गाभा:
http://www.esakal.com/esakal/20120523/4617244213726099706.htm
आजच्या सकाळमधील आजची बातमी वाचण्यासारखी आहे. राष्ट्रपतीपदाचे आपले एक उमेदवार संगमा हे सोनीयांच्या पाठींब्यासाठी त्यांची माफी मागायला तयार आहे. ( त्यांनी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला होता).
प्रंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर सर्व पदांचे अगोदरच बर्यापैकी अवमूल्यन झालेले आहे किंवा होत आहे. आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते.
प्रतिक्रिया
23 May 2012 - 5:40 pm | विकास
यातून एकच सिद्ध होते की श्री. संगमांचे व्यक्तीमत्व पारदर्शक आहे आणि ते प्रामाणिक आहेत. आत-बाहेर काही ठेवत नाहीत. :-)
आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते.
"वाटत होते" असे म्हणायचे आहे का? आणिबाणीच्या काळात फक्रुद्दिन अली अहमद, नंतरच्या काळात ग्यानी झैलसिंग यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली-दिली-घेतली त्यावरून हे आधीच झाले आहे असे वाटते. (झैलसिंगांना तर "महाभियोग" खटल्याला सामोरे जावे लागेल असा मेसेज मिळेल अशा पद्धतीने वंदता चालू केल्याच या संदर्भात आठवते...).
23 May 2012 - 7:17 pm | नाना चेंगट
नेहरु - राजेंद्रप्रसाद यांचे संबंध कसे होते ? :)
24 May 2012 - 12:48 am | विकास
येथे चांगली आणि थोडक्यात माहीती आहे.
24 May 2012 - 12:53 am | चिंतामणी
काय व्हायचे बाकी आहे? मधल्या काळातील काही राष्ट्रपतींची (आत्ताच्या सकट) नावे आठवुन बघा. खात्री पटेल.
25 May 2012 - 5:56 pm | jaydip.kulkarni
ह्या मागे पण काहीतरी "पावर" गेम असावी , कारण ह्यांच्या घराच्या लोकांनी पाठींबा दिला नाहीये .........आणि खरच राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन झाले नाही काय ह्या आधी , गेल्या शतकात राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती नव्वदी पार केलेली होती, किती कार्यक्षम असतील नाही हे...