आज सिंहावलोकन करावं , भूतकाळाचं प्रतिबिंब पहावं
पदरची घालून माती , आठवणींच रोप लावाव..
सांगा किती प्रयत्न केले , आणि किती निसटल्या संधी ?
किती जगलो झूरत झूरत , आणि जगलो किती स्वच्छंदी
किती दिले घाव शब्दांचे , किती भरल्या जखमा नंतर,
किती वाटा चूकल्या धावताना , आणि चाललो किती अतंर
किती बहरला गुलमोहोर प्रेमाचा , आणि किती निवडूंग झालो
कितीदा पेटून उठलो हक्काने , आणि कितीदा लाचार झालो
सारं इथेच सूटत जाईल , वेळ आणखी संपत जाईल
पूसट होतील पाऊलखूणा , शेवटी फक्त आठवण राहील
दिवस येईल नव्याने , पण तो ही नंतर सरुन जाईल,
नविन इथे काहिच नाहि, आठव फक्त स्मरुन राहिल
उगाच नको गोंधळ शब्दाचा , सारं काही नितळ आहे,
जरी सरल्या असंख्य रात्री , प्रत्येक दिवस नूतन आहे...
प्रतिक्रिया
31 Dec 2010 - 4:58 pm | अमोल केळकर
चांगली कविता.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!
अमोल केळकर
31 Dec 2010 - 6:15 pm | विजुभाऊ
साध्या सोप्या रचनेची गम्मत काही निराळीच असते.
छान
31 Dec 2010 - 6:53 pm | गणेशा
प्रत्येक ओळ आणि ओळ सुंदर आहे ..
मनापासुन आवडली कविता
4 Jan 2011 - 7:08 am | शुचि
अप्रतिम सुंदर कविता. फारच पटली.
4 Jan 2011 - 10:29 am | विलासराव
अप्रतिम अशी कविता.
फार्फार आवडली.