किशन भारवाडचा खून - आरोपी सब्बीर आणि जमालपूर येथील मौलाना.
अहमदाबाद जिल्हा रहिवासी असलेल्या किशन भारवाड यांची २५ जानेवारी रोजी धंधुका तालुक्यात दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. किशनजी घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सब्बीर, इम्तियाज आणि जमालपूर येथील मौलाना अयुब जावरवाला यांनी यापूर्वी मे २०२१ मध्ये पोरबंदर येथील रहिवासी साजन ओडेदरा याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोरबंदरमध्ये तो सापडला नाही.
एटीएसचे एसपी आयजी शेख यांनी सांगितले की, किशन भारवाडच्या हत्येप्रकरणी मौलाना कमरगानी उस्मानी याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या एका फेसबुक पोस्टमुळे किशन भारवाडची हत्या करण्यात आली आहे. एका बैठकीत कमर गनी यांनी आरोपींना सांगितले होते की, जर कोणी त्यांच्या धर्माविरुद्ध बोलत असेल तर त्या व्यक्तीला संपवले पाहिजे. त्यामुळेच कमर गनीच्या सांगण्यावरून या दोन्ही आरोपींनी किशन भारवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2022 - 2:09 pm | प्रसाद_१९८२
'भारताची घटना नव्याने लिहिण्याची गरज आहे' असे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हटले म्हणून बरे झाले. हेच जर एकाद्या भाजपाशासित राज्याचा मुख्यमंत्री अथवा नेत्यांने म्हटले असते तर कॉंग्रेससहित सर्व लिब्बू लोकांनी, भाजपा विरोधात जमिन आस्मान एक केले असते. मात्र असे स्टेटमेंट एका लिब्बूने दिले असल्याने, 'चोर चोर, मौसेरे भाई' या उक्तीप्रमाणे सध्या सर्व लिब्बू गप्प आहेत.