मन.....
मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस..
मन आभास आभास... मन सुवास सुवास...
मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा
मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा....
मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ
मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ.....
मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी.....
मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं....
मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस......
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....
मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा....
वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा.....
वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा....
- चंद्रशेखर
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....
वाह महामुनी साहेब तोडलत....
एकदम ज ह ब र्या कविता.. येउ द्यात अजुन.
अणि हो मिपावर स्वागत :)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
19 Mar 2009 - 12:00 pm | अनिल हटेला
"मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी....."
क्या बात है !!
येउ द्यात अजुनही !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Mar 2009 - 2:36 pm | जागु
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....
वा खुप छान
बहिणाबाईंची
मन वढाय वढाय ... उभ्या पिकातल ढोर
आठवली.
19 Mar 2009 - 9:52 pm | क्रान्ति
खूप खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
19 Mar 2009 - 11:26 pm | प्राजु
मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकलं हाकलं, फिरी येतं शिरावर..
बहिणाबाईंच्या या काव्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Mar 2009 - 11:35 pm | शितल
कविता आवडली. :)
20 Mar 2009 - 4:20 pm | चन्द्रशेखर गोखले
तुम्हाला आणि तुमच्या कवितेला नमन!!!!
20 Mar 2009 - 7:34 pm | चंद्रशेखर महामुनी
आपलि दाद हा माझा सन्मान आहे !
खुप आभार ! आणखि बळ आले....
20 Mar 2009 - 5:11 pm | अमोल खरे
यमक छान जुळवलं आहे.
20 Mar 2009 - 7:36 pm | चंद्रशेखर महामुनी
आभारि आहे ! अमोल !
24 Mar 2009 - 12:16 pm | जयवी
फ़ारच गोड कविता !!
मनाचं वर्णन कितीतरी लोकांनी कितीतरी प्रकारांनी केलंय..... !! तरीही त्याचा थांग लागत नाही हेच खरं!
24 Mar 2009 - 12:33 pm | चंद्रशेखर महामुनी
आभार ! जयवी !
खरे आहे.... मनाचा थांग लागत नाहि हेच खरे.... !