हा भेदभाव-दुजाभाव का बरं?
कालच "गांधीजयंती" झाली....स्वर्गीय महात्मा गांधी यांच्या विचारमुल्यांबाबत आणि ते महात्मा होते याविषयी माझ्या मनात कोणत्याही शंका नाहीत. पण गांधीजयंती ज्या उत्साहात सर्व देशभर साजरी केली जाते तशाच प्रकारे...विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, किंवा अशा अन्य वीरांना ते Glamour का मिळत नाही? त्यांची देशभक्ति किंवा त्यांचे प्रयत्न हे गांधींपेक्षा कमी होते का? ते गांधीइतके ग्रेट नव्हते का?...
मुळात अशा जयंत्या-आणि स्मृतीदिनाच्या सुट्ट्या देणे हेच माझ्या तत्वात बसत नाही...अनेक सणवार्(अनेक धर्माचे) इथे साजरे होत असल्याने आधीच कामाचे असंख्य तास फुकट जातात पण मग जर सुट्ट्या द्ययच्या असतील तर केवळ एकाच व्यक्तिच्या जयंती आणि स्मृतीदिनाच्या का बरे? तुम्हाला हा दुजाभाव आहे असं वाटत नाही का?
पर्याय दोन आहेत
१) सगळ्याच स्वातंत्रवीरांच्या जयंती आणि स्मृतीदिनाच्या सुट्ट्या कायम्च्या रद्द करणे ( उलट त्यांच्या दिव्य स्मृतीला स्मरुन त्या दिवशी अधिक तास प्रामाणिकपणे काम करणे)
२) एकूणएक स्वातंत्रवीरांच्या जयंत्या आणि स्मृतीदिनी सुट्ट्या जाहीर करुन सेक्युलर राष्ट्र असल्याचा दावा सिध्द करुन कोणाच्याही बाबतीत दुजाभाव न करणे.
........कदाचित माझे मत हे अतिशयोक्तीचे असुही शकेल पण तुम्हाला काय वाटतय?
वाचन
4661
प्रतिक्रिया
0