म्हणतात ना....
एका गालात मारले तर दुसरा गाल करावा पुढे...
मग प्रत्येक जण मारल्याशिवाय जाईल का पुढे ?
नेकी कर दरिया मे डाल......
मग एक दिवस स्वत:लाच बुडतान्ना नाही का पहाल?
निन्दकाचे घर असावे शेजारी.....
जर निन्दकच घुसला घरात,आदरतिथ्य करावे तरी?
नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........
करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे?
बोट दिले तर हात धरु नये.....
पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे?
चूक भूल द्यावे-घ्यावे....
वाटले मन मिपावर मोकळे करावे.
अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट...
अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 7:32 am | विसोबा खेचर
चूक भूल द्यावे-घ्यावे....
वाटले मन मिपावर मोकळे करावे.
अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट...
अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.
सुंदर कविता. जियो..!
तात्या.
23 Jan 2009 - 8:03 am | शुभान्गी
धन्यवाद...
23 Jan 2009 - 8:04 am | विकास
खूप भावली!
23 Jan 2009 - 8:08 am | अनिल हटेला
नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........
करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे?
बोट दिले तर हात धरु नये.....
पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे?
आवडले !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Mar 2009 - 7:16 am | उमेश कोठीकर
शुभांगी,खूपच छान. थोडे अजून लयीत येऊ दे.
30 Mar 2009 - 7:32 am | सँडी
खुपच छान!
- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.