शाळा की मंदिर
थोडा विस्कळीत आहे हा लेख पण समजूत घ्याल अशी अपेक्षा
सध्या राम मंदिर एकदम हॉट टॉपिक आहे त्या मुळे, मंदिर कशाला त्या पेक्षा शाळा , इस्पितळे यावर खर्च केला पाहीजे अशी वाक्य परत ऐकू यायला लागली आहेत. मला खरंच माहीत नाही काय योग्य आणि अयोग्य , एखाद्यावेळेस इतिहासच याचे उत्तर देईल. पण मला मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि माणूस केंद्रित विचार करायला आवडतो.
सगळीच माणसे वेगळी वेगळी असतात. त्यांचे ज्ञान आणि शिकणेही वेगळे असते. अगदी प्रज्ञा पण ९ प्रकारच्या असतात. कोणी गणित , शास्त्र लवकर शिकू शकतो, कोणी भाषा, कोणी शारीरिक कामे जसे खेळ , कोणी चित्रकला, कोणी संगीत तर कोणी शिल्पकला. त्यातही एखाद्याला चित्रकलेत गती असली म्हणजे लगेच तो पिकासो होत नाही. त्यातही प्रत्येकाची पातळी वेगळी असू शकते. काही लोकांना एकाहून अधिक विषयात गती असू शकते.
समजा एखाद्याला एखाद्या विषयात गती नाही पण त्यातच शिक्षण आणि कारकीर्द करायला जबरजस्ती केली तर त्याची प्रगती होणे खूप कठीण आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेत हेच होत आहे , फक्त गणित , विज्ञान, हिशेबनीस , संगीत , अभिनय इत्यादी मोजक्याच विषयात यशस्वी कारकीर्द करता येते, पण बाकीच्यांनी काय करायचे?
एका सुदृढ समाजात खरंतर सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या विषयात संधी मिळाली पाहिजे, पण त्यातील काही ठिकाणी राजाश्रय पण जरुरी असतो, म्हणून इतिहासाच्या पुस्तकात एखाद्या यशस्वी राजाबद्दल बोलताना त्याच्या राजाबद्दल बोलताना भरभराट आणि त्याने विविध कलावंतांना दिलेला राजाश्रय आणि बांधलेली मंदिरे, विहिरी, महाल या बद्दल लिहिले असायचे.
सांगण्याचा उद्देश म्हणजे जो पर्यंत अति होत नाही तो पर्यंत मंदिरे किंवा तत्सम गोष्टी समाजाच्या किंवा राजाश्रयाने बांधणे काहीच वाईट नाही.
खरं तर जातीनिहाय सर्वेक्षणाऐवजी , प्रज्ञा निहाय सर्वेक्षण केले पाहिजे म्हणजे तसे शिक्षण तयार करता येईल आणि समाजाचीही अधिक गतीने प्रगती होईल
आपला काय विचार ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रज्ञा निहाय सर्वेक्षण
असे प्रश्न पडताहेत म्हणजे
'
बुद्धीची कीव करावी की बदमाशपणाचा राग
कधीच सूटलाय. कर्मठ
>>> कर्मठ मनूवाद्यांना मंदीर
हिंदू सुधारतोय/सुधारलाय हा
हिंदूंना मंदिर नको आहे
ह शाळा नी मंदिर विचारलं तर
मंदिर सनातनींना हवं असतं.
लोकांच्या टॅक्स मधूनो हज हाउस
+१०८
काय बनवा बनवी चालली आहे
तुम्ही दिलेल्या आकड्यात फक्त
आपल्या माहितीचा स्रोत कोणता आहे?
बाकी भारत सरकार मंदिरांचा
अहिरावण
त्यांचं तसंच आहे. सरकारवर
अरे नका भेटू जबरदस्ती नाही.
अरेरे
गोरा मनूका खाल्ला तर काय होईल
गोरी मनुका नसते. काळी असते
शाळा की मदिरालये असा प्रश्न
आलयं....
दक्षिणा
आकडेवारी आहे का ...
+१ ऊनाड
शाळा उघडण्यासाठी मंदिर
मंदिर हीते म्हणून कारोना
मंदिर हीते म्हणून कारोना काळात कुणी उपाधी राहिले नाही.दिल्ली नी महाराष्ट्रात मंदिरे बंदं होती तिथे अनूक्रमे केजरीवाल नी ऊध्दव ठाकरे हेच देवरूपाने लोकांसाठी धीवून येऊन कुणालाही ऊपाशी ठेवले नाही तिथे मंदीरे धावून आली नाहीत. मंदिरे हे फक्त काही लोकांची दक्षीणा घेऊन पोट भरण्याची जागा आहे.खिक्क
केंद्राने राज्याचा जीएसटी
असो. राजकिय होईल. पण देवरूपी
>>>केंद्राने राज्याचा जीएसटी
असूद्या सर. केंद्राने जीएसटी
हा हा हा
साहेब त्या id ला प्रतिसाद नका
+१ आणी आपल्या लाडक्या
भुजबळ बुवा
झाझू?? हे काय आहे??
खरे साहेब, तुम्हाला तुमच्या
हा हा हा
२०१९ ला केंद्राने भर कोरोनात
२०१९ ला आणी नंतर भर कोरोनातही
अगदी बरोबर. योग्य तर्क आणि
साहेब तुम्हाला उद्देशून नाही
असो. चर्चा राजकिय दिशेने
दिल्ली, महाराष्ट्राच्या
डाॅक्टर साहेब तुम्ही ऊच्चभ्रू
काय ठरलं मग ?
मधला मार्ग निवडूयात. मदिरालये