भारतातल्या पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे ?

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
24 Apr 2025 - 7:06 pm
गाभा: 

नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत

मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत

पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )

त्याचे मुद्दे
१) सारे जहाँ से असाच हिंदोस्ता मध्ये एक वाक्य आहे " मझ हब नाही सिखाता आपस मे बैर रखना " युद्ध बॉर्डर वॉर चालू आहे ,आपण मात्र पाकड्याम्चे लांगूल पालन करावे
२) मी त्याला हे पण सांगतले कि पाकिस्त्यानी कलाकारांवर पण बंदी आहे उत्तर :- मी बॉलीवूड मध्ये थोडी आहे

म्हणजे देशप्रेम , सैनिक लोकांचे जीव ह्याचे काहीच किंमत नाही ?
ह्यांना कसे बालामृत पाजवावे कि अक्खा भारत देश आपला ,आणि ज्या देशाचे सैनिक आपल्यावर हल्ला करतात ती अक्खा देश शत्रू ?

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2025 - 7:21 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तानप्रेमी मिपाकरांचे काय करायचे?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:29 pm | मुक्त विहारि

आणि

फाट्यावर मारा...

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 7:28 pm | मुक्त विहारि

"इंद्राय स्वा: तक्षकाय स्वा:"

स्वगत.....

"कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ पाचवी ते दहावी पर्यंत शिकवला पाहिजे....

राष्ट्र म्हणजे नक्की काय? ही वैचारिक भूमिकाच जर स्पष्ट नसेल तर, असे उदारमतवादी फितूर इथे तयार होणारच....

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Apr 2025 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली

हे असले अंधभक्तिमय विचार मनुवाद्यांच्या व्हॉट्सअप समूहात चांगले दिसतात. कुणे एकेकाळी मी देखील अंधभक्त असताना असाच विचार करायचो, मी काही दिवसाआधी सरबजीत सिनेमा पाहिला, जसे त्यांचे लोक आपल्याइथे आहेत तसे आपलेही तिथे आहेत, त्यांच्या कैदेत आपलेही लोक आहेत जसे कुलभूषण जाधव वगैरे, पहिली गोष्ट हल्ला हा अतिरेक्यांनी केलाय पाकिस्तानी अधिकृत सैन्याने नाही, अतिरेकी ५ चेकपोस्ट क्रॉस करून आत घुसले नि परत फिरले सुद्धा. इतकी मिठी सुरक्षा यंत्रणेतील आपली चूक आपल्याला दिसत नाही? पुलवामाचे आरडीएक्स भारतात कसे पोहोचले अजून कळलेले नाही. ही माहिती लपवत कोण नी कशासाठी आहे? असे प्रश्न आपल्याला पडायला हवे. मुळात अतिरेक्यांचा हेतूच देशात हिंदू मुस्लिम फूट पडावी असा असेल तर आपण त्याला खटपानी घालत नाही आहोत का? आपल्या सरकारची चूक लपवायला अंधभक्त मैदानात उतरून पाकिस्तानला शिव्या देत आहेत जेणेकरून सरकारला कुणी दोष देऊ नये, पाकिस्तान आहेच हरामखोर देश, आज सत्ता असतानाही त्यांच्या कलाकाराना मोदी सरकार थेट बंदी का घालत नाही? मागे राज ठाकरेंनी ए दिल है मुश्किल ह्या सिनेमात पक्षितानी कलाकार होता म्हणून आंदोलन उभारले होते शेवटी दिग्दर्शकाने ५ कोटी रुपये सैन्य मदत निधीत दिले तेव्हा सिनेमा रिलीज होऊ शकला, शिवसेनेने शारुख खानच्या “माय नेम इज खान” विरुद्ध केवढे आंदोलन उभारले होते? भाजपेयीनी आजपर्यंत असे काही केले आहे का? अनेक पाकधर्जीने लोक हे आज भाजप मध्ये गुण्यगोविंदाने भ्रष्टाचार करताहेत! आहे का त्याना पक्षातून हाकलायची कुणाची हिंमत? त्यामुळे भाजपेयींच्या नादाला लागू नये पाकिस्तान प्रेमींसोबतच ह्या नालायक भाजप सरकारचे काय करावे असाही धागा हवा.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2025 - 8:34 pm | मुक्त विहारि

तुम्ही असेच विनोदी लिहा...

हे असे हल्ले तर पाकिस्तानी सैन्य फाळणी झाली त्या सुमारा पासूनच करत आहे....

असो,

आनंद आहे.....

स्वगत...

बरे झाले की मी, "कौटिल्याचे अर्थशास्त्र" फार आधीच वाचले...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Apr 2025 - 9:27 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आपली गुप्तचर यंत्रणा कमी पडली हे आधी मान्य करायला हवे की नाही?
उगीच् इकडचे डावे,तिकडचे उजवे.. करत बसायचे कारण नाही. भारताचे परराष्ट्र धोरण, कोणत्याही देशाबाबतचे असूद्या, ठोस भूमिका घेणे हे सरकारच्या(आणि काही आधीच्याही) स्वभावात नाही. पॅटर्न ठरलेला आहे. हल्ला झाला की सरकारतर्फे "चोख उत्तर देणार" असा प्रतिसाद आणि समर्थक "पाकड्यांची नांगी ठेचा" म्हणणार महिन्याभरानी दोन्ही देशांचे राजदूत वॉशिंग्टन डी.सी. नाहीतर ब्रूसेल्समध्ये हास्तांदोलन करताना फोटो. मध्यभागी अमेरिकेतर्फे कोणीतरी.
त्यामुळे आधी सरकारीपातळीवर काय बदल होणार हे विचारायला हवे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 9:49 am | अमरेंद्र बाहुबली

+१

प्रसाद गोडबोले's picture

25 Apr 2025 - 11:25 am | प्रसाद गोडबोले

सरकारीपातळीवर काय बदल होणार हे विचारायला हवे.

>>> काहीही नाही. शून्य. सरकारी पातळीवर काहीही बदल होणार नाहीयेत, चार दिवस लोकं भुंकतील, नंतर विसरून जातील.

मुख्य मुद्दा हा आहे की पहलगाम हा पाकिस्तान ने भारतावर केलेला हल्ला नव्हता, हा "त्यांनी" काफिरांवर केलेला हल्ला होता.
त्यामुळे इथे सरकार चा, सरकारी ॲक्शन चा संबंधच नाही , इथे काफिर काय करतात, काफिर काय दीर्घकालीन निर्णय घेतात हे पाहणे रोचक आहे.

प्रश्न पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे असे नसून , परधार्जिण्या आत्मघातकी काफिरांचे काय करायचे हा आहे .

नजीब अब्दालीला एकनिष्ठ आहेच. समस्या अब्दाली नाही, नजीब आहे.
अब्दालीला बोलावणाऱ्या नजीबाला ठेचायला बाजीराव, नानासाहेब, दत्ताजी शिंदे, सदाशिवराव सर्व समर्थ आहेत, प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:30 am | अमरेंद्र बाहुबली

पण ते ५ चेकपोस्ट पार करून २०० किमी आत आलेच कसे नी परत गेलेच कसे? हे सत्य अजूनही बाहेर का येत नाहीये? पुलवामाचेही सत्य अजून बाहेर का आले नाही? अमित शहा नी अजित डोभाल राजीनामा का देत नाहिये?

विजुभाऊ's picture

25 Apr 2025 - 2:33 pm | विजुभाऊ

त्यांच्या राजिनाम्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवला जाईल का

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 2:58 pm | अमरेंद्र बाहुबली

नैतिकता तर पाळली जाईल, तसेही शहा नी डोभाल असे पर्यंत काश्मीर मध्ये पर्यटक सुरक्षित नाहीयेत.

स्वरुपसुमित's picture

25 Apr 2025 - 5:22 pm | स्वरुपसुमित
आग्या१९९०'s picture

25 Apr 2025 - 11:34 am | आग्या१९९०

नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?
सौगात ए रेवडी वाटणाऱ्यांचे हात कलम करून टाका.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 11:49 am | अमरेंद्र बाहुबली

खिक्क!

अगदी योग्य प्रश्न...

आपलेच नाणे खोटे ....

प्रसाद गोडबोले's picture

25 Apr 2025 - 2:05 pm | प्रसाद गोडबोले

आपलेच नाणे खोटे

>>>
करेक्ट !

मला वाटलेलं की माझ्याप्रतीसादवर लोकं विचारातील की आजचे होळकर कोण? कसं ओळखायचं त्यांना ?
पण होळकर वृत्तीच्या लोकांनी स्वतःच प्रतिसाद देऊन स्वतःचे पत्ते उघड केले !

आता मग जर आपल्याला माहिती आहे की आपल्यातच होळकर आहेत, जे भर युद्धातून मागे फिरणार आहेत , तर मग कशाला आपण नजीब अन् अब्दालीचे निर्दालन करायच्या भानगडीत पडायचे ? आपला पानिपतशी संबंध नाही अन् पहलगामशी ही नाही !!

आपण मस्त आपल्या "पुण्यात" राहू सुखाने.

तिकडं होळकर , शिंदे , बुंदेले, गायकवाड, सूरजमल जाट, राजपूत , शीख , त्यांचे त्यांचे बघून घेतील. त्यांना नजीबाने अब्दालीने त्यांना जिवंत ठेवलं काय की बटिक करून ठेवलं काय ? आपण कशाला चिंता करा !!

आपला अब्दालीशी संबंध नाही अन् नजीबशीही नाही अन् होळकरांशी तर मुळीच नाही.

तुका म्हणे उगी राहावे | जे जे होईल ते ते पाहावे ||

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 4:27 pm | मुक्त विहारि

योग्य बोललात...

मुलगी नसल्याने मी पण आता तोच विचार करतो.

आधी मुलगी नाही, ह्याचे वाईट वाटायचे, पण केरळ, अजमेर आणि राजस्थान येथील घटना बघता, मुलगी नाही, ही उत्तम घटना वाटायला लागली आहे...

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Apr 2025 - 1:42 pm | अमरेंद्र बाहुबली

प्रश्न आहे नजीबाला धर्मपुत्र मानून वाचवणाऱ्या होळकरांचे काय करायचे ?

नजीबाचा नी अब्दालीचा बंदोबस्त होळकरांनी लावलाच असता पण भाऊसाहेब पेशव्यांच्या सैन्य घेऊन केल्या गेलेल्या धार्मिक तीर्थयात्रेने घात झाला.

यावर मी खूप मोठा प्रतिसाद टंकलिखित केला होता.पण अशा बीभत्स लोकांना माझ्या प्रतिक्रियेमध्ये म्हणजेच माझ्या विचारात पण स्थान द्यायचं नाही.२६ कुटुंब उद्ध्वस्त झाली,पण सोमिच्या कुंपणवरच्या बडबडीने वातावरण खूप गढूळ झालं आहे.इथ आणखीन थांबणं म्हणजे स्वतःहून संताप..ताप वाढवण्यासारखं झालंय.नकोच हे सगळं.

मुक्त विहारि's picture

25 Apr 2025 - 8:45 pm | मुक्त विहारि

तुम्ही इतक्यात त्रासलात?

तक्षशिला ते उदय प्रताप कॉलेज, हेच तर सुरु आहे.

स्वरुपसुमित's picture

25 Apr 2025 - 11:15 pm | स्वरुपसुमित

मला व्यनि करा

भीमराव's picture

27 Apr 2025 - 9:31 pm | भीमराव

स्थानिक सपोर्ट शिवाय २०० किलौमिटर आता येऊन हल्ला करणं शक्य ची नाही. सर्व भारतीय सलमानी लोक वाईट नसतीलही. पण इस्लाम धर्म मात्र नक्कीच वाईट आहे. त्यांची तत्वे इस्लाम आणि गैर इस्लाम साठी वेगळी आहेत.

रात्रीचे चांदणे's picture

27 Apr 2025 - 9:36 pm | रात्रीचे चांदणे

काही तरी चूक होतेय असं वाटतंय, हल्ला स्थानिकांनीच केलेला दिसतोय आणि सपोर्ट पाकिस्तानने केलेला असेल.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2025 - 10:51 pm | मुक्त विहारि

आपण इतिहासातून काही शिकत नाही.

हे ट्रोजन हॉर्स, आपलीच मंडळी घेऊन येतात मग ते जयचंद असो किंवा दाऊद इब्राहिम किंवा सूर्याजी पिसाळ...

आपलेच नाणे खोटे...

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2025 - 11:46 am | चौथा कोनाडा

काही बातम्यांनुसार पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक गोष्ट समोर आली आहे. त्यानुसार सध्या पाकिस्तानी सैन्यदलात अधिकारी आणि सैनिक मोठ्याप्रमाणावर राजीनामे देत आहेत. या सगळ्यांना पाकिस्तानी लष्करातील नोकरी तातडीने सोडायची असल्याची बाब समोर आली आहे. एकूण 250 अधिकारी 1200 सैनिकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याची माहिती आहे.

हे सगळे लोक भारतधार्जिणे आहेत अशी चर्चा सुरु आहे.
यांना हाताशी धरून तिठे काही करता येईल का ?

यांना हाताशी धरून तिथे काही करता येईल का?

हो,,,, नक्कीच...पण त्यांना इथे न आणता....

कारण त्याला इतिहास आहे.

१. असे भाडोत्री सैनिक कुठल्याच राष्ट्राचे ईमानदार सैनिक नसतात... इति, कौटिल्य... त्यांचा अनुभव... सिकंदराचे भाडोत्री सैनिक...

२. आझाद हिंद सेनेचे, जपानी सैनिक..

३. पाकिस्तानने पोसलेले अफगाणी सैनिक...

त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा, किती प्रमाणात, केंव्हा उपयोग करून घ्यायचा? हे मोदी सरकार नक्कीच ठरवेल. कदाचित ह्याचा उपयोग, पाक सैन्याचा येडगाव करण्यासाठी पण करेल....

गांधी आणि नेहरू, यांच्या पेक्षा मोदींच्या हातात देश नक्कीच सुरक्षित आहे.....

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 2:29 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यामुळं, ह्या सैनिकांचा कसा, किती प्रमाणात, केंव्हा उपयोग करून घ्यायचा? हे मोदी सरकार नक्कीच ठरवेल.
आपल्या सैनिकांचा कसा वापर करायचा हे मोदी सरकारला सुचत नाहीये, ह्या सैनिकांचा काय वापर करणार?

मुक्त विहारि's picture

29 Apr 2025 - 2:32 pm | मुक्त विहारि

नुकत्याच उघडकीस आलेल्या, भोपाळ स्कँडल बद्दल, तुमचे काय मत आहे?

आग्या१९९०'s picture

29 Apr 2025 - 2:51 pm | आग्या१९९०

बोफोर्स म्हणू नका, २जी म्हणू नका, कॉमनवेल्थ घोटाळा म्हणू नका, सगळीकडे काँग्रेसवरील आरोप निराधार निघाले.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 3:28 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांच्या डिग्र्या खोट्या, आरोप खोटे, विकास खोटा, सुरक्षा खोटी. सगळ काही खोट!

मुक्त विहारि's picture

29 Apr 2025 - 3:42 pm | मुक्त विहारि

बाळा...

मी नुकत्याच झालेल्या भोपाळ स्कँडल बद्दल बोलत आहे...

भोपाळ वायू दुर्घटने बद्दल नाही....

च्यामारी टोपी, यांना तर धड वाचता पण येत नाही... कैसा विपक्ष का नेता banegaa रे तू?????

रात्रीचे चांदणे's picture

29 Apr 2025 - 5:42 pm | रात्रीचे चांदणे

काही बातम्यांनुसार पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक गोष्ट समोर आली आहे
ह्या असल्या सगळ्या बातम्या खोट्या वाटत आहेत. भारतीय मीडिया TRP साठी काहीही करेल.

श्रीगुरुजी's picture

29 Apr 2025 - 6:00 pm | श्रीगुरुजी

सर्व खोट्या बातम्या आहेत. भारतीय माध्यमांइतकी मूर्ख व देशद्रोही माध्यमे जगातील कोणत्याही देशात सापडणार नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Apr 2025 - 6:00 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

Bhakti's picture

29 Apr 2025 - 7:24 pm | Bhakti

+१
याच माध्यमांनी कै.विनय आणि त्यांच्या पत्नीचा पेहलगाममधील शेवटचा रील दाखवला , खुप पसरला.तेव्हा एक रीलस्टार जोडपं पुढे आले आणि म्हणाले "आम्ही जीवंत आहोत,कृपया आम्हाला श्रद्धांजली वाहू नका, मिडिया त्या दुर्दैवी जोडप्याचा पेहलगामचा व्हिडिओ फिरत आहे ते आम्ही आहोत.ही मिडियाची चूक आहे शहानिशा न करता व्हिडिओ पसरवला आहे."
आणि अशा बातम्यांनी लोकांचं अड्रेनाइल वाढत राहतं,माथी गरम राहतात.

पाकिस्तानात सैन्यच देश चालवते.सर्वात मोठ्या पदावरचा अधिकारी १०० कोटींपर्यंतचा 'माल' कमवत असतो असं ऐकलं.असे सर्व अधिकार असताना ते सैन्य अधिकारी कशाला राजीनामे देत बसतील?? प्रश्नच आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Apr 2025 - 8:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"सर्वात मोठ्या पदावरचा अधिकारी १०० कोटींपर्यंतचा 'माल' कमवत असतो असं ऐकलं."
नक्कीच खरे आहे. पाकिस्तानातील ह्या उच्चभ्रू वर्गाचा एक पाय पाकिस्तानात आणि दुसरा अमेरिकेत्/युरोपात असतो.आपल्या येथेही काही निव्रुत्त अधिकार्यांचे अवाढव्य बंगले आणि पार्क केलेल्या जॅग्वॉर्स्/ऑडि गाड्या पाहिल्या की आपले अधिकारीही कमी नाहीत हे कळते.

"काही बातम्यांनुसार पाकिस्तानी लष्करात भूकंप माजवणारी एक गोष्ट समोर आली आहे"
खोटी बातमी आहे.https://www.dawn.com/news/1907153/fact-check-letters-about-mass-resignat...
मात्र अशा ए आय च्या मदतीने बातम्या 'तयार' करणार्या आणि पसार्वणार्याना मात्र सलाम. बातमीतला नंबर्,ईमेल खोटा कशाला देता? तो खरा तरी द्यायचा!!