आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते.
त्याचा अर्थ काय ?
आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे .
खाली काही उदाहरणे देत आहे,
छत्रपति शिवराय : मराठा
महात्मा फुले : माळी
डॉ . बाबासाहेब आंबेडकर : बौद्ध
राणी अहिल्यादेवी होळकर : धनगर
लोकमान्य टिळक : ब्राम्हण
हि तर काही उदाहरणे आहेत , आमच्या मनावर हे सगळे इतके ठासवून भरले आहे कि काही साहित्यक पण जाती पातीचा उल्लेख करूनच ह्या सर्व व्यक्तींबद्दल लिहितात .
जर ह्या लोकाची चरित्र वाचली तर ह्यांनी मात्र कधीही जातीपातीला आपल्या मनात थारा दिला नव्हता . त्यांना एकच जात माहित होती , माणूस .
आज काल जर समजा मी वरील पैकी कुणाचेही गोडवे गावू लागलो कि लोक आधी माझी जात पाहतील.
कधी संपणार हे ?
आजही शाळेत जातीचा दाखला मागितला जातो , का म्हणून ? एका बाजूला जाती पाती संपवून टाका म्हणायचे आणि जिथून खरे संस्कार सुरु होतात त्या विद्यामंदिरात जात तपासायची .
वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सर्व जाती धर्माची लोक होती. त्यांनी कधीही म्हटले नाही कि हा अमुक जातीचा आहे म्हणून ह्याला सोबत नको . मग आपण का ह्यांना जाती आणि धर्मात अडकवून टाकलेय ??
प्रत्येक वेळेस कुठल्या नि कुठल्या राजकीय स्वार्था साठी एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्व बळी जातेय.
प्रतिक्रिया
22 Apr 2015 - 5:07 pm | कपिलमुनी
22 Apr 2015 - 5:13 pm | प्रमोद देर्देकर
जाने दो कमुतै नया है वह!
22 Apr 2015 - 5:17 pm | टवाळ कार्टा
कमु "तै" नैत =))
22 Apr 2015 - 5:17 pm | प्रमोद देर्देकर
प्रकाटाआ
22 Apr 2015 - 6:16 pm | पॉइंट ब्लँक
ह्यावर चर्चा करून काय फायदा नाय. सगळ्यांना स्वतःचा फायदा बघायचाय. ऐतिहासिक व्यक्तीचा बळी गेला काय आणि त्याचा बाजार झाला काय, सगळ एकच!
22 Apr 2015 - 7:06 pm | सुबोध खरे
हा विषय च्युईंग गम चघळण्या सारखा आहे
कितीही वेळ चव पोटात काही जात नाही
आणि
थोड्या वेळाने तोंडाला स्वाद पण राहत नाही.
22 Apr 2015 - 7:12 pm | मोहनराव
असल्या जिल्ब्या आजकाल तळल्या जात नैत!
22 Apr 2015 - 8:21 pm | बाबा पाटील
कोणतीच जात समावुन घेत नाही.
22 Apr 2015 - 10:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
चांगला मुद्दा रे नितिना. आम आदमी पार्टी सोडली तर बाकी सगळे जात-धर्म मानणारे पक्ष आहेत.
22 Apr 2015 - 11:18 pm | धर्मराजमुटके
अहो मग हे चांगलेच नाही का ? भारतात तुमची जात कोणतीही असो, त्यात एखादा तरी महापुरुष जन्माला आलेला असतोच. समजा मी मराठा आहे आणि इतर सर्व जातीत महापुरुष आहे पण माझ्याच जातीत नाही तर मला कमीपणा नसता का वाटला ? या महापुरुषांच्या महानपणामुळे तुम्ही अगदी दिपून जाता व त्याचा मार्ग अनुसरण्यास तुम्हाला उभा जन्म पुरत नाही. मग इतर महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन घडविणे कधी जमणार ? त्यामुळे आहे ते ठीक आहे. पुढे चालत रहा.
माझ्या शाळेत तर नव्हता मागीतला बुवा.
23 Apr 2015 - 12:43 am | खटपट्या
आडनाव लावायचे बंद केले तर होईल का काही?
23 Apr 2015 - 7:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही जात-पात पाळत नाही असं म्हणणारी नवीन "निर्जात जात" उदयाला येईल. आणि अल्पसंख्य असल्याच्या नावावर आरक्षण मागेल. आपल्या देशाचा भरोसा नाही.
सिरियस होउन जरी आपल्या डॉक्युमेंटवरती जात लावणं बंद केलं तरी जवळपास ७०-८०% अर्ज भरताना जातीची जागा रिकामी सोडुन चालत नाही. :/
23 Apr 2015 - 8:55 am | जेपी
महात्मा घेता का ?महात्मा>>>
घेतो की! काय भाव चालु आहे..
23 Apr 2015 - 11:32 am | सतीश कुडतरकर
आवशीकखावव्हरान, आमच्यात कोन म्हपुरूस जन्माकच येवक नाय.
अंबानी, बिर्ला, अगरवाल, गुप्ता यांच्यापैकी कोन हा काय?