गाभा:
भरपूर राजकारण करून, आघाडी सरकार स्थापन केले, पण हे सरकार, सामान्य जनतेसाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे.
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
3. साधु हत्याकांड
4. तांदूळ घोटाळा
5. अर्भक मृत्यू
6. शेतकरी वर्गाला दिलेली अपुरी मदत
7. वाढीव पेट्रोल दर.
8. ड्रगचा वाढता वापर...
9. मेट्रो रेल्वे बाबत केलेली चालढकल
10. CBI चौकशी होऊ नये, म्हणून उचललेली पाऊले
11. तक्रार केली तर, तक्रार करणारी व्यक्ती गायब होणे.
12. मराठा आरक्षणाचा सावळागोंधळ
एकूणच, हे सरकार, सामान्य माणसासाठी नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे....
प्रतिक्रिया
16 Jan 2021 - 8:13 am | सौंदाळा
गल्लीतील गुंड आणि खंडणीखोर सत्तेवर बसल्यावर दुसरं काय होणार?
जनताच यांना योग्य वेळी धडा शिकवेल.
16 Jan 2021 - 8:58 am | मुक्त विहारि
सामान्यतः, हुषार माणसे, निवडणुक लढवत नाहीत.
डोंबोली सारख्या, सो काॅल्ड, सुशिक्षित माणसांच्या शहरात, साध्या नगरसेवक पदासाठी, समाजसेवा करणारा उमेदवार, कुठल्याही पक्षाला मिळत नाही,
16 Jan 2021 - 8:43 am | श्रीगुरुजी
याआधीचे सरकार कोणत्याही वर्गातील जनतेसाठी नव्हते. ज्यांनी आपल्या खुर्चीसाठी, आपल्याला प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत देणाऱ्या निष्ठावंत मतदारांचा विश्वासघात करून नुकसान केले, ते फक्त स्वत:चेच असतात.
16 Jan 2021 - 9:02 am | मुक्त विहारि
सहमत आहे
16 Jan 2021 - 9:12 am | दिगोचि
यात वाचाळवीर राऊत यान्चे नाव हवे कारण त्यान्च्यामुळे २०२४च्या निवडणुकीवर परिणाम होईल असे आता तरी वाटत आहे.
16 Jan 2021 - 9:15 am | मुक्त विहारि
त्यामूळे, मी वैयक्तिक पातळीवर टीका केली नाही.
16 Jan 2021 - 9:13 am | मुक्त विहारि
13. एका निवृत्त सैनिकाला, मारहाण केली.
16 Jan 2021 - 9:32 am | मराठी_माणूस
कोणते सरकार सामान्य जनतेसाठी होते ?
16 Jan 2021 - 9:51 am | मुक्त विहारि
आधीच्या सरकारच्या चूका सांगीतल्यात तर उत्तम....
16 Jan 2021 - 11:03 am | मराठी_माणूस
काही तुरळक अपवाद वगळता सर्व काही सत्तेसाठी.
16 Jan 2021 - 11:12 am | मुक्त विहारि
कुठल्या चूका?
16 Jan 2021 - 12:11 pm | मराठी_माणूस
भ्रष्टाचार की सर्वात मोठी कीड आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तो करणे आणि करणार्यांना पाठीशी घालणे हे सतत चालले आहे.
16 Jan 2021 - 12:24 pm | मुक्त विहारि
मागच्या सरकारने चुका केल्या असतील तर, त्या चुका टाळायला, ह्या सरकारने काय केले?
16 Jan 2021 - 12:32 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणे, वेगळी असणे साहजिकच आहे.
पण, त्याच बरोबर, सामान्य माणसाला त्रास होऊ नये, इतपत तरी काळजी घ्यायला हवी....
17 Jan 2021 - 1:57 pm | Rajesh188
प्रशासन यंत्रणा,आणि ते प्रशासन हकणारे सरकार नसेल तर कोणताच देश चालणार नाही
सरकारी धोरण ही सर्वात जास्त महत्वाची असतात त्या वर लोकांच्या नोकऱ्या,व्यवसाय अवलंबून असतो.
धोरण बदलेले तर चांगले चालणारे व्यवसाय पण क्षणात माती मोल होवू शकतात.. कोणी असे समजत असेल मी स्वतःच्या मेहनतीवर पैसे कमवत आहे तर ते अर्ध सत्य आहे प्रशासन आणि सरकारी धोरण हीच तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देतात.
सरकार ही यंत्रणा जीवनात नगण्य नाही अतिशय महत्वाची आहे.
सरकारी यंत्रणा च पूर्ण फायदा घेवून त्याच यंत्रणेला नगण्य समजायचं हे थोड विरोधी मत वाटत.
चांगले सरकार निवडणे म्हणजे आपले स्वतःचे भविष्य चांगले बनवणे
16 Jan 2021 - 9:44 am | Rajesh188
तुम्ही कोणत्या पक्षाचा आमदार आणि नगरसेवक निवडून दिला आहे?
अगदी वैयतीक बोलायचे झाले तर तुम्ही ज्या आमदार आणि नगरसेवकाला मतदान केले आहे तो समाज सेवा निस्सीम भावनेने करतो का?
आणि तुम्ही त्याला का मत दिले त्याचे एका वाक्यात कारण काय आहे.
ह्या दोन प्रश्नांची उत्तर सर्वात महत्वाची आहेत.
16 Jan 2021 - 9:55 am | मुक्त विहारि
सरकार एका माणसाचे नसते
16 Jan 2021 - 10:06 am | Rajesh188
पण एक एक आमदार मिळून च बहुमत मिळते आणि सरकार स्थापन होते.
16 Jan 2021 - 10:20 am | मुक्त विहारि
आघाडी सरकार, असे स्थापन झालेले नाही, ही वस्तुस्थिति आहे,
16 Jan 2021 - 10:17 am | प्रसाद_१९८२
वर्षे, दिड वर्षा पासून कोथळा, खंजीर, मराठी आस्मिता, कोमट पाणी, घरातच बसा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या शिवाय एक ही वेगळा शब्द सध्याच्या महा आघाडी सरकार कडून ऐकला नाही.
याशिवाय यांची सत्तेत येऊन केलेली कामे काय तर, गेल्या सरकारच्या योजना बंद करणे, स्वत:च्या हट्टासाठी आरे कारशेड इतत्र हलवणे, बुलेट ट्रेनला विरोध, केजरिवाल प्रमाणे प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलने, कंगानाचे घर बुलडोजर चालवून पाडणे, मंत्र्यासाठी आलिशान गाड्या खरेदी करणे याशिवाय इतर एक ही काम या सरकारने केले असेल तर सांगावे कुणी.
16 Jan 2021 - 10:21 am | मुक्त विहारि
शिवभोजन थाळी
16 Jan 2021 - 10:29 am | Rajesh188
Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन.
साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन.
अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण.
हिंदू मुस्लिम तणाव नाही.
16 Jan 2021 - 10:31 am | मुक्त विहारि
आपले हे मुद्दे नक्की आहेत का?
16 Jan 2021 - 12:37 pm | प्रसाद_१९८२
Corona काळात योग्य वेळी लॉक डाऊन.
--
तो केंद्र सरकारने लावला व त्यावर तुमच्या सारख्या अनेकांनी टिका केली होतो.
साथीच्या रोगात जनतेला फुकट रेशन.
--
फुकट अन्न धान्य केंद सरकारने दिले मात्र त्यातही महाविकास आघाडीने घोटाळे केले
अपुऱ्या आरोग्य सुविधा असून सुध्धा परिस्थीत वर नियंत्रण.
--
कोरोना संख्या व मृत्यु देशात सर्वात जास्त महाराष्ट्रात झाले आहेत.
हिंदू मुस्लिम तणाव नाही.
--
तो या आधी कधी होता ?
16 Jan 2021 - 10:40 am | Rajesh188
फक्त योग्य पद्धत नी खोडून काढवेत.
केंद्र सरकार ल मध्ये न घेता.
16 Jan 2021 - 10:45 am | सुबोध खरे
हायला
दुसऱ्या धाग्यावर तर लॉक डाऊन केला आणि श्रमिकांचे हाल झाले म्हणून मोदींच्या नावाने शिमगा करत होतात.
शरद कोचिंग क्लासेस लावले काय? कोलांट्या मारायला शिकलाय!
16 Jan 2021 - 10:47 am | मुक्त विहारि
धन्यवाद
16 Jan 2021 - 12:10 pm | बाप्पू
ठो...!!
16 Jan 2021 - 8:39 pm | चौथा कोनाडा
शरद कोचिंग क्लासेस
😂
हे आवडल्या गेलेले आहे !
16 Jan 2021 - 10:52 am | मुक्त विहारि
करोनाच्या काळात, वांद्रे रेल्वे स्टेशनवर, गर्दी कशी काय जमा झाली?
उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रा पेक्षा जवळ जवळ दुप्पट असुनही, त्या राज्याने, जास्त चांगल्या रीतीने ही लागण हाताळली
16 Jan 2021 - 10:53 am | मुक्त विहारि
फुकट रेशन, केंद्र सरकारने दिले...
आयजीच्या जीवावर बायजी उदार...
16 Jan 2021 - 10:54 am | मुक्त विहारि
मग आता सुधारली आहे का?
16 Jan 2021 - 10:56 am | मुक्त विहारि
तो कसा असेल?
अजान स्पर्धा भरवली जाते...
हिंदू हृदयसम्राट, "जनाब "होतात...
16 Jan 2021 - 11:24 am | Rajesh188
पण ते गरजवंत व्यक्ती पर्यंत पोचवणे हे राज्य सरकार चे काम असते.
एक उदाहरण घेवू.
बिहार ला 86450 MT धान्य केंद्र सरकार नी दिले पण बिहार मधील bjp आघाडी सरकार नी फक्त.1.84 MT च धान्य वाटप जनतेला केले .
आणि बाकी सर्व धान्य कुठे गेले ह्याचा पत्ताच नाही.
16 Jan 2021 - 11:29 am | मुक्त विहारि
पण काही लिंक असेल तर द्या...
मला आपल्या राज्यात झालेला, तांदूळ घोटाळा मात्र माहिती आहे,
16 Jan 2021 - 11:31 am | श्रीगुरुजी
ही घ्या लिंक
https://www.misalpav.com/comment/1091249#comment-1091249
16 Jan 2021 - 11:40 am | मुक्त विहारि
थोडक्यात, आम्ही म्हणू, तेच सत्य, ह्या पंथातले दिसतात....
16 Jan 2021 - 11:58 am | Rajesh188
Bjp संचलित रिपब्लिक टीव्ही न्यूज चॅनेल वर त्याच गुन्ह्याखाली केस दाखल आहे.
16 Jan 2021 - 11:41 am | Rajesh188
https://www.foodnavigator-asia.com/Article/2020/07/13/India-s-COVID-19-f...
16 Jan 2021 - 12:12 pm | Ujjwal
लेख नीट वाचता कि नाही? तुम्हीच दिलेल्या लिंक मध्ये महाराष्ट्र सरकारने धान्याचे एप्रिल मे मध्ये १ टक्क्यापेक्षा कमी आणि जुन मध्ये 0% वितरण केले आहे हे लिहिलंय.
Of the 36 states and Union Territories (UTs) in India, two distributed zero grains (Goa, Telangana), 11distributed less than 1% of allocated grains (Andhra Pradesh, Gujarat, Jharkhand, Ladakh, Maharashtra,Meghalaya, Odisha, Sikkim, Tamil Nadu, and Tripura) across April and May 2020, whereas in June 2020 sixmore (Bihar, Gujarat, Maharashtra, Tamil Nadu, Sikkim, and Ladakh) also distributed zero grains.
16 Jan 2021 - 12:18 pm | मुक्त विहारि
असे होते कधीकधी
16 Jan 2021 - 12:20 pm | Ujjwal
:)
16 Jan 2021 - 12:16 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...
16 Jan 2021 - 2:05 pm | अनन्त अवधुत
तुम्ही विदा दिलाय. आजवर असे कधी झाले नव्हते की तुम्हाला माहिती/ दुवा/ विदा मागितला आणि तुमच्याकडून तो मिळाला .
16 Jan 2021 - 12:29 pm | Rajesh188
सरकार कोणत्या पक्षाचे आहे ह्या पेक्षा सरकार चालवणारी लोक कोण आहेत हे जास्त महत्वाचे असते हेच तर सांगायचे आहे.
म्हणून तर पहिल्याच कमेंट मध्ये मी तुम्ही कोणाला मत दिले होते आणि ज्याला मत दिले होते. तो व्यक्ती निस्सीम भावनेने समाजसेवा करत आहे का?
असा प्रश्न विचारला होता.
16 Jan 2021 - 12:36 pm | मुक्त विहारि
पण तो एकटाच सत्तेत नाही,
इतरही काही जण सत्तेत आहेत
असो,
तुमची विचारसरणी, माझ्या पेक्षा वेगळी असल्याने, तुम्ही, तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी
16 Jan 2021 - 12:41 pm | कानडाऊ योगेशु
मुळात हे मान्य करायला हवे कि फडणवीसांचा अतिअहंकार त्यांना व पक्षाला व राज्याला नडला. थोडे तोंड गप्प ठेवले असते तर आज सत्तेत असते.
सध्याचे सरकार हे राज्य चालवायचे ह्या उद्देशाने स्थापलेले नसुन फक्त सरकार चालवायचेच ह्या हेतुने स्थापले गेलेले आहे.त्यामुळे दर तीन-चार महिन्यानेन आता पड्णार आता पडणार अशी आवई उठवली जाते पण होत काही नाही.
16 Jan 2021 - 8:07 pm | कानडाऊ योगेशु
>काहीही करून माझाच मुख्यमंत्री झाला पाहिजे हा *बाळ*हट्ट नडला.
काहीही करुन मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे हा हट्ट जास्त नडला.जेव्हा सेना मुख्य्मंत्री पदावर अडुन बसली होती तेव्हा ज्युनिअर ठाकरेंचे नाव पुढे केले होते. हा एक नंबरचा पोरकट पणा होता व कोणालाही मान्य झाला नसता.पण पुढे पवारांनी उध्दव ठाकरेंना पुढे आणुन मुत्सुद्दीपणा दाखवला.हाच पर्याय फडणवीसांना सेनेसमोर ठेवता आला असता.तसेही सेना अर्धा-अर्धा कार्यकाल वाटुन घ्यायला तयार होती.पण अतिस्वार्थ नडला. आणि पुढे अजित पवारांशी असंगाशी संग करुन स्वतःचे हसे करुन घेतले ते वेगळेच.
16 Jan 2021 - 8:36 pm | श्रीगुरुजी
फडणवीसांनी २०१७ पासून अनेक गंभीर घोडचुका केल्यामुळे (अजिबात गरज नसताना शिवसेनेच्यया गळ्यात पडून युती करणे ही त्यातील एक गंभीर घोडचूक) व दुर्दैवाने मोदी-शहांनी त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना मुक्तहस्त दिल्याने, २०१९ मध्ये अत्यंत अनुकूल परिस्थिती असूनही भाजपच्या जागा कमी झाल्या व सरकार गेले. फडणवीसांच्या चुका अजूनही सुरू आहेत व मोदी-शहांच्या अजूनही ते लक्षात येत नसल्याने, पुढील स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसून भाजप चौथ्या क्रमांकावर फेकला जाईल. नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला आपले बालेकिल्ले गमवावे लागल्याने याचे प्रत्यंतर आले आहे.
फडणवीसांच्या गंभीर घोडचुका व त्यामुळे भाजपची वेगाने होत असलेली घसरण हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. मूड येईल तेव्हा यावर लिहीन.
16 Jan 2021 - 1:48 pm | श्रीगुरुजी
फक्त अतिअहंकार नव्हता. त्यांनी अनेक गंभीर घोडचुका केल्या व अजूनही त्या सुरूच आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा कमी होऊन सरकार गेले व भविष्यातील विधानसभा निवडणुकीतही त्यांचे सरकार येणे अवघड आहे. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे व पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची बरीच शक्यता आहे.
18 Jan 2021 - 5:56 pm | सुबोध खरे
लोकांना आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते
people get the government, they deserve it.
18 Jan 2021 - 6:02 pm | श्रीगुरुजी
नक्कीच. परंतु ज्यांना प्रत्येक निवडणुकीत डोळे झाकून मत दिले त्यांच्याकडूनच विश्वासघात व्हावा हेच भाजप समर्थक मतदार deserve करीत होते का?
16 Jan 2021 - 6:33 pm | जानु
सरकार स्थापन केले ही राजकीय खेळी म्हणुन मान्य केले जाईल. पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ, बुलेट रेल्वे ला खोडा हे पातळी सोडुन घेतलेले निर्णय सगळ्यात जास्त टोचले. सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन. राजकारणासाठी पोटावर लाथ मारायला तयार झालात, जनतेच्या फायद्यापेक्षा आपले राजकारण महत्वाचे. राऊत यांच्या वायफळ बडबडीने जास्त उबग आणला. त्यात कंगना आणि अर्णब ने शिस्तीत म्हणा किंवा खेळुन, त्यांना काय राजकारण येते ते लोकांच्या मनात ठसवले. साहेब कायम हे दाखविण्यात मग्न झाले की मी म्हणजे फायनल रिमोट. कायम सरकार पडणार नाही ही टेप. कोणती कामे केली किंवा निर्णय घेतले हे विचारले तर सगळा गोंधळ. पुन्हा निवडणुका आल्या की यांना अजिबात उभे नाही करणार.
16 Jan 2021 - 8:48 pm | चौथा कोनाडा
१०१ टक्के सहमत !
17 Jan 2021 - 1:17 pm | कानडाऊ योगेशु
>पण आरे कार शेड बाबत केलेला खेळ,..वगैरे वगैरे..
एरवी इथे मत सेनेविरुध्द जायला हवे पण रातोरात असंख्य झाडांची कत्तल करुन फडणवीस आपली विश्वासार्हता गमावुन बसले आहेत.बीजेपी च्या बाजुने असलेल्या अनेकांनाही ते कृत्य काही पसंत पडले नव्हते. हीच गोष्ट घाईगडबडीत पहाटे पहाटे उरकलेल्या शपथविधीची.ह्या दोन्ही कृत्यांना जनता माफ करणे अवघड आहे.
>सेना जगते ती मुंबईच्या जोरावर. पक्ष आणि सत्ता पैशाच्या जोरावर चालते. सेनेला पैसा मिळतो तो मुंबई आणि ठाण्यातुन.
बरोबरे.सेनेचा मुख्य अजेंडा हा मुंबई मनपा वर सत्ता हाच असतो आणि राज्यपातळीवरची सत्ता हे त्यामानाने दुय्य्म उद्देश्य असावे आणि पुढील मनपा निवडणुकींची सेनेने आत्तापासुनच फिल्डींग लावायला चालु केली आहे. (गुजरातीमधुन पत्रके वगैरे.). सेनेला जनता जोपर्यंत मनपा वरुन पायउतार करत नाही तोपर्यंत सेनेला लोकाधार नाही असे म्हणणे बिनबुडाचे ठरेल.
बाकी राऊत ही बीजेपीची एक डोकेदुखी होऊन बसले आहेत आणि त्यांना हाताळणारा एकही सक्षम वीर बीजेपीत नाहीत.(काय ती अमृतावहींनीची आणि राणे सुपुत्रांची प्रत्युत्तरे.!)
16 Jan 2021 - 8:41 pm | Rajesh188
सेना आणि भारतीय जनता पक्षात निवडणुकी आधीच संघर्ष चालू होता..
युती होईल की नाही ह्याची खात्री नव्हती.
नानार प्रकल्प ल bjp आग्रही होती तर सेना त्याला विरोध करत होती.
जिथे सेनेचे उमेदवार जिंकतात तेथील च राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या ताकत वान लोकांना bjp नी पक्षात प्रवेश दिला होता.
देवेंद्र फडणवीस कर्ज माफी दिली असे सांगत होते तर ठाकरे एकाला ही कर्ज माफी मिळाली नाही असे सांगत होते.
आरे मधील मेट्रो शेड साठी bjp आग्रही होती तर सेना त्याचा विरोध करत होती.
Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना.
नारायण राणेंचा bjp pravesh सेने ला रुचला नव्हता.
इतके सारे महाभारत निवडणुकी अगोदर घडत होते तरी युती झाली.
का?
दोन्ही पक्षात बेबनाव आहे हे राजकीय पंडित असलेल्या अमित शाह ना माहीत नव्हते का?
ते काय बोळ्याने दूध पितात काय.
युती तुटण्याची सर्व जबाबदारी सेने वर टाकून स्वतः नामा निराळा राहण्याचा प्रयत्न BJP करते आहे.
पण राजकारणातील खेळाडू आणि समंजस जनता त्या वर विश्वास का म्हणून ठेवेल.
17 Jan 2021 - 3:11 am | सुक्या
Bjp देवेंद्र जी मुख्यमंत्री म्हणून promote करत होती तर सेना आदित्य ठाकरे ना.
हे जर असे होते तर शिमगा करायला निवडणुक का होउ दिली. त्या अगोदर आमचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहे हे का नाही बोलले? कुणी तोन्ड दाबुन ठेवले होते का?
17 Jan 2021 - 4:54 am | अनन्त अवधुत
सेना आदित्य ठाकरे ना प्रमोट करत होती ह्याचा एखादा पुरावा आहे तुमच्याकडे? की आपले नेहमीप्रमाणे मनात येईल ते टंकायचे ?निवडणुक काळातील एखादी बातमी ज्यात सेनेने आदित्य ठाकरे ना मुख्यमंत्री म्हणून सादर केले आहे किंवा एखाद्या प्रचार सभेतील पोस्टर ज्या प्रचार सभेत सेना / भाजप मधले पहिल्या फळीतील नेते आहेत, असे काही असेल तर प्लिज इथे पोस्ट करा.
17 Jan 2021 - 7:29 pm | श्रीगुरुजी
आदित्य ठाकरेचे नाव नव्हते, परंतु १८ फेब्रुवारीस युतीची अधिकृत घोषणा करताना "भाजप व सेना सर्व जागा, सर्व पदे व सर्व जबाबदाऱ्या समान वाटून घेणार आहेत", असे फडणवीसांनी आधी मराठीत व नंतर हिंदीत सांगितले होते (ते प्रत्येक गोष्ट दोन्ही भाषात सांगतात).
नंतर १९ फेब्रुवारीस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना "सुरूवातीची अडीच वर्षे सेनेचा व उर्वरीत अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होईल असे वाटाघाटीत दोन्ही पक्षांनी ठरविले आहे", असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
हेच इतर सर्व सेना नेते वेगवेगळ्या सभातून ऑक्टोबर २०१९ पर्यंत सांगत होते व कोणत्याही भाजप नेत्याने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. जुलै २०१९ मध्ये फायनान्शियल एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेने सुद्धा हेच सांगितले होते.
परंतु विधानसभा निवडणुकीच्या एक आठवडा आधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी असे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले. हे सांगण्यास त्यांनी इतका उशीर का लावला? हे आधी सांगितले असते तर सेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वीच युती तोडली असती या शंकेमुळे भाजप नेते जवळपास ८ महिने गप्प असावे.
युतीसाठी सेनेने पुढाकार घेतला नव्हता. स्वतः फडणवीसच युतीसाठी अत्यंत कासावीस होते. त्यामुळेच त्यांनी वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून अक्षरशः उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडून युती करायला लावली. युतीसाठी त्यांनी निदान मोघम स्वरूपात तरी सेनेला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले असावे. त्यामुळेच निकालानंतर सेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिली. मुळात संपत आलेल्या सेनेला तब्बल १२६ जागा देऊन भाजपने स्वतः फक्त १४६ जागा लढविल्या, तेव्हाच भाजप बहुमताच्या १४५ या आकड्यापासून खूप दूर राहणार व सेनेला आपल्या ताकदीपेक्षा खूप जास्त जागा मिळून सेना भाजपला नाचविणार हे दिसत होते. हे ओळखून फडणवीसांनी मित्र पक्षाला दिलेल्या १८ जागा कमळ चिन्हावर लढवायला लावून आपली उमेदवार संख्या १६४ वर नेली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट आयाराम पायघड्या घालून भाजपत आणले. किमान २०१४ प्रमाणे १२५ च्या आसपास जागा मिळतील या भ्रमात फडणवीस होते.
परंतु मतदारांनी दणका देऊन भाजपला १०५ वरच रोखले (यात मित्रपक्षांचे २ व १७-१८ आयारामांचा समावेश आहे) व फडणवीसांची स्वप्ने उधळली गेली.
19 Jan 2021 - 10:29 am | अमरेंद्र बाहुबली
+१
20 Jan 2021 - 12:02 am | अनन्त अवधुत
सेनेचे नेते सेनेचा मुख्यमंत्री होईल हे सांगत होते. पण आदित्य ठाकरेचे नाव कोणी घेतले का, इतकेच विचारायचे होते.
16 Jan 2021 - 8:41 pm | चौथा कोनाडा
+१
१०० टक्के सहमत !
17 Jan 2021 - 9:51 am | Rajesh188
https://maharashtratimes.onelink.me/W6tZ/dd08d9d7
ही महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी पूर्ण वाचा.
पुढचा मुख्यमंत्री सेने चाचं असेल असे उद्धव ठाकरे किती तरी वेळेला सभेत म्हणाले आहेत.
त्याची लिंक मागू नका ते जग जाहीर आहे.
लोकसभा निवडणुकीत युती झाली तेव्हा ती bjp ची गरज होती.
आणि सेना तिथेच चुकली.लोकसभे साठी सेने नी युती करायला च नको होती.
Bjp ची गरज भागली होती.
370 कलम ,आणि बाकी कारण मुळे bjp स्वबळावर विधानसभा जिंकेल ह्याची खात्री bjp ला होती.
त्या मुळे युती करणे निवडणूक पूर्व ही सेनेची गरज होती.
लोकसभेत युती करून सेने नी जी चूक केली होती.त्याचा च तो परिणाम होता.
17 Jan 2021 - 9:52 am | Rajesh188
http://mtonline.in/RbjxsZ48?utm_source=whatsapp&utm_campaign=mtmobile&ut...
17 Jan 2021 - 10:09 am | Rajesh188
बिहार मध्ये नितीश कुमार च्या जागा कमी असून त्यांना मुख्यमंत्री पद bjp नी स्वतः दिले.
का?
17 Jan 2021 - 12:05 pm | Rajesh188
राजकारण असे चालत नाही.
युती तुटण्याच कारण
मुख्यमंत्री पद हे कधीच नव्हत.जसे तुम्ही समजत आहात.
Bjp आणि सेनेची युती बाळासाहेब आणि bjp ह्यांनी का घडवून आणली.
हा प्रश्न विचारून बघा स्वतः ला.
नंतर काय काय घडामोडी घडल्या त्याचा एकदा विचार करा.
मग तुटणे कोणाची गरज होती bjp ची की सेने ची तो विचार करा .
मग तुमच्या लक्षात येईल मुख्यमंत्री पद तर फक्त बहाणा होता.
17 Jan 2021 - 7:45 pm | मुक्त विहारि
सध्याचे सरकार, जनतेच्या भल्यासाठी, काम करत आहे का? हा आहे ....
17 Jan 2021 - 8:43 pm | Rajesh188
आता जी तीन पक्षाची आघाडी आहे त्या सरकार नी काय काम केली .
1 वर्षाचे सरकार आणि lockdown मध्ये सापडलेले सरकार .
त्या सरकार नी काय काम केले त्याचे मापन कोणत्या फूट पट्टी नी करायचे.
असे एका वर्षात सरकारी निर्णय होवून काम चालू होत नाही.
त्या साठी मला वाटत.
काँग्रेस ,राष्ट्रवादी युती सरकार जावून सेना युती सत्तेवर आली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पासून राज्यात काय काम झाली त्याचा विचार करावा लागेल.
मुख्यमंत्री फडणवीस झाल्या नंतर किती धरण बांधली गेली ?
किती क्षेत्र पाण्याखाली आले.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्या पासून आज पर्यंत प्रशासन गतिमान झाले आहे का.
फडणवीस मुख्य मंत्री होते तेव्हा पासून आज पर्यंत भ्रष्ट कारभार जो प्रशासनात होता तो नष्ट झाला आहे का.
लोकांची काम सरकारी बाबू वेळात पूर्ण करत आहेत का .
नवीन किती युनिट वीज निर्मिती महाराष्ट्रात चालू झाली.
आता महाराष्ट्रात ज्या काही सुविधा दिसत आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार च्या काळातील आहेत,मुख्यमंत्री मनोहर जोशी च्या काळातील आहेत.
की फडणवीस सरकार नी निर्माण केलेल्या आहेत.
पाहिले ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आताच्या सरकार ला प्रश्न विचारा.
17 Jan 2021 - 8:49 pm | मुक्त विहारि
ह्या घटनांचा आणि करोनाचा, फार काही संबंध नाही
उदाहरणार्थ,
सामान्य माणसाला घरी बोलावून केलेली मारहाण
निवृत्त सेनाधिकार्याला केलेली मारहाण
यांचा आणि करोनाचा काहीही संबंध नाही
17 Jan 2021 - 10:38 pm | Rajesh188
देशाची राजधानी दिल्ली शहरात आज (बुधवार, 1 जुलै) पेट्रोल 80.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.53 रुपये प्रति लीटर आहे. मात्र, दोन्ही इंधनांचा मूळ दर पाहिला तर तो अनुक्रमे 24.92 आणि 27.03 रुपये प्रति लीटर इतका आहे. दिल्ली मध्ये 24.92 रुपये मूळ किंमत (बेस प्राइज) असलेले पेट्रोल 80.43 रुपये आणि डीजेल 27.03 रुपये असताना 80.53 रुपये प्रति लीटर गेलेच कसे? जाणून घेण्यासाठी इंडियन ऑयल संकेतस्थळावर नजर टाकल्यावर दरांबाबत बरेच काही ध्यानात येते. जे दर 1 जुलै पासून लागू झाले आहेत.
पेट्रोल बेस प्राइज 24.92 रुपये प्रति लीटर आहे. ज्यावर 33 पैसे प्रति लीटर दराने भाडे दिल्यानंतर त्याची किंमत 25.25 रुपये प्रति लीटर होते. त्यावर एक्साइज ड्युटी 32.98 रुपये प्रति लीटर, डीलरचे कमीशन 3.64 रुपये प्रतिल लीटर आणि मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट 18.56 रुपये प्रति लीटर असे लागते. त्यामुळे सर्वांचे मीळून होतात 80.43 रुपये. जो दर प्रत्यक्षात ग्राहकालाच द्यावे
असे ठरतात पेट्रोल ,डिझेल चे दर.
एक्साइज duty हा केंद्र सरकार चा कर आहे..
तो 32.98 रुपये आहे.
राज्याने लावलेल्या vat च्या दुप्पट कर केंद्रांनी लावला आहे पेट्रोल ,डिझेल वर.
त्या मुळे पेट्रोल चे दर जास्त आहेत त्याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे.
भाव वाढीला तेच जास्त जबाबदार आहेत.
18 Jan 2021 - 1:35 am | टवाळ कार्टा
केंद्रात मोदी सरकारच्या ऐवजी चिवसेना आली किंवा भ्रष्टवादी आली किंवा वरुन "गर्व से कहो" म्हणणारे येउंदेत किंवा "हे राम" म्हणणारे बापू येउंदेत...पेट्रोलचे भाव वर वरच जात रहाणार आहेत
#go electric
18 Jan 2021 - 10:49 am | मुक्त विहारि
राज्य सरकार, त्यांचे दर कमीजास्त करू शकते.
उदा. केंद्र सरकारने, आधारभूत किंमत 50/₹ ठरवली तर, राज्य सरकार ते त्याच किंमतीने विकू शकते किंवा, जास्त दर लाऊन विकू शकते.
महाराष्ट्र सरकारने, इतर काही राज्यांपेक्षा जास्त दर लावले आहेत.
काही लोकांना, स्वतःच्या चुकीचे खापर, इतर लोकांवर फोडायची सवय असते. सर्वसामान्य माणूस, इतका खोलवर विचार करत नाही.
18 Jan 2021 - 10:43 am | मुक्त विहारि
दरवाढ, राज्य सरकारने केली आहे.
इतर काही राज्यात, महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर कमी आहेत.
18 Jan 2021 - 1:03 pm | मदनबाण
1. सामान्य माणसाला, घरी बोलावून मारहाण.
2. एका माणसाला,जीवे मारण्याची धमकी देणारा आमदार.
यात आता ३ री भर देखील पडली आहे असे म्हणावे का ?
‘Physically and mentally tortured’ former BARC CEO, arrested by Mumbai Police, admitted to hospital, daughter requests PM Modi to save his life
दासगुप्ता यांची कन्या यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहुन त्यांच्याकडे आपल्या वडीलांच्या प्राणाची भिक मागितली असुन, दासगुप्ता यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 1:21 pm | Rajesh188
अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे.
दासगुप्ता पण त्यांचाच सवंगडी आहे.
उच्च कोटी तील देश प्रेम असणारा.
(उच्च कोटी देशप्रेम म्हणजे सामान्य लोक समजतात त्या पेक्षा खूप वेगळे देशावरचे प्रेम.)
आता फक्त सुशांत बद्द्ल चे अर्णव चे चाट व्हायरल झाले की खूप मज्जा येईल.
18 Jan 2021 - 2:11 pm | मदनबाण
अर्णव चे व्हॉट्सॲप चाट व्हायरल झाले आहे त्या वरून केंद्र सरकार आणि अर्णव चे देश प्रेम किती उच्च कोटी चे आहे हे लोकांना माहीत झालेलं आहे
अर्णब आणि दासगुप्ता [ ज्यांना तुम्ही सवंगडी म्हणता ] हे दोघेही स्वतःचे पर्सनल कम्युनिकेशन स्वतःलाच गोत्यात आणण्यासाठी तसेच टॉर्चर करुन घेण्यासाठी व्हायरल करतील का ? अर्थातच नाही. मग त्यांचे पर्सनल कम्युनिकेशन व्हायरल कसे होउ शकत ? व्हॉट्सएप म्हणते ते एंड टु एंड एनक्रिप्शन करतात, म्हणजे कोणी तरी व्हॉट्सएप ला विनंती केली किंवा पैसे दिले आणि त्यांच्या सर्व्हरवर स्टोअर असणार्या एनक्रिप्शन की वापरुन व्हॉट्सएप ने हा डेटा पुरवला ? पण ही शक्यता देखील धुसर दिसते ! [आधीच त्यांची पुंगी वाजलीय,असं केल तर देशातुनच ब्लॉक होतील. ]
समजा तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि माझा तुमच्याकडे, मग मी तुमचा नंबर अर्णब गोस्वामी नावाने सेव्ह करतो आणि तुम्ही माझा दास गुप्ता या नावाने सेव्ह करता, मग जसा प्लॅन असेल तसे आपण लिहायचे आणि स्क्रिन शॉट काढुन व्हायरल करायचे ! [ हे सहज शक्य आहे नाही ? :))) ]
एक मंत्री काही काळा पूर्वी अर्णब जेल मध्ये आत्महत्या करेल अश्या स्वरुपाचे विधान करताना स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसले होते, त्याच मंत्र्याचा जावई ड्रग केस मध्ये अडकल्यावर हे अर्णब चॅट प्रकरण अचानक आले [ इतके दिवस हे चॅट रेकॉर्ड्स कुठे बरं दडलेले होते ? ] थोडक्यात कोणीतरी टायमिंग धरुन हा उध्योग करत आहे.
असो... पाकिस्तानकडुन अपेक्षित प्रतिक्रिया देखील आली बघा ! तेव्हा देश-विघातक शक्तींचा हा एक डाव असलल्याचेच प्रथम दर्शनी दिसते.
संदर्भ :- Pakistan calls Pulwama attack ‘false flag operation’ citing Arnab Goswami’s WhatsApp chats
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 2:30 pm | Rajesh188
त्या scroll.in che ceo समीर पाटील आणि संपादक नरेश हे अर्णव चेच भावबंध नाहीत ना ह्याची खात्री पटल्यावर च तुम्ही दिलेल्या दुव्यावर किती विश्वास ठेवायचं ह्याचा विचार कोणी पण करेल.
18 Jan 2021 - 3:00 pm | श्रीगुरुजी
अगदी बरोबर! या दोघांच्या कायप्पा गप्पा या दोघांशिवाय कोण प्रसिद्ध करणार? एका मंत्र्याची कबुतरबाजी व व दुसऱ्या मंत्र्याच्या जावयाचे अंमली पदार्थ संबंध बाहेर आल्यानंतर या दोघांच्या नावाखाली कायप्पा गप्पा प्रसिद्ध करणे हे संशयास्पद आहे.
18 Jan 2021 - 4:22 pm | शा वि कु
सुशांत सिंग प्रकरणानंतर व्हाट्स ऍप सुरक्षेत चांगलीच वाढ झालेली दिसतेय. नायतर रियाचे सगळे चॅट टीव्हीवर दाखवायचे, त्याच्यावर तर मु.पो. ची सही पण नसायची.रियाच्या चॅट मधून सुशांतच्या चहात कायकाय मिसळलं कळत होतं की.
18 Jan 2021 - 7:27 pm | मदनबाण
रेहा ने तिची ड्रग चॅट मान्य केली होती, हे सांगायचे सोयिस्कर रित्या विसरलात वाटतं !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 8:35 pm | शा वि कु
गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही, हे तुम्हीसुद्धा विसरलातच की.
चालायचंच.
18 Jan 2021 - 10:00 pm | मदनबाण
गोस्वामीने सुद्धा हे माझे चॅट नाहीत, मु.पो. थापा लावत आहे असे कुठे म्हणले नाही
ओक्के, तर मुंबई पोलिसांनी हे स्विकारले, त्यावर माननिय माजी मुख्यमंत्री काय म्हणाले ते खाली देतो :-
The voluminous transcript of Mr Goswami’s chats released by Mumbai Police is deeply disturbing. Who gave access to such sensitive information from national security to constitutional amendments and political appointments?”
“The Government of India must launch a thorough probe. Also the Parliamentary Standing Committee on Defence must take this matter with utmost priority,” he added. The admission by Chavan is, again, a stark reminder of the extent to which the Mumbai Police and the Maharashtra Government have gone to in order to target Arnab Goswami.
संदर्भ :- Congress admits Mumbai police leaked Arnab Goswami chats: Here are all the wild conspiracy theories they generated
जाता जाता :- From Times of Islamabad to The Hindu: 5 media outlets which ’knew about the Balakot airstrike before it happened’ according to ‘liberal’ logic
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- They’re paying someone in Taloja to torture him till he names Arnab, he’s on death bed: Ex-BARC CEO family speak up, file affidavit
18 Jan 2021 - 10:32 pm | शा वि कु
रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी,
पण राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी पसरवल्या आणि त्यासाठी पोलिसांनी चॅट वाचले हे काय, तर "टार्गेटिंग गोस्वामी." छान. (टीआरपी scam, सरकारी कनेक्शन्सचा गैरवापर हे पण आहेच!)
OpIndia नेहमीसारखं lol. काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ? मिलिटरी, सैन्य वैगेरे बद्दल इतकं लिहिणाऱ्या व्यक्तीकडून असा रिस्पॉन्स ? बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो.
बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी.
मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ?
कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ?
(मला हे चॅट्स खरे आहेत असे म्हणायचे नसून, दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे.)
19 Jan 2021 - 12:18 pm | मदनबाण
रियाचे चॅट्स वाचणे ओके होते, ते पण पोलिसांनी नाही तर टीव्ही अँकर्स नी
पोलिसांनी चॅट व्हायरल करण्याचे कारण काय ? असे व्यक्तिगत कम्युनिकेशन व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का ? त्यामुळे ट्रार्गेट गोस्वामी आहे हे उघड सत्य आहे, जरी तुम्हाला व्यक्तिगत रित्या ते मान्य नसेल तरी.
काय होईल ह्याच स्पेक्युलेशन करणं आणि सरकार काय करणार आहे ह्याची नक्की बातमी आपल्या मित्राला सांगणे, हे सेम वाटतं का ? टाइम्स ऑफ इस्लामाबाद 4 पर्यायांचा विचार करत होता, त्यातला नक्की ऑप्शन गोस्वामीने लॉक करून दिला असता तर ?
जर तर ला न्यायालयात देखील किंमत नसते... आर ठाकरेंची सगळी भाषणे अशीच जर-तर शब्दांचा वापर असलेली असतात. :)
स्पेक्युलेशन करणे आणि अचूक माहिती देणे यात फरक असतो हे आपल्या समजत असेल असे मी समजतो.अर्णब ने कोणतीही ऑपरेशनल माहिती उघड केलेली निदान मला तरी दिसली नाही. जी लिंक दिली आहे त्यात अजय शुक्ला यांचे ट्विट वाचुन देखील तुम्ही जे अर्णबच्या बाबतीत म्हणत आहात तेच म्हणता येइल.
बाकी सगळे पेपर पर्यायांचा विचार करत होते, तर गोस्वामीला काय होणार हे माहिती होतं आणि तो ते मित्राला सांगत होता. ह्यात मला तर फरक वाटतो.
अगदी आपल्या पंतप्रधानां पासुन ट्रम्प तात्यांनी त्या काळात अशीच विधाने केलेली होती, फार मोठी कारवाई होइल हा अंदाज आणि नक्की कुठे आणि काय कारवाई होणार हे सांगणे यात फार मोठे अंतर आहे. अगदी टाईम्स ने देखील बातमी छापली होती :- Response to Pulwama attack: Precision air strikes the favoured option
बाकी, मु.पो. ने बेकायदेशीर मार्गाने चॅट मिळवले तर नक्की कारवाई व्हावी.
जशी मु.पो. वरकठोर कारवाई झाली पाहिजे, तसेच जर अर्णब दोषी आढळला तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे.
मूळ विषय- चॅट खरे आहेत की नाहीत ?
कि मुंबई पोलीस सहजगत्या व्हेरिफाय होऊ शकणाऱ्या गोष्टीवर इतके धाधांत खोटे बोलत आहे ?
जेव्हा मी प्रतिसाद लिहला होता तेव्हा मु.पो यांनीच हे पर्सनल कम्युनिकेशन लिक केले होते ते मला ठावूक नव्हते, तुमच्या दुसर्या प्रतिसादात जेव्हा उल्लेख आला त्या नंतर मी बातमी शोधली आणि मग दुवा देखील दिला.
दोन चॅट्स लीक मध्ये काय क्वालिटेटिव्ह फरक तुम्हाला दिसला, ज्याने ते चॅट विश्वासार्ह होते आणि हे "कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या नावाने सेव्ह करून घेतलेले स्क्रीनशॉट" आहेत हे जाणून घ्यायचे आहे.
दोन्ह चॅट मधील मुख्य फरक म्हणजे एक चॅट एका व्यक्तीने ड्रग्स संबंधी केले असुन दुसरे एका पत्रकाराने दुसर्या व्यक्तीशी केलेली सविस्तर चर्चा आणि इतर बाबींची चर्चा आहे. रेहा ने स्वत: मान्य केल्याचे तिचे चॅट सत्यच होते, त्यानुसार तिच्यावर कारवाई झालीच होती तसेच मु.पो. यांनीच स्वतः चॅट लिक केल्याचे मान्य केले असल्याने अर्णब चे चॅट सत्य असावे असे निदान या घडीला तरी मान्य करावे लागेल. तसेच मु.पो. वर कशी आणि कोणती कारवाई होइल ते देखील पहावयास हवे.
जाता जाता :- कारगिल युद्धाच्या वेळी बर्खा दत्त आणि २६/११ च्या वेळी जवळपास सगळा मिडिया कसा वागला होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
संदर्भ :-
Book reveals that Army was spooked by Barkha Dutt’s reporting in Kargil
Remembering the role Barkha Dutt played in endangering the lives of 100s of civilians during the 26/11 Mumbai terror attack
26/11 attack: Media pulled by Supreme Court for it's role
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India Today CFO and Distribution Head being grilled by ED again in the fake TRP case: Read details
22 Jan 2021 - 1:52 pm | मदनबाण
आधीच्या प्रतिसादात बर्खा दत्त यांचा उल्लेख केलेला आहेत, भाऊ तोरसेकरांनी त्यांच्या वरील व्हिडियोत तिचे व्यवस्थित कौतुक केले आहे ते ऐकण्या सारखे आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exercise
18 Jan 2021 - 1:06 pm | Rajesh188
देश चालवण्यासाठी पैसे लागतात तर राज्य चालवण्यासाठी सुद्धा पैसे लागतात.
केंद्र सरकार देश चालवण्यासाठी 32..98 म्हणजे 33 रुपये एक्साईज duty लावत असेल तर 18 रुपये vat राज्य सरकार का लावू शकतं नाही. .
राज्यांची देनी केंद्र सरकार वेळेवर देत नाही.
Gst मधील राज्यांचा हिस्सा वेळेवर देत नाही .
मग राज्यांनी काय करायचे.
एक तर gst मुळे राज्यांचे आर्थिक स्वतंत्र ह्या bjp सरकार नी हिरावून घेतले आहे.
पण हे bjp च्या समर्थकांना कधीच दिसणार नाही.
18 Jan 2021 - 4:34 pm | मुक्त विहारि
योग्य ती आर्थिक मदत नक्कीच केली आहे.
18 Jan 2021 - 11:58 pm | कपिलमुनी
साडेसहा हजार ग्रामपंचायती मध्ये आघाडीला यश मिळाले आहे याचा अर्थ इथे लिहितात तेवढे सरकार वाईट नाही
19 Jan 2021 - 12:30 am | कपिलमुनी
शून्य स्टॅटिस्टिक्स असलेला भोंगळ धागा !
केवळ आरोप चालणार
19 Jan 2021 - 8:22 am | गणेशा
दिलेल्या मुद्द्यावर बरेच बोलण्यासारखे आहे,
पण वेळेअभावी लिहिता येत नाहीये.
विशेष करून.
पेट्रोल, साधू हत्या, आरे / कारशेड, मराठा आरक्षण आणि काही, cbi /ed तत्सम संस्था आणि इतर.
तरीही लिहिण्याचा प्रयत्न केला असता, पण मुळ धागा लेखकानेच वेळ न घालवता फक्त point लिहिले आहेत तेच आवडले नाही.
मते वेगळी असावीत पण विश्लेषण नको का आपल्या मतांचे?
म्हणुन विस्तृत लिहीत नाही.
उदा. पेट्रोल : देशात केंद्र सरकार अमुक ३०-३२ रुपये tax लावतेय, राज्य सरकार इतके लावतेय. बॅरल च्या किंमती.. म्हणजे देशात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना केंद्र सरकार विरोधात पेट्रोल, गॅस यांच्या विरोधात आंदोलन करायचे आणि आता राज्य?
का मोदी है तो..
साधू हत्या झाली ती वाईट, पण जमलेल्या लोकात तेथील सरपंच हा सुद्धा bjp चा होता, ग्रामपंचायत सदस्य bjp चे.
Lockdown, whatsapp मेसेज फिरेलेले होते मुले पळवणारी टोळी फिरतेय, वगैरे हे सगळे संदर्भ नकोत का?
मराठा आरक्षण न्याय प्रविष्ट आहे हे फडणवीस सरकार सांगत होते, विरोधी राजकारण करतात हे बोलत होते, मग आता ते राज्य सरकार अंतर्गत आहे काय?
शेतकरी अपुरी मदत, तांदूळ घोटाळा या बाबत माहिती येऊद्या सगळेच whatsapp सारखे नसते..
Cbi संस्था केंद्राकडे, तसेच ed वगैरे.. त्यांचा गैरवापर केंद्र सरकार करतेय कि राज्य?
ड्रग चा वापर सामान्य माणसात वाढलेला data तर द्या.. मला वाटते म्हणुन कसे चालेल?
कंगना, अर्णब फलाना कोणासाठी आहेत हे एकदा पाहिले पाहिजे, अर्णब चे चाट जे फिरतेय ते ही पाहिले पाहिजे..
असली लोकं आणि इतर याबद्दल सविस्तर तर लिहा..
असो..
19 Jan 2021 - 10:42 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत. हा धागा १०५ आणबनही घरी बसवले ह्याची जळजळ कुठेतरी काढण्यासाठी काढलेला वाटतोय :)
असो. आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय. :)
19 Jan 2021 - 11:36 am | श्रीगुरुजी
असहमत. आघाडी सरकार आधीच्या सरकारसारखेच अत्यंत वाईट आहे.
19 Jan 2021 - 11:42 am | प्रसाद_१९८२
आघाडी सरकार ऊत्तम काम करतंय.
--
आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?
19 Jan 2021 - 12:09 pm | सॅगी
किमान समान लुटीचा कार्यक्रम किती छानपैकी राबवला जात आहे.
तुम्हाला ना, कशाचं काही कौतुकच नाही बघा... :)
20 Jan 2021 - 9:22 am | अमरेंद्र बाहुबली
आघाडी सरकारने, गेल्या दिडदोन वर्षात केलेले एक 'उत्तम' काम सांगा ?>>>>
-महाराष्ट्राला काडीचा ऊपयोग नसलेल्या बुलेट ट्रेन ला स्थगीती.
-कोरोना संकटावर ऊपाययोजना. (मागचं सरकार कोल्हापुरात लोक मरत असताना मते मागत फिरत होतं)
-मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणनार्यांना धडा.
-मुंबई पोलिसांना बदनाम करनार्याना चपराक.
-कारशेड ची जागा बदलणे.
- महाराष्ट्रात झालेली मोठी गुंतवणूक.
- मुंबईतील कार्यालये अहमदाबाद ला हलवण्याचा डाव हाणून पाडणे.
- राज्याच्या हक्काचा जीएसटी केंद्राने अडवलाय त्याविरूध्द वेळोवेळी आवाज ऊठवणे.
- महाराष्ट्र हिताची कामे करणे.
-मराठी माणूस अन्वय नाईक ह्यांच्या आत्महत्येची चौकशी करून दोषीला अटक करणे.
अजुन अनेक
20 Jan 2021 - 9:45 am | सुक्या
ही सरकार ची कामे आहेत?
(कामणा) वाचता काय रोज?
20 Jan 2021 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वरील कामात अजून एक कामात अॅड करा त्या अर्णव गोस्मावीची ट्याव ट्याव बंद केली. किती तो आक्रस्ताळपणा.
सध्या त्याचा आवाज म्यूट झाला एक चांगलं काम झालं टीआरपी घोटाळा मला वाटतं, ही नवी माहिती जनतेला मिळाली. :)
-दिलीप बिरुटे
20 Jan 2021 - 10:08 am | श्रीगुरुजी
राऊतची बेताल ट्याव ट्याव प्रचंड वाढली, हे अजून एक काम अॅड करा.
20 Jan 2021 - 10:54 am | सॅगी
राऊत आणि अर्णब हे एकाच माळेचे मणी आहेत, दोघांचीही ट्याव ट्याव बंद झाली तर अतिउत्तम होईल.
20 Jan 2021 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१) मा.सैनिक, विधवा, यांच्यासाठी घरपट्टी माफ २) शिवभोजन थाळी रुपये पाच ३) शेतक-यांना आठतास वीज मिळावी यासाठी कृषीपंप जोडणे.४) धानउत्पादकांना सातशे रुपये क्विंटल प्रोत्साहन योजना ५) सिंधुदुर्गात पाचशे खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय ६) नोव्हेंबरापासून कापूस खरेदी केंद्र सुरु .. ७) हेक्टरी शेतक-यांना आर्थिक मदत. असे बरेच कामं आहेत.
बाकीचे सर्व घेतलेले निर्णय इथे आहेत.
-दिलीप बिरुटे
19 Jan 2021 - 2:02 pm | श्रीगुरुजी
मागील १० महिन्यात मुख्यमंत्री १० वेळा सुद्धा घराबाहेर आलेले नाहीत. सर्व कामे ठप्प आहेत. एक मंत्री २ वर्षे तुरुंगात राहून जामिनावर बाहेर आहे, एका मंत्र्यांने मागितलेल्या खंडणीमुळे एका व्यावसायिकाला आत्महत्या करावी लागली व तोच मंत्री आपल्यावर टीका करणाऱ्यांंना घरी पकडून आणून मारहाण करतो, अजून एक मंत्र्याची कबुतरबाजी नुकतीच बाहेर आली, अजून एका मंत्र्याचा जावई अंमली पदार्थांच्या विक्रीत सापडून तुरुंगात आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांंना घरी जाऊन बदडले जाते. हे सर्व बदनाम मंत्री अजून मंत्रीपदावर विराजमान आहेत.
२०२०-२१ शैक्षणिक वर्ष अजून सुरू झाले नाही. ११ वी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अजूनही संपलेली नाही व त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नाही. कोणत्याही अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा झालेली नाही. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली. एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष पूर्ण वाया गेले आहे व पुढील वर्ष सुध्दा वाया जाण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक परिस्थिती सुद्धा ठप्प आहे. चित्रपटगृहे, पर्यटनस्थळे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अजूनही बहुतांशी बंद आहेत.
आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन शक्यतो लवकरात लवकर परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही योजना नाही. केवळ आला दिवस ढकलणे सुरू आहे.
19 Jan 2021 - 1:29 pm | कानडाऊ योगेशु
ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचे विश्लेषण कुणी देईल का?
सामनातील लेखानुसार महाआघाडी स्पष्टपणे जिंकली आहे.(मटामधील बातमीनुसार. सामना वाचत नाही पण अलिकडे मटामध्येच सामना मध्ये काय बातम्या आहेत ह्याच्या बातम्या असतात.)
19 Jan 2021 - 1:45 pm | श्रीगुरुजी
आपणच जिंकलो असा चारही पक्षांचा दावा आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विश्लेषण करण्यासारखे काहीही नसते. उमेदवाराच्या वैयक्तीक संपर्कावर मते मिळतात. येथे पक्षाचा संबंध नसतो.
19 Jan 2021 - 1:48 pm | सॅगी
पक्षनिहाय आकड्यांनुसार, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
बाकी सामनाचे मालक, महाआघाडीच्या टोळीचा एक भाग असल्याकारणाने, सामनातील लेख आणि बातम्या त्याच टाईपच्या असणार, त्यामुळे....
19 Jan 2021 - 6:42 pm | बाप्पू
महाविकास आघाडी ने या निवडणुका युती करून लढवल्या होत्या का??
नसेल तर हा विजय महाविकास आघाडीचा कसा काय असू शकतो?? पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधात लढायचे आणि नंतर रिजल्ट आल्यावर तिघांची बेरीज करून हा आमचा विजय आहे म्हणायचे हे थोडं विचित्र आहे..
19 Jan 2021 - 6:49 pm | श्रीगुरुजी
सर्वच पक्ष सोयिस्कर युती करतात.
उदाहरणार्थ चंद्रकांत पाटलांच्या गावात भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी युती केली होती. तरीही पराभव झाला.
19 Jan 2021 - 5:51 pm | मुक्त विहारि
https://navbharattimes.indiatimes.com/state/maharashtra/other-cities/a-1...
एक वर्ष होत आले तरी, नंतरच्या बातम्या नाहीत.
19 Jan 2021 - 7:00 pm | Rajesh188
फक्त एवढाच अर्थ घ्यायचा ग्रामपंचायत निकाला वरून की.
तिनी पक्ष एकत्र आली तर bjp ची हार पक्की आहे.
जवळ जवळ 9000 ग्रामपंचायती तिन्ही पक्षा कडे मिळून आहेत .
आणि BJP कडे फक्त 3100 की 3200.
19 Jan 2021 - 7:03 pm | बाप्पू
भाजप हरणार he दिसताक्षणी तुम्हाला आनंदाच्या उकळ्या च फुटतायेत जणू..
19 Jan 2021 - 7:17 pm | श्रीगुरुजी
ग्रामपंचायत निवडणुक निकालांचा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी कणभरही संबंध नसतो.
19 Jan 2021 - 7:25 pm | मुक्त विहारि
कारण, मतांचे विकेंद्रीकरण, हळूहळू होत आहे.
शिवाय, भाजपला हरवायचे असेल (जनता गेली खड्ड्यात), तर, एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्टरवादी कॉंग्रेस, ह्या तिघांनाही माहिती आहे.
ही निवडणूक, पुढील निवडणूकीत आपापसातील जागा वाटपासाठी लिटमस टेस्ट होती.
19 Jan 2021 - 8:07 pm | श्रीगुरुजी
पुढील विधानसभा निवडणुक २०१९ प्रमाणेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप-सेना अशीच होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप विरूद्ध सेना अशीही थोडी शक्यता आहे. भाजप सेनेशी पुन्हा एकदा जमवून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडली तर आम्ही पाठिंबा देऊ, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर सांगितले आहे. ऑक्टोबर मध्ये फडणवीस व संजय राऊत यांची तब्बल दोन तास चर्चा झाली. एकंदरीत सेनेला पाठिंबा देऊन सेनेकडे अजून काही काळ मुख्यमंत्रीपद ठेवावे अशा वाटाघाटी सुरू आहेत.
परंतु काहीही झाले तरी व कशीही आणि कधीही निवडणुक झाली तरी पुढील निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष असेल हे नक्की.
19 Jan 2021 - 8:09 pm | मुक्त विहारि
असे झाले तर, भाजपचा मतदार, भाजपला मतदान करणार नाही.
19 Jan 2021 - 8:45 pm | श्रीगुरुजी
फडणवीसांच्या ५ वर्षातील काही अत्यंत चुकीच्या निर्णयांंमुळे भाजपच्या काही मतदारांनी २०१९ मध्येच भाजपला मत दिले नव्हते. त्यामुळे सेनेबरोबर युती करूनही २०१४ च्या तुलनेत भाजपची मते कमी झाली व जागाही कमी झाल्या. आता परत सेनेशी युती केली तर भाजप महाराष्ट्रात संपेल.
19 Jan 2021 - 9:48 pm | कानडाऊ योगेशु
मुळात भाजपला एका मेकओवरची गरज आहे.शरद पवार व अजित पवार ह्या काका पुतण्यांनी फडणवीसांना अक्षरशः मूर्ख बनवले.पुन्हा तोच चेहरा घेऊन समोर जाणे हि फार मोठी जोखीम ठरेल.
19 Jan 2021 - 10:12 pm | श्रीगुरुजी
+ १
फडणवीस व चंद्रकांत पाटील या दोघांची भाजप मतदारांमध्ये सुद्धा खूप नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजपने या दोघांऐवजी नवीन नेते निवडले तरच महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबेल.
19 Jan 2021 - 10:56 pm | Rajesh188
अर्णव आणि कंगना ला उघड समर्थन देण्या मुळे जे पाहिले bjp चे मतदार होते ते पण bjp पासून दूर गेले .
राम कदम चे माकड चाळे महाराष्ट्र मधील जनतेला आवडले नाही.
आघाडी सरकार चा विरोध करता करता आपण महाराष्ट्र चाच विरोध करत आहोत हे bjp च्या लक्षात आले नाही.
ज्या सुशांत साठी bjp नी महाराष्ट्र ची बदनामी केली त्या प्रकरणाचं तपास cbi नी करून सुद्धा मुंबई पोलिस चुकीचे होते हे दाखवता आले नाही.
त्या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही पण महाराष्ट्र ची बदनामी मात्र bjp नी केली .
आणि त्याचा दूरगामी परिणाम नक्कीच होणार आहे
19 Jan 2021 - 11:18 pm | बाप्पू
सहमत.
एरवी फडणवीस मला धुरंधर राजकारणी आहेत असे वाटायचे पण तो फासलेला पहाटेचा शपथविधी पाहिल्यानंतर माझे मत थोडे बदलले.
चंद्रकांत पाटील फक्त मराठा नेतृत्वाच्या चेहऱ्यासाठी पक्षात घेतले आहेत असे वाटते. त्यांच्यात ना आक्रमक पणा ना सडेतोड उत्तर देण्याची ताकद. कोल्हापूर वरून निवडणुकीत उभे राहिले असते तर निवडून येणे अवघड होते. किंबहुना ते पडलेच असते. जनतेमध्ये तेवढा रोष होता हे नक्की ( कारण कोल्हापूर मध्ये पूरपरिस्थिती गंभीर असताना BJP च्या नेत्यानीं केलेले दुर्लक्ष ). .. त्यामुळेच पुण्याच्या सेफ जागेतून निवडणूक लढवली. पण असे करताना पुण्यात ज्यांनी इतकी वर्षे कष्ट घेतले त्यांच्यावर अन्याय झाला हे नक्की.
रावसाहेब दानवे बद्दल तर न बोललेलंच बरं. पूर्णतः वाचाळवीर माणूस. कसा काय प्रदेशाध्यक्ष आहे कुणास ठाऊक. यांच्या घरातील भांडणामुळे औरंगाबाद ची सीट विधानसभा निवडणुकित हरले. अन्यथा तिथे युतीची ( शिवसेनेची ) सीट आली असती.
विनोद तावडे कुठेही दिसत नाहीत.
एकनाथ खडसे यांच्यासारख्या व्यक्तीस पक्ष सोडण्याची वेळ का आली हे देखील समजले नाही. शेवटपर्यंत त्यांनी विचारले की माझा गुन्हा काय पण कोणाकडूनच उत्तर आले नाही. शेवटी त्यांनी NCP ची वाट धरली. पण खरे सांगायचे तर त्यांनीच विदर्भात पक्ष उभा केला.
त्यांच्यावर MIDC जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप होता. पण असे आरोप सर्वच पक्षात कितीतरी नेत्यांवर आहेत. त्यामुळे कोणी त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागवत नाही.
मुनगंटीवार त्यातल्या त्यात थोडे बरे वाटतात. पण त्यांना तितके फुटेज मिळताना दिसत नाही.
BJP म्हणजे फडणवीसआणि फडणवीस म्हणजेच BJP he जे काही समीकरण बनले होते ( अजूनही आहे ) ते येणाऱ्या निवडणुकीत BJP साठी घातक ठरेल यात शंका नाही.
BJP मध्ये मेकओवर होणे गरजेचे आहे.
19 Jan 2021 - 11:43 pm | श्रीगुरुजी
स्पष्ट सांगायचं तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे राऊत आहेत (अत्यंत वाचाळ, बेतात वक्तव्ये, फुशारक्या, उद्या म्हणे ते कसलातरी गौप्यस्फोट करणार आहेत) आणि फडणवीस भाजपचे शरद पवार आहेत (अत्यंत विश्वासघातकी, सहकाऱ्यांना संपविणे, भ्रष्टांंना संरक्षण, सत्तेसाठी काहीही करायला तयार इ.). या दोघांना मोदी-शहांनी का मुक्तहस्त दिला आहे ते समजत नाही. हे दोघे भाजपला संपविणार.
20 Jan 2021 - 9:27 am | अमरेंद्र बाहुबली
कानडाऊ योगेशू सहनत +१
19 Jan 2021 - 9:55 pm | सॅगी
जोवर काँग्रेस अस्तित्वात आहे तोवर भाजपही राहणार हे नक्की, त्यामुळे भाजप महाराष्ट्रात (फॉर दॅट मॅटर, देशात) संपेल असे काही वाटत नाही.
19 Jan 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि
राष्ट्रवादीला मरण नाही
नंतर मात्र, पक्ष फुटणार
19 Jan 2021 - 8:21 pm | Rajesh188
पक्षांची नाव वेगळी असली तरी सर्वच राजकीय पक्षांची सत्ता राबवण्याची कार्य पद्धती थोडीफार फरकाने एक सारखीच असते.
स्वतःचे पोट भरणे,कार्यकर्ता ची सोय करणे.
हे सर्वच करतात.
जास्त यश मिळाले की बेधुंद सर्वच पक्ष होतात.
हीच धुंदी उतरवण्यासाठी बदल आवश्यक असतो.
Bjp धुंदीत होती तिला जमिनी वर आणणे गरजेचं होते.
बाकी कोणत्याच पक्षाला शत्रू समजण्याचे कारण नाही.
सर्व च आपले आहेत.
19 Jan 2021 - 8:49 pm | Rajesh188
जागृत जनताच सुशासन निर्माण करू शकते.
फक्त राजकीय पक्षांच्या भरवशा वर सुशासन येणार नाही.
जिथे सरकार चुकेल तिथे जागृत जनता असेल तर लगेच विरोध होईल .
आणि सरकार नेहमी दबावात राहील.
आपल्या जे चुकीचं घडते त्याला राजकीय पक्ष च जबाबदार आहेत असे ठरवले की आपण नामानिराळे राहण्यास मोकळे.
असेच माझे मत आहे.
19 Jan 2021 - 11:08 pm | Rajesh188
Caa ला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत ही चाल थोडीफार यशस्वी झाली पण शीख शेतकऱ्यांना खलिस्तानी ,अतिरेकी ठरवणे लोकांना बिलकुल आवडले नाही.
शीख लोक देशद्रोही आहेत हेच कोणाला पटणार नाही.
जेव्हा bjp ल जाणवले शीख लोकांना देशद्रोही म्हणणे आपल्यावर च उल्टेल तेव्हा आंदोलन कर्ते खलिस्तानी आहेत हे सांगणे bjp ni बंद केले.
देर से आये मगर सही आये.
पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती.
20 Jan 2021 - 8:42 am | सुखीमाणूस
भा़जपाचा कौन्ग्रेस् किवा राष्ट्रवादी केला फडणवीस यानी..
माझ्यामते फडणवीस राजकारण खेळले जे अयश्स्वी झाले हे दुर्दैव..शेवटी जो जीता वही सिकन्दर
शिव्सेनेचा धाकटा भाउ म्हणुन कायम रहाणे भाजपासाठी उपयोगाचे नाही. कारण देश स्तरावर 'एक देश एक भाषा' एत्यादी भुमिका घ्यायची वेळ येणार तेव्हा कायम त्रास होणार. (नोटाबन्दीच्या वेळेला सर्वात जास्त टिका शिवसेनेने केली)
त्यांमुळे खरतर यापुढे भाजपाने भले सत्तेबाहेर रहावे लागले तरी चालेल पण भलत्या युती नको असा बाणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवावा.
फडणविसाना बर्याच त्रासाचा सामना करावा लागला.
मराठा मोर्चा द्वारे दबावाचे राज़कारण झाले
आरे प्रकरण (लवासा ऐशो आरामसाठी झाली तेव्हा कुठे होते पर्यावरण वादी? मेट्रोमुळे मुम्बैतल्या सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर होते आहे)
अम्रुता फडणविस याना ट्रोल करणे
महाराष्ट्रातील गडावर हेरीटेज हौटेल चालु करण्याचा निर्णय व्यवस्थित पणे भान्डवल करुन फडणविस कसे खलनायक आहेत ते रन्गवले गेले.
शिव्सेनेने युति केवळ मोदी वलयाचा लाभ मिळवायला घेतली.प्रत्यक्श मात्र त्यान्चे लोक विरोधी प्रचार करत होते. अगदी चन्द्रकान्त पाटील बाहेरचे आहेत त्याना मत देउ नका असे कोथरुड मध्ये सन्गितले जात होते.
अदानी आणि अम्बानी आहेतच हक्काचे बी जे पी साठी प्रगती दाखवायला आणि विरोधकान्साठी जनतेला भीती दाखवायला
फडणविसाना ना घराण्याची पार्श्वभुमी ना जातिचा (अल्प्सन्ख्य असल्यामुळे) उपयोग
पवार कायम फडणविसान्चा उल्लेख पेशवे असा करतात. यापुर्वी कधी नव्ह्ता एवढा पेशव्यान्चा इतिहास जागवला गेला. पेशवे कसे वाइट राज्यकर्ते आहेत याचा मुद्दाम प्रचार झाला (जरी आता त्यान्चा कोणी वन्शज राज्कारण किवा प्रसिद्धि मागे नाही). फडणविस पेशव्यान्चे वन्शज असल्यासारखे चित्र रन्गवले गेले (कायप्पा इ)
एवढे सगळॅ चालु असताना फडण्विसानी कम्बर कसली आणि बहुमताने निवडुन् येण्यासाठी जो काही आटापिटा केला तो फसला एवढ नक्की.
भारतातल्या प्रत्येक राज्यातली समीकरणे निराळी आणि गणिते वेगळी. आपण बिन पैशाचा तमाशा मस्त पैकी पहायचा......
20 Jan 2021 - 6:04 pm | कपिलमुनी
खा केळ !
20 Jan 2021 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेने काँग्रेस आणि राकॉशी केलेली युती अनेकांना त्रासाची वाटते. भाजपाबरोबर यूती केली असती तर मग लै भारी वाटले असते. आपापला एक विचार असतो. मागील पाचवर्षात भाजपाने शिवसेनेचा केलेला सारखा अपमान. आणि त्या बदल्यात भाजपाला शिवसेनेने दिला धडा, हिशेब महाराष्ट्राच्या आयुष्यात भाजपा विसरु शकणार नाही. लैच जबरा धक्का दिला. अनेकांना ते रुचणार नाही. मागील सरकारने ''अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल'' अशा गोळ्या महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या. आता महायुतीचं सरकार, हळुहळु आपल्या पद्धतीने काम करीत आहे. करोना काळात मुख्यमंत्र्याचं आपल्या माणसाने केलेला सुसंवाद अनेकांना आश्वासक वाटला. करोनाकाळात परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. दिव्या बत्तीच्या भरवशावर न राहता लोकांना काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठीची एक आश्वासक मांडणी सरकारने केली. सरकार उत्तम काम करीत आहे, असे वाटते.
बाकी चालू द्या.
-दिलीप बिरुटे
20 Jan 2021 - 10:04 am | सुबोध खरे
सरकार उत्तम काम करीत आहे ?
एवढे सगळे फुटकळ निर्णय तर राज्याचे सामान्य प्रशासन( सचिव अधम किन्वा अंडर सेक्रेटरी) सुद्धा घेऊ शकते.
प्रशासनात काम केले असेल त्याला हे सहज लक्षात येईल.
साध्या मेट्रो कारशेडचं निर्णयात किती नाचक्की झाली आहे हे याचे या निर्लज्ज लोकांना काहीही घेणे देणे नाही.
ज्या निर्णयामुळे राज्याचे काही हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल( दर डोई ४०० रुपये महाराष्ट्रातील जनतेला भरायला लागतील) तो केवळ आपला अहंगंड सुखावण्यासाठी घेतला. जी जमीन दुसऱ्याची आहे त्याने ती तिसऱ्याला( शापूरजी पालनजी) ला विकास करण्यासाठी दिल्याचे शपथपत्र केल्यावर केंद्र सरकारने त्यावर आक्षेप घेऊन प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कल्याणकारी राज्याच्या उप जिल्हाधिकाऱ्याने हि जमीन MMRDA ला दिल्याचे पत्र जरी केले.
शेम्बड्या पोरालाही समजेल कि इतकी बेकायदेशीर गोष्ट न्यायालयात एक दिवस ही टिकणार नाही.
आता नवीन जमीनीच्या शोधात आहेत. मुंबई मेट्रोचा पूर्ण होण्याचा कालावधी किमान ४ वर्षे पुढे गेला.
खा तुम्ही धूर धूळ आणि आवाज. आम्ही करतो वर्क फ्रॉम होम आणि पितो कोमट पाणी
कुणाच्या बापाची जहागीर?
20 Jan 2021 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून करोनाला पळवून लावण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम आणि कोमट पाणी बरं असावे.
आपल्या गप्पूसेठला कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करायचा नाद आहे, स्वतः स्वदेशी लस टोचून आत्मनिर्भर झाल्याचा इव्हेंट कधी ? की भिती वाटतेय....! ;)
बाकी, काय चाललंय नवीन डॉक्टरसाहेब ?
-दिलीप बिरुटे
20 Jan 2021 - 11:03 am | सॅगी
हे सांगण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री मामुंनाही सतरांदा पत्रकार परिषदा घ्यायचीही गरज नसावी नाही का? तरीही घरी बसुन टिव्हीवर झळकुन चमकोगिरी करायचा नाद काही जात नाही ;)
बाकी, काय चाललंय नवीन प्रा. डॉ. साहेब आपल्या संभाजीनगरात?
20 Jan 2021 - 11:35 am | सुबोध खरे
दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे, मशाल मोर्चे काढून
https://www.bbc.com/news/av/uk-52054745
https://www.france24.com/en/20200318-weapplaud-french-pay-tribute-to-hea...
आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टी जगभर केल्या जातात.
हे आपल्याला ठाऊक नसावे.
आणि एकदा मोदीद्वेषाची झापडे लावली कि ते दिसत नाही किंवा ऐकू सुद्धा येत नाही.
बाकी त्या उपक्रमाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून बऱ्याच लोकांची फार जळजळ झाली होती.
आजसुद्धा याच करोना योद्ध्यांना सर्वप्रथम आणि मोफत लस देण्यात येत आहे.
नुसते थाळी वाजवण्याबद्दल शिमगा करणारे लोक याबद्दल एक चकार शब्द काढत नाहीत (ते नैसर्गिक आहे म्हणा)
आता सुद्धा भारत लस बनवण्यात आणि देण्यात सर्वात पुढे आहे
आणि
याचे श्रेय श्री मोदींना मिळणार आहे या भीतीने विरोधकांची गाळण उडाली आहे.
बाकी चालू द्या.
20 Jan 2021 - 12:16 pm | सुक्या
अगदी हेच लिहायला आलो होतो ... नन्तर "झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोन्ग घेतलेल्याला जागे करता येत नाही" हे आठवले. मग तो नाद सोडुन दिला.
बाकी दीवे लावणे, बत्त्या लावणे, टाळ्या वाजवणे हे करोना योद्ध्यांना आणी सीमेवरच्या योद्ध्यांना मानवन्दना देण्यासाठी होते हे गल्लीत सग्ळ्याना माहीत आहे. हे लोक आमच्या सारखे वर्क फ्रोम होम करायला लागले तर आमच्या बुडाखाली फटाके फुटायला वेळ लागणार नाही.
20 Jan 2021 - 4:49 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
20 Jan 2021 - 12:35 pm | पिनाक
त्यांनी आधी लस कशासाठी टोचून घ्यावी? आधी सगळ्या डॉक्टर्स ना (खऱ्यावाल्या), नर्सेस ना, सफाई कर्मचाऱ्यांना, पोलिसांना लस देऊन मग वयोमानाप्रमाणे लस देण्याचं जाहीर झालंय. त्यांच्या वयोमानाप्रमाणे पहिल्या 3 कोटीं नंतर त्यांचा नंबर आहेच. बाकी खास करून कोव्हीशिल्ड ची लस actual virus नसल्याने (आणि वयोवृद्ध लोकांना तीच लावली जाणे अपेक्षित असल्याने) त्यांना धोका नाहीच. तर ते टाळतील कशासाठी? लस दिल्याने धोका असता तर लस नावाची गोष्ट बनवलीच गेली नसती. यव्हढी साधी गोष्ट कळत नाय तुम्हा झंटलमन लोकांना? डॉक्टर काय कॉपी करून झाला का?
21 Jan 2021 - 9:33 pm | पिनाक
आजची बातमी: दुसऱ्या लाटेमध्ये (वयस्कर लोकांना लस टोचण्याची लाट) मोदी स्वतः लस टोचून घेणार आहेत. पहिल्या लाटेत लस टोचून न घेण्यासाठी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार एकाही मुख्यमंत्र्याने लस टोचून घेतली नव्हती. अगदी मी म्हटल्याप्रमाणेच. काही लोकांना नाही त्या कचरा गोष्टी लिहून तोंडावर आपटायची हौसच असते.
https://www.thehindu.com/news/national/pm-modi-cms-to-take-covid-19-jab-...
21 Jan 2021 - 9:37 pm | Rajesh188
पण मोदी वर कोणाचाच बिलकुल विश्वास नाही(फक्त डोळे झाकून विश्वास ठेवतात ते bjp
अंध भक्त सोडले तर)
21 Jan 2021 - 9:45 pm | बाप्पू
हो ना.. अंधभक्त अगदी तसाच विश्वास ठेवतात मोदींवर.. जसा तुम्ही खांग्रेस, आणि NDTV var ठेवता. आणि आता अलीकडे मामु घरबसे यांच्यावर
21 Jan 2021 - 10:50 pm | Rajesh188
वाजपेयी सारख्या महान नेत्या नंतर अडवाणी सारख्या अनुभवी व्यक्ती ला पंतप्रधान पद देणे गरजेचे होते.
पण बिलकुल कुवत नसणाऱ्या मोदी ना पंतप्रधान पदावर बसवून भारतीय जनता पक्षाने
घोडचूक केलेली आहे ह्याची झलक पुढच्या निवडणुकीत तर मिळेलच पण त्या घोडचूक केल्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्ष
परत आपल्या मुळ स्थानावर जाईल.
लोकसभेत फक्त 2 सदस्य.
21 Jan 2021 - 10:55 pm | सॅगी
याच "सो कॉल्ड घोडचुकीला" देशातील मतदारांनी "दोन" वेळा निवडुन दिले आहे बरंका... ;)
बाकी डोळे मिटून दूध पिणे चालु ठेवा. :)
21 Jan 2021 - 11:28 pm | Rajesh188
गळ्याला फास लागतो तेव्हाच भानावर येतात आणि योग्य विचार करूनच मतदान करतात.
जसे अत्यंत कर्तृत्व वान अशा इंदिराजी ना पण आणीबाणी नंतर घरी बसवले होते सामान्य लोकांनी.
22 Jan 2021 - 12:35 am | कानडाऊ योगेशु
महोदय ह्या घटनेचे प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण म्हणुन आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे हो.
22 Jan 2021 - 8:58 am | सॅगी
अगणित घोटाळ्यांमुळे गळ्याला फास लागला होता म्हणूनच मौनमोहन सरकारला घरी बसवले होते सामान्य लोकांनी.. खरंय ना??
22 Jan 2021 - 10:27 am | मराठी_माणूस
कशा मधे ?
21 Jan 2021 - 11:30 pm | श्रीगुरुजी
कितीही दिवास्वप्ने पाहिली तरी ती सत्यात उतरत नाहीत. विश्वास बसत नसेल तर हे वाचा.
https://www.misalpav.com/comment/1091828#comment-1091828
21 Jan 2021 - 10:30 pm | Rajesh188
फडणवीस ह्यांचे मेट्रो बाबत जे निर्णय होते ते बरोबर होते हे BJP चीच ठरवणार का.
ते चुकीचे होते असे खूप लोकांना वाटते
आरे हे राखीव क्षेत्र आहे आणि तिथे कोणतेच व्यावसायिक बांधकाम नको असे मत असणारी लोक सुद्धा आहेत.
आरे हे मुंबई चे फूफुस आहे आहे आणि त्या आरे चे नुकसान हे कृतीम रुपयात करताच येणार नाही.
Bjp आनी फडणवीस जे करतात ते बरोबर च असते ह्याचे मूल्यमापन करूनच ठरवावे लागेल ना
20 Jan 2021 - 12:43 pm | सुखीमाणूस
आमचे एक ओळखिचे सतत कायप्पा वर (फडणविसान्च्या राज्य कार्भारच्या वेळी) गरिबान्चे हाल बघा, शेतकर्यान्चे काय? असे काळजी करत असत. शिवाय अम्बानी च्या नावाने अखन्ड खडेफोड चालुच असायची. मराठी माणुस तर मुम्बैत खुप हालात होता. आणि मुम्बै मध्ये पर्प्रान्तिय खुप शिरजोर होते.
सगळे उद्योग मुम्बै बाहेर् चालले होते. म्हन्टले छान आहे की अपोआप परप्रान्तिय पण गुजरातला जातिल..मुम्बैत शेति व मासेमारी करता येइल. फक्त मराठी रहातील शिवाय मुम्बैच्या पर्यावरणाचा नाश थाम्बेल ते वेगळेच
विकास आघाडी शपथविधीच्या वेळेला त्यान्चा कायप्पा सन्देश होता की बघा गुपचुप रात्रीच्या अन्धारात नाही केला शपथविधी.. कसा समारम्भपुर्वक केला. म्हन्टले अहो गरिबान्चे वाली तुम्ही साधा सोहळा करुन ते पैसे वाचवुन निदान गरीबान्च्या तरी उपयोगि आणायचे...
आणि मधे एकदा मुम्बै इन्डियन्स जिन्कले तर यान्चे स्टेटस--मुम्बै दिल्ली पुढे झुकायची नाही... म्हण्टले अहो मुम्बै इन्डियन् चा मालक अम्बानी, त्यात फक्त चार मराठी खेळाडू आणि तुम्ही कसले नाचताय? अर्थात आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारे असायचेच :))
मोदी चमकोगिरी करत असत्तात त्याचे कारण असावे की लोकान्च्या डोळ्यावर कौन्ग्रेस्स, नेहरु व गान्धी असे झापड आहे. बघावे तिथे विमानतळ,रस्ते व विद्यापीठे यान्चीच नावे. फुकटची आजन्म जाहिरात जणु.. तो पडदा दुर करायचा तर त्याहुन मोठी जाहीरात हवी...मग काय होउदे खर्च :))
20 Jan 2021 - 2:19 pm | Rajesh188
मोदी आल्यापासून.
1) देशातील बेरोजगारी कमी झाली आहे का?
2) देशेतील लोकांचे प्रती व्यक्ती उत्पादन वाढले आहे का?
3) प्रशासन जलद आणि कर्तव्य दक्ष झाले आहे का?
4) लोकांची सरकारी काम कोणत्याही अडचणी न येता सहज होत आहेत का?
5) भारतात दर्जेदार वस्तू चे उत्पादन होवून जगभर भारताची निर्यात वाढली आहे का
6) शेतीचे पाण्याखालील क्षेत्र वाढले आहे का
7), मुंबई मधील रेल्वे चा प्रवास सुख कारक झाला आहे का
8) देशातील गुन्हेगारी कमी झाली आहे का
.
9)कोर्टात न्याय कमी वेळेत मिळू लागला आहे का.
ह्या मधील कधीच मोदी आल्यावर पण झाले नाही.
आतापर्यंत जी सरकार होवून गेली त्या पेक्षा वेगळे मोदी चे सरकार बिलकुल नाही.
मग लोक मोदी म्हणजे युग पुरुष असल्या सारखे त्यांची आरती का उतरत असतात.
बुध्दी भ्रष्ट झाल्यावर असे होवू शकत ते तर कारण नसेल.
20 Jan 2021 - 2:33 pm | सॅगी
१. मोदी येण्याआधी, या देशात हे प्रश्न कधीच नव्हते का?
२. जर नव्हते तर मोदींना एवढ्या बहुमताने का निवडुन दिले देशातल्या जनतेने? तेही दोन वेळा?
हे प्रश्न कधीतरी स्वतःलाही विचारुन बघत जा...
हेच कारण तर नसेल ना मोदींना आंधळा विरोध करण्यामागे?
20 Jan 2021 - 4:48 pm | मुक्त विहारि
राष्ट्र सरकार बाबत नाहीत.