केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे
- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम
सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे
छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर
असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8
प्रतिक्रिया
2 Apr 2024 - 12:19 pm | मुक्त विहारि
https://www.marathi.hindusthanpost.com/special/history-of-andaman-jail-n...