म्हणतात ना ,
अंत भला तो सब भला ,
हेच खरे .
सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला
वाईट न म्हणनेच बरे
वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही
सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही
शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही
सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई
हरलास तू , असं कुणी बोलत असेल
अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल
त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं
अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं
म्हणावं ,
जिंकला आहेस तू , मी हरलो नाही
शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही
- अभिषेक पांचाळ
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 11:07 am | चांदणे संदीप
सुंदर कविता!
मिपाच्या गदारोळात हे चांगल कुठेतरी दुर्लक्षित व्हायला लागलंय! :(
Sandy
5 Apr 2016 - 1:47 pm | अभिषेक पांचाळ
Thanx sandip sir
5 Apr 2016 - 9:03 pm | पैसा
कविता आवडली.