मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतेक सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. त्यातीलच एक गोष्ट होती विमानप्रवास. २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन लागण्यापूर्वी दोनतीन दिवस देशातील विमानसेवा बंद करण्यात आली होती. दोन महिन्यानंतर मे २०२० मध्ये मर्यादित प्रमाणावर ती सेवा सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात प्रत्येक विमानात ६०% पर्यंत प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली. आता १८ ऑक्टोबर २०२१ पासून विमानांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हळूहळू आपले सगळे दैनंदिन व्यवहार कोरोनापूर्व काळात होते तसे होतील ही अपेक्षा.
https://maharashtratimes.com/business/business-news/civil-aviation-decid...
प्रतिक्रिया
21 Oct 2021 - 6:21 pm | श्रीगुरुजी
आर्यनच्या जामिनाची सुनावणी २६ ऑक्टोबरला घेणार असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तर अंमली पदार्थ नियंत्रणाच्या न्यायालयाने आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे.
आर्यनच्या अटकेमुळे पिसाळलेल्या नबाब मलिकचे रोजचे आरोप सुरू आहेत. आता त्याने समीर वानखेडेंवर अत्यंत खालच्या पातळीवरील व्यक्तीगत आरोप केले आहेत. समीर वानखेडेचा बाप बोगस होता, समीर वानखेडे स्वतः बोगस आहे, त्याचे कुटुंब बोगस आहे, मी याला एक वर्षाच्या आत तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे तो आज बरळत असल्याची चित्रफीत आजच वृत्तवाहिन्यांवर दाखवित होते. समीर वानखेडे प्रसिद्ध व्यक्तींना अडकवितो आणि मालदीव, दुबई येथे त्यांच्याकडून खंडणी घेतो, असे अनेक निराधार आरोप नबाब मलिक करतोय. समीर वानखेडेंचा तो सातत्याने एकेरी उल्लेख करतोय, त्यांच्यावर व त्यांच्या बहिणीवर निराधार व व्यक्तीगत आरोप सुरू आहेत. बेभान उधळलेल्या मलिकला कोणीही आवरण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.
२०१३ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर बोलताना मलिक माध्यमांसमोर बोलला होता की "शिवसेना मुर्दाडांचा पक्ष आहे, उद्धव ठाकरे मुर्दाडांचे नेते आहेत.". या बरळण्यावर निखिल वागळेने एका वृत्तवाहिनीवर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात बोलताना मलिकने मुर्दाड शब्दाचे समर्थन केले होते. आज हाच मलिक मुर्दाडांच्या नेत्याच्या हाताखाली काम करतोय व मुर्दाडांच्या पक्षातील नेते त्याचे सहकारी आहेत.
https://www.lokmat.com/mumbai/sameer-wankhede-said-nawab-malik-lier-i-ha...
21 Oct 2021 - 6:30 pm | mangya69
स्पाईस जेट विमानावर फोटो आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन
21 Oct 2021 - 8:33 pm | कपिलमुनी
हा गृहस्थ यझ आहे
21 Oct 2021 - 7:05 pm | mangya69
महाजनचा मुलगा, रिया चक्रवर्ती , सुशांत ह्या केसमध्ये नेमके कोण आणि कसले गुन्हेगार सापडले ?
21 Oct 2021 - 10:35 pm | mangya69
https://www.jansatta.com/rajya/proposal-to-demolish-indira-gandhi-traini...
गुजरात में इंदिरा गांधी के नाम पर बनी इमारत को तोड़कर पीएम मोदी के नाम पर भवन बनाने की तैयारी की जा रही है। इसके लिए बकायदा प्रस्ताव भी पास हो गया है। अब इस प्रस्ताव पर गुजरात के सीएम भूपेन्द्र पटेल को फैसला लेना है।
गांधीनगर में बने इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन को तोड़ कर नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन बनाने का प्रस्ताव पास किया गया है। गुजरात पंचायत परिषद की बैठक में इससे संबंधित प्रस्ताव लाया गया, जिसे बाद में पास भी कर दिया गया। प्रस्ताव लाने के समय कहा गया कि यह भवन बहुत पुराना है, इसलिए इसे तोड़कर नया भवन बनाने की अनुमति दी जाए। साथ ही नए भवन का नाम पीएम मोदी के नाम पर रखा जाए।
------
हॅरी पॉटरमध्ये एक प्रोफेसर असतो , कुणीही कसला पराक्रम केला की तो त्याच्यावर भ्रमित मंत्र वापरून त्याला विसमरण करवत असतो आणि मग त्याचा पराक्रम स्वतःच्या नावाने खपवत असतो.
प्रोफेसर लोकहार्ट गिलरॉय
नवीन नवीन पोशाख करणे , आपण मोठे गुरू आहोत अशा बढाया मारणे , पेपरात मासिकात फोटो छापवून आणणे , लहान मुलांना मनकी बात तासन तास सुनवणे, प्रत्यक्ष लढाईवेळी झोला उचलून पळणे हे त्याचे छंद असतात.
21 Oct 2021 - 11:12 pm | श्रीगुरुजी
कॉंग्रेसनेच याची सुरूवात केली रे. पुण्यात पूर्वी पेशवे उद्यान या नावाचे प्राणीसंग्रहालय होते. ते तेथून जवळच कात्रजच्या अलिकडे नेल्यानंतर त्याला राजीव गांधी प्राणीसंग्रहालय असे नाव कॉंग्रेसींनी दिले.
स्वारगेटजवळील चौकाला पूर्वी सावरकर चौक असे नाव होते. त्या चौकात केशवराव जेंधेंचा पुतळा उभारून कॉंग्रेसींनी त्याच चौकाला केशवराव जेधे चौक असे नाव दिले.
जे कॉंग्रेसींनी पेरलं, तेच उगवतंय. तू उगाच लोड घेऊ नकोस.
21 Oct 2021 - 11:24 pm | mangya69
https://en.m.wikipedia.org/wiki/Peshwe_Park
पेशवे पार्क अजून आहे.
फक्त प्राणी राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात नेले आहेत
22 Oct 2021 - 12:00 am | श्रीगुरुजी
प्राणी संग्रहालयाचे नाव पेशवे उद्यान होते. आता ते राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आहे. पेशवे उद्यानाच्या जागेत आता महापालिकेचे डंपर उभे असतात. तेथे आत जाण्याची कोणालाही परवानगी नाही.
22 Oct 2021 - 10:18 am | Rajesh188
Bjp च्या केंद्रीय सरकार च्या मंत्रिमंडळात अतिशय हुशार लोक मंत्रिमंडळात आहेत पण योगी सरकार च्या मंत्रिमंडळात पण अती हुशार लोकांची कमी नाही.
Talent कुटून भरले आहे.
योगी सरकार च्या मंत्री मंडळातील मंत्री महोदय उपेंद्र तिवारी ह्यांनी लोकांचे अज्ञान दूर केले आहे.
95% देशातील जनतेला पेट्रोल ,डिझेल लागत नाही त्या मुळे त्यांच्या किंमती वाढल्या तरी काही फरक पडत नाही
देशात फक्त 5% लोकांनाच इंधनाची गरज लागते असा त्या अर्थ .
काय ते दिव्य ज्ञान