५ राज्यातील निवडणूक निकाल

प्रचेतस's picture
प्रचेतस in राजकारण
10 Mar 2022 - 9:25 am

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा.

प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय.

पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.

प्रतिक्रिया

गल्लीच काय शहरहि काय राज्यच चुकलेलं आहे

चालायचेच, भारत देश मोठा आहे.

गावठी फिलॉसॉफर's picture

11 Mar 2022 - 11:35 am | गावठी फिलॉसॉफर

कागलकरांनी तर कचुरेंचा अवतार घेतला नाही नाही ना...????

तसेही कचुरे धार्मिक तेढ निर्माण करत नाहीत..... सहज शंका.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

11 Mar 2022 - 12:00 pm | रावसाहेब चिंगभूतकर

नाही, बहुधा ते वेगळे, हे वेगळे. हा राजेश188 यांचा नवीन अवतार आहे.राजेश188 कुणाचा अवतार ही कल्पना नाही.

प्रसाद_१९८२'s picture

10 Mar 2022 - 1:21 pm | प्रसाद_१९८२

शिवसेनेला किती जागा मिळाल्या ? गोव्यात तर नोटापेक्षा हि कमी मते आहेत सेनेला.

प्रचेतस's picture

10 Mar 2022 - 1:23 pm | प्रचेतस

सर्वच ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं अशा बातम्या आहेत. :)

खेडूत's picture

10 Mar 2022 - 1:31 pm | खेडूत

झालं जप्त तर झालं. कुठं स्वतःच्या खिशातून भरायचं आहे!

उत्कर्षाला सीमा असते, अधोगतीला नाही असं वाचलेलं आठवलं.

मागल्यावेळी डिपोझीट टिकवण्यासाठी फक्त ५०% मते कमी पडली होती. या वेळी ४८% कमी पडली. याचाच अर्थ शिवसेनेचा उत्तर प्रदेश मधला जनाधार वाढत आहे. पुढच्या वेळी मुख्यमंत्री आमचाच ! आणि तोही पूर्ण सहा वर्षे !

sunil kachure's picture

10 Mar 2022 - 1:25 pm | sunil kachure

.

प्रचेतस's picture

10 Mar 2022 - 1:27 pm | प्रचेतस

काय राव, भाजप जिंकली की घोटाळा, इतर कुणी जिंकले तो जनादेश :)

(राजेश) घटनेतल्या कलम १८८ मध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे
😀

प्रचेतस's picture

10 Mar 2022 - 1:46 pm | प्रचेतस

=))

टर्मीनेटर's picture

10 Mar 2022 - 1:35 pm | टर्मीनेटर

@ sunil kachure

त्या साठी घटनेत बदल करावा

त्यासाठीच कशाला? घटनेत खूप काही बदल/दुरुस्त्या करणे अत्यावश्यक आहे पण नुसते नाव काढले तरी 'संविधान खतरेमें हैं' अशी बोंब मारायला कित्येकजण पुढे सरसवतात त्यांचे काय करायचे?
त्यांना तुरुंगात टाकायचे की थेट फाशी द्यायची?

ह्यावर तुमचे अभ्यासपूर्ण मत वाचायला आवडेल!

sunil kachure's picture

10 Mar 2022 - 2:00 pm | sunil kachure

काळा नुसार घटनेत योग्य तो बदल करण्याचा अधिकार लोकसभेला आहे,कायदे करायचा अधिकार लोकसभेला आहे.
घटनेत ते स्पष्ट आहे.
कोण कशाला विरोध करेल आणि विरोध केला तर तो मोडून काढण्याचा अधिकार घटनेने सरकार लं दिलेला आहे.
खूप वेळा घटना बदली गेली आहे आणि काळा नुसार तो बदल होणे अपेक्षित आहे.
भारतात निवडणुका निरपेक्ष झाल्याचं पाहिजेत.
लोकांच्या मनात बिलकुल शंका नकोत.
Evm विषयी लोक संशक आहेत तर उपाय केलेच पाहिजेत.
फक्त प्रशासकीय अधिकारी वर्गावर विश्वास ठेवणे अयोग्य आहे.
शेवटी त्यांची नेमणूक ,कुठे करायची हे सरकार ठरवते.
प्रामाणिक ,स्वाभिमानी अधिकारी अतिशय नगण्य आहेत.
शेषन हे स्वाभिमानी आणि प्रामाणिक होते.
अधिकारी खाल्या मिठाला जगू शकतात.
त्या मुळे मीठ च विविध लोकात vata

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 1:39 pm | चौकस२१२

आपचं मनःपूर्वक अभिनंदन.
आम्हि हि करतो आप चे अभिनंदन !, अपेक्षा नवहती, खास करून पंजाब सारख्या परंपरावादी, शीख धर्माचा पगडा राजकारणावर आहे
वाटलं होता कि छनि नेतृत्व मुले काँग्रेस परत येईल
पण प्रोफेसर साहेब गेला बाजार आपण आप चे अभिनंदन केलेत तसे खुल्या मनाने ४ राज्यात भाजप परत येतंय त्यांचे हि करा हो अभिनंदन .. एवढी कंजुषी बरी नव्हे
असो परत पंजाब कडे वळतो
पुढं एबघू कि नवीन संसदीय आप म्हणून कसा काम करतो ते !
भाजपाला अर्थातच काही नवहते ( हा एक वेगळं विषयाचा मुद्दा आहे कारण महाराष्ट्र सारख्या काँग्रेसी बालेकिल्ल्यात भाजप दोनदा चांगलंय जागा मिळवू शकली मग पंजाब सारखया हिंदू निदान ३०% असेलली राज्यात कधीच पाठिंबा कसा नाही ? पाठबळ )

शाम भागवत's picture

10 Mar 2022 - 2:12 pm | शाम भागवत

काहीही.
जेव्हां प्राध्यापकजी मोदींचे कौतुक करायला लागतील, तेव्हां त्याचा अर्थ मोदींची लोकप्रियता सर्वोच्च पदी पोहोचून आता ती घसरायला लागली आहे असा होतो.

धर्मराजमुटके's picture

10 Mar 2022 - 1:48 pm | धर्मराजमुटके

गोव्यात ममता बॅनर्जींच्या प़क्षाची काय अवस्था आहे ?
शिवसेनेला क्रमांक एकची मते मिळाली आहेत.

नि३सोलपुरकर's picture

10 Mar 2022 - 1:48 pm | नि३सोलपुरकर

TMC ची गोव्यात काय स्थिती आहे .

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 1:55 pm | चौकस२१२

पंजीतून पर्रीकर हरले कारण कि व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा हे सिद्ध झालं
यातून भाजपचे सोशल इंजिनीरिंग परत सिद्ध झाले
- कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांची निवडणूक
- पणजीत घराणेशाही वाढू ना देणे
- उत्तर प्रदेशात एका चक्क संधू कपडे घालणाऱ्या व्यक्तीला थेट मुखमंत्री बनवणे
- काँग्रेसी बालेकिलाल असलेल्या महाराष्ट्रात एका "फडणवीस" ना मुख्यमंत्री नेमणे इत्यादी

भाजपा, सपा आणि आप तिन्ही पक्षांचे अभिनंदन. काँग्रेस संपली हे बऱ्याच दिवसांपासून दिसत होते ते पुन्हा दिसले.

शेखर गुप्ता-

First takeaways from trends. The first is, AAP has risen as the “change” party of India. It is a fundamental new shift in national politics. Watch for their vote share in Gujarat later this year. A new planet has risen.

आनन्दा's picture

10 Mar 2022 - 5:18 pm | आनन्दा

मला वाटतं पुढच्या काही निवडणुका मध्ये मुख्य लढत आप आणि काँग्रेसमध्ये असेल..

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 5:20 pm | चौकस२१२

जी मंडळी ( सर्वसामान्य, माध्यमातील आणि प्रसिद्ध ) म्हणून दुख्खी आहेत ते "आता आप नि बघा कसे जिकंले"असे "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना " वागतील पवारांची मॅक्स महाराष्ट्र पत्रकार परीषद बघा .. आप आप आप

सपाचा मतदार वर्ग विस्तारला आहे, पण लोकसभेत सपा यापेक्षा कमीच परफॉर्म करेल असे वाटते. राज्यात सपा केंद्रात भाजपा अशी बरीच मते असावीत.

आपचे वेल्फेअर पॉलिटिक्स यशस्वी होत आहे ही आनंदाची बाब आहे. सामान्य लोकांसाठी थेट चांगली गोष्ट करणारे सरकार कधीही चांगले. आआपला फुकटे म्हणण्याआधी युपी मध्ये भाजप का जिंकली हे भक्तांनी पहावे. युपी मध्ये सुद्धा "लाभार्थी फॅक्टर" होता हे सर्व पोल्स मधून दिसले आहे. युपी मध्ये सुद्धा वेल्फेअर योजना चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या होत्या. भाजपने आपल्या उडत्या आणि तोंडाळ हिंदुत्वाला थोडासा लगाम घातला तर त्यांचा फायदा होईल असे वाटते.

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 6:58 pm | चौकस२१२

वेल्फेअर पॉलिटिक्स
दिल्ली कदाचित चालेल ( दिल्ली तील बऱ्याच गोष्टींचा खर्च केंद्रसरकारच करते नाहीतरी ) मोठ्या राज्यात कसे होईल! आणि त्यत्साहीचाच पैसा कुठून आणणार
पंजाब मध्ये हे मतदान " काँग्रेस नको " आणि भाजप शिखांना नको म्हणून आप असे वाटते
"युपी मध्ये भाजप का जिंकली हे भक्तांनी पहावे.

नेहमीचे जातीचे राजकारण , यादव, दलित इत्यादी लोकांनी नाकारले म्हणून हे " काँग्रेसी गांधी नेहरू गुलमानि " पण समजून घयावे

मी म्हणतोय कि युपीत सुद्धा वेल्फेअर पोलिटिक्सने भाजपला चांगली मदत झाली आहे. (भक्त हा शब्द मायबोलीवर दिल्लीकरांना फुकटे म्हणणाऱ्यांना होता.)

खर्च कोणी का करत असेना तरी यापूर्वी जे जनतेला डिलिव्हर झाले नव्हते ते आआपनेच केले ना. शिक्षण आणि आरोग्यावर पण केजरीवालांनी लक्ष दिले आहे, दिल्लीकर खुश आहेतच. पंजाबात काय होते हे पाहू.

टर्मीनेटर's picture

10 Mar 2022 - 7:44 pm | टर्मीनेटर

वेल्फेअर पॉलिटिक्स
दिल्ली कदाचित चालेल ( दिल्ली तील बऱ्याच गोष्टींचा खर्च केंद्रसरकारच करते नाहीतरी ) मोठ्या राज्यात कसे होईल! आणि त्यत्साहीचाच पैसा कुठून आणणार

+१०००

दिल्ली, पुड्डूचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशात आणि गोवा, सिक्कीम सारख्या छोट्या राज्यांत (काही विशेष सवलती असल्याने) आप चे वेल्फेअर पॉलिटिक्स चालू शकते. आता पंजाब जिंकल्यावर त्यांची खरी कसोटी आहे. तिथे बहुतांश खर्च त्यांना राज्याला मिळणाऱ्या महसूलातून करावे लागणार आहेत (जे दिल्लीत करावे लागत नाहीत).

इतर ठिकाणी जर असे फुकट किंवा सवलतीच्या दरात देणे शक्य असते तर काँग्रेस किंवा भाजप सारख्या अनुभवी पक्षांनी अशी खैरात वाटली नसती का?

पंजाब जिंकल्याबद्दल आपचे अभिनंदन, पण आता दिल्ली मॉडेल तिथे राबवण्यासाठी पैशाचे सोंग कसे आणतात हे बघण्यात जास्त स्वारस्य आहे.

स्वगत - केंद्राने केवळ पोलीस खात्याचा खर्च जरी दिल्लीच्या तथाकथित राज्य सरकारवर टाकला तर महामहिम केजरीवाल आज जी खैरात वाटत आहेत ती त्यांना वाटणे शक्य होइल का?

प्रदीप's picture

10 Mar 2022 - 7:45 pm | प्रदीप

वे. युपी मध्ये सुद्धा "लाभार्थी फॅक्टर" होता हे सर्व पोल्स मधून दिसले आहे.

इतकेच नव्हे, तर तिथे फुकट रेशनवाटपही झाले होते, असे काही यूट्यूबच्या व्हिडीयोंमाधून दिसले.

मला वाटते, हा 'लाभार्थी फॅक्टर' व सुधारलेली सुरक्षा व्यवस्था, ह्या दोन्ही बाबींमुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपाला भरघोस मतांनी पुन्हा निवडून दिले आहे.

म्हणाला की मी निवडूध आलो तर पाणी आणि वीज बिल अर्धे करीन तर "जनता" त्यालाच मते देईल.

केजरीवालांनी हीच आइडिया केलेली. त्यांनी ओळखले की उत्तम प्रशासन ते हेच.

बाकी ती बिलं अर्धी करतात, मेट्रो भाडे स्वस्त ठेवतात ते कुणाच्या जिवावर?
- दुसऱ्या राज्यांच्या महसुलावर.
-------------

यावर सविस्तर वाचायला सोर्स मटेरियल आहे का ?

बरेच लेख येतील.
त्यापैकी एक -
timesofindia/india/delhi-election-results-7-reasons-why-arvind-kejriwal-led-aap-won

शाळेच्या
फीया, खाजगी शाळांची फीवाढ रोखणे आणि पाणी - वीज सर्व दिलंय.

आताच्या पंजाब निवडणुक प्रचारातही परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या मुलांचा प्रश्न मांडला होता त्यांच्या भावी मुख्यमौत्री मान यांनी ( इंडिया टुडे २१ फेब्र मुलाखती - " परदेशी शिकायला जाणारा विद्यार्थी २५ लाख रुपये डुबवतो देशाचे, तिकडेच राहतो. ते थांबवायचा प्रयत्न करणार. ")

मी काही मनाला येईल ते ठोकत नाही.

तुम्ही दिलेली लिंक चालत नाही.
तुम्ही ठोकता असे म्हणलेच नाही.
सोर्स केजरीवाल ने काय कामं केली यासाठी नाही, दुसऱ्या राज्याच्या म्हसूलातून यासाठी हवा होता.

दिल्ली मध्ये मिळणाऱ्या महसूल वर केंद्र सरकार आणि काही फुकटी राज्य अवलंबून आहेत.
हे सत्य असताना दिल्ली सरकार दुसऱ्या राज्यांच्या महसूल वर आणि केंद्र सरकार च्या मिळणाऱ्या देणग्या वर त्यांच्या जनतेला सुविधा देत आहे .
हा नवीन च शोध म्हणायचं.

भाजपा विरुद्ध एवढे वातावरण निर्मिती झाल्यावरही मतदार अचानक का फिरले?

बहुदा ही वातावरण निर्मिती आंतरजालावर आणि टिव्हीवर असते. ती खाली झिरपेल असे नाहीच.
--
पण ह्या वेळी कोणी पुरस्कार परत करुन बडेजाव केला नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमे युक्रेन-रशिया युध्दात गुंतल्याने हिंदुत्वा टेरर मध्ये रस नसावा.

sunil kachure's picture

10 Mar 2022 - 9:54 pm | sunil kachure

BJP ल मत देवून त्यांना विजयी केले.
आता परत bag भरून गैर bjp सरकार असलेल्या राज्यात पोट पाण्यासाठी जावूया.
उरका लवकर.
केजरीवाल ला किती शिव्या दिल्या तर त्याच्याच राज्यात पोट भरणार आहे.
महाराष्ट्र ल किती नाव ठेवली तरी
तिथे गेल्या शिवाय घर चलने मुशिकील आहे.

जसे काही तुमच्या आवडत्या महाराष्ट्रीयन प़क्षांचा तिकडे मुख्यमंत्री बनला असता तर तिकडच्या लोकांची तिकडेच पोटे भरली असती.

निकाल अतिशय आश्चर्यकारक, लोक भाजपला का निवडणून देतात हे कळत नाही – हरीश रावत
https://www.loksatta.com/elections/i-cant-understand-people-saying-bjp-z...

श्री गुप्तांनी आपला काँग्रेसच्या जागी आणले आणि श्री योगी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले.

sunil kachure's picture

10 Mar 2022 - 10:43 pm | sunil kachure

लोक काय विचार करून मतदान करतात हेच मोठे कोडे आहे
योगी सरकार किंवा bjp परत निवडून येणे ह्या वर दुःख नाही.
पण लोकांनी bjp ल आणि योगी ना मतदान केले असेल?
१) मोदी मुळे.
२) भावनिक प्रश्न जसे धर्मवाद, जाती वाद मुळे .
बुरखा प्रकरण कर्नाटक मध्ये मतदान काळात च का उभे राहिले आणि आता का शांत झाले ते प्रकरण
आर्थिक प्रश्न लोकांस का महत्वाचे वाटत नाहीत.
उपासमार,रोजगार,शेतकऱ्यांची बिकट अवस्था.
आरोग्य सेवा चे तीन तेरा.
भ्रष्ट प्रशासन .
हे जीवनासाठी अती आवशक्य बाबी वर लोक मत देत नसतील आणि फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देत असतील.
तर देशाचे भविष्य अंधार मय आहे .
हे नक्की
यूपी मध्ये bjp ल लोकांनी का मत दिली असतील?
त्याची कारणे काय?
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे
देशाचे भविष्य त्या वर अवलंबून आहे

काही लोकांना जन्मतच अंधत्व आलेले असते त्यामुळे त्यांना डोळ्यावरची झापड काढा असे सांगून उपयोग नसतो.

Trump's picture

10 Mar 2022 - 10:51 pm | Trump

श्री कचुरे, तुम्ही सगळीकडे प्रतिसाद लिहीता.
--------

यूपी मध्ये bjp ल लोकांनी का मत दिली असतील?
त्याची कारणे काय?
हा प्रश्न खूप महत्वाचा आहे

ह्यावर लेख लिहा.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

11 Mar 2022 - 3:07 am | ॲबसेंट माइंडेड ...

फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देत नाहित हा अर्थ आहे.

चौकस२१२'s picture

11 Mar 2022 - 5:31 am | चौकस२१२

जाती वाद मुळे .?

उत्तर प्रदेशात पूर्वी प्रमाणे जर लोकांनी तर सपा ज्याला यादव समाजाची मते जातात का निवडून आला ?
एकीकडे म्हणता कि .. "bjp परत निवडून येणे ह्या वर दुःख नाही." आणि दुसरीकडे तेच ते रडगाणे ! लोकांच्या निर्णयावर शंका घेणे धन्य

सामान्यनागरिक's picture

11 Mar 2022 - 12:58 pm | सामान्यनागरिक

शेतकर्यांच्या भल्यासाठी कायदे आणले तर ते परत घ्यायला लावले. मग आता मोदीला दोष का देता? शेतकर्यांना कर्ज माफी, फुकट गोष्टी मिळण्याची सवय झाली आहे.
आजही प्रतिकूल परिस्थीत सुद्धा छोट्याश्या जमीनीत चांगली शेती करणारे शेतकरी आहेत.

भावनिक प्रश्नांवर काही लोक मतदान करतात. एवढे बहुमत मिळत नाही.
उप्र मधील सगळेच लोक मूर्ख आहेत असे म्हणायचे आहे का ?

आणि जर एखाद्या उत्तर भारतीय माणसाने ठरवले की भावनिक मतदान नाही करायचे तरी तो मत कोणाला देणार? जर योगी/ मोदी ने १०० पैकी १०च चांगल्या गोष्टी केल्या असतील तर सपा/बसपा यांनी काही चांगल्या गोष्टीकरायची इच्छा सुद्धा व्यक्त केलेली नाही. ते फक्त आपल्या बिरादरीतील लोकांचे भले करण्यात गुंतलेले होते. मायावतीने तर हत्तींचे पुतळे उभे करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. त्याचीच शिक्षा मिळाली आहे.

जर संसदेत विरोधी पक्षांनी अडवणुकीचे धोरण राबवले नसते तर अनेक चांगले निर्णय/ कायदे झाले असते. आणि मग त्यांना ( विरोधकांना )कंटाळुन जनतेने भाजपला मत दिले नसते.

सुबोध खरे's picture

11 Mar 2022 - 7:11 pm | सुबोध खरे

कशाला त्या कचरे साहेबाना उत्तर द्यायच्या भानगडीत पडताय?

ते फक्त उ हा ब क ( उचल हात बडव कळफलक) आहेत


“आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य आहे, त्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा सल्लावजा सावधगिरीचा इशारा

महाराष्ट्राच्या महाप्रवक्त्यांच्या नावाने पुरस्कार चालू करुन पहिला पुरस्कार चंद्रकांत पाटलांना द्यावा अशी मी मागणी करत आहे. कृपया अणुमोदण द्या.

श्री राऊत काय करतील श्री उध्दव ठाकरे यांनी हाकले तर ?

माननिय मुख्यमंत्री दिलदार आहेत. ते असे काही करणार नाही.

sunil kachure's picture

10 Mar 2022 - 11:01 pm | sunil kachure

सहज गंमत म्हणून घेण्यासारखे हे प्रश्न नाहीत
गंभीर व्हा.
सर्वांचे भविष्य त्या प्रशनाधी निगडित आहे.
यूपी मध्ये bjp ल का मतदान झाले.
योगी नी यूपी चे रुपांतर .
प्रगत,रोजगार देणारे राज्य,स्वच्छ प्रशासन.
उन्नत ग्रामीण अर्थ व्यवस्था,नियाजान बद्ध सुंदर शहर ह्या मध्ये केले आहे का?
किंवा पुढे ते करतील ह्याची खात्री आहे का?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

10 Mar 2022 - 11:29 pm | रावसाहेब चिंगभूतकर

बाकीचे लोक हे प्रश्न सहज गंमत म्हणून घेताहेत हा तुमचा गैरसमज आहे. बाकीचे लोक तुमच्या पोस्ट ची चातकासारखी वाट पहात असतात. तुम्ही या लोकांना जागृत करण्यासाठी ज्ञानदान चालू ठेवावे.

sunil kachure's picture

11 Mar 2022 - 12:48 am | sunil kachure

Sp ल दोन नंबर ची मत मिळतात हे पण चिंताजनक आहे
काँग्रेस नी ती जागा घेतली असती तर मतदार सजक आहेत ह्याचा थोडाफार तरी पुरावा मिळाला असता.
बाकी पंजाब,मणिपूर ,गोवा ह्या राज्यात मतदार परिपक्व आहेतं
यूपी आणि उत्तराखंड येथील मतदार अजून पण भावनिक प्रश्नावर मतदान करतात.
आणि हे चिंता जनक नक्कीच आहे.