क्षितीज दुरुन फार छान दिसते,
म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात,
तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते.
म्हणुन त्याला आपण गाठायचे असते..
जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते,
पण आपण मुळीच कंटाळायचे नसते.
तर त्याला आपण गाठायचे असते..
खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.
कारण त्याला आपण गाठायचे असते..
एक दिवस कळते आपण बरेच अंतर कापलेले असते,
आणी तरीही क्षितीज तिथुनही तितकेच दुर असते.
पण मागील लोकांना आपण क्षितीजावरच असल्याचे भासते..
तिथेही आपण थांबायचे नसते, पुढे पुढेच जायचे असते,
क्षितीज अजुनही दुर असते, त्याला आपण गाठायचे असते..
त्याला आपण गाठायचे असते..
__ निशिगंध
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 8:50 am | क्रान्ति
कविता आवडली.
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
25 Apr 2009 - 9:36 am | मदनबाण
खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात,
पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.
कारण त्याला आपण गाठायचे असते..
मस्तच... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
25 Apr 2009 - 3:33 pm | निशिगंध
धन्यवाद क्रान्ति आणी मदनबाण
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!