मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी
सांभाळ मुला रे सांगुन गेली आई
ती प्राणपणाने लढली घन तिमिरात
कष्टात गुंतली अथक राबली बाई
मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई
भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही
वाढता वाढता वय गढले संसारात
मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई
हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात
मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत
ठरवून न ठरवूनही न घडले कांही
निसटल्या क्षणांनो सांगा मज;
मी कसा होउ उतराई....
.............अज्ञात
प्रतिक्रिया
22 Nov 2011 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा
शब्दात प्रतिक्रीया नोंदवायला तुमच्या कविते एवढीच प्रगल्भता आणी प्रतिभाही लागेल...ती माझेपाशी नाही. आपल्या ह्या काव्यांजलीस विनम्र अभिवादन
23 Nov 2011 - 10:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी असेच म्हणायला आलो होतो!! अआ. माझ्या भावनांना शब्द दिल्याबद्दल आपले आभार!!
22 Nov 2011 - 11:23 pm | पैसा
छान कविता.
23 Nov 2011 - 7:24 am | मनीषा
(समृद्धी, प्रगतीचा हा शाप म्हणायचा की वास्तविकता ?)
अतिशय सुंदर कविता !
24 Nov 2011 - 9:10 am | विदेश
ठरवून न ठरवूनही न घडले कांही
निसटल्या क्षणांनो सांगा मज;
मी कसा होउ उतराई....
आता शक्यच नाही .
24 Nov 2011 - 9:43 am | सुहास झेले
सुंदर कविता.... :)
24 Nov 2011 - 4:14 pm | navinavakhi
अतिशय सुंदर कविता !
24 Nov 2011 - 5:33 pm | रुमानी
कविता आवडलि.
30 Nov 2011 - 2:47 pm | राघव
अगदी मनातून खोलवरून आल्यासारखे वाटले.
एवढी सुंदर कविता वाचावयास दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
राघव