गुलमोहर.!
माझ्या अंतर्बाह्यात
सामावलीस तू.
दूरवर पसरलेल्या मार्गात माझ्या
उभी होतीस तू.
अन् मी पुढेच जात राहिलो,
गुंग होऊन माझ्या विचारांत.
जीवनही गुरफटून गेले
त्या अनुत्तरित प्रश्नांत.
तुला भेटण्यास
दोन शब्द बोलण्यास
वेळच कुठे होता? आता...
आता तर पर्जन्यधारांसमवेत
बरसतेस तू.
आणि शेवटी वेळ
असताना मजपाशी
घाईत आहेस तू.
काय सांगू, काय सांगू आपण...
अजाणताच म्हणतो -
आहे बेमौसम हे शहर.
पुन्हा कधीतरी भेटूया...
अलविदा - ए - गुलमोहर.!
प्रतिक्रिया
12 Mar 2009 - 6:25 pm | चन्द्रशेखर गोखले
छान कविता !!
12 Mar 2009 - 11:03 pm | क्रान्ति
सुरेख कविता!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}