स्वातंत्र्य संपले????????

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
6 Dec 2011 - 4:22 pm
गाभा: 

मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते.

केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे.

थोडक्यात सेन्सॉरशीप येणार आहे. आत्ता या साईटसवर "सिब्बल" हा "मोस्ट हॅपनींग" विषय झाला आहे.

या साईटसवर फक्त "मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी" असतात का?

इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी??

वाचून हसावं की रडावं...?
केंद्र सरकारनं इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटसवर 'सेन्सॉरशीप' आणायचं ठरवलंय. कोणताही कन्टेन्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी 'प्री स्क्रिनिंग' व्हावा आणि 'चुकीचा' कन्टेन्ट काढून टाकावा, असा फतवा काढण्याची पावलं केंद्र सरकार टाकतेय...!!!

फेसबुक, गुगल, याहूला सरकारकडून ताकीद
http://www.esakal.com/esakal/20111206/5411406916295255938.htm

सरकारची सोशल नेटवर्किंग कंपन्यांना धमकी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11003772.cms

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

6 Dec 2011 - 4:34 pm | मृत्युन्जय

मनमोहन सिंग : शीख
सोनिया गांधी: ख्रिश्चन
मोहम्मद पैगंबरः मुसलमान

हिंदु धर्मांधांमुळे सामान्य जनतेवर ही सेन्सोरशिप लागू होते आहे. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यासारख्या सज्जन, पापभीरु, देशभक्त लोकांवर हे लोक टीका करतातच कसे?

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Dec 2011 - 4:42 pm | पुण्याचे वटवाघूळ

उगीच धर्म घुसदू नका हो. राजीव गांधींविरूध्दही मजकूर हे लोक चालू देनार नाहीत. ते तर हिंदूच होते ना?तेव्हा मुख्य मापदंद यांच्या मर्जीतला असने हे आहे. हिंदू किंवा अहिंदू असने नाही.

पुण्याचे वटवाघूळ

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 5:03 pm | सोत्रि

ते तर हिंदूच होते ना?

ह्या विवादास्पद मुद्दा आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.

- (गाधींच्या 'निधर्मी' राष्ट्रातला रहिवासी) सोकाजी

मृत्युन्जय's picture

6 Dec 2011 - 5:11 pm | मृत्युन्जय

खाली गणपाने लिहिले आहे तरीही लिहिण्याचा मोह आवरत नाही. राजीव गांधी पारशी होते असा समज आहे. बाकी सोकाजी म्हणतात त्याप्रमाणे जाणकार प्रकाश टाकतीलच :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Dec 2011 - 5:25 pm | पुण्याचे वटवाघूळ

राजीव गांधी हिंदू नव्हते याविषयी कोनता पुरावा आहे तुमच्याकडे? वडिल पारशी म्हणून ते आपोआप पारशी बनतात का? राजीव गांधींनी इंदिरा गांधींवर अंत्यसंस्कार हिंदू पध्दतीनेच केले होते. यातून ते स्वतः हिंदू असल्याचे मान्य करत होते याचा पुरावा नाही का?

बरं इंदिरा गांधी, पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याविरूध्द काही लिहिलेलेही ही मानसे सहन करणार नाहीत. आता ही मंडली तर हिंदूच होती ना?

पुण्याचे वटवाघूळ

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

थत्तेचाच्यांच्या सविस्तर प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

नितिन थत्ते's picture

6 Dec 2011 - 6:08 pm | नितिन थत्ते

प्रतिसाद द्यायचा आग्रह केलात? आता भोगा आपल्या कर्माची फळं :P

सेन्सरशिप असू नये. [परंतु सेन्सरशिप नसून प्री चेक ऑन कण्टेण्ट आहे असे मंत्रीमहोदयांनी म्हटले आहे]

फेसबुकसारख्या ठिकाणी ही & हि पोस्ट/फोटो/व्हिडिओ आली असेल तर "रिपोर्ट धिस फोटो" च्या बटणावर क्लिक करता येते. तसे कधी कधी मी केलेले आहे. कधी कॉमेंटही लिहिल्या आहेत. परंतु अश्या पोस्ट पटापट शेअर होऊन त्यांचा इतका धबधबा होतो की प्रत्येक ठिकाणी जाऊन "रिपोर्ट" करणे शक्य नसते.

मध्यंतरी "काँग्रेसचे वाटोळे व्हावे" या भावनेतून लिहिलेली दीपिका पडुकोणच्या (पायगुणा)बाबतची पोस्ट फेसबुकावर/जालावर फिरत होती. काँग्रेसचे काय व्हायचे ते होवो पण ती पोस्ट व्यक्तिश: दीपिकासाठी बदनामीकारक आणि तिच्या करियरला मारक ठरू शकेल अशी होती. विशेषत: सिनेमा क्षेत्रात नशीबाविषयक अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात मानल्या जातात त्यामुळे.

मी ती एकदोनदा रिपोर्ट केली परंतु ती इतक्या वेळा येत राहिली की मी ती रिपोर्ट करणे सोडून दिले.

विशिष्ट विचारसरणीच्या उघडपणे विरोधी असणार्‍यांच्याबाबत अशी ही & हि पोस्ट येतच राहणार. मीच इतरत्र लिहिल्याप्रमाणे हे पराभूतांचे वाङ् मय* आहे आणि ते पराभूतांच्या गटात आणि समर्थकांत आवडीने चघळले जाणार. (याहून जास्त आपण काही करू शकत नाही याची खात्री या पराभूतांना असते आणि हे केल्याने आपल्याला काही इजा त्रास होणार नाही अशी खात्रीही त्यांना असते)

बंदी घालून काही साध्य होणार नाही आणि त्याची गरजही नाही.

*पराभूतांचे वाङ मय ही संकल्पना धनंजय यांच्याशी बर्‍याच काळापूर्वी झालेल्या पत्रव्यवहारातून घेतली आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2011 - 8:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या मते तुमचा सदर प्रतिसाद हा पण "पराभूतांचे वाङ मय" या मोडतो. काय मत आहे ?? ;-)

परंतु सेन्सरशिप नसून प्री चेक ऑन कण्टेण्ट आहे असे मंत्रीमहोदयांनी म्हटले आहे

या वरून प्रश्न पडला, सेन्सॉरशीप म्हणजे नक्की काय असते? म्हणजे दादा कोंडक्यांच्या चित्रपटात काही द्वर्थी नाही हे बघणे म्हणजे सेन्सॉरशीप नसून नुसते प्रीचेक असायचे का? (आता दादा कोंडके हे उदाहरण झाले, असेच सर्वच चित्रपट/नाटके वगैरे वगैरे..)

याचा अर्थ आता सेन्सॉरबोर्डासारखेच, "प्रीचेक ऑन कण्टेण्ट बोर्ड" चालू करणार का? ;)

मला अजून एक प्रश्न पडला, महाराष्ट्र टाईम्स पासून ते टाईम्स ऑफ इंडीयाच्या जालावरील पहील्या पानाचे आणि त्यातील कोपर्‍यातील छायाचित्रांसहीत मथळ्यांचे देखील "प्री चेक ऑन कण्टेण्ट" करण्याचा विचार आहे का? त्यांना पण मंत्रीमहोदयांनी बोलावले होते का? ( हे मी मंत्री महोदयांना उद्देशून म्हणत आहे...)

विशिष्ट विचारसरणीच्या उघडपणे विरोधी असणार्‍यांच्याबाबत अशी ही & हि पोस्ट येतच राहणार.

अगदी अगदी १००% सहमत. आता सावरकरांनी जे म्हणलेले नाही हे ऐतिहासीक सत्य आहे, हे दाखवून झाल्यावर देखील अशी त्यांच्या नावावरील चुकीची वाक्ये नाही का परत परत जालावर येतात? ;)

चिंतामणी's picture

7 Dec 2011 - 7:52 pm | चिंतामणी

>>>आता सावरकरांनी जे म्हणलेले नाही हे ऐतिहासीक सत्य आहे, हे दाखवून झाल्यावर देखील अशी त्यांच्या नावावरील चुकीची वाक्ये नाही का परत परत जालावर येतात?

:O :-O :shock:

ह्याचा इथे काय संमंध?????

बादवे

स्वा.सावरकारांचा उद्धार जालावर जो उद्धार चालतो त्या बद्दल आपले मौलीक विचार काय ऐकायला आवडेल.

विकास's picture

7 Dec 2011 - 8:02 pm | विकास

ह्याचा इथे काय संमंध?????
- - - -
स्वा.सावरकारांचा उद्धार जालावर जो उद्धार चालतो त्या बद्दल आपले मौलीक विचार काय ऐकायला आवडेल.

दोन्हीचे उत्तर एकच "शोधा म्हणजे सापडेल" ;)

बाकी माझ्या वरील (आधीच्या) प्रतिसादात सावरकरांच्या ऐवजी कुठल्याही ऐतिहासीक (हयात नसलेल्या पण तरीही प्रसिद्ध) व्यक्तीबद्दल लावले तरी चालेल, किंबहूना लावावे असे म्हणेन.

जोशी 'ले''s picture

6 Dec 2011 - 8:50 pm | जोशी 'ले'

जरा गुगलुन बघा ते कोणत्या धर्मा चे आहेत फक्त political फायद्या साठि त्यांचे हिंदु पध्दतीने अंत्य संस्कार केलेत,
http://www.vepachedu.org/Nehrudynasty.html

पुण्याचे वटवाघूळ's picture

6 Dec 2011 - 10:52 pm | पुण्याचे वटवाघूळ

जरा गुगलुन बघा ते कोणत्या धर्मा चे आहेत फक्त political फायद्या साठि त्यांचे हिंदु पध्दतीने अंत्य संस्कार केलेत,

अहो अल कायदाच्या वेबसाईटावर ओसामाही फार मोठा संतपुरूष होता असे छापतील आणि औरंगजेबाच्या वेबसाईटवर छत्रपतींविषयी चांगले लिहितील अशी अपेक्षा कशी करणार? तेव्हा अशा सवंग लोकप्रियता मिळवायला काढलेल्या वेबसाईटा सोडून जरा अभ्यासासाठी रेफरन्स म्हणून वापरता येईल असा काही पुरावा द्या की राव. गांधी घराण्याचा मी पण समर्थक नाही पण अशी बिनबुडाची टिका नाही आवडत बघा!!

पुण्याचे वटवाघूळ

जोशी 'ले''s picture

7 Dec 2011 - 8:16 am | जोशी 'ले'

राहुल च खरं नाव Raul हे एक इटालीयन नाव आहे त्याचे भारतिय नाव rahul करण्यात आलंय, तसेच त्याच्या national ID card वर place of warship - चर्च आहे…..आणि आम्हि पडलो गुगले लोक्स अजुन कुठुन पुरावे हो तसेच मी खाली दिलेल्या प्रतिसादा नुसार कमीत कमी 'कपि'ल सिब्बल ने सुब्रमन्यम स्वामींचे म्हणने तरी खोडावे मग बाकीच्या गमजा…

विजुभाऊ's picture

7 Dec 2011 - 3:50 pm | विजुभाऊ

राहुल च खरं नाव Raul हे एक इटालीयन नाव आहे त्याचे भारतिय नाव rahul करण्यात आलंय,
हे धादान्त खोटे आहे. उगाच केसाची पिसे करत बसू नका.
राउल हा शब्द इटालियन नाही.
राउल या स्पॅनिश/पोर्तुगीज (मूळ जर्मॅनिक) शब्दाचा अर्थ Wolf Counsil असा होतो Ralf हा त्याच्या अद्ययावत अवतार
भारतीय शब्द राहुल या शब्दाशी त्या शब्दाचा दूरान्वये ही संबन्ध नाही.
जमनालाल बजाजानी त्यांच्या मुलाचे नाव राहूल ठेवले या कारणाने इंदिरा गांधीनी त्यांच्या मुलाचे नाव राजीव ठेवले असा उल्लेख आहे. राहुल बजाज यानी त्यांच्या मुलाचे नाव राजीव ठेवले म्हणून इंदीरा गांधीनी त्यांच्या नातवाचे नाव राहुल ठेवले होते

राहुल हे एक पूर्णपणे भारतीय नाव आहे.खूप पुरातन काळापासून.या नावाचा अर्थ मला माहित नाही पण गोतम बुद्धांच्या मुलाचे नाव राहुल होते.

चिंतामणी's picture

7 Dec 2011 - 7:27 pm | चिंतामणी

>>>जमनालाल बजाजानी त्यांच्या मुलाचे नाव राहूल ठेवले या कारणाने इंदिरा गांधीनी त्यांच्या मुलाचे नाव राजीव ठेवले असा उल्लेख आहे. राहुल बजाज यानी त्यांच्या मुलाचे नाव राजीव ठेवले म्हणून इंदीरा गांधीनी त्यांच्या नातवाचे नाव राहुल ठेवले होते

आतील गोटातील या माहितीबद्दल आभार.

:bigsmile:

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 Dec 2011 - 7:23 pm | पुण्याचे वटवाघूळ

राहुल च खरं नाव Raul हे एक इटालीयन नाव आहे त्याचे भारतिय नाव rahul करण्यात आलंय,

तुम्ही जोशी असाल तर त्याच न्यायाने तुमचे नाव पण इटालीयन झाले. तुम्ही Joshua किंवा Josh हे युरोपीयन नाव ऐकले आहे का? त्याचेच जोशी हे भारतीय नाव केले आहे.

पुण्याचे वटवाघूळ

दादा कोंडके's picture

7 Dec 2011 - 7:41 pm | दादा कोंडके

या चर्चेवरून अत्रेंचा एक ऐकलेला विनोद आठवला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी, एक मनुष्य तावातावाने अत्र्यांना म्हणाला बेळगाव कर्नाटकाचंच आहे कारण नावाची मुळ व्युत्पत्ती 'बेळ' हे कानडी आहे. अत्रे शांतपणाने म्हणाले मग त्या न्यायाने उद्या लंडन महाराष्ट्राचं आहे म्हणाल! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2011 - 10:59 am | विश्वनाथ मेहेंदळे

संपादकांना हा प्रतिसाद अजून दिसला नाही की आक्षेपार्ह वाटला नाही ?

जोशी 'ले''s picture

7 Dec 2011 - 8:20 pm | जोशी 'ले'

हे हे…काय तरिच वो तो Joshua च इकडुन तिकडे गेला असेल :-) बाकि बियंका / प्रियंका वडेरा बद्दल काय :-)

आनंदी गोपाळ's picture

8 Dec 2011 - 10:47 pm | आनंदी गोपाळ

थोऽडी वाट पहा हो जोशी
मग तुमचं खरंच जोशी 'ले' होणारे. म्हण्जे ल्यालेले ;)
असं मी नै, ते सिब्बल सायेब म्हंतात. एकतर आप्ला आयपी एक्दम टेलिफोन नंबरसारखा असतो.
दुसरं एकदा टाईप केलं की पर्मनंट होतं.
आता ते सिब्बल ला 'कपी' कितींदा म्हटलं त्याचा पन हिशेब येनारे ;) नुस्तं गुग्ले लोक म्हणुन जबाबदारी जात नै. (जात नै ती जात)
तर मी म्हंतो
जऽरा थांबा.
मग 'ले'ऊ ना ;)

(बादवे. जोशी,
१. तुम्ही काय ढिगार्‍यावर बसून त्या राहूल चा बाप्तिस्मा पहात होता काय?
२. तुमाच्या परिचयात/ओळखीत/माहितीत/नातेवाईकांत/खानदानात कुणी राहूल गांधींचा ओरिजिनल पास्पोर्ट पाहिला आहे काय?
३. राहूल राजीव गांधी या नावाच्या व्यक्ती समोर उभे राहून हे जे काय तुम्ही गरळ वर ओकलेत, ते ओकायची तुमची हिम्मत आहे काय?

या प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारा.
या असल्या वागणूकीपायीच हा असला विचार त्या मंत्र्याच्या डोक्यात आला आहे बहुतेक.)
ज्या दिवशी बीएसेनेल तुमचा आयपी ट्रेस करील त्या दिवशी आपण आपले रिस्पॉन्स कुठे कसे एडिट केले त्याची हिस्टरी शोधायची वेळ तुमच्यावर येऊ नये अशी आशा करतो.

आपल्याला 'ले'ने के देने पडू नयेत असे विचार करणारा आपला हितचिंतक,
आनंदी (गोपाळ)

जोशी 'ले''s picture

9 Dec 2011 - 7:23 am | जोशी 'ले'

एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत-..
आनंद आहे....
ममम्म्म..मी घाबरलो ना

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Dec 2011 - 1:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> राहूल राजीव गांधी या नावाच्या व्यक्ती समोर उभे राहून हे जे काय तुम्ही गरळ वर ओकलेत, ते ओकायची तुमची हिम्मत आहे काय?

काय संबंध ??? त्याच हिशोबाने, दाउद इब्राहीम बद्दल तुमच्या मनात जे विचार आहेत ते त्याच्या समोर उभे राहून बोलायची तुमची हिम्मत आहे काय ? (तुमच्या मनात त्याच्या बद्दल चांगले विचार असतील तर गोष्ट वेगळी).

आणि प्रयत्न केलातच, तर त्याला तुम्हाला (आनंदी) गोपाळ वरून (दुखी: किंवा पीताम्बरधारी) गोपाळ बनवायला किती वेळ लागेल याचा विचार करा. पण म्हणून तुम्ही (किंवा इतर कुणी) जालावर पण आपले विचार मांडू नयेत? कमाल आहे.

आनंदी गोपाळ's picture

9 Dec 2011 - 11:32 pm | आनंदी गोपाळ

या दाऊदला कुणीतरी पकडून आणणार होतं म्हणे. त्यांचं काय झालं ते महाराष्ट्रास ठाउक आहे.
पण हा जो दाऊद आहे तो नामचीन गुंड आहे, अन राहूल गांधी हा या देशाच्या जनतेने निवडून दिलेला खासदार. थोडा तरी फरक असेल असे वाटते? तुलना कुणाची कशी करावी हे थोडे विचार करून ठरवावे. उचल्ले बोट लागले टंकाया असे करू नये हे इनंती.
त्या दाऊदने माझे काय करायला किती वेळ लागेल याचा हिशेब आपण करू नका. मी समर्थ आहे स्वतःची काळजी घेण्यास. तुम्हालाही यथाशक्ती मदत करीन हवी असली तर.
इथे मी जोशीलेंशी बोलत होतो. तुम्चं नक्की काय दुखलं? ते जालावर् विचार मांडुन सांगा. मीपण माझेच विचार विचारले आहेत त्यांना.
ता.क. अत्ताच जोशिलेंना खरडीतुन काही लिहिले आहे. ते इथे परत लिहीतो.

या असल्या बिनबुडाच्या पासपोर्ट गोष्टि लिहिल्यानेच ही सेन्सॉरशिप लादली जाऊ शकते, याचा जराही विचार करता येत नाही का तुम्हाला? इथे ४ ओळी टाईप करून देशाची पॉलिसी बदलता येणार नाही साहेब.

जोशी 'ले''s picture

10 Dec 2011 - 12:39 am | जोशी 'ले'

काय येवढे तावा तावाने वकिलि पञ घेतल्या सारखे प्रतिसाद देताय, इंटरनेट वर सगळेच चुकिची माहिति मिळते का? आणि मी काय Phd. करत नाहिये राहुल वर, कि मागितला संदर्भ कि दिला, कधितरि कुठे तरि वाचलेले असते ते त्या अनुशंगाने मी प्रतिसादात दिलेय..अता हेच बघाना जरा संदर्भ गुगलुन बघितल्यावर rahul gandhi- wikipedia वर पुढिल वाक्य मिळाले " During this period, he assumed the pseudonym Raul Vinci and his identity was known only to the university officials and security agencies " तर ह्यातिल Raul हे नाव असल्याचा उल्लेख मि दुसरी कडे कुठेतरी वाचल्या चे स्मरते, आता आग असेल तरच धुर असेल ना? दुसरे असे मि पासपोर्ट नाहि तर national id बद्ल बोलत होतो, जो मी पाहिला नाही;-) ....तिसरे, हिम्मत अं ....जाऊ द्या..... जय जय रघुविर समर्थ.....

चिंतामणी's picture

10 Dec 2011 - 1:56 am | चिंतामणी

एकदम बराबर बोल्या रे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2011 - 11:50 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>या दाऊदला कुणीतरी पकडून आणणार होतं म्हणे. त्यांचं काय झालं ते महाराष्ट्रास ठाउक आहे.
अवांतर म्हणून पास.

>>पण हा जो दाऊद आहे तो नामचीन गुंड आहे, अन राहूल गांधी हा या देशाच्या जनतेने निवडून दिलेला खासदार. थोडा तरी फरक असेल असे वाटते? तुलना कुणाची कशी करावी हे थोडे विचार करून ठरवावे. उचल्ले बोट लागले टंकाया असे करू नये हे इनंती.
दाउद आणि राहुल मधला एक फरक मला माहित आहे. दाउद त्याच्या क्षेत्रात (जे वाईट का असेना) स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढे गेला आहे. आडनाव कासकर आहे म्हणून नाही. आहे की नाही मजबूत फरक ?

>>त्या दाऊदने माझे काय करायला किती वेळ लागेल याचा हिशेब आपण करू नका. मी समर्थ आहे स्वतःची काळजी घेण्यास. तुम्हालाही यथाशक्ती मदत करीन हवी असली तर.
तुम्ही समर्थ आहात ना, तसे राहुल समोर बोलायला जोशिलेही समर्थ असतील कदाचित. जे तुम्हाला लागू तेच इतरांना आणि जे इतरांना लागू तेच तुम्हाला.

>>इथे मी जोशीलेंशी बोलत होतो. तुम्चं नक्की काय दुखलं?
मिपासारखी संस्थळे चव्हाट्या सारखी असतात. त्यामुळे तुम्ही एकाशी बोलताना अजून ४ जण मध्ये येणारच. तसे चालत नसेल तर खरडवहीत लिहा.

>>ते जालावर् विचार मांडुन सांगा. मीपण माझेच विचार विचारले आहेत त्यांना.
ही दोन वाक्ये कळलीच नाहीत. क्षमस्व..

प्रशांत उदय मनोहर's picture

7 Dec 2011 - 12:46 am | प्रशांत उदय मनोहर

नेहरू आडनावाची लोकं भारतात कुठल्या भागातली आहेत? जवाहरलाल नेहरूंच्या कुळाशी संबंध नसलेली किती नेहरू कुळे अस्तित्वात आहेत? फ़िरोज गांधी पारशी होते? पारशी लोकांमध्ये गांधी हे आडनाव असते का? नसल्यास गांधी आडनावाच्या जाती/उपजातींमध्ये फ़िरोज़ हे नाव असते का? इ. इ.

माझ्याकडे पुरावे नसल्यामुळे प्रश्नच विचारतोय. या प्रश्नांची लॉजिकल उत्तरे (पुराव्यांसकट/पुराव्यांशिवाय) मिळाल्यास उपकृत होईन.

-प्रशांत

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 Dec 2011 - 7:59 am | पुण्याचे वटवाघूळ

त्याच न्यायाने बच्चन अडनाव नक्की कोणत्या भागातले? अमिताभ बच्चनशी संबंध नसलेले किती बच्चन आहेत? अहो बच्चन हे हरिवंशराय श्रीवास्तव यांचे टोपणनाव तेच नंतर त्यांचे अडनाव झाले. आता अमिताभ श्रीवास्तव हे नाव स्वतः अमिताभसुध्दा मान्य करणार नाही. अशी अडनावे काही कारणांनी लोक बदलत असतात. तसाच फिरोज बाटलीवालाचा काही कारणांनी (नक्की कोणत्या ते माहित नाही) फिरोज गांधी झाला. (इंदिरा गांधींचे काथरिन फ्र्~एंक ने लिहिलेले चरित्र).

आधीच काहीतरी गृहित धरायचे आणि आपलुआ म्हणायच्या समर्थनार्थ सवंग वेबसाईटांचे पत्ते द्यायचे हे कितपत योग्य आहे?

मी अस ऐकलय कि इंदिरा गांधीनी 'गांधी ' या आडनावाचा राजकारणात फायदा व्हावा म्हणून हे आडनाव बदललं आहे.

आणखी एक गोष्ट सतावते.लहानपणी विदेशी मालाची होळी करताना जी मुलगी आपली विदेशी बाहुली जाळून टाकते ती मोठी झाल्यावर विदेशी सून कशी काय स्वीकारते?

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 Dec 2011 - 11:06 pm | पुण्याचे वटवाघूळ

मी अस ऐकलय कि इंदिरा गांधीनी 'गांधी ' या आडनावाचा राजकारणात फायदा व्हावा म्हणून हे आडनाव बदललं आहे.

नक्की बातमीचा स्त्रोत देता का?

लहानपणी विदेशी मालाची होळी करताना जी मुलगी आपली विदेशी बाहुली जाळून टाकते ती मोठी झाल्यावर विदेशी सून कशी काय स्वीकारते?

समजले नाही.विदेशी बाहुली जाळली तेव्हा विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायचे कारण आर्थिक होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळायचे होते. आपण विदेशी वस्तू विकत घेऊन इंग्रजांचे व्यवसाय पुढे चालवत आहोत आणि त्याच पैशाने इंग्रज आपल्या देशावर अन्याय करत आहेत, इथल्या लोकांच्या पोटावर पाय देत आहेत ही बहिष्काराच्या मागची भावना होती.

आता वळू या तुमच्या तुलनेकडे:

१. सून म्हणजे बाहुली आहे का?
२. बाहुली विकत घेतात तशी सूनही विकत घेतात का?
३. बाहुली वापरल्यामुळे इंग्रजांच्या व्यवसायाला हातभार लागत होता तसा हातभार सून घरी आणून लागणार होता का?
४. विदेशी वस्तू वापरल्यामुळे भारतीय लोकांचे व्यवसाय बुडायला हातभार लागणार होता. तसा प्रकार घरी सून आणून होणार होता का?
५. बाहुली किंवा तत्सम गोष्टी जाळायचे आवाहन केले होते. कोणावर त्यासाठी सक्ती केल्याचे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा स्वतःच्या लग्नाव्ह्या वेळी विदेशी बरोबर लग्न न करणे त्यांना योग्य वाटत असेल तर ते ठिक आहे. पण स्वतःच्या मुलाने पण तसेच करावे हा अट्टाहास कशाकरता? ते तसे इंदिरा गांधींनी केले नाही ते योग्यच (माझ्या मते).

पुण्याचे वटवाघूळ

जोशी 'ले''s picture

8 Dec 2011 - 8:15 am | जोशी 'ले'

अहो काय हे सर्वांना तुम्हि बातमीचा स्त्रोत विचारताय, तुमच्या कडे तरि आहे पुरावा (का जाळावा:-) ) मला मोठे मोठे प्रतिसाद टंकता येत नाहि पण काय हो भारतीय कायद्या प्रमाणे मुलाचा जन्मत: धर्म तोच असतो जो बापाचा असतो, बायकोचा धर्म तोच असतो जो पतिचा असतो असे मला तरी वाटते ( याचा पुरावा माझ्या कडे नाहि :-( जर आजोबांनी जाति चा दाखला नसेल काढला तर नातवाला त्याचा त्रास होतो( याचाहि पुरावा माझ्या कडे नाहि) त्या अर्थी जी पुर्वजांची जात/धर्म ती नातवाची

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Dec 2011 - 5:06 pm | पुण्याचे वटवाघूळ

भारतीय कायद्या प्रमाणे मुलाचा जन्मत: धर्म तोच असतो जो बापाचा असतो, बायकोचा धर्म तोच असतो जो पतिचा असतो असे मला तरी वाटते

ठिक आहे. कायद्यावरच बोट ठेवायचे असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये कायद्याप्रमाणेच जायला हवे. इंदिरा गांधींचा मुलगा राजीव गांधी निवडणुका जिंकून पंतप्रधान झाला आणि ते कायद्याला मान्य आहे. इतकेच नव्हे तर इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रपती झैलसिंगने राजीवला पंतप्रधान म्हणून नेमले ते पण कायद्याला मान्य आहे. २००४ मध्ये सोनिया पंतप्रधान झाल्या असत्या तर ते पण कायद्याला धरूनच होते.२०१४ मध्ये राहुल पंतप्रधान झाला (याची शक्यता फारच कमी असली तरी) तरी ते कायद्याला धरूनच असेल. तेव्हा घराणेशाहीच्या नावाने गळे काढणे बंद झाले पाहिजे. आपल्याला सोयीसकर गोष्टींमध्ये कायदा काय सांगतो ते बघायचे आणि इतर ठिकाणी नाही हे योग्य नाही.

(रात्रीच्या वेळी झाडाला उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

१. सून म्हणजे बाहुली आहे का?
निदान नवीन असताना तरी तिला बहुलीच समजतात.

२. बाहुली विकत घेतात तशी सूनही विकत घेतात का?
नाही.सुनेला विकत घेत नाहीत.जावयाला विकत घेतात.पूर्वी त्या किंमतिला 'हुंडा' म्हण्याचे आता 'सदिच्छा भेट' अस म्हणतात.

३. बाहुली वापरल्यामुळे इंग्रजांच्या व्यवसायाला हातभार लागत होता तसा हातभार सून घरी आणून लागणार होता का?
स्वतःच्या पिढीजात व्यवसायाचे १२ वाजणार होते त्याच काय?

४. विदेशी वस्तू वापरल्यामुळे भारतीय लोकांचे व्यवसाय बुडायला हातभार लागणार होता. तसा प्रकार घरी सून आणून होणार होता का?
नसानसात राजकारण भारलेल असतानाही हेही कळू नये कि आपल्या पदाची भावी वारसदार हीच आहे.लोन्कांचे व्यवसाय बुडाले तर बुडाले पण आपल्या खंडणीची पांपरा बुडाली नाही पाहिजे.

५. बाहुली किंवा तत्सम गोष्टी जाळायचे आवाहन केले होते. कोणावर त्यासाठी सक्ती केल्याचे प्रकार झाल्याचे ऐकिवात नाही.
नो कमेंट्स

दादा कोंडके's picture

9 Dec 2011 - 6:21 pm | दादा कोंडके

खतरनाक प्रतिसाद! :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

10 Dec 2011 - 9:38 am | पुण्याचे वटवाघूळ

निदान नवीन असताना तरी तिला बहुलीच समजतात.
नाही.सुनेला विकत घेत नाहीत.जावयाला विकत घेतात.पूर्वी त्या किंमतिला 'हुंडा' म्हण्याचे आता 'सदिच्छा भेट' अस म्हणतात.

या दोन वाक्यांचा आपला मुळचा मुद्दा-- इंदिरा लहान असताना विदेशी बाहुली जाळू शकत होत्या तर त्याच पुढे विदेशी सून कशी स्विकारू शकतात याच्याशी काडीमात्र संबंध नाही त्यामुळे "नो कमेन्ट्स".

३. बाहुली वापरल्यामुळे इंग्रजांच्या व्यवसायाला हातभार लागत होता तसा हातभार सून घरी आणून लागणार होता का?
स्वतःच्या पिढीजात व्यवसायाचे १२ वाजणार होते त्याच काय?

समजले नाही. इंदिरा गांधींनी विदेशी सून घरी आणली म्हणून त्यांच्या पिढीजात व्यवसायाचे कसे काय १२ वाजणार होते?

नसानसात राजकारण भारलेल असतानाही हेही कळू नये कि आपल्या पदाची भावी वारसदार हीच आहे.लोन्कांचे व्यवसाय बुडाले तर बुडाले पण आपल्या खंडणीची पांपरा बुडाली नाही पाहिजे.

म्हणजे इंदिरा गांधी खंडणीबहाद्दर होत्या? उत्तम. बाय द वे, राजीवचे लग्न झाले १९६८ मध्ये. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन २-२.५ वर्षे झाली होती.त्याकाळी त्या "गुंगी गुडिया" म्हणूनच होत्या. त्यांच्या नेतृत्वाला खरी धार चढली १९६९ पासून-- ब्यांकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार उभा करून निवडून आणणे आणि नंतर पक्षातच फूट पाडणे आणि सिंडिकेटला बाहेरचा रस्ता दाखविणे या सगळ्या गोष्टी त्यांनी १९६९ मध्ये केल्या. १९६८ मध्ये इंदिराजी त्यांच्या कणखर प्रतिमेसाठी तितक्याशा ओळखीच्या झालेल्या नव्हत्या. त्यांचे खरे तेज जगापुढे यायचेच होते. अशा वेळी भविष्यात देसाई-कामराज इत्यादी मंडळी आपल्याला पदच्युत करतील अशी भिती त्यांना नक्कीच होती. अशा वेळी १९६८ मध्ये आपण मरेपर्यंत (मधल्या २-२.५ वर्षाचा अपवाद वगळता) आपणच पंतप्रधान असू, आपला एक मुलगा लवकर मरेल, त्यानंतर दुसर्याला आपण आपले वारस नेमू, मग आपल्यानंतर तो ही मरेल आणि त्यानंतर आपली सून आपल्या पदाची वारसदार असेल या सगळ्या गोष्टी इंदिराजींना १९६८ मध्येच कळल्या असतील तर त्यांच्याकडे अतिमानवीय शक्ती होती आणि त्या भविष्य बघू शकत होत्या असेच म्हणायला हवे. अहो तुमचा मुदा post-facto आहे. १९६८ मध्ये इंदिरा गांधींना या सगळ्या गोष्टींची कल्पना आली होती हे तुम्ही कोणत्या आधारावर बोलता?

(रात्रीच्या वेळी झाडाला उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

किचेन's picture

10 Dec 2011 - 12:49 pm | किचेन

ह्यावारच्या माझ्या प्रतिक्रिया मी इथे टंकू शकत नाही.कारण जनमानसात (माझ्याही मनात) इंदिरा गांधीबद्दल प्रचंड आदर आहे.त्यांच्याविषयीच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा होत असते.पण आता जर त्यांच्याबद्दल मी माझ मत नोंदवल तर सं.मं नक्कीच आक्षेप घेईल.सो माझ्याकडून पूर्णविराम.

आनंदी गोपाळ's picture

8 Dec 2011 - 10:54 pm | आनंदी गोपाळ

आणखी एक गोष्ट सतावते.लहानपणी विदेशी मालाची होळी करताना जी मुलगी आपली विदेशी बाहुली जाळून टाकते ती मोठी झाल्यावर विदेशी सून कशी काय स्वीकारते?

ती जेव्हा ते स्वीकारते,
तेव्हा ती जगातली पहिली महिला पंतप्रधान असते.
एका शत्रू राष्ट्राचे २ तुकडे करू शकणारी रणनीतीज्ञ असते..
पोखरण करणारीही...
अजूनही अनेक काही असते.

तीच ती इंदीरा 'गांधी' असते जी राकेश शर्माला विचारते, 'कैसे नजर आ रहा है वहांसे हमारा हिंदोस्ताँ?'
अन उत्तर येतं, 'सारे जहाँसे अच्छा!'

किचेन ताई, उचलली जीभ लावली टाळ्याला हे करण्या आधी, सार्वजनिक जीवनातून व्यक्तिगत जीवन बाजूस काढायला शिका हे विनंती. अन इतक्या मोठ्या कर्तृत्वाबद्दल तर नक्कीच शिका. कमीतकमी माहिती घ्या की यांनी अमुक का केलं? फक्त जालावरच्या विखाराला वाचू नका.

तुमच्या तपशीलात दुरूस्ती सुचवतो.

सिरीमावो बंदारनायके या जगातील प्रथम महीला पंतप्रधान होत.

Sirimavo Bandaranaike (1916-2000)
Prime minister of Sri Lanka three times: from 21 Jul 1960 to 27 Mar 1965,
from 29 May 1970 to 23 Jul 1977 and
from 14 Nov 1994 to 10 Aug 2000. She was the first woman to head of government in world history and probably the oldest female political leader in active by the time of her demise in 2000.

Indira Gandhi (1917-1984)
Prime minister of India twice,
from 19 Jan 1966 to 24 Mar 1977 and
from 14 Jan 1980 to 31 Oct 1984,

बाकी चर्चा चालू द्या.

आनंदी गोपाळ's picture

9 Dec 2011 - 11:34 pm | आनंदी गोपाळ

आय स्टँड करेक्टेड!

तुम्ही उपहासाने लिहिलय माहीत आहे.
पण इथे काही अजाण बालके आहेत जी तुमच्या या वक्तव्याचा आधार घेत ही चर्चा भरकटत नेतील.
तेव्हा लिख्ते वक्त सावधानी बरतो. :)

चिंतामणी's picture

6 Dec 2011 - 4:45 pm | चिंतामणी

Trends: India trends
Kapil Sibal
#IdiotKapilSibal

हे वाचा. हे दोन्ही टॉपला आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2011 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार

कॉलिंग हरमिंदर त्रिलोकेकर.....

सरदार हरमिंदरला गुप्त खलिता पाठवण्यात आला आहे.
'कपिल सिब्बल वर शारिरीक हल्ला' अशी बातमी लवकरच येइल अशी आशा आहे.

- (स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य उपभोगणारा) सोकाजी

प्यारे१'s picture

6 Dec 2011 - 4:56 pm | प्यारे१

कमरेखाली वार चुकीचाच. कुणावरही केलेला. त्याला आळा घातला गेलाच पाहिजे. मो. पैगंबर बद्दल काहीही आक्षेपार्ह लिहीणं चुकीचंच आहे. तसेच व्यक्तींवर देखील. पण......
पण सामान्य जनता या तथाकथित चिखलफेकी/टीकेव्यतिरिक्त 'आपण काही करु शकत नाही' अशा भावनेने अशा स्वरुपाची टीका/चिखलफेक करत आहे हे राज्य कर्त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मुळात अशा गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात सत्ताधार्‍यांबाबत'च' का दिसून येत आहेत याचं उत्तर वाढता भ्रष्टाचार, महागाई या आणि अशा तसेच एकंदर राजकारणी नालायक या प्रचारातून (फक्त राजकारणी नालायक याबद्दलच्या प्रचारातून-भ्रष्टाचार, महागाई आहेच) येत आहे.

एखादं बॉक्सिंग किट असतं अथवा हिट मी ची बाहुली असते तसं समाजामध्ये या सोशल साईटचं स्थान असल्यासारखं वाटतंय. राग व्यक्त करण्याचं साधन अथवा माध्यम. बस्स्स्स. राग खरा कशावर आहे? हे सरकार मध्ये काम करणार्‍या लोकांनीसमजून घेतलं पाहिजे आणि त्याचा निपटारा केला पाहिजे. मी तर म्हणतो अशी 'किट्स' आहेत म्हणून आपल्याकडं क्रांती बिंती काही होत नाही.

@ कपिल सिब्बलः
अशा साईट्सवर वर बंदी घालून्/स्क्रीनिंगची भूमिका घेऊन उगाच प्रेशर कूकरची वाफ दडपू नये. स्फोट होऊन मुळापासून उलथून पडण्यापेक्षा आम्ही नालायक लोक अशा साईटस वर जी **उपटगिरी करतोय ती तशीच सुरु राहू द्या. तुम्ही व्यवस्थित म्हणण्यापेक्षा तुमच्या मर्जीनं सरकार चालवू शकाल. ;)

सोत्रि's picture

6 Dec 2011 - 5:07 pm | सोत्रि

सहमत!

- ('हिट-मी' ची बाहुली कुठेशी मिळेल ते शोधणारा) सोकाजी

मराठी_माणूस's picture

6 Dec 2011 - 5:05 pm | मराठी_माणूस

मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते.

"योग्य अर्थ घेणे" हे खुप आवडले .

केंद्र सरकारनं इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटसवर 'सेन्सॉरशीप' आणायचं ठरवलंय.

इंटरनेट कंपन्या आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईटस ह्या केंद्राच्या अखत्यारीत येतात का ?

मी तर म्हणतो हा धागाच उचकटून टाकावा.
कोण जाणे सिब्ब्लांची वक्रदृष्टी पडली तर मिपावरपण टाच यायची. ;)

मृत्युन्जय's picture

6 Dec 2011 - 5:33 pm | मृत्युन्जय

गणपाशेठशी शमात आहे.

पक पक पक's picture

6 Dec 2011 - 5:52 pm | पक पक पक

जेम्स लेन आता कूठे आहात हो.................

पक पक पक's picture

6 Dec 2011 - 5:55 pm | पक पक पक

जेम्स लेन भौ ह्या वर प्रकाश टाका हो................

सुनील's picture

6 Dec 2011 - 7:01 pm | सुनील

लहानपणापासून काही ठराविक व्यक्तींबद्दल एका विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांकडून काहीबाही, रोचक असा मजकूर समजे. मीदेखिल तो आवडीने चघळीत असे (पुढे अक्कलदाढ आल्यावर ते थांबले!).

ह्या प्रकारच्या मजकूराला "पराभूतांचे वाङ् मय" असा चपखल शब्दप्रयोग योजल्याबद्दल थत्ते यांचे अभिनंदन!

बाकू मूळ लेखाबद्दल म्हणाल तर, कोणत्याही प्रकारच्या सेंसरशिपला विरोध.

चिरोटा's picture

6 Dec 2011 - 7:10 pm | चिरोटा

भ्रष्टाचाराचे शेण अंगभर पसरलेल्या अकार्यक्षम सरकारने लोकांचे लक्ष वळवण्यासाठी केलेली ही क्लुप्ती आहे. आणखी १५ दिवस जावू द्या, भारत-चीन सीमेवर चीनी सैन्याची जमवाजमव अशी बातमी येईल!.

इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी?

उजवे असोत की डावे असोत की मधले , सगळ्यांचेच पाय मातीचे.

उत्तम, फक्त कपिल सिब्बलने म्हणावयास नको कि फक्त थोडा धक्का लागला असे वाट्ले ,बाकी आम्हास माननिय हारविन्दर सिन्घ साहेब यान्च्या बद्द्ल खात्री आहे कि ते परत फक्त धक्का मारणार नाहीत्,आणी मागील चुका टाळतील्.

१५ दिवस ...? आहो साहेब १५ दिवस फार होतात हो..मिडीया वाल्याना का पोटावर मारता ?

पक पक पक's picture

6 Dec 2011 - 7:56 pm | पक पक पक

कोणत्याहि शब्दा चे योग्य अर्थ ,आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने घ्यावेत का ......?आम्ही अ अ आई चा शिकलो आहोत्....मा मा कशाचा होतो....?

कपिलमुनी's picture

6 Dec 2011 - 8:44 pm | कपिलमुनी

म ..म.. मामाचा ...
इथे माननीय आणि माजी असे पण असेल.

पुष्करिणी's picture

6 Dec 2011 - 8:08 pm | पुष्करिणी

वा वा..
पण हे प्रिस्क्रिनिंग कोण करणार आणि त्याचे निकष काय?

जोशी 'ले''s picture

6 Dec 2011 - 9:07 pm | जोशी 'ले'

'कपि'ल सिब्बल जर हिमंत असेल तर या स्वमींना कोर्टात खेचा http://janataparty.org/sonia.html

विकास's picture

6 Dec 2011 - 10:01 pm | विकास

सत्ताधारी ढुढ्ढाचार्यांना "विनाशकाले विपरीत बुद्धी" होऊ लागली आहे. कुठेतरी आपले कोणी वाकडे करू शकत नाही असा आंधळा अहंकार त्यात आहे असे वाटते.

आधी, "सहनाववतु, सहनऊ भुनक्तु" म्हणत एकत्र येऊन चापले... मग भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात अण्णा, रामदेवबाबा आणि जनतेशी खेळ खेळले... ते चालू असतानाच communal violence bill पटलावर मांडायचा प्रयत्न केला (ज्यात संख्याधारीत समाजावर अन्याय झाला का नाही हे ठरवत, देशाचे एका अर्थी विभाजन केले गेले आहे). नंतर एफ डी आय अचानक आणायचा प्रयत्न... आणि आता सेन्सरशीप नाही नुसते स्क्रिनिंग म्हणत, लेखणीपेक्षा सामर्थ्यवान ठरत असलेल्या आंतर्जालाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न.

कधीकाळी आणिबाणीत सर्वसत्ता केंद्रीत करून जनतेची आणि विरोधकांची मुस्कटदाबी करणार्‍या इंदिराजींना असेच वाटले होते की कोणी काही करू शकणार नाही, इंदिराजींच्या नंतर ७५% जागांचे बहुमत घेऊन आलेल्या राजीव गांधींना देखील असेच वाटले होते की नंतरच्या निवडणूकीत विरोधकांचे उरलेले (२५%) बाक देखील रहाणार नाहीत म्हणून. रालोआच्या काळात १३ दिवस-महीने आणि नंतर १३ वर्षे येणार अशा आंधळ्या विश्वासात "इंडीया शायनिंग" म्हणत त्यांनाच काय त्यांच्याबरोबर प्रसिद्धी माध्यमांना देखील तसेच वाटले...

थोडक्यात कोणी माज करत असे समजू नये की आपण सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलो आहोत काही करू शकतो आणि जनतेला गुंडाळू शकतो...

असो.

इष्टुर फाकडा's picture

6 Dec 2011 - 10:04 pm | इष्टुर फाकडा

मला वाटतं कि हीच वेळ आहे, भाजपने जनतेची दिशाभूल थांबवून अधिकृतरीत्या मान्य करावं कि कपि सिब्बल, दिग्गीरजा आणि रोमपुत्र हे काँग्रेस मध्ये राहून त्यांच्यासाठी काम करतात ;)

विकास's picture

6 Dec 2011 - 10:38 pm | विकास

दादा कोंडके's picture

6 Dec 2011 - 11:58 pm | दादा कोंडके

आत्ताच वॉलवर टाकून आलो! :)

अविनाशकुलकर्णी's picture

6 Dec 2011 - 10:48 pm | अविनाशकुलकर्णी

नेमके अत्ताच काय असे झाले??
एफ..डी.आय्+अण्णा..

तर कारणी भुत असु शकतिल?

अन्या दातार's picture

6 Dec 2011 - 11:42 pm | अन्या दातार

सरकारचा हा प्रयत्न अज्जिबात पटला नाही. ज्या कारणांसाठी सरकारवर चिखलफेक होतेय त्यावर त्यांनी उपाय करावेत. चिखलफेक आपसूकच बंद होईल ना. हे म्हणजे आम्ही काय करायचे ते करु, पण तुम्ही बोलायचे नाही. काही प्रश्न यामुळे नक्कीच उपस्थित झाले आहेत.

१. मुळात १२० कोटी लोकसंख्येच्या देशात फेसबुक वापरकर्ते १० कोटीच्या आसपास आहेत. त्यापैकी १५-२०% लोक नियमितपणे पोस्ट्स टाकतात किंवा वाचतात. म्हणजे फक्त दीड-दोन कोटी लोकांच्या आवाजाला सरकार घाबरले असे म्हणावे काय?

२. एकीकडे गिलानी, ओमर अब्दुल्ला, अरुंधती रॉय इ. मंडळी भारताच्या हितांना बाधा येईल अशी वक्तव्ये करतात तेंव्हा यांना सेंसॉरिंग का सुचत नाही? सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग हे लोक देशहितापेक्षा मोठे आहेत काय?

३. एम.एफ. हुसेन यांच्याबद्दल जेंव्हा वाईट-साईट बोलले गेले तेंव्हा हुसेन यांच्या समर्थनार्थ आलेले लोक ज्या फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन बद्दल बोलत होते, ते लोक आज का पुढे येत नाहीयेत? हुसेन यांनी काढलेली चित्रेही समाजातील अनेकांना आवडली नव्हती. हाच नियम लावायचा झाला तर फोटोशॉपमध्ये एडीट केलेली चित्रे बघून त्यावर बंदी घालावी का वाटली? ज्यांनी एडीट केली त्यांना हुसेन यांचे फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन नाही का? का ते फ्रीडम काही "विशिष्ट समाजापुरते" आहे?

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार आहे?

चिंतामणी's picture

7 Dec 2011 - 1:20 am | चिंतामणी

२. एकीकडे गिलानी, ओमर अब्दुल्ला, अरुंधती रॉय इ. मंडळी भारताच्या हितांना बाधा येईल अशी वक्तव्ये करतात तेंव्हा यांना सेंसॉरिंग का सुचत नाही? सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग हे लोक देशहितापेक्षा मोठे आहेत काय?

३. एम.एफ. हुसेन यांच्याबद्दल जेंव्हा वाईट-साईट बोलले गेले तेंव्हा हुसेन यांच्या समर्थनार्थ आलेले लोक ज्या फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन बद्दल बोलत होते, ते लोक आज का पुढे येत नाहीयेत? हुसेन यांनी काढलेली चित्रेही समाजातील अनेकांना आवडली नव्हती. हाच नियम लावायचा झाला तर फोटोशॉपमध्ये एडीट केलेली चित्रे बघून त्यावर बंदी घालावी का वाटली? ज्यांनी एडीट केली त्यांना हुसेन यांचे फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन नाही का? का ते फ्रीडम काही "विशिष्ट समाजापुरते" आहे?

मी म्हणालो "इतर वेळी सोशल पोलिसिंग च्या नावाने गळे काढणा-यांना सेन्सॉरशीपची गरज का भासावी??"तु जास्त प्रभावीपणे सांगीतलेस. असे मला वाटते.

शिल्पा ब's picture

7 Dec 2011 - 2:59 am | शिल्पा ब

लोकांचा अन कायद्याचा काहीच धाक नसल्याने या राजकारण्यांची इतकी टीमटीम चालते. निवडणुकीत पैसे देउन मत खरेदी करता येते. मुस्लीम व्होटबँक आहेच शिवाय लोकं विचार न करता मत देतात किंवा देतच नाहीत.

पण अशी सेन्सॉरशिप शक्य आहे का? चीनमधुन गुगलने आपले ऑफीस हलवले होते ते याच कारणाने ना!! अभ्यासुंनी, माहीतगारांनी सांगावं.

मैत्र's picture

7 Dec 2011 - 10:05 am | मैत्र

कुठल्याही आधाराशिवाय केलेले आरोप चुकीचेच आहेत. नेहरू गांधी परिवाराबद्दल एक ढकल पत्र फिरत असते. अशा ढकल पत्रांवर किती विश्वास ठेवणार. त्यामुळे या स्वरुपाच्या गोष्टिंना आळा घातला पाहिजे

पण सिब्बल हे आता दिग्विजय सिंह यांच्या रांगेत जाउन बसत आहेत.
सिब्बल यांना फक्त मॅडम आणि पंतप्रधान यांच्याबद्दलचाच मजकूर का दिसतो?
म्हणजे दिग्विजय जे काही बोलतात / लिहितात ट्विटर वर ते चालते का/? वर कोणी लिहिल्याप्रमाणे केवळ यांच्या मर्जीतले तेवढे चालेल?

यामागचे एक मोठे राजकारण मला असे वाटते --
काँग्रेसला विरोध करणारे किंवा सरकारच्या ध्येयधोरणांकडे समजून पाहू शकणारे हे बहुधा सुशिक्षित / इंटरनेट वापरणारे लोक आहेत. सामान्य जनता फेसबुक इ. सोडा संगणक सुद्धा वापरत नाही. अशा स्वरुपाचे फिल्टर करुन, माध्यमातून जी विरोधी मते येतात ती controversial या नावाखाली पसरूच द्यायची नाहीत असा हा मोठा डाव वाटतो.
म्हणजे यू पी ए च्या विरोधात जे जनमत तयार होऊ शकते ते पुढच्या निवडणूकांपर्यंत मोडून काढायचे कारण जाल हे संपर्काचे / चर्चेचे माध्यम वापरणार्‍यांच्या rights वरच गदा आलेली आहे. म्हणजे जनतेची मतं काय नेहमीच्या पद्धतीनं मिळतातच. जी विरोधात जाऊ शकतात ती आधीच थांबवायची.
ट्युनिशिया सारख्या लहानशा देशात जाल आणि चेपु वापरून क्रांती झाली. इतकं भारतात घडेल असं नाही आणि तेवढी गरजही नाही. भारतात अजून तरी अराजक किंवा एकाधिकार शाही नाही.
पण आधीच precautionery measure सिब्बल घेत आहेत असं वाटतंय.

गुगल ने आज उत्तर दिले आहे की जे legal आहे ते आम्ही फिल्टर करणार नाही / करत नाही.

इतक्या उघडपणे लोकविरोधी भूमिका घेणं सिब्बल / दिग्विजय/ मनीष इ. लोकांना कसं जमतं हेच समजत नाही. अशी प्रत्येक कृती हि त्यांच्या पुढच्या पाच वर्षांच्या स्वप्नांना उलट परिणाम करणारी होणार आहे.
काही वेळा तर सिब्बल यांचे वागणे हे उद्दामपणाचे -- माझ्याकडे सत्ता आहे आणि मी काहीही करु शकतो अशी वाटते.

बाकी धर्माचा भाग. व्यक्तिस्वातंत्र्य हे सोयीस्कर नसावं. गेल्याच आठवड्यात फिल्म फेस्टिवल मध्ये हुसेन यांच्यावरची फिल्म दाखवण्यावरून गदारोळ झाला. तेव्हा हे व्यक्तिस्वातंत्र्य वाले लोक पुढे आहे.
आता पैगंबरांवरुन जो मुद्दा सिब्बल यांनी आणला आहे तेव्हा हे लोक कुठे दडी मारुन बसले आहेत.
व्यक्तिशः अशा स्वरुपाचा मजकूर श्रद्धास्थानांच्या बाबतीत नसावाच अशा मताचा मी आहे मग ते पैगंबर असोत किंवा सरस्वती.

भारताची चीनसारख्या दडपशाहीच्या दिशेने वाटचाल होते आहे काय अशी भीती वाटते आहे.

अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन , भ्रष्टाचारावर अंकुश मिळवण्यासाठी जनलोकपाल विधेयकाचा त्यांचा आग्रह व त्याला जनसामान्यांकडून मिळालेला वाढ्ता पाठींबा ,रामदेव यांचे काळ्यापैशा संदर्भातील जनआंदोलन , सुब्रमण्यमस्वामी यांनी वैध मार्गाने लढा लढून सरकारच्या अनेक नेत्यांचा भ्रष्टाचारातला सहभाग पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध करुन मिळवलेले यश ...काँग्रेसचे वाचाळ नेते दिगविजय यांच्यामार्फत प्रसंगी केली जाणारी असंबद्द विधाने ..आणि त्यातच भर म्हणुन वेळोवेळी काँग्रेसप्रणित युपिए सरकारने घेतलेले एकांगी निर्णय व त्यांच्या मार्फत सुरु असलेला अजागळ कारभार ....यासगळ्याचा परिपाक म्हणुन सोशल नेटवर्किंग संस्थळावर सुज्ञ सदस्यांनी काँग्रेसपक्षावर व गांधी घराण्यावर ओढलेले ताशेरे आणि शाब्दिक आसुड सहन न झाल्यानेच काँग्रेसच्या दुरसंचार मंत्र्यांनी आता सोशल नेटवर्किंग संस्थळावर टाच आणण्याचा निर्णय घेत सरळ सरळ हिंदुस्थानी जनतेच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरच घाला घालायचा प्रयत्न केलाय......... २००९च्या निवडणूकांमधे काँग्रेसपक्षाला मिळालेल्या अनपेक्षित यशाने काँग्रेसी निर्ढावलेत........गांधी घराण्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या व निव्वळ आपल्या मालकांना खुश करण्यासाठी अशाप्रकारे जनतेच्या मुलभुत हक्कावर सिब्बल यांचे वागणे हे उद्दामपणाचे आहे-- माझ्याकडे सत्ता आहे आणि मी काहीही करु शकतो हि भावना काँग्रेसपक्षाचा माजोरडेपणाच दर्शवते .

समंजस's picture

7 Dec 2011 - 7:37 pm | समंजस

सत्ताधार्‍यांकडून अपेक्षित असा प्रकार...

राहिला प्रश्न हा की नेमकं काय होणार? "सेन्सरशिप" की फक्त "स्क्रिनींग" .. तर हे जाणून घ्यायला इतिहासाचं पारायण (पुन्हा) करायला हरकत नसावी. नाही..जास्त मागे जाण्याची गरज नाही..फक्त ईस्ट ईंडीया या कंपनीच्या आगमनापर्यंत (१६१२) मागे गेलं तरी पुरेसं ठरावं [हो.. ईस्ट ईंडीया ही कंपनी भारतात फक्त व्यापार करायला आली होती.. रेस्ट इज हिस्ट्री :) ]

फेसबुक ने किया आर्मी फैन पेज बैन?
http://www.bhaskar.com/article/NAT-facebook-bows-to-govt-bans-indian-arm...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2011 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

काल बहूदा काही प्रॉब्लेम असावा :)

आज सकाळपासून पेज व्यवस्थीत चालू आहे.

https://www.facebook.com/IndiaArmyFans

पाकीस्तानबद्दलच्या वाईट कॉमेंट उडवल्या असतील. :) :-) :smile:

हल्ली फक्त पाकीस्तानबद्दलच्याच नाहि तर दाउदजि साहेबा बद्द्लच्या चान्ग्ल्या प्रतिक्रिया देखिल 'अवान्तर' म्हणून उडवल्या जातात........