अनामिक
खरी कविता कधी येते माहितीये का?
जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!!
तीच तिची खरी-यायची वेळ..
तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही..
खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा
खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! .
वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ..
काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!!
हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!???
असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही!
अंतरीच्या बोल वाटे तू आता जवळी रहा
मीच माझे शब्द सांडू का मला सांगू पहा.
हीच आता वाट नवखी चालतो तुझिया सवे
वेदनेचे अर्थ कथिशी ,बोलतो ..असू दे नवे!
काय गाठू शब्द आणखी आशयाला तोकडे
सोडूनि देतो तुला मी जा कशी तुझिया सवे...
मुक्तछंदी मुक्तबंधी जा आता जगती जरा
लागला तर अर्थ थोडा दे मला सत्यी खरा.....
आत्मबन्ध..
अरे?
अंतरीच्या बोल वाटे तू आता
सुंदर.
आवडली.
खरी कविता कधी येते माहितीये
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा.
(आतून आलेली हाक?)
अर्थवाही
@ज्ञानोबाचे पैजार, यशोधरा,
आत्मबंध आवडला आहे ..