स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे
दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमचे पूर्वाग्रह पक्के आहेत
बाप्पू
हम्म. टंकनसुख घेणारे येतीलच
मला वाटतं....
नेतृत्व
मग काय औ'बाद राजधानी परभणी,
स्वतंत्र विदर्भ मुद्द्यावर
बच्चू कडू सारख्यांनी हे आंदोलन हातात घेतले तर विदर्भ होणे
मंदार भाऊ, तुमचा खुलासा वाचुन
सविस्तर उहापोह झाल्यास काहीतरी उत्तम चर्चा होऊ शकते
सोन्या बापु - विदर्भा वर
एक मिनिट!
विकास कार्यात जर
राज्यकर्ते म्हणजे कोण? आमदार
खल्लास प्रतिसाद. _/\_
शेवटच्या वाक्यावरुन पुढे
चंद्रपुर ची पुर्ण वीज
मग हे ८० आमदार काय उपटत बसतात
सोन्याबापु,
दुसर्या कोणामुळे मागे राहिलो
असला नाकर्ता भाग कशापायी
कर्ता भाग कशापायी ठीवाता मंग
म्हुनस म्हन्तोय मी
नेते नाकर्ते आहेत हो जनता
विदर्भातले नेते नाकर्ते आहे त
अहो असले नाकर्ते नेते जनता च
महारष्ट्रात विजेचे वांदे
घेत का नाही
मंदार भालेराव, थोडिशी माहिती घ्या.
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध
आज भारतात भरपूर वीज उपलब्ध
जाता जाता
चुकीच्या मुद्द्यावर वादविवाद
डांगे साहेब
पुलंची आठवण
ते पुलंचेच वाक्य आहे. ( आम्ही
अवांतर - संत्री आणि वाळ्याचे तट्टे?
जरा हलक घ्या ना बाप्पा
१००% सहमत..
बाप्पु जबरदस्त प्रतीसाद
विदर्भात नैसर्गीक स्त्रोतांचा
पार्शियली एग्रीड हाओ चिनार
विकास कार्यात जर
सोन्या बापु - माझा युक्तीवाद
बच्चू कडु सेन्सेशनलिस्ट आहे!
स्वतंत्र विदर्भ तर कराच, पण
नागपुर ची मेट्रो घोषीत केल्या
मी काय म्हणतो?
नक्की?
१००%