साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा),
१/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे.
कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे.
नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून
मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा. नंतर त्यात वेलदोडेपूड, बदामाचे काप,काजूचे तुकडे व बेदाणे घालून, वर तूप घालून भाताला चांगली वाफ आणावी. गरम गरम सर्व्ह करावा.
वरुन साजूक तूप घालावे.
प्रतिक्रिया
3 Sep 2010 - 10:22 am | विसोबा खेचर
फोटो?
आपला,
तात्या सराफ.
6 Sep 2010 - 11:16 pm | अजितजी
फोटो ची काय जरुरी ? दर वेळेला फोटो चाच आग्रहका? एखाद्याला नाही होत शक्य तो काढणे
7 Sep 2010 - 1:25 pm | विसोबा खेचर
कारण त्यामुळे पाकृची शोभा वाढते अशी माझी समजूत..
वाचक म्हणून ती माझी व्यक्तिगत अपेक्षा..
कबूल..
तात्याजी.
7 Sep 2010 - 3:06 pm | अजितजी
पटले तुमचे विचार
हे ही मी बघत आहे की ज्या पाक्रु फोटो नसतो त्याना प्रतिक्रिया देखिल नसतात /कमी असतात --त्या देवु नयेत असा काही अ लिखित करार/ नियम आहे का ?
7 Sep 2010 - 3:15 pm | परिकथेतील राजकुमार
निवेदितातै फोटु कुठे आहे ?
बाकी पाकृ झकासच.
7 Sep 2010 - 3:20 pm | मितान
मी शोधतच होते गं ही रेसिपी. ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबर्याचा कीस चालेल का ?
6 Oct 2010 - 5:21 pm | गणेशा
एकदम झकास