सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
19 Mar 2009 - 5:11 pm | ठकू
वर्षाॠतूच्या आगमनाने राघूही आनंदले आहेत व ही आनंदाची बातमी वनात सर्वांना देण्यासाठी ते घिरट्या मारीत आहेत. झाडेदेखील अतिशय आनंदली आहेत व पक्षांप्रामाणेच त्यांच्याही अंगाखांद्यांवरून पावसाच्या सरी ओघळत आहेत.
पावसाचा इतका वर्षाव झाला आहे की नद्याही सागर भासु लागल्या आहेत. माझ्याही मनाला प्रियकराच्या भेटीची ओढ लागली आहे व या डोंगरवाटा जणु माझ्या मनाचे गुपित ओळखून माझ्या सर्व वाटा वेढून मला माझ्या प्रियकराच्या दिशेने नेत आहेत.
वर्षाॠतूचा ही किमया की पिकांचा मंद सुगंध मला केशाराच्या सुगंधप्रमाणे वाटते आहे. त्या सुवासने मी धुंद असतानाच माझ्यावर माझ्या प्रियकराच्या प्रेमाचा वर्षाव झाला आहे, माझा प्रियकर जणू घन होऊनच मला बिलगला आहे.
19 Mar 2009 - 5:19 pm | राजा
हे अस आहे काय !
धन्यवाद.
19 Mar 2009 - 5:44 pm | ठकू
अगदी असंच आहे असं नाही हो, राजाभाऊ. मी आपला अल्पमतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय.
-ठकू
19 Mar 2009 - 6:20 pm | राजा
अहो हे तरि काय कमि आहे का !
19 Mar 2009 - 10:46 pm | क्रान्ति
छान भावार्थ लिहिलाय. कवितेइत्काच उत्कट!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
20 Mar 2009 - 5:45 pm | अजय देशपांडे
या गाण्याचे चाल छान आहे