीच्या तळमळीने/शिकाऊ वृत्तीने उतरत नसावेत (किंवा "मला "ते" जमलं तर अभिनय काय चीज आहे? असं म्हणून शॉर्टकट घेऊ बघत असावेत) असं तर होत नसाव?
मस्त मस्त मस्त...
सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.
एकदम बरोबर....भरमसाट झालेल्या Reality Shows चा परिणाम.. प्रत्येकाला "पी हळद आणि हो गोरी" अशा पद्धतीने म्हणजे instanst यश हवे असते.
पण काही गुणी व्यक्ती recommendation च्या अभावी मागे पडतात हे ही तितकेच खरे...
(मी सुद्धा छान अभिनय करतो. बर्याच वेळा मला अभिनयात पारितोषिक मिळाले आहे (उत्तेजनार्थ का असेना..))
खादाडमाऊ
तुमच्या ब्लॉगवर आधीच वाचला होता.... परत आवडला.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
धन्स सगळे...
अश्याच आलेल्या एका मेलमुळे वैतागून लेख लिहायला घेतला. पहिले दोन किस्से लिहील्यावर लक्षात आलं की हे नुसतंच वाफेला वाट करून देणं झालंय मग काय करायला पाहीजे हे जेवढं माझ्या अकलेला कळत होतं तेही लिहिलं..
:)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.
तुम्ही अशा लोकांना भेटता , त्यांना आलेला राग वगैरे सहन करता ...??? तुमच्या पेशंसची कमाल वाटते.
अजून एक गंमत म्हणजे ऑर्कुटवरच्या नाटक कम्युनिट्यांमध्ये ५० % टॉपिक हे मी अमुक नाटक करत आहे आणि कलाकार हवे आहेत, असले काहीतरी असतात. ...
आता ऑर्कुटवर अभिनेते मागवून कसे मिळणार आणि या जगाभरातल्या कट्ट्यावरती त्याच्याच गावात उपलब्ध होणारे अनेक आणि चांगले अभिनेते कसे मिळणार, असले प्रश्न या तथाकथित दिग्दर्शकांना काही पडत नाहीत....
असले टॉपिक सुरूच राहतात...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
तुम्ही अशा लोकांना भेटता , त्यांना आलेला राग वगैरे सहन करता ...??? तुमच्या पेशंसची कमाल वाटते.<<
मलापण वाटायची... :)
आता नाही भेटत..
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
असाच एक मानुस पुण्यातील अनेक सभांमदी येत असतो. चेहर्यानी थोडीफार वळख. अनेक मोठ्या मोठ्या लोकांसमवेत नवीन नवीन फोटु / बातम्या दाखवायचा. यकदा डायरेक व्हाईट हाउस ची मेल दाखवली. नंतर अशीच काही गोष्टी.
यकदा म्हन्ला राष्ट्रपतीना सांगितलय कि राज्यसभेच तिकीट आपल्याला पाहिजे. सामान्य मानुस का नाई राज्यसभेत खासदार होउ शकत? मला डॉ श्रीकांत जोशींचे मनोविकाराचा मागोवा पुस्तक आठवले. त्याला म्हनल तुमच म्हन्न बरोबर आहे पन राज्यसभेला लई लोकांचे नंबर पेंडिंग हायेत. कुमार केतकर बी हायेत. तुमचा नंबर कवा लागनार? त्यांनी माझ्याकड अस पाहिल कि मी जनु व्हीलनच हाये. शुब बोल रे नार्या सारखी गत झाली.
बाकी लेख उत्तम! आमाला अभिनय कशाशी खातात हे माहित नाई याचा आनंद झाला. कालच काटकोन त्रिकोण हे नाटक पाहिले. त्यात मोहन आगाशे यांचा अभिनय खुप आवडला. नाटकच जाम आवडल.डॉ विवेक बेळे यांनी लेखन दिग्दर्शन व भुमिका केली होती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
लेख आवडला...! आपली कारकीर्द कमी वेळात घडावी असे स्वप्न अनेकांना पडतात आणि स्वप्न प पाहणे काही गैर नाही. मेहनत आणि सारखं शिकायचं तरी किती दिवस, असे वाटून आपल्या भावना ते सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करीत असावे. पण, त्यांना अधिक प्रेमानं आणि जवाबदारीनं समजून सांगायला हवे असे वाटते. आणि नेमका आपला स्पष्ट असलेला स्वभाव अनेकांना अहंकारी आणि खडूस वाटू शकतो.
-दिलीप बिरुटे
नाही त्या भ्रमात राहून नुकसान होण्यापेक्षा क्षणिक निराशा/राग आला तरी चालेल.
वाईटपणा नको म्हणून भलावण करणार्या/फसवणार्या लोकांची कमी नाहीये, स्पष्टवक्ते लोक हे बहुदा अप्रियच ठरतात!
चतुरंग
लेख आवडला.
आजकाल नुसत टिव्हीवर यायला मिळाल तरी तेवढी पुरेस असत काही जाणांना.
श्रम करायची तयारी फारच कमी जणात असते.
अनरिअॅलिस्टिक एम्स असलेले ही दिसतात.
असो. छान लिहिले आहे.
अनेक अनुभवांचे बोल आहे ते. असणारच वाचनिय!
मीनल.
खूप छान लेखन!
अभिनयाच्याबाबतीत किंवा कलाकार निवडणूकीत फारश्या कोणत्याही गोष्टींची कल्पना नाहीये त्यामुळे "अरे बापरे!" असं वाटत राहिलं. नाहीतर मला तर आधी वाटायचं की नट नट्यांच्या मुलाखतींमध्ये सांगतात तसं,"निर्माते/दिग्दर्शकांनी मला अमक्या ठिकाणी पाहिलं आणि हाच्/हिच तो/ती अशी त्यांची खात्री पटली."अश्याप्रकारांनी निवड होत असावी किंवा तुमचे आईवडील आधीच या क्षेत्रात काम करणारे असायला हवेत.
रेवती
,"निर्माते/दिग्दर्शकांनी मला अमक्या ठिकाणी पाहिलं आणि हाच्/हिच तो/ती अशी त्यांची खात्री पटली."अश्याप्रकारांनी निवड होत असावी किंवा तुमचे आईवडील आधीच या क्षेत्रात काम करणारे असायला हवेत. <<
या दोन्हीही शक्यता अमान्य करत नाही मी. पण तो नशिबाचा भाग आहे. आणि केवळ हेच मार्ग नाहीत.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
स्वप्न आणि वास्तव ह्यातली दरी पार करण्याचे प्रयत्न करताना आपले स्वप्न हे दिवास्वप्न तर नाही ना आणि कदाचित त्यामुळेच अंती टोकाची निराशा पदरी आल्याने ते दु:स्वप्न तर ठरणार नाहीना ह्याची चाचपणी करत रहाणे हे शहाणपणाचे असते.
'अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे' तर आजकालचा सर्वसामान्य स्वभाव झालाय की काय अशी शंका यावी इतपत सर्वदूर पसरलाय!
जिद्द, योग्य दिशेने मेहनत करण्याची तयारी, डोळे उघडे ठेवून शिकण्याची तयारी, कामावरची निष्ठा, गुरुवरची श्रद्धा ह्या गोष्टी तुमचं रॉकेट उंच घेऊन जाणारं इंधन आहेत हे लोक विसरत चालले आहेत.
(इ.पाचवीत एकांकिकेत पाटलाचे काम करुन पहिला नंबर पटकावलेला - नाट्यभूषण ;))चतुरंग
प्रतिक्रिया
सरींडर आणि
अनेक पैलू
वा! लेख
हॅ हॅ हॅ
तुमच्या
+१
सर्व
अगदी!
धन्स
सुंदर लेख !
सरींडर आणि
तुम्ही अशा
व्हीलन
लेख
पण कमीतकमी
अगदी अगदी!!
अतिशय
आवडला
खूप छान
,"निर्माते/
खूपच चांगला लेख आहे.
हा हा